जे कोणी चर्चेला कंटाळुन त्याच त्या निरर्थक मुद्द्यांभोवती फिरुन वैतागलेले असतील व ज्यांना खरोखर फुलेंच्या कार्याचे परखड प्रामाणिक उत्कृष्ठ मुल्यमापन वाचायचे असेल तर अशा सर्वांना कदाचित हे खालील तर्कतीर्थ श्री लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे हे अप्रतिम विश्लेषण उपयोगी ठरेल असे मला वाटते.
इथे मराठी पुस्तकाचा दुवा ( छोटेच आहे ५७ पानांचे ) व मुळ मराठी पुस्तकच वा निबंध म्हणा हवा तर फार वाचनीय आहे. पण ते खेळत बसावे लागेल झुम शी
http://marathifreebooks.blogspot.in/2015/10/jyoticharitra-jyotiba-phule-laxman.html
आणि त्याऐवजी वरील पुस्तकाचाच इंग्रजी अनुवाद पिडीएफ मध्ये इथे उपलब्ध आहे.
http://www.arvindguptatoys.com/arvindgupta/phule.pdf
माझे मत आहे त्रास झाला तरी मराठी पुस्तकालाच प्राधान्य द्यावे.
यातील मतांवर चर्चा करण्याची अजिबातच गरज नाही हे आपापल्या आकलनासाठी अभ्यासासाठी वाचावे या अपेक्षेने इथे देत आहे.
ज्याला कोणाला रस असेल त्याच्यासाठी
असो
मारवाजी लिंक बद्दल धन्यवाद,
तर्कतीर्थ जोशी यांच्या या लिंक लेखनातून एक गोष्ट कळते,
की तत्कालीन समतावादी पुरोगामी ब्राम्हण लोकं सुद्धा,
.
या बुरसटलेल्या विचारांच्या प्रतिगामी ब्राम्हणवादी वृत्तीच्या लोकांकडून भरपूर पिडले गेलेत, त्यानापन ह्या दलिंदरी मनु वादी वृत्तीच्या लोकांनी भरपुर त्रासले होते.
आता आली का पंचाईत. तर्कतीर्थ म्हणतात की शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना गुरू केले असे फुल्यांनी पोवाड्यात लिहिले आहे. पण रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरू होते हे ब्रिगेडी आकसामुळे मान्य करीत नाहीत. नक्की कोण खरं बोलतंय? फुले, तर्कतीर्थ की ब्रिगेडी?
अ ने त्याच्या पुस्तकात पुरावा म्हणून ब चे विधान वापरले.
ब नेही त्याचे विधान क च्या पुस्तकातून घेतले होते.
.....
विधान वर्णन करत असलेली घटना १६ व्या शतकातली
अन अ ब् क् तिघेही १९-२० व्या शतकातले.
खरं खोटं कसं करायचं ?
नर्व्हस नाईटी :) :)
डॉ. साहेब नर्व्हस नाईटी भारीच .. ख्या ख्या ...
आता एक नर्व्हस नाईटीचा बळी अशी जिल्बी पाडाच.
BTW - पाडाच हा शब्द लिहिताना गुगलने भलताच शब्द सुचवला तो प्रूफ रिडींग करताना लक्षात आले म्हणून बरे अन्यथा आनगापै ची कपालहस्तमुद्रा: करावी लागली असती.
२०१२ साली मोठ्या कौतुकाने अखिलेश यादवला निवडून दिल्यावर लगेच मुझफ्फरनगरला दंगली झाल्या. त्या काय भाजपने केल्या? गोरखपूर व फुलपुरात भाजप हरल्यावर अरारिया त पाकिस्तान झिंदाबादचे नारे देऊन कोण दंगली करवू पाहतोय? भाजपच्या दंगली या सशाच्या शिंगासारख्या आहेत.
आ.न.,
-गा.पै.
महाराष्ट्रात जातीय दंगली घडवल्या जाणार हे यांना आधीच माहित होते.
दाऊद इब्राहिम भारतात येणार हे यांना आधीच माहित होते.
आता देशात धार्मिक दंगली घडविल्या जाणार हे पण यांना आधीच माहित होते.
पण .........
स्वतःच्या पक्षाचे सहा नगरसेवक उद्धव ठाकरे पळवणार हे मात्र माहित नव्हते... ते पळवल्यावरच कळलं.
रेल्वे रोकोचे २-३ महिन्याचे प्लांनिंग बद्दल मात्र महाराष्ट्राच्या गृहखात्याला थांगपत्ताच नव्हता. मला वाटते हे सुद्धा तेवढेच महत्वाचे होते.
https://www.loksatta.com/mumbai-news/watch-video-mumbai-rail-roko-was-planned-three-months-in-advance-1648510/
....
