Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नीरव मोदी व पी.एन.बी. घोटाळा

म
माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 02/18/2018 - 09:40
🗣 122 प्रतिसाद
गेल्या २५-३० वर्षात बँकांचे बर्याच प्रमाणात संगणकीकरण झाले. त्याने अनेक फायदे झाले. मात्र आर्थिक घोटाळ्याना काही आळा बसतोय असे दिसत नाही. नुकताच उघडकीस आलेला नीरव मोदी-पी.एन.बी. घोटाळा. हिरे/हार दागिने बनवून विकणार्या नीरव मोदी व त्याच्या कंपनीने २०११ पासून एकूण ११,००० कोटी काढले. ह्या बँकेच्या अधिकार्यानी अनेक 'लेटर ऑफ अंडरटेकिंग'(LoU) नि.मो. कंपनीला दिली. त्यानुसार नि.मो.कंपनीने पी.एन.बी. व ईतर काही बँकातून तो पैसा काढला. परतफेड होत नाही हे दिसल्यावर घोटाळा उघडकीस आला. काही पडलेले प्रश्नः १) LoU चा रेकॉर्ड बँकेच्या सेंट्रल डेटाबेसमध्ये नाही असे बँकेने म्हंटले आहे. हे कसे शक्य झाले ? २)swift मेसेजिंग सिस्टिम व नॉस्ट्रो खाते हा काय प्रकार आहे ? सध्यातरी काही अधिकार्याना अटक झाली आहे. पी.एन.बी. चे संचालक सुनिल मेहता ह्यांनी आमची बँक चोख व्य्वहार ठेवते..आम्ही ह्या प्रकरणातून बाहे येवू असे सांगितले आहे. वरकरणी ते म्हणत असले तरी शेकडो कोटींचे कर्ज काढले जाते पण बँकेच्या सर्वोच्च अधिकार्याना ह्याची कल्पना नसते ह्यावर कसा विश्वास ठेवायचा? ED(सक्तवसूली सण्चलनालय) व सी.बी.आय. वगैरे वरातीमागून घोडे असा प्रकार असतो. विजय मल्ल्यासारखाच नीरव आधी पळाला(म्हणजे पळायला लावले) व यथावकाश सी.बी.आय. ने एफ.आय.आर. नोंदवला. आता अपेक्षेप्रमाणे धाडसत्र चालू आहे व 'आम्हाला नाय बुवा माहीत हा नीरव मोदी' असे सांगण्याचा भाजपा व कॉंग्रेसचा प्रयत्न चालू आहे. राहता राहिला शेवटचा प्रश्न- अतिधनाढ्यांच्या यादीत नाव पटकावणार्या नीरव मोदीला एवढे कर्ज काढायची( व तेही अशा मार्गाने) गरज काय?(https://retail.franchiseindia.com/interview/retail-people/profiles/Over-the-next-5-years-we-are-looking-at-over-20-new-boutiques-across-the-globe--Nirav-Modi.i1333/ ) ह्या दोन महिन्यापुवीच्या मुलाखतीत तो जगातील विविध शहरात शाखा उघडण्याबद्दल बोलतोय. मग असे दोन महिन्यात काय झाले ?
वर्गीकरण
घोटाळा

प्रतिक्रिया द्या
53448 वाचन

💬 प्रतिसाद (122)
ग
गामा पैलवान Mon, 02/19/2018 - 14:21 नवीन
अहो माईसाहेब, नीरव मोदींनी घोटाळा केलेला नाहीच्चे मुळी. त्यांनी फक्त चालू तरतुदींचा यथायोग्य वापर केला. हां, थोडा पैसा जरासा इकडेतिकडे झाला असेल, पण नीमोंनी नुकसान भरून द्यायचं कबूल केलंय. ११५०० कोटी रुपयांचा घोटाळा असला तरी प्रत्यक्ष नुकसान कमी असेल. ते नीमो चुटकीसरशी भरून देऊ शकेल. आता मी हे असं का म्हणतोय माहितीये? कारण की सांप्रत बँकिंग हाच एक मोठ्ठा झोल आहे. कसं ते इथे थोडक्यात लिहिलंय. तिथनंच डकवतो :
समजा तुमच्या खिशात ३००० रुपये किमतीचं सोनं आहे. तुम्ही सोनाराकडे गेलात आणि सोनं मोडलंत. सोनार ५० रुपये मोडणावळ कापून २९५० रुपयांच्या नोटा तुमच्या हातावर टेकवेल. तुम्ही त्या नोटा बाजारात किराणा, मीठमिरची वगैरेसाठी खर्च करू शकता. आता समजा तुम्ही बँकर आहात. तुमच्या खिशात ३००० रुपयांचं सोनं आणि सोबत बँकिंग लायसन्स आहे. तर ते सोनं तुम्ही स्वत:च्याच तिजोरीत ठेवून ९७००० रुपयांच्या नोटा छापू शकता. किंवा ९७००० रुपयांच्या ठेवी गोळा करू शकता. या ९७००० रुपयांपैकी सुमारे ५००० रुपये राखीव ठेवून उरलेले ९२००० रुपये कर्जाऊ देऊ शकता. बसल्याजागी पैसे मिळवायचा याहून सोपा उपाय अस्तित्वात नाही.
