भारत बायकांसाठी अवघड देश आहे ...
भारत बायकांसाठी अवघड देश आहे ..... आणि ह्याचं मूळ आपल्या विचारसरणीत आहे.हि दोन विधाने पिलीयन रायडर यांच्या दुसर्या एका धागा प्रतिसादातून घेतली आहेत . शीर्षकात पहिले वाक्य वापरले तरी चर्चेचा मुद्दा दुसरे वाक्य आहे. तिकडे त्यांनी एलॅबोरेट केलेले नाही तरी दुसरे विधान मला अंशतः मान्य आहे पण सरसकट मान्य नाही परस्त्री कडे आदराने पहाण्या बद्दलचे सुसंस्कारही ह्याच भारतीय भूमीत केले जातात. पण एनी वे १) विचारसरणीत कोणते बदल व्हावेत असे तुम्हाला वाटते ? २) स्त्री अत्यचारांवर रिअॅक्ट करणारे अनेक , स्त्री स्वातंत्र्य आणि संबांधीत स्त्रीयांच्या स्वाभीमानापलिकडे जाऊन , शुचिता आणि कौटूंबीक , समुह, जात, धर्म, भाषा इत्यादी ओळखींच्या स्वाभीमानावरुन रिअॅक्ट होत नाहीत ना अशी साशंका वाटते असे असणे स्त्री स्वातंत्र्य आणि स्वाभीमान विषयक सकारात्मक विचार सरणीस कितपत पोषक आहे ? ३) प्रत्येक घटना घडल्या नंतर शीक्षा वाढवा शीक्षा बदला किंवा विना चौकशी शिक्षा द्या अशा मागण्या होताना दिसतात , कायदा व्यवस्थे पलिकडे जाऊन पुरुषांवरील सामाजिक संस्कार हा विषय चर्चेत कमी येतो , शिक्षा स्वरुप बदलत जाणे पुरेसे आणि स्त्री स्वातंत्र्यास खरेच पोषक असते का ? पुरुषांवरील सामाजिक संस्कार यात काय बदल व्हावेत ? ४) ह्या विषयावर सामाजिक राजकीय दबाव निर्माण करण्या एवढ्या चर्चा निश्चतच गरजेच्या आहेत , पण अती चर्चांनी तेही स्वातंत्र्यास बाधा न आणता सुरक्षा कशी वाढवावी या वर फोकस नसणार्या पोकळ चर्चांनी स्त्रीयांमध्ये भितीचे वातावरण निर्मिती होत नाही ना ? भिती चे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून चर्चांचे स्वरुप कसे असावे ? * आता वरचे धागा शीर्षक आहे , ते कमतरतांकडे लक्ष्य वेधण्यास यशस्वी होते पण ते सुरक्षेची भावना निर्माण करते का ? किंवा भिती च्या वातावरणाची निर्मिती करणारी जोड देणार नाही हे कसे पहायचे ? * माझी एक धागा चर्चा स्त्री पोषाख, स्त्री-पुरुष संबंध आणि (अ)सुरक्षिततेचा सांभाळ दुवा ज्यात चर्चेसाठी काही प्रश्नही दिले आहेत त्यांचा येथील चर्चेत काही उपयोग होत असल्यास पहावे . किंवा त्या धाग्यावर लिहायचे असल्यास हरकत नाही. * या चर्चेत सहभागी अत्याचारांची निखालस निंदाकरतात असे गृहीत धरले आहे . त्यामुळे इमोशनल बाजू पेक्षा वैचारीक बाजूने चर्चा या धाग्यात अभिप्रेत आहे. * दुसर्या देशांशी तुलना अभिप्रेत नाही , आपल्या देशात काय सुधारण्णा असाव्यात यावर फोकस असावा .
