ताज्या घडामोडी - भाग १९
नववर्षाच्या सुरवातीला ट्रंपने पाकिस्तान बद्दल अत्यंत परखड ट्विट केल्यानंतर लगेच अमेरिकेने पाकिस्तानला देण्यात येणारी २५.५ कोटी डॉलर्सची मदत रोखण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रंप अध्यक्श असेपर्यंत भारताने अमेरिकेच्या माध्यमातून पाकिस्तानवर दडपण आणून दाऊद, हाफिज सईद इ. अतिरेक्यांना आपल्या हवाली करण्यास लावावे.
http://m.indiatoday.in/story/after-donald-trump-tweet-us-blocks-military-aid-to-pakistan/1/1121799.html
१. “Nobody, including our ancestors, in written or oral, have said they saw an ape turning into a man,”यात काय चूक आहे? माकडापासून उत्क्रांती होऊन माणूस झाला असे आपले पूर्वज म्हणाले होते का?२. “No books we have read or the tales told to us by our grandparents had such a mention,”यात काय चूक आहे? माकडापासून उत्क्रांती होऊन माणूस झाला असे आपले पूर्वज म्हणाले होते का?३. “Darwin’s theory (of evolution of humans) is scientifically wrong. It needs to change in school and college curriculum. Since the man is seen on Earth he has always been a man,”डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांतावर अनेक शास्त्रज्ञांनी आक्षेप घेतलेला आहे. हा सिद्धांत वादग्रस्त असून जगन्मान्य नाही. त्यामुळे वरील वाक्यात आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही. (बादवे, माकडापासून माणूस झाला असेल तर अजून माकडे अस्तित्वात कशी?) असो.असा माणूस जर HRD राज्यमंत्री असेल तर देशाला शिक्षणामध्ये नवीन दिशा देण्याऐवजी त्याची दुर्दशाच करू शकतो. एका माजी IPS अधिकार्याकडून असे statement यावे हे तर दुर्दैवी आहे. मोदी नि अश्या यडछांप लोकांना मंत्रिमंडळातून कडून टाकल पाहिजे किंवा त्यांना दुसर खात ज्यामध्ये त्याचं expertize आहे असे खाते दिले पाहिजे.जे सत्य आहे तेच सत्यपाल सिंह यांनी बोलून दाखविले आहे. त्यांच्या बोलण्यामुळे शिक्षणाची दुर्दशा कशी होईल? माकडापासून उत्क्रांती होऊन माणूस झाला असे आपले पूर्वज म्हणाले नव्हते आणि तेच त्यांनी सांगितले आहे. डार्विन सिद्धांत वादग्रस्त आहे. त्यावर अनेकांनी आक्षेप घेतलेले आहेत. त्यावर बोलणे हेसुद्धा चुकीचे नाही. ते केवळ मोदी मंत्रीमंडळात आहेत व आपल्याला न आवडणारे ते बोलले आहेत म्हणून लगेच त्यांना काढून टाकण्याची मागणी करणे हे असहिष्णुतेचेच लक्षण आहे.अरेरे काय हे...मोदी सरकारची अनेक चांगली कामे आहेत त्याचे समर्थन आपण करू शकता ना. चुकीच्या विधानांची कशासाठी समर्थन करायचे.त्यांची विधाने चुकीची आहेत हे कधी सिद्ध झाले किंवा हे कोणी ठरविले? डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धात हा वादग्रस्त असून त्यावर मतभेद आहेत व त्याला जगन्मान्यता नाही. ज्या विषयाला एकापेक्षा जास्त बाजू आहेत त्यावर कोणत्यातरी एका बाजूने बोलणे हे चुकीचे विधान कसे?