भिमा कोरेगाव ला नक्की काय झाले आहे?
नमस्कार मंडळी
काल कोरेगाव भिमा येथे झालेल्या लढाईला २०० वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्या नंतर तिथे २ गटांमध्ये दगडफेक झाली आणि काही जण म्रुत्युमुखी पडुन वातावरण तंग झाले. मग नगर रस्ता वाहतुकीला बंद करण्यात आला आणि कोरेगाव पार्क, नगर रोड,वाघोलि परिसरात कलम १४४ लावण्यात आले.
दुसरी म.टा. मधील बातमी हे सांगते
https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/prakash-ambedkar-blames-sambhaji-bhide-and-hindu-ekta-aaghadi-for-bhima-koregaon-violence/articleshow/62337263.cms
आज हे लोण पुणे परीसर आणि मुंबई पर्यंत पोचले आहे. शिवाय प्रकाश आंबेडकर वगैरे नेत्यांनी याला दलित-सवर्ण रुप देउन उद्या महाराष्ट्र बंद चे आयोजन केले आहे.
एकंदर प्रकार काय आहे याची कोणाला कल्पना आहे का?
ही बातमी मोगल व भटांना समजताच " गणपत " महार आणि बाकी मंडळीचे "शीर कलम" केलं गेलं व महार जाती ने दिवसा "बाहेर पडण्यास बंदी घातली गेली.....""कमरेला झाडू आणि गळ्यात मडके" अडकवविण्याची "शिक्षा भटांनी" सुनावली. पुढे ही बातमी पुण्यामध्ये सर्वत्र पसरली, लोक ह्या """""गणपत"""" ला वंदन करु लागले. महाराचा देव झाला म्हणुन "भट" चिडले.त्या काळात म्हणजे १६८० मध्ये महार किंवा इतरांना शिक्षा देण्याचे अधिकार भटांना होते का? संभाजी महाराजांनंतर सन १७०० पर्यंत राजाराम महाराज राजे होते व त्यांच्यानंतर १७०७ पर्यंत म्हणजे औरंग्या मरेपर्यंत भोसले घराण्याचीच सत्ता होती. पेशव्यांना अधिकार मिळाले ते १७०८ मध्ये म्हणजे संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर १८ वर्षांनी. म्हणजे महाराष्ट्रात भट व मोगल सत्तेवर नसताना ते महारांना शिक्षा कोणत्या अधिकाराने देणार? समजा अशी शिक्षा दिली असेल तर राजाराम महाराज व त्यांच्या नंतर सत्तेवर आलेल्या ताराबाई व नंतर आलेले शाहू महाराज यांनी ही शिक्षा कशी पुढे सुरू ठेवली? एकंदरीत वरील दावे ही शुद्ध जातीयवादी थापेबाजी आहे.इंग्रज भारतात आले त्यांना पुण्यामध्ये शिरणे शक्य होत नव्हते. पेशवाईच्या विरुद्ध त्यांना यश मिळत नव्हते. हे सर्व एक तरुण पहात होता, त्याचं नाव ""सिध्दटेक महार"" होतं.तो इंग्रजां सोबत "करार करतो" तुम्हाला हे राज्य आम्ही मिळवून देतो पण तुम्ही "आम्हाला मडके आणि झाडू पासून मुक्त" करा. सन्मानाने जगण्याचा आधिकार द्या . इंग्रज त्याची अट मान्य करतात. हाच सिद्धटेक ५०० महार सोबत वढु येथील "संभाजी राजेंच्या समाधीवर जाऊन दर्शन"" घेताे आणि म्हणतो राजे!!!!!!!!!!!"