समजा या ठेवीदारांना तुम्ही ५% व्याजाचा परतावा कबूल केलाय. म्हणून तुम्ही ९२००० रुपये ३०% व्याजाने उद्योजकांना कर्जाऊ देणार. ठीक आहे. बसल्या जागी साधारण २३.४५% फायदा (९७००० रुपये पायाभूत धरून). काय मस्तं धंदा आहे, नाहीका? पण एक अडचण आहे. बघा, जर सगळ्या ठेवीदारांनी एकाच वेळेस तुमच्या बँकेसमोर देणगी परत करायचा तगादा लावला, तर तुमची माईबँक कोलमडलीच, बरोबर? तर हा अनावस्था प्रसंग उद्भवण्यासाठी सगळे ठेवीदार एकाच वेळेस एकत्र येणं जरुरी आहे. मात्र तसं होत नाही म्हणून बँक चालू राहते. आता समजा तुमच्या माईबँकेचं यश बघून गुपचूप पैसा कमावण्यासाठी नीरव मोदी नावाच्या माणसाने नीरव बँक स्थापन केली. तिने फायरस्टार, गीतांजली ज्युलर्स, सोलर एक्स्पोर्ट्स, स्टेलर डायमंड्स वगैरे उद्योजकांना व्याजावर कर्ज दिलं. पण ही बँक नीरव असल्याने तिच्याकडे बँकिंग लायसन्स नव्हतं. म्हणून तिने फक्त एकाच ठेवीदाराकडून ठेवी स्वीकारल्या. त्या ठेवीदाराचं नाव पंजाब न्याशनल ब्यांक अर्थात पन्याब्या. बघा, आता माईबँकेच्या अनावस्था प्रसंगासाठी सगळे ठेवीदार एकाच वेळी एकत्र येऊन ठेवींसाठी धरणं धरायला हवेत. हे जवळजवळ अशक्य आहे. पण नीरवबँकेच्या अपघातासाठी एकमेव ठेवीदार पुरेसा आहे. नेमकं तेच झालं. माईबँकेच्या बाबतीत जरी अनावस्था प्रसंग ओढवला तरी माईसाहेबांनी ठेवीदारांना वचनं देऊन फुटवलं असतं. कारण त्यांच्याकडे बँकिंग लायसन्स आहे. माईसाहेब अधिक ठेवी स्वीकारून अधिक विश्वासार्ह उद्योजकांना कर्जं देऊन, व ती व्यवस्थितपणे वसूल करवून भविष्यकाळात ठेवीदारांच्या ठेवी सव्याज परत करू शकतात. परंतु नीरवबँकेकडे लायसन्स नाही. साहजिकंच पन्याब्यास फुटवणं अवघड झालंय. शेवटी नीरव मोदींवर गुन्हा दाखल होईल तो अनधिकृत व्यवहारांचा असेल. हे व्यवहार ११००० कोटी रुपयांचे व गेले ७ वर्षं चालू असले तरी नीरव मोदींचं प्रत्यक्ष देणं खूपंच कमी असेल. त्याचा बराच मोठा भाग भरून द्यायची तयारी त्यांनी दाखवली आहेच. सांगण्याचा मुद्दा काये की, नीरवने खाल्लं तर शेण आणि पन्याब्यानं खाल्लं तर श्रीखंड. 'हर्षद मेहताने घोटाळा केलेलाच नाही' या १९९२ च्या वेळच्या युक्तिवादाची आठवण झाली. मी काही यांतला तत्ज्ञ नाही. पण म्हंटलं त्याच धर्तीवर हा घोटाळा जमेल तितका तपासून बघूया. म्हणून हा संदेशप्रपंच. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Mon, 02/19/2018 - 17:47 नवीन
विख्यात पत्रकार शेखर गुप्ता यांनी बँकांचे राष्ट्रयीकरण रद्द करावे असे मत व्यक्त केले आहे. हे राष्ट्रीयीकरण इंदिरा गांधी यांनी केले होते. मी, बँकेचा अकाउंट होल्डर या नात्याने मिळणाऱ्या अनुभवा वरून, यांच मताचा झालो आहे. राष्ट्रीयीकरण झालेल्या बॅँकांचे कर्मचारी हे खातेदारांशी सरकारी कर्मचाऱयांच्या सारखे वागतात.त्यांना नोकरीची सुरक्षा आहे आणि काम केले नाही तर जाब विचारणारा कोणी नाही. फोन केला तर उचलत नाहीत आणि उचललाच तर धड उत्तर देत नाहीत. अधून मधून हरताळ करून पगार वाढ ही करुन घेत असतात. या उलट खासगी बॅँकांतील कर्मचारी यांची वागणूक खूप मदत करणारी असते. आपल्या पैकी ज्या कोणाचा आय सी आय सी आय , एच डी एफ सी , कोटक किंवा इतर खाजगी बॅँकांशी सम्पर्क असेल ते माझ्याशी सहमत असतील. बॅँकेच्या कर्मचार्यानी गैर व्यवहार करायचे आणि ते उघडकीस आल्यावर त्या बद्दल सरकारला जबाबदार ठरवायचे, हे बंद झाले पाहिजे.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Mon, 02/19/2018 - 18:53 नवीन
विख्यात पत्रकार शेखर गुप्ता यांनी बँकांचे राष्ट्रयीकरण रद्द करावे असे मत व्यक्त केले आहे. हे राष्ट्रीयीकरण इंदिरा गांधी यांनी केले होते.
पूर्ण सहमत आहे. ते राष्ट्रीयीकरण राजकारण्यांना पैसा लुटता यावा म्हणूनच केले गेले होते. गरीबांचे कल्याण वगैरे मुलामा देऊन. पण हे करणे कोणत्याही राजकारण्याला शक्य नाही. मोदींनाही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले
M
manguu@mail.com Mon, 02/19/2018 - 19:50 नवीन
सुखाची नोक्री , वाढता पगार , फिक्स टाइमवर ये जा , ए सी , घरकर्ज स्वस्तात , घराजवळ ट्रान्सफर ..... लोकाना जलसी वाटते हो .... पेशंट जास्त आहेत , पगार मात्र दोन वर्षे वाढला नाय , दीड वाजला , जेवायचे कधी इ इ म्हणून आमचे लोक माझ्याबरोबर हुज्जत घालत बसले , तर सरळ हे सोडून ॲक्सिस बॅंकेत नोकरीला जावा , म्हणून सांगतो. वाद समाप्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले
र
राही Mon, 02/19/2018 - 17:57 नवीन
नोटबंदीच्या काळात अशी कुजबूज होती की मोठमोठे सिनेतारे-तारका आणि अन्य वलयांकित व्यक्ती यांनी जुन्या नोटांच्या बदल्यात फार मोठ्या रकमेचे दागदागिने खरेदी केले होते आणि जवाहिर्‍यांकडून त्यांना मागील तारखांच्या पावत्या मिळाल्या होत्या. या कुजबुजीने सध्या पुन्हा डोके वर काढले आहे.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Mon, 02/19/2018 - 18:10 नवीन
PNB घोटाळा: बेचु तिवारी, यशवंत जोशी आणि प्रफुल्ल सावंत या तीन अधिकाऱ्यांना सीबीआयने मुंबईतील ब्रॅडी हाऊसमधून केली अटक.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Mon, 02/19/2018 - 20:06 नवीन