त्यांची सर्व वाक्ये एकत्र घेवून वाचा प्रत्येक वाक्य आणि शब्द वेगळे घेवून न्हवे. त्यांचा सांगण्याचा हेतू असा होता कि आपल्या पूर्वजांनी वेदामध्ये उत्क्रांती बद्दल काही सांगितले नाही म्हनुन डार्विन चुकीचा, आपण फक्त आपले पूर्वज वेदात काय म्हणाले तेच सत्य मानायचे. ते असे म्हणतात माणूस हा कधी उत्क्रांत झाला नसून पूर्वीपासून माणूसच आहेआपण फक्त आपले पूर्वज वेदात काय म्हणाले तेच सत्य मानायचे असे ते म्हणालेले नाहीत. त्यांनी सांगितले की आपल्या पूर्वजांनी याबद्दल सांगितलेले किंवा लिहिलेले नाही. ही वस्तुस्थिती आहे व तीच त्यांनी सांगितली आहे.Since the man is seen on Earth he has always been a manयात काय चुकीचे आहे?डार्विन काय म्हणतोय हे या मंत्री महोदयांनी आयुष्यात वाचले नसेल.डार्विन काय म्हणतोय यापेक्षा तो जे म्हणतोय ते १०० टक्के बरोबर आहे का हा मुख्य मुद्दा आहे. समजा मंत्रीमहोदयांनी डार्विन काय म्हणतोय हे वाचलेही नसेल, परंतु जगातील ज्या अनेक शास्त्रज्ञांनी डार्विनचा सिद्धांत मान्य न करता त्यावर आक्षेप घेतले आहेत त्यांनी तरी आपले मत व्यक्त करण्यापूर्वी डार्विनचा सिद्धांत नक्कीच नीट वाचला असेल.त्यामुळे शब्दांचे खेळ करून त्यांना समर्थन देण्याचे काही अर्थ नाही असे वाटते.डार्विनविरूद्ध बोलले म्हणजे लगेच त्यांना मंत्रीमंडळातून काढून टाका अशा मागणीतही काही अर्थ नाही. एकतर त्यांना स्वतःचे विचार सार्वजनिक करण्याचे विचारस्वातंत्र्य आहे, दुसरं म्हणजे त्यांचे हे विचार प्रक्षोभक, बेकायदेशीर इ. नाहीत आणि तिसरं ज्याला एकापेक्षा जास्त बाजू आहेत अशा विषयावर त्यांनी एका बाजूने मत मांडले आहे. त्यांनी स्वतःचे मत मांडले आहे व स्वतःच्या मतामागील कारणमीमांसाही सांगितली आहे. त्यांचे मत वैज्ञानिकदृष्ट्या खोडण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो. त्यावर आभाळ कोसळल्यासारखे लगेच आकांडतांडव करण्याची गरज नाही आणि ते योग्यही नाही. https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/satyapal-singh-opposed-for-claiming-darwins-theory/articleshow/62589415.cms वरील बातमीत लिहिलंय की "उत्क्रांतीच्या सिद्धांतप्रकरणी सत्यपाल यांनी त्यांचं विधान मागे घ्यावं, यासाठी वैज्ञानिकांनी त्यांच्याविरोधात ऑनलाइन मोहीम सुरू केलीय. या मोहिमेत सत्यपाल सिंह यांना खुले पत्र लिहिण्यात आले असून समर्थनासाठी संशोधक, वैज्ञानिकांना सहभागी व्हावे असे आवाहन वैज्ञानिकांनी केले आहे. " ही तर शुद्ध गुंडगिरी आणि झुंडशाही झाली. एखाद्या वादग्रस्त सिद्धांतावर आता मत मांडायचीही चोरी आहे कारण शास्त्रज्ञांना न आवडणारे मत कोणी व्यक्त केले तर लगेच ते अशी मोहीम सुरू करणार. भारतीय वैज्ञानिक इतके बंदिस्त व कोत्या मनोवृत्तीचे असतील असे वाटले नव्हते. सत्यपाल सिंह यांच्यासारख्या सॉफ्ट टारगेट विरूद्ध अशी सवंग मोहीम सुरू करता येईल, परंतु जगातील ज्या शास्त्रज्ञांनी डार्विनच्या सिद्धांताविरूद्ध मत व्यक्त केले आहे त्यांच्याविरूद्ध भारतातील वैज्ञानिक काय करणार? त्यांच्याविरूद्ध अशी मोहीम सुरू करण्याची यांच्यात हिंमत आहे का?सगळं चुकीचं आहे. पूर्ण चुकीचं वाक्य आहे.ते कसं काय?डार्विन काय म्हणतो हे समजावून न घेता त्याचा सिद्धांत पुस्तकातून काडून टाकणे का तर आपल्या पूर्वजांनी हे सांगितलं नाही आपल्या वेदात हे नाही म्हणून. हा भंपकपणा आहे, वैज्ञानिक मतभेद न्हवेत. आणि अश्या शिक्षण मंत्र्याला पदावर राहणे शोभून दिसत नाही. जर त्यांना मंत्रिपद वरून हटवणे अतिशोयक्ती वाटत असेल तर त्याचे खाते बदला, हा उपाय मी सुचवलेला आहे.