बादवे मनसेचे सहा नगरसेवक राज यांनी बंधूंच्या दिमतीला पाठवले अशी कुजबुज ऐकली होती.
विरोधी पक्षांना या रेल रोकोची माहिती कशी काय नव्हती ते मजेशीर वाटतेय. अजून एक मोर्चा करून जनजीवन विस्कळीत करण्याची आणि सरकारविरोधात रोष निर्माण करण्याची एक नामी संधी गमावली त्यांनी. फक्त २०० विध्यार्थी जमले, ह्या काय मजा नाय!
----------------------------------------
कधी कुठे कुठले आंदोलन केले जाणार आहेत याची माहिती ठेवण्यासाठी गुप्तचर खातं असतं होय, चान चान! मला तर वाटले होते कि आंदोलन करणार्यांनी पोलिसांना आंदोलनाचे कारण, दिशा, काळ, वेळ सांगून परवानगी घ्याची असते. तरीही झालेल्या रेल रोकोलो निष्पाप नागरिकांचे संवैधानिक आंदोलन वगैरे म्हटले जाईलच म्हणा! ज्यांनी त्रास भोगला सकाळी ते सामान्य नागरिक गणले जात नसतात कधी!
माई, कर्नाटकात, लिंगायत धर्माला मान्यता देण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले राज्याने टाकली, आता
केंद्रातील नरेंद्र काय भूमिका घेतोय ते पाहूया....
आजकाल ते मनमोहन पेक्षाही जास्त मौनात गेलेत, असे दिसते.....
धर्मनिरपेक्ष काँग्रेस चे काय झाले हे?
यांना आता प्प्रादेशिक, धार्मिक सगळ्या अस्मिता जपण्याची वेळ आलीच. समाज आजुन दुभंगला जातोय पण निवडून यायचे आहे ना?
तरी बर बौद्ध आणि मुस्लिम दंगली (म्यानमार व श्रीलंका येथील) दाखवून देत आहेत की सगळे धर्म सारखे.
काँग्रेस ला देशाची नाही तर निवडून यायची फक्त काळजी आहे.
२०१३ ला सरकार असताना स्वतंत्र धर्माचा प्रस्ताव का म्हणे फेटाळला होता?
--------------------------------------------
वीरशैव महासभेने कर्नाटक सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे.
आमचे? आणि तुमचे कोणते मंदिर आहे मग? मंदिरच कि..?
==================
देऊळ कधी बांधायचे ते बघू सावकाश! ते काँग्रेसच्या दांभिकपणाबद्दल बोला हो आता. आता मान्यता का दिली? २०१३ ला प्रस्ताव आला तेव्हा तो का फेटाळला?
==================
तरीपण, तुमच्या माहितीसाठी, ते मंदिर कधी बांधायचे ते सुप्रीम कोर्ट ठरवणार आहे हो. तुम्ही आम्ही नाही.
धर्मनिरपेक्ष व धर्मअतिरेकी यात फ़रक आहें.
एखाद्या नवीन धर्माला मान्यता देने हे निरपेक्षपणे करणे वेगळे,
बुरसटलेले धर्मअतिरेकी त्याला कडवा विरोध करतीलच...
तुमच्या आमच्या आक्षेपाचं राहूद्या हो थोडावेळ. २०१३ ला काँग्रेसला काय आक्षेप होते ते बघायला पाहिजे. काँग्रेसला ५ वर्षात असे काय झाले कि उपरती सुचली? बरं ती उपरती २०१७, २०१६ ला का नाही सुचली?
>>> जर म्हटले असेल, तर नवीन धर्म तयार होतोय त्याला तुमचा आक्षेप असण्याचे कारण काय ?
लिंगायत हा वेगळा धर्म नाही. एखाद्या गटाला वेगळे काढून विशेष वागणूक देणे देशासाठी अत्यंत घातक असते. त्यातून समाजात दुही पेरली जाऊन अशांतता निर्माण होते. एका गटाला विशेष वागणूक मिळाली तर असे अनेक गट अशी मागणी करतील व त्यातून अराजक निर्माण होईल. पप्पूच्या पणजोबांनी हेच उद्योग करून काश्मिर व भारतात एक भिंत उभी केली ज्याचे दुष्परीणाम भारत आजही भोगत आहे.
". एखाद्या गटाला वेगळे काढून विशेष वागणूक देणे देशासाठी अत्यंत घातक असते....."
.
एक्झयांटली ..
गेल्या अनेक शतकांपासून अशीच "वेगळी वागणुकीच्या" घातक प्रकार चालु आहे, हेच शेतकऱ्यांच्या व बहुजनांच्या अनिष्ठेस कारण आहे,
असेच महात्मा फुले सांगत होते.
देशात पप्पू तर मिपात अक्कु !!=)) =)) =))