या प्रतिसादात डॉक्टरसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे या LOUs रोलओव्हर होत गेल्या आणि एकूण कर्जाची रक्कम फुगत गेली. ही प्रथा सर्वसाधारणपणे सर्वच ब्यांकांत पूर्वापार चालत आलेली आहे. ज्यांनी बँकेत काम केलेले आहे अथवा अश्या प्रकारची कर्जे घेतलेली आहेत (यात कोणी मिपाकर नसावेत) ते याला दुजोरा देऊ शकतील. १५-२० वर्षांपूर्वी मी एका "प्रतिष्ठित" सहकारी बँकेत काम करत असताना एका इलेकट्रोनिक्स वस्तूंचा व्यापार करणाऱ्याला जवळपास १ कोटीचं कर्ज दिलं होतं. पुण्याच्या उल्हासनगरातला व्यापारी असल्याने त्याच्या "दुकानात" ग्राहक जर म्हणलं की सोनीचा टीव्ही पाहिजे तर जे टीव्हीचे डबे ठेवलेले असतील त्याला तो सोनीचा स्टिकर लावून द्यायचा. याचे मॉडगेज आणि कॅश क्रेडिट कर्ज अश्याच पद्धतीने रोलओव्हर केले गेले. इतकेच नव्हे तर त्याने ज्वेलरचे दुकान टाकण्यासाठी अजून कर्ज मागितले तर तेही त्याला दिले गेले. हा माणूसच फ्रॉड होता हे आम्हाला सगळ्यांना माहित होते पण वरून आज्ञा झाल्यावर काय करणार. पुढे ही सर्व खाती एनपीए झाली तेव्हा व्याज धरून रक्कम ५ कोटींच्या वर गेली होती. वसुलीला जेव्हा गेलो तेव्हा कळले की हा माणूस पत्र्याच्या घरात राहत होता आणि त्याच्याकडे जप्त करण्यासारखे पण काही नव्हते. असे अनेक खातेदार मी स्वतः बघितलेले आहेत. ब्रँच मॅनेजर स्वतः खातेदाराला सांगताना ऐकलेलं आहे की इथे तुमचं कर्ज मूळ रक्कम ५० लाख आणि व्याज धरून ६० लाख गेलंय ना मग आमच्याच दुसऱ्या ब्रँच मध्ये ७५ लाख कर्जासाठी अर्ज करा. मी मंजुरीची शिफारस करतो. ते मंजूर झाले की माझ्या ब्रँचमधले ६० लाख भरून टाका. वरील घटना एका सहकारी बँकेच्या एका शाखेतील आहेत, ज्याची उलाढाल १०० कोटीच्या आसपास होती. तर मोठ्या राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये काय चालत असेल याची कल्पनाच केलेली बरी. ऑडिटरला कसं सापडलं नाही म्हणताय? तर आमच्याकडे ऑडिटर यायचे, त्याआधी वर्दी यायची की ते येणार आहेत आणि त्याबरोबर त्यांच्या प्रोग्रॅमची आणि मागण्यांची यादी पण यायची. मस्त डुलत डुलत ऑडिटर लोक यायचे, एका मीटिंग रूम मध्ये बसायचे. त्यांची सरबराई सकाळी सुकामेवा पासून ते पंचतारांकित जेवण इथपासून सुरु होऊन, रात्री एखाद्या फार्म हाऊसवर मदिरा आणि मदिराक्षी इथपर्यंत व्हायची. नंतर बिदाई म्हणून त्यांनी मागितलेल्या वस्तू पण दिल्या जायच्या. हे असले लोक कसलं ऑडिट करणार आणि त्यांना काय सापडणार? जाऊ दे. अश्या अंतर्गत घपल्यांच्या बऱ्याच गोष्टी मी सांगू शकेन ज्याची सर्वसाधारण ग्राहकांना कल्पनाच नसते. माझ्याकडे आमच्या बँकेच्या सर्वरचा unrestricted access होता पण कधी एक पैसा चोरावा असं मनात आलं नाही. Back-end ने काय वाट्टेल ते करू शकलो असतो आणि कोणाला कळलं पण नसतं. कारण काही अंतर्गत खाती अशी असतात की त्याचं ऑडिट कधीच होत नाही. त्यामुळे ज्यांना फ्रॉड करायचे असतात ते कसेही करून ते करतातच. जे सापडतात ते चोर ठरतात पण तोपर्यंत ते प्रतिष्ठित म्हणवतात.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 02/20/2018 - 04:42 नवीन
अत्यंत माहितीपूर्ण प्रतिसाद. कायदे, गाईडलाईन्स, ऑडिट्स,code of conduct दाखवायला एक असते पण प्रत्य्क्षात परिस्थिती वेगळी असते. 'इंपोर्ट-एक्स्पोर्ट'चा 'धंदा' करणारे व्यावसायिक अचाट श्रीमंत का असतात ते ही येथे कळते. खूप पगार नसूनही सरकारी बेंकांचे अधिकारी परदेशवार्या,२०-३० लाख भरून मुलांना परदेशी शिकायला पाठ्वणे.. हे कसे होते तेही कळते. ओडिट करणार्या बहुतांशी C.A. लोकांकडे बक्कळ पैसा असतो. ह्यात नवल नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
M
manguu@mail.com Tue, 02/20/2018 - 04:47 नवीन
तळे राखील तो पाणी चाखील , ही म्हण जुनी आहे माईमैय्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
M
manguu@mail.com Tue, 02/20/2018 - 04:49 नवीन
सैय्या भये कोतवाल , अब काहेका डर अशीही म्हण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 02/20/2018 - 07:07 नवीन
'तमे मेरा व्यवसाय नाश कर्यो' म्हणत निरवने पीएन्बी ला पत्र लिहिले आहे. https://economictimes.indiatimes.com/industry/miscellaneous/letter-that-nirav-modi-wrote/articleshow/62993195.cms कर्जवसुलीसाठी अतीघाई केलीत- आता पैसा मिलण्याची शक्यता कमी.. असे पत्रात लिहिलेय. एवढाच प्रामाणिक आहे तर भारताबाहेर पळायची काय गरज होती? घोटाळा बराचसा लक्षात आला पण एक प्रश्न अजूनही पडलाय-९०० कोटींची मालमत्ता असनार्या/त्या व्यवसायात नाव कमावून असणार्या नीरव मोदीला अशा मार्गाने जायची काय गरज होती? आयात निर्यात एवढ्या ठिसूळ आर्थिक पायावर चालू असते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ब
बिटाकाका Tue, 02/20/2018 - 07:10 नवीन
उलटा चोर कोतवालको डाटे अशीही एक म्हण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 02/20/2018 - 17:27 नवीन
या LOUs रोलओव्हर होत गेल्या आणि एकूण कर्जाची रक्कम फुगत गेली. कर्जे व रोलओव्हर यात मोठी समस्या नाही असे वर लिहिले आहेच... समस्या ही आहे की मूळ, कर्जे देताना आणि त्यांचे रोलओव्हर करताना, योग्य ते तारण घेतले नाही. पुरेसे तारण घेतले असते तर ते वापरून बँकेने आपले पैसे वसूल केले असते आणि बँक गोत्यात आली नसती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ग
गामा पैलवान Tue, 02/20/2018 - 10:09 नवीन
डॉ. सुहास म्हात्रे,
ही नीरव मोदीची मग्रूरी कायद्यावर आधारीत आहे, त्याची कारणे या प्रतिसादतील परिच्छेद (अ) व (आ) मध्ये दिली आहेत.