जो सिद्धांत सर्वमान्य नाही व ज्याच्या सत्यतेविषयी वैज्ञानिकांमध्येच मतभेद आहेत तो पुस्तकात असावा का? हा सिद्धांत आपल्या पूर्वजांनी सांगितलेला नाही हे बरोबरच आहे. अशा वादग्रस्त सिद्धांताविषयी आपले मत व्यक्त केले म्हणून लगेच त्यांना काढून टाकायचे किंवा खाते बदलायचे?मी वैज्ञानिक रित्या त्यांचं वाक्य खोडलेल आहे आणि सनदशीर मार्गाने मागणी केली आहे त्यांना हटविण्याची. माझ्या सारख्या इतर लोकांनी केलेल्या मागणीला गुंडगिरी म्हणणे चुकीचे आहे. सरळ सरळ सनदशीर आणि योग्य पद्धतीने केलेली मागणी आहे.हटविण्याची मागणी सनदशीर आहे तसेच त्यांचे मतसुद्धा सनदशीर आहे. आपले मत व्यक्त केल्यानंतर लगेच "तुमची विधाने मागे घ्या" म्हणून ऑनलाईन मोहीम वगैरे सुरू करणे व दबास आणणे हे माझ्या दृष्टीने गुंडगिरी व झुंडशाहीचे लक्षण आहे. इतर देशातील अनेक वैज्ञानिकांनी हा सिद्धांत मान्य केलेला नाही. त्याविषयी भारतातील वैज्ञानिकांची काय भूमिका आहे? वैज्ञानिकांनी बंदिस्त विचार न करता प्रत्येक शक्यतेचा विचार खुल्या मनाने केला पाहिजे. मुळातच जो सिद्धांत वादग्रस्त आहे त्यावर कोणत्या तरी एका बाजूने मत व्यक्त केल्यानंतर लगेच ऑनलाईन मोहीम वगैरे सुरू करणे याला माझा आक्षेप आहे. असे करण्याऐवजी वैज्ञानिकांनी त्यांचे म्हणणे वैज्ञानिक आधारावर खोडून काढावे. ज्याप्रमाणे इतर क्षेत्रात असहिष्णुतेचा नसलेला बागुलबुवा उभा करून भाजप सरकारविरूद्ध कांगावा केला जात आहे त्यात आता हे वैज्ञानिकही सामील होत आहेत असे चित्र दिसते आहे.सत्तापक्षातील लोकांना उगाच वाद निर्माण करायला आवडतात असं वाटायला लागलाय (अंजिराची झाड, गुरुत्वाकर्षण, उत्क्रांती - अजून काय काय काढतील कोण जाणे!?)सत्तापक्षातील माणसे वाद निर्माण करतात यापेक्षा सत्ताधार्यांच्या विधानामधून विनाकारण नसलेला वाद निर्माण करून राजकीय अजेंडा राबविला जातो असे दिसते.HRD राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी अकलेचे तारे तोडलेले आहेत, त्यांची काही विधानेआधी लिहिल्याप्रमाणे सत्यपाल सिंह यांना स्वतःचे मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांनी व्यक्त केलेले मत कोणत्याही प्रकारे प्रक्षोभक, समाजात दुफळी पाडणारे, घटनाद्रोही, दंगली माजविणारे, एखाद्या जातीधर्माचा अपमान वगैरे करणारे इ. नाही. मुळात जो दावा अजून वैश्विक सत्य झालेला नाही व ज्याविषयी वैज्ञानिकांमध्येच मतभेद आहेत, अशा दाव्यावर कोणत्या तरी एका बाजूने मत व्यक्त करण्याचे विचारस्वातंत्र्य त्यांना आहे. एखाद्याला त्यांचे मत आवडले नसले तरी लगेच "त्यांनी अकलेचे तारे तोडले" अशी टिप्पणी योग्य वाटत नाही.1. We, the scientists, science communicators and scientifically-oriented members of the public, are deeply pained by your claim. It is factually incorrect to state that the evolutionary principle has been rejected by the scientific community. On the contrary, every new discovery adds support to Darwin’s insights.