१. ग्रामीण स्त्रियांच्या समस्या, ज्यात आरोग्य, शिक्षण, लोकशाही प्रक्रियेत अधिकाधिक सक्रिय व जाणता सहभाग, सुरक्षा, शेतीचे प्रश्न, स्त्री-भ्रूणहत्येसंबंधी जागृती, जातपंचायतीसारख्या प्रतिगामी संस्थांचे महत्व कमी करणे, आर्थिक स्वावलंबित्व वाढवणे, शौचालय- पाणी- पर्यावरणाचे प्रश्न सोडवणे, बचत गट चळवळ, विधवा, परित्यक्त्या महिलांची एम्पॉवरमेंट यांचा समावेश करता येईल. २. शहरी - निमशहरी स्त्रियांचे प्रश्नः मुख्य मुद्दा एकट्या राहणार्या वा नोकरी- व्यवसायासाठी बाहेर पडणार्या स्त्रियांची सुरक्षा, समान वेतन- मानधनाचा मुद्दा, आर्थिक स्वावलंबन, वृद्ध स्त्रियांचे प्रश्न, सुरक्षीत परिवहन सुविधा, कामाच्या ठिकाणी होणारे शोषण थांबवणे, संपतीच्निर्मितीचा प्रश्न, मुस्लिम स्त्रियांच्या संबंधात म्हणायचे झाले तर शिक्षण, तलाक- पॉलिगमी- संपत्तीच्या मालकी हक्क यात समानता, एकल मातांचे प्रश्न, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, संशोधन यात स्त्रियांचा टक्का वाढणे, ऑनलाईन ट्रोलिंग, डिजिटल जेम्डर रिलेटेड गुन्हे, इनोव्हेशन, स्टार्ट अप यामध्ये महिलांचे प्रमाण वाढवणे, पुरूषांचा घरकाम- अपत्यसंगोपन यातील सहभाग वाढणे, मॅटर्निटी रजेचा, पाळणाघरांच्या सुरक्षेचा प्रश्न आदी गोष्टींचा समावेष शहरी- निमशहरी भागातील स्त्रियांसंबंधी चर्चेत करता येतो. ३. वर प्रतिसादांत उल्लेखलेल्या आणि अतिशय गरजेच्या स्त्री- पुरूष दोहोंच्याही मानसिकता बदलासंबंधी काम करावे लागेल. स्त्रीप्रश्नावर संशोधन, तत्वज्ञान, अर्थशास्त्र यातील संशोधन यासाठी अतिशय आवश्यक आहे. जागरूक, सजग, सुजाण पालकत्व यात मह्त्वाची भुमिका बजावू शकते असे वाटते.बापरे... तुम्ही तर व्हीजन ३००० मांडलेत. ब्रावो.स्त्री-पुरूष समानता हा मानवजातीच्या भल्यासाठी आवश्यक असलेला मुद्दा आहे. स्त्री विरूद्ध पुरूष असा हा लढा नाही. समानतावादी विरूद्ध असमान व्यवस्था टिकवू इच्छिणारे असा हा लढा आहे.झाला ना गोंधळ? आता कोण कुठली बाजू कधी घ्यायची? समानतावादी आणि समानताविरोधी म्हणजे पंडूचे पाच ते पांडव अन धृतराष्ट्राचे ते कौरव असा सोपा हिशोब नाहीये ना.पण भाऊ, तेव्हा तर बलात्कार जवळजवळ होत नसतहे तर अजिबातच पटत नाही.अत्यंत दृढ धार्मिक संस्कारम्हणता कि काय? आता तुम्हाला शिकविण्यात येणारी इतिहासाची पुस्तके खोटा इतिहास शिकवितात असे म्हणायचे असेल तर पुढे बोलण्यात अर्थ नाही.पुढच्या लोकसभा निवडणुका होईपर्यंत दर महिन्यात काहीतरी धुरळा उडवला जाईल.>>> +१ . अत्यंत घाणेरड्या स्तराला पोहचलेले राजकारण पाहुन खेद वाटतो. काँग्रेस , सेक्युलर लोकं कशाचं भांडवल करत आहेत ? बलात्काराच्या घटनेचं ? तेही आठ वर्षांच्या चिमुरड्या पोरीच्या ? आणि भाजपा वाले तरी काय करत आहेत ? असल्यांना बलात्कार प्रकरणात संशयित असालेल्यांना बचावायचा प्रयत्न? न्यायव्यवस्थेवर दबाव आणणे ? अवघड आहे .