एकदम चोक्कस ! घोटाळा नीरव मोदीने केलेला नसून पन्याब्याने केलेला आहे. मोदीकडनं तारण घायची जबाबदारी बँकेची आहे. ती तिने पाळली नाही. यांत मोदीचा काय दोष? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 02/20/2018 - 10:21 नवीन
असे आहे तर तो मग पळाला कशाला? भारतात येत का नाही? "मी तुझ्या घरात चोरी केली.. तू घरी नव्हतास, त्यात माझा काय दोष?.. दोष असलाच तर तो वॉचमनचा.." असे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Tue, 02/20/2018 - 14:39 नवीन
अहो माईसाहेब, कोण पळालंय? नीरव तर धंद्याच्या कामासाठी अमेरिकेत गेलाय. पण त्याच्या मागे कोणीतरी काहीतरी राळ उडवली आणि प्राप्तीकराच्या धाडी पडल्या. आता त्या बिचाऱ्याला परत यायचं झालं तर बदनामीपायी अडचणी येणारंच ना? आ.न., -गा.पै. वि.सू. : परकायाप्रवेश कसा वाटला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
च
चिर्कुट Tue, 02/20/2018 - 10:28 नवीन
https://www.quora.com/Why-is-the-trust-of-people-reducing-in-BJP-Modi-government/answer/Samir-Mullick-3?share=f3ff7c7a&srid=IBBF
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 02/20/2018 - 10:54 नवीन
हे मात्र धक्कादायक आहे रे चिर्कुटा. नीरव्/चोक्सी जेलमध्ये जात नाहीत, त्यांच्या मालमत्तेचा लिलाव होत नाही तोपर्यंत ह्या सरकारचे(अगदी नरेंद्र मोदी ह्यांचेदेखील) काही खरे नाही. आता कदाचित,'कॉन्ग्रेस नेत्यांनी मदत केली म्हणून सांग अन्यथा वेगळ्या मार्गाने प्रकरण हाताळू' असे कदाचित अजित दोवल नीरवला सांगतील असा ह्यांचा अंदाज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिर्कुट
ब
बिटाकाका Tue, 02/20/2018 - 12:28 नवीन
हे अंधविरोधक दिवसेंदिवस हास्यास्पद होत चालले आहेत. २०१५ ला हे मोदीमहाशय आणि त्यांचा मामा हे फरारी आणि घोटाळेबाज होते का? भारतातल्या प्रतिष्ठित व्यवसायिकांपैकी एक नव्हते का? पंतप्रधान त्यांना बोलले, भेटले, गळाभेट केली तरी काय प्रॉब्लेम आहे? ======================= मोदींच्या इतर व्यवसायिंकाच्या भेटी गाठी, संबंध कधीच चर्चेत नसतात पण जर तो व्यावसायिक गुजराती निघाला कि अंधविरोधकांना उकळ्या फुटतात हे एक निरीक्षण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिर्कुट
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 02/20/2018 - 12:51 नवीन
चोक्सी महाशय २०१२ पासून वेगळ्या प्रकरणात गुंतले होतेच- http://www.freepressjournal.in/india/pnb-scam-mehul-choksi-imported-750-kg-of-gold-without-paying-a-rupee-in-duty-under-it-dept-scanner-since-2012/1222869 सत्ता मिळवण्यासाठी राजकीय पक्षांना अशा लोकांशी हातमिळवणी करावीच लागते ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा चोक्सी महाशयांनी वाजपेयी/मनमोहनांच्या कार्यक्रमात हजेरी लावलीही असेल. पण चोक्सी-नीरव सारखे लोकांवर अशी वेळ येत असेल तर ते एका अर्थाने बरेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
च
चिर्कुट Wed, 02/21/2018 - 05:26 नवीन
कुणालाही अंधविरोधक, हास्यास्पद असली विशेषणं लावून परिस्थिती नाही बदलत. विनाकारण पर्सनल होऊ नका. सगळे मोदीविरोधक काँग्रेसी, आपवाले, डावे वगैरे नसतात. >> २०१५ ला हे मोदीमहाशय आणि त्यांचा मामा हे फरारी आणि घोटाळेबाज होते का? भारतातल्या प्रतिष्ठित व्यवसायिकांपैकी एक नव्हते का? पंतप्रधान त्यांना बोलले, भेटले, गळाभेट केली तरी काय प्रॉब्लेम आहे? हे एक असं बोलणार आणि दुसरे अंडभक्त २०१३ मध्ये रावल्या आणि बाकी काँग्रेसी कसे नीरवला सामील होते ते सांगत फिरणार. ह्याला डबल ढोलकी म्हणतात बरं का.. >> मोदींच्या इतर व्यवसायिंकाच्या भेटी गाठी, संबंध कधीच चर्चेत नसतात पण जर तो गुजराती निघाला कि अंधविरोधकांना उकळ्या फुटतात हे एक निरीक्षण आहे. काय निऱक्षण आहे.. २०१४ पासून काही विशेष गुज्जू व्यावसायिकांचीच संपत्ती ७०-८०-१६०००० टक्क्यांनी वाढली आहे हे कसं काय नजरेतून सुटलं बरं? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Wed, 02/21/2018 - 06:20 नवीन
कुणालाही अंधविरोधक, हास्यास्पद असली विशेषणं लावून परिस्थिती नाही बदलत. विनाकारण पर्सनल होऊ नका. सगळे मोदीविरोधक काँग्रेसी, आपवाले, डावे वगैरे नसतात.