जगातील अनेक वैज्ञानिकांनी डार्विनचा सिद्धांत मान्य केलेला नाही. त्यामुळे सत्यपाल सिंहांनी केलेलं विधान factually correct आहे. विज्ञानात अनेक नवीन सिद्धांत शोधले जातात, काही जुन्या सिद्धांतांना आव्हान देऊन ते अंशतः किंवा पूर्ण चुकीचे ठरविले जाऊ शकतात, काही जुन्या सिद्धांतात सुधारणा केली जाऊ शकते. त्यामुळे जो सिद्धांत वैज्ञानिकांनी अजून निर्विवाद मान्य केलेला नाही त्या सिद्धांतावर कोणी आक्षेप घेतला असेल तर त्यामुळे deeply pained होण्याची गरज नाही. इतका मेलोड्रामा करण्यापेक्षा, डार्विनचा सिद्धांत पूर्ण सत्य असून सत्यपाल सिंहांचे विधान चुकीचे आहे हे विज्ञानाच्या भाषेत सांगितले असते तर ते जास्त योग्य झाले असते.2.Statements such as “humans did/did not evolve from monkeys” is an overly simplistic and misleading representation of evolution.असू शकेल. परंतु शालेय पुस्तकात डार्विनच्या सिद्धांताची माहिती देताना जे चित्र दाखविले जाते त्यात आधी एका माकडाचे चित्र दाखवून ते हळूहळू उत्क्रांत होऊन त्याचे माणसात रूपांतर झाले असे दाखविले जाते. त्यामुळे माकडापासून माणूस झाला असे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबले गेल्यास आश्चर्य नाही. सत्यपाल सिंहांना दोष देण्यापेक्षा पाठ्यपुस्तकातून डार्विनचा सिद्धांत कशा प्रकारे शिकविला जातो याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.3.When a minister working for human resource development in the country makes such claims, it harms the scientific community’s efforts to propagate scientific thoughts and rationality through critical education and modern scientific research. It also diminishes the image of the country at the global level and reduces faith of the international historical research community in the genuine research by the Indian researchers.आक्षेप घेणारा एखादा मंत्री असला तरी, एखाद्या वादग्रस्त सिद्धांतावर आक्षेप घेतल्याने वैज्ञानिक संशोधनाची व विज्ञानाची हानी कशी होईल? आक्षेप घेणारा मंत्री उच्चविद्याविभूषित आहे. ते रसायनशास्त्रात एम.एस.सी व एम.फिल. असून वेगळ्या विषयात एमबीए व पीएचडी आहेत. त्यांना विज्ञानाची थोडीतरी पार्श्वभूमी आहे. जेव्हा जगातील इतर वैज्ञानिक सुद्धा हा सिद्धांत अजून जसाच्या तसा मान्य करीत नाहीत, तेव्हा एखाद्याने (तो मंत्री असला तरी) तसाच आक्षेप घेणे यामुळे विज्ञानाची हानी कशी होणार? इतर वैज्ञानिकांनी आक्षेप घेतले होते तेव्हा विज्ञानाची हानी झाली नव्हती का? या आक्षेपामुळे जगात भारताची प्रतिमा खालावेल हा दावा तर अत्यंत हास्यास्पद आहे. भारतीय वैज्ञानिकांकडून ही अपेक्षा नव्हती. ज्याप्रमाणे एका ठराविक वर्गाने पुरस्कार-परतीच्या मार्गाने आपले राजकीय हिशेब चुकते करण्याचा प्रयत्न केला होता, तसाच प्रयत्न काही वैज्ञानिक करीत आहेत असा संशय येऊ लागला आहे. मागील वर्षी काही वैज्ञानिकांनी सरकारविरूद्ध मोर्चा वगैरे काढला होताच. आता ही पुढची पायरी दिसते.पुढे जायचे की मागे ते ठरवा, डार्विनच्या सिद्धांत नाकारण्यावरून काकोडकरांचा टोलाएखाद्या वादग्रस्त, सर्वमान्य सिद्धांतावर आक्षेप घेण्यामुळे आपण मागे कसे जाणार? न्यूटनच्या काही प्रमेयांवर आइनस्टाईनने आक्षेप घेतले होते तेव्हा जग पुढे गेले होते का मागे? नंतर आईनस्टाईनच्या सिद्धांतावरही आक्षेप घेतले गेले तेव्हाही जग पुढे गेले का मागे? विज्ञान हे कायम प्रवाही असते. ते कायमच पुढे जात असते. पुढे जात असताना नवीन शोध लागणे व मागील शोधात सुधारणा करणे हे स्वाभाविक आहे.रालोआ ऑफीशिअली फुटायला सुरुवात झाली.