आम्ही तुमच्या खुनाचा बदला घेण्यास निघालो आहोत शक्ती द्या आशिर्वाद द्या. असे म्हणून ह्यापुन्हा एकदा अत्यंत हास्यास्पद आणि जातीयवादी दावे! शिस्तबद्ध सैन्य व तत्कालीन आधुनिक शस्त्रे हाताशी असलेले इंग्रज एका व्यक्तीशी करार करतात ही शुद्ध थापेबाजी आहे. सन १८०० मध्येच जनरल वेलस्लीने खंडाळ्याच्या घाटात महादजी शिंदेंच्या मोठ्या सैन्याला पराभूत केले होते. असे असताना त्यांना पुण्यात शिरणे शक्य नव्हते यावर फक्त मूर्खच विश्वास ठेवू शकतील. दुसरं म्हणजे संभाजी राजेंच्या खुनाचा बदला पेशव्यांविरूद्ध लढाई करून कसा घेता येईल? संभाजी राजांना औरंग्याने हालहाल करून मारले होते. बदलाच घ्यायचा होता तर एखाद्या मुस्लिम राजाचा घेता आला असता. संभाजी राजेच्या १६९० मधील खुनाचा १७०८ मध्ये जन्माला आलेल्या पेशवाईशी काहीतरी संबंध होता का? संत तुकाराम महाराजांचा खून ब्राह्मणांनी केला असा नवा विकृत इतिहास ब्रिगेडींनी लिहिला आहे. आता बहुतेक त्याच धर्तीवर संभाजी राजेंना (त्याकाळी अस्तित्वात नसलेल्या) पेशव्यांनी मारले असा नवा इतिहास इतिहासाचार्य प्रकाश आंबेडकर आणि कंपनी लिहिणार असं दिसतंय."""५०० महारांनी""" """२५००० पेशव्यांना""" संपवून टाकले......२५००० पेशवे? अगदी २०१८ अध्ये सुद्धा सौदी राजघराण्यात सुद्धा २५००० माणसे नाहीत. मग २०० वर्षांपूर्वी २५००० पेशवे कोठून आले? त्याकाळी पुण्याची एकूण लोकसंख्या तरी २५००० असेल का? पेशवे एकच होते व उर्वरीत त्यांची सेना होती आणि त्यांच्या सेनेत सर्व जातींचे सैनिक होते. ५०० जणांनी २५००० जणांना संपविणे म्हणजे प्रत्येकाने किमान ५० जणांना संपविणे. आज भारतात एकच रजनीकांत आहे. परंतु २०० वर्षांपूर्वी पुण्यात तब्बल ५०० रजनीकांत होते असं दिसतंय."""आपल्या लोकांना इतिहासाची माहिती नसणे""" हेच त्यांच्या समस्यांचे एक "प्रमुख कारण" आहे...इतिहासातच रममाण होणे आणि चुकीचा, विकृत आणि जातीयवादी इतिहास शिकणे हीच मुख्य समस्या आहे.मी जेव्हा मराठा लाईट इन्फन्ट्रीचा इतिहास लिहिला, तेव्हा त्यात सुरुवातीलाच म्हटले होते की कोण कोणा विरुद्ध लढले हा या पुस्तकाचा विषय नाही. तर या सैनिकांच्या शौर्याची गाथा हा विषय आहे. येथेही महार शौर्याने लढले... त्याबद्दल त्यांच्या शौर्याचे कौतुकच केले पाहिजे पण आपल्या नालायक राजकारण्यांनी मोठ्या खुबीने त्याला जातीय स्वरुप दिले.थोरल्या आंबेडकरांनीच १९२७ मध्ये या युद्धाला ब्राह्मण वि. महार युद्धात महारांचा विजय असे जातीय स्वरूप देऊन विजय साजरा करण्याची परंपरा सुरू केली. प्रकाश आंबेडकर आता फक्त आपल्या आजोबांचा कित्ता गिरवीत आहेत.मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जो भी कसमे खायी थी हमने, वादा किया था जो मिलके, तुने ही जीवन मे लाया था मेरे सवेरा, क्या तुम्हे याद है... क्या तुम्हे याद है... क्या तुम्हे याद है... :- Raazमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-भिडे गुरुजींविरोधात बोलायची कोणाचीही लायकी नाही- उदयनराजे भोसलेमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-भिडे गुरुजींविरोधात बोलायची कोणाचीही लायकी नाही- उदयनराजे भोसले