सगळे भक्त नसतात हे का कळत नसावे बरे मग? =====================
हे एक असं बोलणार आणि दुसरे अंडभक्त २०१३....
कुणालाही अंधभक्त म्हणाल्याने परिस्थिती बदलते काय? हि डबल कि ट्रिपल ढोलकी आहे? २०१३ ला भेटल्याचे रेफेरंन्सेस देणार्याला हे जाऊन सांगा, मला सांगण्याचा काय उद्देश आहे? आणि २०१३ च्या संदर्भात टिका करायची असेल तर ती मी पर्सनल इव्हेंट्स मध्ये सामील असण्यावर करेन, सार्वजनिक व्यावसायिक इव्हेंटमध्ये भेट झाली म्हणून गळा काढणारे खरे डबल ढोलकीवाले असतात असे माझे मत आहे. =====================
काय निऱक्षण आहे.. २०१४ पासून काही विशेष गुज्जू व्यावसायिकांचीच संपत्ती..
भारतात २०१४ पासून कोणाकोणाची संपत्ती किती किती वाढली, तुलनेसाठी २०१०-१४ मध्ये किती वाढली याचे संदर्भ द्या, मग ठरवू त्यातले किती गुजराती होते आणि किती बाकीचे. नाहीतर अशा वक्तव्यानं जनरली फेकणे असे संबोधित करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिर्कुट
च
चिर्कुट Wed, 02/21/2018 - 09:33 नवीन
आलाय आता वाद/ चर्चा करत बसायचा. उपयोग होत नाही हे चांगलंच समजलंय. सो, मी काही प्रतिवाद करणार नाही. चील. रच्याकने एक प्रश्न माईसाहेबांच्या ह्यांना - काय ओ 'हे', पूर्वी आम्ही काँग्रेसला याच सगळ्या गोष्टींसाठी (नोक-या, भ्रष्टाचार, इ.) मनसोक्त शिव्या घालायचो, तेंव्हा कुणी आम्हाला संघी, भाजपेयी, भक्त वगैरे म्हणत नसायचं शिवाय भरघोस समर्थन मिळायचं. थोडक्यात सरकारचं समर्थन करणारं कुणी नसायचं. पब्लीकनं सरकारचं समर्थन करण्याची पद्धत ही कधी आणि कशामुळे सुरु झाली असेल बरं? तुमच्या काळी कसं होतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Wed, 02/21/2018 - 09:52 नवीन
सोप्पं उत्तर, चिल्लो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिर्कुट
व
विशुमित Wed, 02/21/2018 - 09:53 नवीन
खुदा ना खास्ता जर पुढील सरकार काँग्रेस (UPA) केंद्रात आणि आघाडीचे महाराष्ट्रात आले तरी मी शोधून शोधून त्या सरकारांविषयी विरोधी/न पटणारी मते लिहणार हा संकल्प अंध विरोधक या बिनबुडाच्या टिपण्णीवर राग व्यक्त करत आताच सोडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिर्कुट
म
मार्मिक गोडसे Wed, 02/21/2018 - 11:44 नवीन
खुदा ना खास्ता जर पुढील सरकार काँग्रेस (UPA) केंद्रात आणि आघाडीचे महाराष्ट्रात आले तरी मी शोधून शोधून त्या सरकारांविषयी विरोधी/न पटणारी मते लिहणार अगदी मनातलं बोललात. फालतू लाड परवडत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ट
ट्रेड मार्क गुरुवार, 02/22/2018 - 01:13 नवीन
खुदा ना खास्ता कशाला पुढील सरकार फक्त काँग्रेसचेच यावे आणि त्यापुढील सर्व सरकारे सुद्धा काँग्रेसचीच यावीत. आणि तुम्ही त्यांची ओढून ताणून निंदा करायची पण गरज नाही. उगाच दुसऱ्यांना दाखवण्यासाठी कशाला काही करावं? मुख्य म्हणजे ते काही चुका करणारच नाहीत. लोकांना दुसरे कुठले सरकार पचत नाही. आता लोक म्हणतात की वाजपेयींचे सरकार चांगले होते, पण जेव्हा दुसऱ्यांदा निवडून द्यायची वेळ आली तेव्हा काय झालं? आणि त्यापेक्षा महत्वाची गोष्ट की पंतप्रधानपदाची पुढची टर्म मिळाली नाही म्हणून वाजपेयींचे काय नुकसान झाले? त्यांना ना बायको ना कुटुंब ना त्यांची कोणा नातेवाईकांच्या बिझनेस मध्ये काही गुंतवणूक होती. हेच लॉजिक आत्ता लावले तर नामोंनाही कुटुंबाचा पाश नाही. स्वतःच्या भावाबहिणीच्या नावे त्यांनी काही बिझनेस उभा केला नाही किंवा जमिनी घेऊन ठेवल्या नाहीत. त्यामुळे जरी त्यांना पंतप्रधानपदाची दुसरी टर्म मिळाली नाही तरी वैयक्तिकरित्या त्यांना काय फरक पडणार आहे? कदाचित गुजराथच्या मुख्यमंत्रीपदी ते परत जाऊ शकतील. त्यामुळे प्रत्येकाने आपापला फायदा तोटा बघावा... बाकी देश तर काय, चालतोच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
प
पुंबा गुरुवार, 02/22/2018 - 14:51 नवीन
हे 'सरकारने चांगले काही केले तर, कौतूक कराल तरच तुमची वाईट गोष्टींवर केलेली टिका ग्राह्य धरली जाईल' हा भक्तांचा युक्तिवाद, विरोधाचा स्वर चांगलाच टिपेला गेलेला आहे हे दिसल्याने केला जातोय. त्यांचं निराळंय हो, त्यांना बेंबीत बोट घातलंय, विंचू चावला तरी गार लागतयंच म्हणावं लागत आहे, आता पुर्वी समर्थनात असणारे टिका करायला लागले हे बघता पिसाळले. आता माझे मतः सरकार ही व्यवस्था आपणच आपल्याच आयुष्याचे संचालन व्यवस्थित व्हावे याकरीता केलेली व्यवस्था आहे. आपलेच प्रतिनिधी ती व्यवस्था आपल्या वतीने चालवतात. तिच्यावर आपले संपूर्ण रेग्युलेशन हवे. व्यवस्थेने आपल्याला उत्तरदायी असलेच पाहिजे. जिथे जिथे चुकीचे काही घडेल तुथे तिथे ते माप सद्य कालीन सरकारच्या माथ्यावर टाकलेच पाहिजे. झालेल्या चुकांवर पांघरून घालणे समर्थकांचे काम असू शकते, निष्पक्ष, सामान्य नागरीकाला पक्षाशी आणि कुठल्या विचारसरणीपेक्षा निष्ठा देश आणि सम्विधानावर हवी. जे वादे करून सरकार सत्तेवर आले होते ते पूर्ण होत नसतील तर बोललेच पाहिजे. उगा कौतूक- फिउतुकाची नाटके गरजेची मुळीच नाहीत. टिका महत्वाची. सतत त्यांना अकाऊंटेबल ठेवत गेलो तर चुका कमी होतील. आपल्याला व्यवस्था अधिकाधिक सुधारायला हवी आहे, त्यासाठी सतत सतर्कता गरजेची आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 02/22/2018 - 15:32 नवीन