कधीपासून झालं हे? उद्धटरावांनी काल जाहीर केलं की आम्ही २०१९ ची निवडणुक स्वतंत्र लढणार. पण हेच त्यांनी बरोबर एक वर्षापूर्वी जानेवारी २०१७ मध्येही सांगितलं होतं. आम्ही २५ वर्षे युतीत सडलो असे सांगून मी भविष्यात कोणाशीही युती करणार नाही असे त्यांनी उच्चरवाने सांगितले होते. शिवसेना स्वतंत्र लढणार म्हणजे रालोआ ऑफिशिअली फुटायला सुरूवात झाली असं म्हणायचं असेल तर हे एक वर्षापूर्वीच झालं आहे. अर्थात भाजप असल्या फुसक्या धमक्यांना अजिबात गांभीर्याने घेत नाही. आम्ही पाठिंबा काढणार या शिवसेनेच्या धमकीचे आता शतक व्हायला आले. अजूनही पाठिंबा सुरूच आहे. आम्ही भविष्यात कोणाशीही युती करणार नाही (जानेवारी २०१७), आमचे राजीनामे खिशात आहेत (फेब्रु २०१७), शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी जाहीर केली नाही तर एप्रिलमधील अधिवेशन चालू देणार नाही (मार्च २०१७), एप्रिलमध्ये भूकंप होणार (मार्च २०१७), आम्ही आता निर्णयाच्या अगदी जवळ आलो आहोत (सप्टेंबर २०१७) . . . अशा अनेक फुसक्या धमक्या आल्या आणि विरून गेल्या. कालची नवीन धमकीसुद्धा तशीच विरून जाणार आहे. मुळात भाजप-सेना युती सप्टेंबर २०१४ मध्येच तुटली आहे. विधानसभा व नंतर झालेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमेकांविरूद्ध लढले आहेत. २०१९ मध्ये सुद्धा त्यांच्यात युती होण्याची शक्यता नाही कारण भाजपचा जनाधार सेनेच्या तुलनेत खूप मोठा असल्याचे अनेकवेळा सिद्ध झाल्याने भाजप सेनेला फारश्या जागा देणार नाही व आपणच मोठा भाऊ या भ्रमात सेना अजूनही असल्याने सेना तसे जागावाटप मान्य करणार नाही. भविष्यात युती होणार नाही हे भाजपला पक्के माहित असल्याने ते सेनेच्या धमक्यांना अजिबात गांभीर्याने घेत नाहीत.शिवसेना बर्याच दिवसांनी कौतुकास्पद वागली. सेनेल झाला तर फायदाच होईल. लोकसभेत नुकसान होईल, पण विधानसभेत ते रिकव्हर करता येईल. राणे, खडसे यांच्याबाबत काहि निर्णय होईल आता. मुंबई महानगरपालिकेला उद्धवजी कसे मॅनेज करतील हे मात्र कळलं नाहि.काहीही. सेनेचा मूर्खपणा अजिबात कमी झालेला नाही. आपला जनाधार भाजपच्या तुलनेत खूप कमी आहे ही वस्तुस्थिती मान्य करून युती केली तरच सेनेला फायदा होऊ शकेल. ताकद नसताना स्वबळावर लढण्याचा प्रयत्न सेनेने केला, तर सेनेचा अंत अटळ आहे. विधानसभेत स्वबळावर सेना जेमतेम ६३ जागांपर्यंत पोहोचली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाणे व काही प्रमाणात मुंबईचा अपवाद वगळला तर स्वबळावर लढणार्या सेनेची बहुतेक ठिकाणी वाट लागली. स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तर भविष्यात सेनेचा जनाधार विधानसभा व लोकसभा निवडणुकीतही कमी होणार हे नक्की.अगदी ताणण्याचे ठरवले तरी श्रीमती सोनिया गांधी जिवंत असेपर्यंत तरी त्या शरद पवारांना पंतप्रधानपदासाठी कधीही पाठिंबा देणार नाहीत. शरद पवार हा त्यांच्या चाहत्यांनी अवाजवी फुगवलेला फुगा आहे (ओव्हर रेटेड) असे यावरून सिद्ध होते.+ २० लाख पवारांची इनिंग केव्हाच संपली आहे. दुर्दैवाने ते अजूनही पॅड बांधून, ग्लोव्हज घालून, बॅट हातात घेऊन बसले आहेत आणि त्यांच्या चाहत्यांनाही वाटतंय की ते पुन्हा एकदा खेळपट्टीवर येऊन चौकार-षटकारांची आतषबाजी करतील. ते खेळपट्टीवर असतानाही कुथत खेळत होते. आता तर ते बाद होऊन तंबूत परतले आहेत.