योग्य लिहिले आहेस. चांगल्या कामाचे कौतुक करा.. हा हट्ट भाजपा-शिवसेना समर्थकांकडून अनेक वेळा होताना दिसतो. मात्र विरोधकांच्या कामाचे कौतुक झाले की "त्यात काय एवढे.. तसे करणे काळाची गरज होती.. वगैरे" असो. विपुल अंबानी व तत्सम लोकांना ताब्यात घेऊन चौकशा चालू आहेत.. नीरवच्या/चोक्सीच्या संपत्ती ताब्यात घेणे चालू आहे. सी.बी.आय./ई.डी. हे काम चोख करताना दिसत आहेत. तेव्हा राजकीय दबाव येथे नाही असे नक्कीच म्हणता येईल. .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
ब
बिटाकाका गुरुवार, 02/22/2018 - 16:41 नवीन
म्हणे निष्पक्ष सामान्य माणूस...काहीच्या काही! उगाच सामान्य माणसाच्या खांद्यावर कशाला बंदूक? सामान्य माणूस चांगल्याला चांगलं आणि वाईटला वाईट म्हणणारा का नको? जिथे भक्त वगैरे शब्द येतात तिथेच मुळात स्पष्ट असते की विरोधी विचारसरणीच्या दावणीला स्वतःला बांधून घेण्यात आलेले आहे. बाकी चुकीच्या गोष्टींवर टिका वगैरे फार्स असतो. **************************** एक बाजूला ज्या गोष्टींवर दुसऱ्यावर टिका करणे, दुसऱ्या बाजूला तीच गोष्ट स्वतः करणे याला साधारणपणे दुटप्पीपणा म्हणतात. **************************** विरोधकांचा सूर टिपेला वगैरे काही नाही, निवडणुका जवळ आल्यासारखा वाटत असल्याने चालू झालेली झटापट आहे असे मला वाटते. आता परत ५ वर्षे नावडते सरकार नको म्हणून तथ्य न मांडता ठराविक नकारात्मक चर्चा करून वातावरण आवडत्या सरकारच्या बाजूला झुकवण्याचा प्रयत्न आहे असे मला वाटते(आमचे आवडते सरकार दुसरे नाही वगैरे मुद्दे असतील तर स्पष्ट सांगावे की मग म्हणणे काय आहे, कुणाला निवडून आणायचे आहे. उगाच ताकाला जाऊन भांडे लपवण्याचा अर्थ नसतो).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
व
विशुमित Fri, 02/23/2018 - 07:27 नवीन
<<<टिका महत्वाची. सतत त्यांना अकाऊंटेबल ठेवत गेलो तर चुका कमी होतील. आपल्याला व्यवस्था अधिकाधिक सुधारायला हवी आहे, त्यासाठी सतत सतर्कता गरजेची आहे.>>> ==>> अगदी मनातील बोललात. SHARPEN THE SAW जनतेने डोळे झाकून काँग्रेस सरकारला जवळ पास ६० वर्ष सत्ता उपभोगायला दिली. त्यामुळे काही चांगल्या गोष्टीं बरोबर इतर अनेक समस्या देखील निर्माण झाल्या. सामान्य लोकांनी कधी एवढे खोलात जाऊन राजकारणाकडे पाहिले नाही. त्यात विरोधकांना प्रशासनामध्ये कसे काम चालते आणि त्यातील खाचखळगे याचे चांगले ज्ञान असणार यात वाद नाही. वरून ६० वर्ष अनुभव असल्यामुळे भ्रष्टाचार कोणकोणत्या प्रकारे करता येऊ शकतो याचे सर्व मार्ग त्यांना ठाऊक असणार. याच जोरावर तर सध्य सरकारला कमी पट संख्या असताना देखील छोट्या छोट्या प्रकरणामध्ये कैचीत पकडता येत आहे. चालू सरकारला उ का चू करायला जागा नाही आहे. त्यामुळे ते कसे इमानदार आहेत दाखवू शकतात. काही प्रकारांमध्ये सुजाण नागरिकांनी उठवलेल्या आवाजामुळे सरकारला स्वतःचे निर्णय मनमानी पद्धतीने रेटने शक्य झाले नाहीत. काही उदाहरणे : १) जमीन अधिग्रहण कायदा २) नोटबंदी- लोकांनी आवाज उठवला म्हणून तर ४०-४२ वेळा वेगवेगळे निर्णय बदलावे लागले. ३) जी एस टी- रोज नवनवीन नियम बदलत आहेत, जेणे करून लवचिकता येण्यात मदत होत आहे. ४) कथित हिंदुत्ववादी आणि गोरक्षकांचा धुमाकूळ- विरोध केला नसता तर अशा संघटनांचे इतके पेव सुटले असते की यामध्ये गुंडापुंडांनी देखील हात धुवून घेतले असते. बातम्या येणे बंद झाले आहे आता. विशेष म्हणजे यावेळेस च्या वॅलेंटिन डे ला चुट्पुटच प्रकार घडले. ५) स्वच्छ भारत योजना- वारेमाप प्रसिद्धीवर खर्च करण्यापेक्षा विधायक कामावर सरकार लक्ष देण्यास भाग पडत आहे. ६) काही घोटाळे- माल्या, निरव मोदी, (आणखी आता आठवत नाहीत ) --- आवाज उठवला म्हणून तर चाप बसला. सरकारचे विशेष कौतुक की मुकेश अंबानींच्या पुतण्याला देखील सरकारने अटक केली. सरकार अदानी-अंबानींसाठी काम करत नाहीत हा संदेश गेला. .... ह्या गोष्टी जर डोळे झाकून मान्य करत लोक गेले असते तर ५ वर्षांनी देशाचे चित्र काही वेगळे पाहायला मिळाले असते. खाली बिताकाका म्हणतात तसे हे निवडणुकीपुरते विरोध असतो याबद्दल बराच अंशी असहमत आहे. निवडणूक फक्त सामान्य माणूस जिंकून देत नसतो, जो तो स्टेकहोल्डर आपल्याला सरकार कडून काय मिळाले यानुसार सरकार कोणाचे आणायचे हे ठरवत असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 02/21/2018 - 06:25 नवीन
योग्य बोललास रे चिर्कुटा. नीरव्/चोक्सीवरचे ट्वीटरी,वॉट्सअ‍ॅपी विनोद तरी अजून फिरत नाही आहेत..भक्त मंडळी गांगरून गेल्याचे लक्षण असे ह्यांचे मत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिर्कुट
म
माहितगार Wed, 02/21/2018 - 09:22 नवीन
COMMENT-The PNB scam: Questions for the bank, the auditors, the RBI and the government
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 02/23/2018 - 07:34 नवीन
हे भारतात करायला हवे... Image removed.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sat, 03/03/2018 - 05:33 नवीन
वॉशिंग्टन: पंजाब नॅशनल बँकेत महाघोटाळा करणारा हिरे व्यापारी नीरव मोदी अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात लपला असला तरी अमेरिकेने मात्र या प्रकरणात भारताला सहकार्य करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. 'नीरव मोदी अमेरिकेत लपल्याचं आम्हीही मीडियातूनच ऐकलं आहे. मात्र त्याबाबत आम्ही अधिकृत दुजोरा देऊ शकत नाही,' असं म्हणत अमेरिकेने हातवर केले आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे स्पष्टीकरण दिलं. अमेरिकेत लपून बसलेल्या नीरव मोदीला शोधून काढण्यासाठी अमेरिकेचं परराष्ट्र मंत्रालय भारताला मदत करणार आहे का? असा सवाल अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याला विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलं. 'मात्र मोदीला पकडायचेच असेल आणि त्यासाठी कायदेशीर सल्ला हवा असेल तर भारताने अमेरिकेच्या विधी विभागाशी संपर्क साधावा,' असा सल्लाही या प्रवक्त्याने दिला. तर अमेरिकेच्या विधी विभागाने मोदीप्रकरणावर बोलण्यास नकार दिला. ..... https://m.maharashtratimes.com/international/international-news/us-says-it-cannot-confirm-whether-nirav-modi-is-in-america/articleshow/63143742.cms .... अमेरिकेत जाऊन प्रधानसेवक जेवून आले. त्यांच्या मुलीलाही इथे पार्टी दिली. इतके रोटीबेटी करूनही हेच फल काय या तपाला ?
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Sat, 03/03/2018 - 06:22 नवीन
तुम्हाला साधारण जाणीव देखील नाहीये की तुम्ही काय बोलत आहात. रोटीबेटी? तुम्ही मोदींचा द्वेष करत असाल इथेपर्यंत ठीक आहे, पण त्यापलीकडे जाऊन जेव्हा हे असले तद्दन फालतू विधाने केली जातात तेव्हा द्वेषाची पातळी कुठेपर्यंत पोहोचली आहे ते कळते. ******************************* जनता सुज्ञ आहे, ती मतपेटीतून असल्या द्वेषयुक्त नकारात्मक प्रचाराला उतर देत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Sat, 03/03/2018 - 08:27 नवीन
रोटी - बेटी हा शब्दप्रयोग कोटी म्हणून केला होता. ( विनोद करण्याची परवानगी काही विशेष लोकानाच असल्याचे अनवधानाने विसरले गेले , त्याबद्दल क्षमस्व )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
व
विशुमित Sat, 03/03/2018 - 09:27 नवीन
अर्रारा जबरा सोलीड हाणले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
श
श्रीगुरुजी Sat, 03/03/2018 - 09:54 नवीन
उष्ट्रानां विवाहेशु गीतो गायंति गार्धभानि परस्परं प्रशंसयंते , अहो रूपं अहो ध्वनि|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ब
बिटाकाका Sat, 03/03/2018 - 10:13 नवीन
अरेरेरे, फ्रस्ट्रेशन लपता लपत नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ब
बिटाकाका Sat, 03/03/2018 - 10:12 नवीन
कोटी करायला अत्यंत सामान्य विनोदबुद्धी प्रेसि असते, द्वेषयुक्त बुद्धीने केलेल्या कोट्या अशाच वायफळ जातात. अत्यंत सामान्य माणसाला देखील रोटीबेटीचा अर्थ कळतो. **************************** तुमच्या द्वेषयुक्त मतांनीच विश्लेषण करून सांगाल का वरील प्रकरणात नेमका रोटीबेटी कशी काय कामाला यायला पाहिजे होती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
स
सर टोबी Sat, 03/03/2018 - 09:32 नवीन
ज्या मनमोहन सिंग यांना उद्देशून सुषमा स्वराज 'निकम्मा' म्हणाल्या होत्या त्यांनी देवयानी खोब्रागडे प्रकरणात घेतलेली कणखर भूमिका. त्या वेळेस त्यांनी अमेरिकन वकिलातीच्या बाहेर असलेली सुरक्षा व्यवस्था काढून घेतली. तसेच वकिलातील भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांना देणाऱ्या विशेष सुविधा बंद केल्या. तसेच राजनैतिक अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या विशेष वागणुकीबद्दल तेथील कोर्टात इतकी जोरदार बाजू मांडली कि कोर्टाने प्रीत भरारा याला बेदरकार वागण्यास प्रतिबंध केला. आर्थिक घोटाळे अन त्यातून होणाऱ्या गुन्हेगारी याची अमेरिकेला सर्वात जास्त झळ बसलेली आहे आणि त्यामुळे अमेरिका अशा गोष्टींच्या बाबतीत जास्त कडक भूमिका इतर देशांच्या बाबतीत घेत असते. असे असताना निरव मोदींच्या बाबतीत दुटप्पी भूमिका घेणाऱ्या अमेरिकेला ठणकावून सांगण्याची हि चांगली संधी होती. प्रधान सेवक अशा महत्वाच्या वेळेस भलत्याच गोष्टी करीत असतात (उदा. मामुली गोष्टींवर ट्विट करणे). आताही त्यांचे वागणे त्यांच्या पूर्वपीठिकेला अनुसरूनच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Sat, 03/03/2018 - 15:03 नवीन
हेच म्हणायचे होते. जो गरजते है वो बरसते नही , हे वारंवार दाखवणे सुरु आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
श
श्रीगुरुजी Sat, 03/03/2018 - 15:47 नवीन
>>> देवयानी खोब्रागडे प्रकरणात घेतलेली कणखर भूमिका. - हे प्रकरण घडले त्याच्या जेमतेम काही दिवस आधी दिल्ली, राजस्थान, म. प्र. व छत्तीसगड या ४ राज्यात खांग्रेसचा दणकून पराभव झाला होता. - लोकसभा निवडणुक फक्त ४ महिन्यांनी होती. - खोब्रागडे दलित होत्या. त्यामुळे काहीतरी केल्यासारखे दाखविणे आवश्यक होते. म्हणूनच सोनिया गांधींची ही तथाकथित, दिखाऊ "कणखर भूमिका".
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
स
सर टोबी Sun, 03/04/2018 - 05:09 नवीन
मी प्रत्युत्तर देत नाही, भलेही माझा मुद्दा कमकुवत होता असा त्यातून अर्थ निघाला तरी चालेल. परंत्तू त्या वेळेसचे पंतप्रधान-इन-वेटिंग यांनी देखील त्या प्रकारची दखल घेतली होती. त्यामुळे देवयानी या दलित असण्याच्या मुद्द्यात तथ्य असावे असे वाटत नाही. आणि भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल तुम्ही त्यांची जात पाहून त्यांना मिळणारी वागणूक योग्य आहे कि नाही ते ठरविता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
प्रदीप Sat, 03/03/2018 - 16:11 नवीन
ह्या दोन्ही घटना वेगवेगळ्या आहेत. खोब्रागडे भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी होत्या. त्यामुळे त्यांना तुरूंगात टाकल्याने, आपल्या सरकारने खंबीर भूमिका घेणे आवश्यक होते. नीरव मोदी हा आपल्या देशात तथाकथित अफरातफर करून परागंदा झालेली एक व्यक्ति आहे. अशा प्रकारे परदेशात गेलेल्या कुठल्याही व्यक्तिस, देशात परत आणणे इतके सोपे नाही. त्यासाठी दोन देशांच्या संबंधित खात्यांत बराच संवाद व्हावा लागतो. त्या देशांतील अंतर्गत कायद्याच्या सर्व तरतूदी पूर्ण व्हाव्या लागतात.आता ह्या केसमधेही दोन सरकारांमधे काही देवाणघेवाण होत असेल, व ती प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागेल. चीनसारख्या बलाढ्य देशासही, त्याच्या एका अशाच नागरीकास परत आणण्यासाठी, कॅनडाशी प्रदीर्घ संवाद करावा लागला होता, ती प्रक्रिया बरेच वर्षे सुरू होती.आपणासही, मल्याच्या बाबतीत सध्या असेच लढावे लागत आहेच. ह्या केसमधे, अमेरीकेच्या परराष्ट्रखात्याकडून दिल्या गेलेल्या तथाकथित उत्तरावरून, नक्की आपल्या सरकारने काय जाहीर आदळाअपट करणे अपेक्षित होते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
ब
बिटाकाका Sat, 03/03/2018 - 17:30 नवीन
तर, त्यांना हा फरक कळत नाही असा आपला गैरसमज झाला आहे असे मला वाटते. त्यांचा मुद्दा तो नाही, हे भारतात न राहणारे पंतप्रधान एवढं रोटीबेटी वगैरे करून निरव मोदीला आणत कसे काय नाहीत? हा त्यांचा मुद्दा आहे. वास्तविक ट्रम्प तात्यांनी रोटीबेटीला जागून त्या मोदीला अधिक वाणाच्या रुपात आपल्या हवाली करायला हवे होते अशी त्यांची अपेक्षा दिसते. असे न होणे हे मोदींच्या परदेश दौऱ्याचे अपयशच म्हणायचे दुसरे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
स
सर टोबी Sun, 03/04/2018 - 05:17 नवीन
ऑफिस ऑफ फॉरेन ऍसेट कंट्रोलर ने त्यांचे काम व्यवस्थित करावे अशी मागणी आपण नक्कीच करू शकतो. या बाबतीत अमेरिकन कायदे तरी आपल्या बाजूने आहेत आणि फिरंग्यांनी कितीही शाब्दिक कोलांटया उड्या मारल्या तरी तसे करण्याला मर्यादा आहेत. दुसरे म्हणजे त्यांच्या राजनैतिक अधिकाऱ्याला बोलावून खडसावता येते. हा एक प्रतीकात्मक अपमान असतो परंतु जगात सगळीकडेच वाहवा करून घेण्याची सवय असल्यामुळे असा प्रकार अमेरिकेच्या जिव्हारी लागू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
प
प्रदीप Sun, 03/04/2018 - 10:35 नवीन
ह्या घटनेसाठी त्यांच्या राजनैतिक अधिकार्‍यास बोलावून खडसावे, हे थोडे अतिशोयक्त व हास्यास्पद वाटते. मला वाटते, राजनैतिक संबंधात इतक्या स्तरावर जाण्यापूर्वी बरेच संकेत असतात, व त्यातही अनेक स्तर असतात. घटनेचे गांभिर्य ध्यानात घेऊन ते स्तर पार करणे जरूरीचे असते. आता, माझी समज चूक असण्याची शक्यता आहेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
स
सुबोध खरे Mon, 03/05/2018 - 07:58 नवीन
ऑफिस ऑफ फॉरेन ऍसेट कंट्रोलर ने त्यांचे काम व्यवस्थित करावे अशी मागणी आपण नक्कीच करू शकतो. म्हणजे नक्की काय काय आणि कसे कसे करावे? समजा ते तसे केले असेल तर ते त्यांनी मिपावर जाहीर करावे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा