Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चालू घडामोडी - डिसेंबर २०१८

व
वामन देशमुख
Sat, 12/01/2018 - 07:27
🗣 144 प्रतिसाद
सध्या देशाच्या बहुतांश भागात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. तेलंगण राज्याचीही मुदतपूर्व निवडणूक पुढच्या आठवड्यात आहे. राज्यभरात आणि राजधानीत प्रचाराचा धुराळा उडालाय आणि सर्वचजण या धामधुमीत आपले हात धुवून घेत आहे असं चित्र दिसतंय. परराज्यातील एक प्रमुख प्रादेशिक पक्ष शिवसेनेनेही अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले आहे, (किंवा अनेकजण शिवसेनेच्या बॅनरखाली स्वतः निवडणूक लढवत आहेत). अशाच एका उत्साही उमेदवाराच्या मिनिट्रकवर लावलेले हे प्रचारचित्र. a
वर्गीकरण
राजकारण

प्रतिक्रिया द्या
55790 वाचन

💬 प्रतिसाद (144)
ज
जानु Sat, 12/01/2018 - 17:53 नवीन
प्रचारचित्र दिसत नाही. तेजप्रताप यादव यांच्या कर्तुत्वाने यादवी चव्हाट्यावर आली, यादव घराणे २०१९ आणि नंतरच्या बिहार स्थानिक निवडनुकांनंतर कालबाह्य होणार का?
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Mon, 12/03/2018 - 05:41 नवीन
फोटो तर शेअर केलाय मी, का बरं दिसत नसावा? बादवे, हा दुवा घ्या: प्रचारचित्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जानु
आ
आनन्दा Mon, 12/03/2018 - 05:51 नवीन
हे काय आता नवीन?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 12/01/2018 - 20:15 नवीन
जर तुमच्या माहितीत कोणता योग्य उमेदवार असेल तर त्याला खालील माहिती उपयोगी पडेल... Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Sun, 12/02/2018 - 15:03 नवीन
राज ठाकरेंचे उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावर भाषण सुरू.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sun, 12/02/2018 - 15:46 नवीन
मराठीत कि हिंदीत? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
व
विशुमित Sun, 12/02/2018 - 19:36 नवीन
हिन्दी मधे... चांगले पंचेस मारलेत .त्यांच्या भाषणाचा परिणाम असा झाला की उतरभारतीय मंचाने रोजगारबद्द्ल ठोस पाऊले घेतली जात नाहित तो पर्यंत उतरभारतीय नेत्याना महाराष्ट्र प्रवेशबंदी केली आहे. https://www.loksatta.com/mumbai-news/up-bihar-mp-mla-ban-entry-in-mumbai-and-maharashtra-1798900/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
व
विशुमित Sun, 12/02/2018 - 19:30 नवीन
नोटबंदीचा काळ्या पैशावर काही फरक पडला नाही...हे मी नाही म्हणत मुख्य निवडणूक अधिकार्यांच म्हणणं आहे. बातमीनुसार यातील आजच्या घडीला प्रभावी लोक कोण असतील बरं?काय अंदाज?? https://www.loksatta.com/desh-videsh-news/demonetisation-never-impact-on-black-money-says-op-rawat-1798830/
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 12/03/2018 - 13:30 नवीन
रागा स्वतःच काँग्रेसमुक्त भारताच्या कल्पनेवर कार्यरत आहेत का ? असा प्रश्न उपस्थित करणारा स्रिमोय तालुकदार यांचा लेख फर्स्टपोस्ट मध्ये आला आहे. खरे म्हणजे एक पाय या डगरीवर एक पाय त्या डगरीवर असे काँग्रेसच्या सेक्युलॅरीझमचे स्वरुप राहीले आहे. नेहरु आणि म.गांधींच्या पलिकडे काँग्रेसींची सेक्युलॅरीझमला बांधिलकी साशंकीतच होती. पंप्र झाल्यावर योगा क्लासेस घेण्याची सुरवातीचे क्रेडीट मोदींना नव्हे तर इंदिराजींना जाते याची बहुतेकांना कल्पना नसते. एकीकडे लांगूलचालन करताना दुसरीकडे गाय-वासरु सारखे चिन्ह निवडणे ते मंदिरांना भेटीचे सॉफ्ट हिंदूत्व इंदिराजींनीही केले, राजीवजींनी काँग्रेस राजकारण राम आणि शहाबानो-माघारीत नेले तर राहुल गांधीही त्याच पावलांवर पावले कशी टाकताहेत या बद्दल तालुकदारांची मांडणी लक्षात घ्यावी लागते. तालुकदार म्हणतात
BJP’s real win lies in successfully setting the ground rules for parties to fight elections........It has ensured that no matter which way the mandate swings......political discourse will steadily shift away from pseudo-secularism to Hindutva as the new campaign metric. And parties will be judged (or so they might assume) by how close or distant they are to this theme.
This, as Yogi Adityanath has pointed out, is a total and complete ideological victory. When Rahul Gandhi is forced to flaunt his sacred thread and Brahminical parentage in a show of competitive Hindutva, the BJP is the winner. Fortunately for BJP, in its mission to replace the ‘idea of Congress’ that came to define the ‘idea of India’ during the past few decades of this independent nation, it has been ably supported by the new Congress president, who is working hard day and night to realise Modi and Amit Shah’s dream of making India 'Congress-mukt'.
..........However, it has completely escaped the Congress president that by trying to outdo the BJP at its own game and presenting Congress as ‘BJP 2.0’, he has hastened Congress’s identity crisis.
A political party is not merely an organised group of leaders, cadres and supporters that seeks to acquire and exercise power. It must have an ideological mooring to shape its policies and vision. A dislocation of that mooring has a ripple effect on the party that may reduce it to a cultish organisation centred around a clan or a dynasty. This system may keep the party temporarily afloat but eventually will be unable to prop up the party in a marketplace of ideas. By seeking to annul its belief in "secularism" (however cynical or subversive Congress’s idea may have been from the tenets of true secularism), Rahul has dislocated this ideological anchor. Congress has nothing to distinguish itself from its more powerful ideological opponent.
इंडियन एक्स्प्रेसच्या अग्रलेखातील एका वाक्याकडे ते लक्ष वेधतात
......The electoral rise of this new Congress may mark the final departure of the idea of the Congress — a move toward Congress-mukt Bharat indeed."
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Mon, 12/03/2018 - 13:46 नवीन
खोसला का घोसला ???? चीट फंड घोटाळयात फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी आरोपीच्या मुलाला हनीट्रॅपमध्ये अडकवून मुख्य आरोपींना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले. लोकसत्ता ऑनलाइन | November 29, 2018 05:20 pm
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 12/04/2018 - 10:18 नवीन
ह्या उपटसुंभाना अणि त्यांचे Brainstorming करणार्या अर्बन सनातनीना आवरा राव कोणितरी..!! https://www.loksatta.com/desh-videsh-news/bulandshahr-violence-main-accused-yogesh-raj-arrested-bajrang-dal-leader-cow-slaughter-complainant-1799719/
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Tue, 12/04/2018 - 11:11 नवीन
मी पूर्वीच बोललोय भाजप ला फक्त भाजपचं हरवू शकते . ही अतिउत्साही माकडे हिंदू धर्म बदनाम करत आहेत . महाराष्ट्रात ही आहेत असली माकडे !!! दुष्काळात जो शेतकरी स्वतःचे दोन वेळा नीट पोट भरू शकत म्हणून तो नाईलाजाने पशुधन विक्रीसाठी काढतो अशा शेतकऱ्याला ' भिकारी , कटोरी वाले ' अशी संभावना करणारे महाभाग आहेत इथे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Tue, 12/04/2018 - 10:25 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh-news/this-is-a-preplanned-conspiracy-by-vhp-bajrang-dal-and-rss-says-uttar-pradesh-minister-op-rajbhar-1799789/
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 12/04/2018 - 11:26 नवीन
रविवार मटा- संजय सोनवणींच्या नवीन पुस्तकाबद्दल समीक्षा आली आहे. हिंदू वि वैदिक धर्म काही पुरावे आहेत म्हणे. २) मध्य प्रदेशात बहुमत नाही असं पंडित म्हणतात ,का य होईल?
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Tue, 12/04/2018 - 11:54 नवीन
मध्य प्रदेश मधे मोदीजींची काहीच हवा नाहीये, परंतु शिवराज सिंग ची इमेज अजूनही चांगली आहे, १५ वर्ष सत्तेविरुद्ध अँटी इन्कमबंसी असूनही जर शिवराज कांटे टक्कर देत असेल, तर नक्कीच गडी स्वयंभू व तगडा आहे. १५ वर्ष सत्तेविरुद्ध अँटी इन्कमबंसी असूनही (ओपन- शट केस असताना) काँग्रेस विस्कळीत नेतृत्व विस्कळीत नॅरेशन असल्यामुळे फक्त टफ फाईट देतीये (साऊथ आफ्रिकन क्रिकेट संघा प्रमाणे चोकर्स... ). शिवराज सिंग बद्दल सहानुभती आहे, जिंकला तर मोदीजींमुळे , हरला तर स्वतःच्या नॉन परफॉर्मन्स मुळे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
म
माहितगार Tue, 12/04/2018 - 14:21 नवीन
संजय सोनवणींच्या नवीन पुस्तकाबद्दल समीक्षा आली आहे. हिंदू वि वैदिक धर्म काही पुरावे आहेत म्हणे.
संजय सोनवणींच्या मांडणी आणि निष्कर्ष पटोत अथवा न पटोत बर्‍यापकी नव्या मांडणीचे प्रयत्न अभ्यासपूर्ण असतात आणि त्यांच्या लेखनाची दखल घेतली पाहिजे असे वाटते. कुणि पुस्तक वाचले असल्यास स्वतंत्र चर्चा धागा काढण्यास स्कोप असावा असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
अ
अर्धवटराव Tue, 12/04/2018 - 15:22 नवीन
आमच्या नजरेत पवार साहेब हे नेहेमीच पंप्र पदाचे उमेदवार. प्रॅक्टीकली आम्हाला नरसींहराव, वाजपेयी देखील आवडायचे. युपीएला दुसरी टर्म मिळाली आणि ममोंबद्दलही आम्हाला आनंद वाटला. मुख्य म्हणजे राहुल गांधींच्य रुपाने काँग्रेसला, देशाला तरुण नेतृत्व मिळेल याचं देखील बरं वाटलं. इकडे रागा फार डिसअपॉइण्ट करायला लागले पण तिकडे मोदि देशपातळीवर उदयाला आले त्याचाही आनंदच झाला. आता मात्र भाजपा परत सॅफ्रन होळी खेळायला लागल्याचं बघुन हळहळ होते आहे. एकीकडे युपीएची भेळपुरी नको वाटते. दुसरीकडे कडवट हिंदुत्वाचं पुनरुत्थान देखील नको वाटतं. केजरीबाबुंनी तसंही फार पुर्वीच निराशा केली आहे. तरुण तुर्कांमधे कन्हैय्या कुमार, मेवाणी वगैरेचा मेळावा बघुन तर डबल नको नको वाटतं. निकट भविष्यात रागा, योगी आदित्यनाथ, कन्हैय्याकुमार... असे ऑप्शन्स असणार का आपल्यापुढे??
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Tue, 12/04/2018 - 15:26 नवीन
फडणवीस पण आहेत की.. त्यांचा ही आवाज कायम चढलेलाच असतो म्हणा. वरच्या पट्टीत बोलणं हे राजकारण करण्याचं बेसिक qualofication आहे की काय देव जाणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
M
mrcoolguynice Tue, 12/04/2018 - 17:44 नवीन
बुलंद शहरकी बुलंद तसवीर ...... हमारा विकास sss हमारा विकास sss
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Fri, 12/07/2018 - 11:44 नवीन
नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील बुलंदशहरमध्ये झालेला हिंसाचार मुस्लिमांशी दंगल घडविण्याचा प्रयत्न होता. हा एक कटाचा भाग होता, असे करण्यात आलेल्या चौकशीत समोर आले आहे. याबाबतचा अहवाल अतिरिक्त पोलिस महासंचालक एस. बी. शिरोडकर यांनी दिला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mrcoolguynice
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 12/04/2018 - 18:39 नवीन
VVIP chopper scam: Middleman Christian Michel extradited to India ३६०० कोटी अगुस्ता-वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील फार महत्वाचा फरार असलेला दलाल, क्रिस्तियन मायकेल, याला युएईच्या सरकारने सिबीआयच्या ताब्यात दिले आहे. त्याला काही तासांत भारतात आणणे अपेक्षित आहे. हा अगुस्ता घोटाळ्याच्या कायदेशीर कारवाईत मैलाचा दगड आहे.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Tue, 12/04/2018 - 21:00 नवीन
ऐव्हाना पोहोचला असेल ! NDA सरकार त्याच्या मागे लागलेल होत ! श्री अजित डोवाल यांच बारीक लक्ष ह्या केसवर होत. २०१७ साली क्रिस्चियन मायकेल ने वेष बदलुन युएईतुन पळुन जायचा प्रयत्न केला होता पण तत्पर ईमिग्रेशन मुळे त्याचा हा प्लॅन वेळीच पकडला गेला ! ह्याच्या वर युएईतही केस चालु आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 12/05/2018 - 07:01 नवीन
क्रिस्तियन मायकेल ब्रिटिश नागरिक आहे. त्याने संयुक्त अमिरातींच्या न्यायालयात, "ब्रिटिश नागरिकाला संयुक्त अमिराती भारतात प्रत्यावर्तित (एक्स्ट्राडाईट) करु शकत नाही" असा युक्तिवाद केला होता. संयुक्त अमिरातींच्या न्यायालयाने त्याला धुडकावून, मायकेलला सिबिआयच्या ताब्यात दिले आणि आता त्याला भारतात आणले गेलेही आहे. हा घटनाक्रम पाहून मल्ल्याची पाचावर धारण बसली नसती तरच नवल होते. त्याने, परत एकदा, "बँकांचे १००% पैसे परत करेन: अशी व्टिट्स करायला सुरुवात केली आहे. अर्थातच, मल्ल्याचा पूर्वेतिहास पाहता, हा (नेहमीप्रमाणेच) दिशाभूल करण्याचा प्रयत्न असण्याची शक्यता आहेच. पण, (अ) त्याच्या प्रत्यावर्तित करण्याच्या खटल्याच्या निकालाची तारीख जवळ येऊ लागली आहे, आणि (आ) ब्रिटनमधून प्रत्यावर्तित केलेल्या गुन्हेगारांसाठी भारतिय तुरुंग सुरक्षित आहेत असा निर्णय अगोदरच ब्रिटिश न्यायालयाने दिलेला आहे... हे पाहता, मल्ल्याकडून कर्जवसूली झाली तर आश्चर्यही वाटायला नको. Vijay Mallya offers to repay 100% of 'public money', says UK extradition to take own legal course.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डँबिस००७ गुरुवार, 12/06/2018 - 16:43 नवीन
क्रिस्तियन मायकेल ला भारतात आणलेले बघुन राजकारण्यांचे धाबे दणाणले आहेतच पण नेहेमी भाजपा, श्री मोदिजींवर कटाक्ष टाकणारे मिडीया कुमार ( रविश कुमार बाबु ) सुद्धा मलुल पडले ! दोन महीन्यापुर्वी रिपब्लिक टीव्हीने संयुक्त अमिरातींच्या न्यायालयाने क्रिस्तियन मायकेलला भारतात प्रत्यावर्तित (एक्स्ट्राडाईट) करण्याची परवानगी दिली आहे अशी बातमी ब्रेक केलेली होती. त्यावेळेला रविश कुमारला जोरदार हसु आलेल. आता जेंव्हा खरच क्रिस्तियन मायकेलला भारतात प्रत्यावर्तित केले गेले त्यावेळे ला म्हणे ह्या केस म ध्ये काही दमच नाही. ईटालीच्या कोर्टात ह्या केस मध्ये कोणालाच शिक्षा झालेली नाही . आताच सरकार ह्या क्रिस्तियन मायकेलला भारतात आणुन काय साधणार आहे वैगेरे वैगेरे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 12/07/2018 - 16:57 नवीन
क्रिस्तियन मायकेलला भारतात आणणे ही फार महत्वाची असली तरी, ती फक्त पहिली पायरी आहे. क्रिस्तियन मायकेलच्या तर्फे "भारतिय कोर्टाला मान्य (अ‍ॅडमिसिबल) आणि निर्णय घेण्यास योग्य" असा पुरावा मिळविणे हे त्यापेक्षा जास्त महत्वाचे आहे. ते जमल्यासच योग्य निर्णय मिळू शकेल. तसे होऊ नये यासाठी, काँग्रेसने अगोदरच फिल्डिंग लावली आहे. काँग्रेसशी संबंधित तीन वकील क्रिस्तियन मायकेलची बाजू मांडायला तयार झाले आहेत. त्यातल्या पहिल्याने पहिल्याच दिवशी मायकेलची न्यायालयाच्या संमतिने अधिकृत भेट घेऊन त्याच्यापर्यंत "योग्य ते संदेश" पोचवले आहेत. शिवाय, या नवख्या वाटणार्‍या वकिलांच्या गटामागे सिब्बल, संघवी, इत्यादी जान्यामान्या वकिलांची गुप्त फळी बसलेली आहेच. या पार्श्वभूमीवर, या अटीतटीच्या खेळात, सरकार कोणती आणि कश्या प्रकारे, आपली रणनिती वापरेल हे पाहणे रोचक असणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
ड
डँबिस००७ Tue, 12/04/2018 - 21:14 नवीन
ऊ प्र च्या एका जिल्ह्यात अजमल कसाबला डोमिसाईल सर्टीफीकेट देण्यात आल होत ! कलेक्टरच्या लक्षात येताच तत्परतेने ते सर्टीफीकेट रद्द केल व सर्टीफीकेट देणार्या अधिकार्याला बडतर्फ करण्यात आल ! कोणी हे सर्टीफीकेट बनवायला अर्ज केला होता हे अजुन समोर आलेल नाही ! पण त्याने मोठा गेम केलेला आहे ! ह्या केस मधला गलथान पणा किती महागात पडणार याची कल्पना ह्या केस मध्ये अडकलेल्याना नसेल ! एवढ्यात ह्या बातमीचा खुप फायदा करुन घेतला आहे !
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Tue, 12/04/2018 - 21:16 नवीन
पाकिस्तानने फायदा घेतला ! आधार कार्ड प्रत्येक बाबतीत वापरण किती महत्वाच आहे हे अधोरेखीत होत आहे !
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Wed, 12/05/2018 - 09:54 नवीन
दिल्लीमध्ये, संसदेचे विशेष सत्र चालू करावे (शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात) यासाठी केलेल्या किसान मोर्च्याच्या दरम्यान,मागण्या / प्रश्न, समजून घेण्यासाठी, अनेक राजकीय लोकांनी गाठी घेतल्या असे वाचले, परंतु कामाच्या व्यस्ततेमुळे असेल कदाचित, पण केंद्रीय सरकारमधील कोणी भेट घेतल्याचे वाचनात नाही. -------------- प्रियांका चोप्रा निक चा राजेशाही विवाहानंतर , त्यांनी दिल्लीत लग्नाचे रिसेप्शन दिले. पाहुण्यामध्ये, आपल्या कामाच्या व्यस्ततेतून वेळ बाजूला काढून, पंतप्रधान मोदीजी यांनीही उपस्थिती नोंदवली व वधूवरास शुभेच्छा दिल्या. गप्पा मारल्या, संवाद साधला. आपला दीर व (गेम ऑफ थ्रोन मधील सांसा ) सोफी टर्नर यांच्या आगामी विवाहाबद्दल, प्रियंकाने पंतप्रधानांना आवर्जून कल्पना दिली. -------------- दरम्यान दिल्लीमध्ये एका मुलाखतीत बोलताना, उपमुख्यमंत्री सिसोदिया म्हणाले, की दोन्ही (हिंदू व मुसलमान) जर होकार देतील, तर अयोध्येतील कोर्टवादातील जमिनीवर, युनिव्हर्सिटी व्हावी व तिथे हिंदू मुसलमान शीख इसाई दलित , भारतीय व विदेशी या सर्वाना शिक्षण मिळावे. का ? तर् म्हणे , भारताची रामराज्य कडे वाटचाल ही युनिव्हर्सिटीचे जाळे विणून होणार , मंदिर बांधून नव्हे. -------------- येडच्यापच आहे मनीष , काहीपण बोलतो, २१ व्या शतकातील युगात काय गरज आहे युनिव्हर्सिटीची ?
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 12/05/2018 - 10:23 नवीन
तिन्ही बातम्यांचे सार, जिथे गर्दी जमते, मतांची चांदी होते त्या त्या साठी राजकीय नेते गागा करतात आणि ज्यांचे त्यांचे भक्त आपापल्या हिरोचे कौतुक करुन मत रुपाने आशिर्वाद देतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mrcoolguynice
M
mrcoolguynice Wed, 12/05/2018 - 11:04 नवीन
तिन्ही बातम्यांचे सार, जिथे गर्दी जमते, मतांची चांदी होते त्या त्या साठी राजकीय नेते गागा करतात
नाही नो नेव्हर ... त्रिवार नकार ... मोदीजींचे, तुम्ही इतर नेत्यांबरोबर कम्पेअर करू नका. मोदीजींची प्रत्येक कृती, त्यांनी घेतलेला व सोडलेला प्रत्येक श्वास व उच्छ्श्वास हा फक्त आणि फक्त भारतमातेसाठीच असतो. भारताची परदेशातील मान अधिकच उंचावी, म्हणूनच त्यांनी रिसेप्शनला वेळ दिला असावा. नाहीतर आपला बहुमूल्य वेळ ते रिसेप्शनतील शे दोनशेच्या गर्दीसाठी निवेश करतील असे मला वाटत नाही, शिवाय त्यात सासुरवाशीण व तिच्या सासरकडची मंडळी (अंदाजे निम्मे पाहुणे राउळे), भारतात मतदानास, पात्र किंवा उत्सुक असतील का ? परंतु सध्यातरी भारताची परदेशातील मान अधिकच उंचावी, म्हणूनच त्यांनी रिसेप्शनला वेळ दिला असावा, असे वाटते.
ज्यांचे त्यांचे भक्त आपापल्या हिरोचे कौतुक करुन मत रुपाने आशिर्वाद देतात.
कौतुक व आशिर्वाद......? कधीपासून व्हायला लागले असें भारतात ? २०१४ पूर्वी एक चपटी व थोडे पैसे टाकून निवडणुका जिंकण्यात यायच्या, शेवटी चपटी व पैश्यांचा, जनतेला उबग येऊन, जनतेने राष्ट्रप्रेमी मोदीजींना, मत रुपाने आशिर्वाद देऊन निवडून आणले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
M
mrcoolguynice Wed, 12/05/2018 - 11:22 नवीन
जिथे गर्दी जमते, मतांची चांदी होते त्या त्या साठी राजकीय नेते गागा करतात
शिवाय तुमच्याच तर्कने जायचे ठरवले, तर मोदीजी मोदीजी हे इतरांसारखे मताचे राजकारण करणारे नेते असते, तर ते जास्ती गर्दीच्या किसान मोर्च्यात गेले असते, रिसेप्शनला जाण्याऐवजी त्यांना पूर्ण कल्पना आहे, हे शेतकरी नेहमीच रडगाणी गात असतात. दोन दिवस मोर्चे काढतील, नंतर गपगुमान शेती करतील. शेतकऱ्याला शहरी टॅक्सपेयर पोसतात, ...शेतकरी नागरिकाना नाही, असा मोदीजींचा अभ्यास असणारच. आणि नाही केली शेतकऱ्यांने शेती, तर काय ? सोप्पंय सर्व अन्न धान्य आयात करायचे... त्यासाठीच आंतरराष्ट्रीय संबंध चांगले ठेवलेत मोदीजींनी ... त्यासाठीच ते रिसेप्शनला गेलेत ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
स
सुबोध खरे Wed, 12/05/2018 - 14:14 नवीन
हे शेतकरी नेहमीच रडगाणी गात असतात. दोन दिवस मोर्चे काढतील, नंतर गपगुमान शेती करतील. शेतकऱ्याला शहरी टॅक्सपेयर पोसतात, ...शेतकरी नागरिकाना नाही, असा मोदीजींचा अभ्यास असणारच. आणि नाही केली शेतकऱ्यांने शेती, तर काय ? चांदीचा मुलामा गेल्यावर पितळ उघडं पडायला लागलेलं दिसतंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mrcoolguynice
M
mrcoolguynice Wed, 12/05/2018 - 14:59 नवीन
काही पितळ वैगरे उघडे पडले नाहीय्ये मोदीजींचे. पुढच्या वेळेस पण मोदीजीच्च.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 12/06/2018 - 06:38 नवीन
पितळ मोदींचं उघडं पडलेलं नाही. ज्याचं आहे त्याने समजून घ्यावं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mrcoolguynice
M
mrcoolguynice गुरुवार, 12/06/2018 - 06:51 नवीन
ओके, मग ज़ेव्हा पितळ मोदींचं उघडं पडेल, त्यानंतर आपण पुढ़े बोलू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
L
lakhu risbud Sat, 12/08/2018 - 09:45 नवीन
माजे "मोगा" माजे रानी तुज्या दोल्यात शोधतो नाव !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
आ
आनन्दा Wed, 12/05/2018 - 15:49 नवीन
खरे आहे. ते जे काही बोलतायत ते मोदी भक्त तर जाऊ द्या. एखादा सामान्य समजुतदार माणुस देखील बोलु शकणार नाही. आसो, किती दिवस चमकणार एखादा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
M
mrcoolguynice Wed, 12/05/2018 - 18:00 नवीन
ते जे काही बोलतायत ते मोदी भक्त तर जाऊ द्या. एखादा सामान्य समजुतदार माणुस देखील बोलु शकणार नाही.
"समाजात 'मोदीभक्त' व 'सामान्य समजूतदार माणूस' , असे दोन समाजगट आहेत, व त्या दोन्ही समाजगटातील कोणीही असे बोलू शकणार नाही ...." असे आपल्या बोलण्यातून ध्वनित होतंय .... असो ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा गुरुवार, 12/06/2018 - 04:34 नवीन
हम्म.. बरोबर. तुम्ही दोन्ही गटात बसत नसल्यामुळे तुम्हाला हा प्रश्न पडला असेल. पण ते वाक्य नीट वाचा, मोदीभक्त ते सामान्य हा त्या प्रतिसादाचा आवाका आहे. त्यापुढच्या लोकांसाठी माझी लेखणी थिटी आहे.. जसे की कुके, आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही पण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mrcoolguynice
M
mrcoolguynice गुरुवार, 12/06/2018 - 05:38 नवीन
पण ते वाक्य नीट वाचा, मोदीभक्त ते सामान्य हा त्या प्रतिसादाचा आवाका आहे.
प्रतिसादाच्या अवाक्याच्या स्केल वर..... ‘मोदिभक्त’ ते ‘सामान्य’ या या स्केलवर , मी नाही हे वाचून हायसे वाटले. धन्यवाद ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा गुरुवार, 12/06/2018 - 05:53 नवीन
काय हो, एव्हढ्या लवकर कल्हई गेली पण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mrcoolguynice
M
mrcoolguynice गुरुवार, 12/06/2018 - 09:23 नवीन
लवकर कुठे ? जवळ जवळ ५ वर्ष्यानी कल्हई जाणारच नं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
र
राहुल५१ गुरुवार, 12/06/2018 - 13:36 नवीन
https://www.hindustantimes.com/delhi-news/delhi-to-get-its-first-haj-house-next-year-building-layout-prepared/story-tEDiwzc2f2T66tij8aWJDL.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राहुल५१
M
mrcoolguynice Wed, 12/05/2018 - 15:24 नवीन
कोंबडीच्या पिलाला समज आली तर...! (संदीप वासलेकर रविवार, 2 डिसेंबर 2018) {{''https://www.esakal.com/saptarang/sundeep-waslekar-write-article-saptarang-158152''}} हा लेखं एका भारतीय पेप्रात का छापून आलाय ? मी म्हणतोय ग्रीसचा किंवा ब्रेक्सिटचा , आणि आपला काय संबंध ??
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 12/05/2018 - 16:22 नवीन
हुशारेत वासलेकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mrcoolguynice
श
शाम भागवत Wed, 12/05/2018 - 17:42 नवीन
खरय. पवारांनाही सांभाळल आणि सत्ताधारी दुखावणार नाहीत याचीपण काळजी घेतली. २०१९ जवळ आलय. कुंपणावर बसणच बर असत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Wed, 12/05/2018 - 18:01 नवीन
भागवतजी, राजकारण जरा बाजूला ठेऊ, एखादी कृती / धोरण देशहीतास अनुकूल नसेल तर देशहीतास अनुकूल नाही म्हणावे, सत्ताधारी/विरोधी पक्ष देशभक्तीचा हवाला देत असेलपण देशहीताच्या अपेक्षांवर खरा उतरत नसेल तर तशीही टिका करावी पण म्हणून देशभक्तीच्या संकल्पनेला गाडण्याची गरज कुणालाही का भासावी हे अनाकलनीय आहे. वासलेकरांनी दिलेल्या कोंबडीच्या पिलाच्या गोष्टीत कोणतेही बदल करुन ती कथ वाचता येऊ शकते सध्या त्यांनी ती एका दिशेने दिली तर ती इतर अनेक दिशांनी वाचता येऊ शकेल याचा आदमास घेण्याची गरज वासलेकरांना कदाचित भासली नसावी.
एका देशभक्ती-विरोधकाने कोंबडीचं नवीनच जन्मलेलं एक पिलू आणलं. देशभक्ती-विरोधक त्या पिलाला रोज वेळेवर, चांगला खुराक देत असे. त्यामुळे पिलू आनंदून जाई व देशभक्ती- विरोधाबद्दल त्याला आत्मीयता वाटत असे. नियमितपणे खुराक मिळाल्यामुळे पिलू मोठं होऊ लागलं. देशभक्ती-विरोधक दिसल्यावर आनंदानं नाचू लागलं. "हा देशभक्ती-विरोधकच आपलं सर्व काही' असं ते समजू लागलं. कोंबडीच्या पिलाला आयुष्यात देशभक्ती-विरोधकाशिवाय दुसरा पर्याय दिसत नव्हता. काही काळानं पिलू अगदी गुबगुबीत झालं. देशभक्ती-विरोधक नेहमीप्रमाणे आला. त्यानं खुराक दिला. पिलू देशभक्ती-विरोधकावरच्या प्रेमापोटी नाचू लागलं. देशभक्ती-विरोधकानं पिलाला हातात घेतलं. एवढ्या मोठ्या व्यक्तीनं आपल्याशी जवळीक साधली, हे पाहून पिलाला अतिशय आनंद झाला. देशभक्ती-विरोधकनं पिलाची मान मुरगळली. काही क्षणात पिलू मरण पावलं; पण शेवटच्या क्षणापर्यंत देशभक्ती-विरोधकाच्या मनातलं कारस्थान, त्यानं निर्माण केलेला प्रेमाचा आभास व त्याचा उद्देश हे काही पिलाला समजलंच नाही. मारलेलं पिलू देशभक्ती-विरोधकानं देशद्रोहीशक्तींन विकलं. गावातल्या पाच-सहा देशद्रोह्यांनी एकत्र येऊन त्या त्या पिलाची मेजवानी झोडली! वास्तविक, कोंबडीचं पिलू अवतीभवती पाहत असायचं. मधूनमधून गुबगुबीत झालेली पिलं नाहीशी होतात, हे त्याला कळायला हवं होतं; परंतु अमर्याद स्वार्थ व वास्तवतेपेक्षा देशभक्ती-विरोधकाने निर्माण केलेल्या आभासाची लालसा यामुळे सत्य काय आहे हे पिलाला समजलंच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
M
mrcoolguynice Wed, 12/05/2018 - 18:15 नवीन
फारच छान प्रतिक्रिया ! फक्त तेवढ, २-४ देशभक्ती विरोधकांची नावे जाहीर करा नं प्लीज ... म्हणजे तुमच्या लेखी असलेले, देशभक्ती विरोधक नको हं ! असे की ज्यांनी जाहीरपणे , देशभक्तीला विरोध केलाय ... आजीबात देशभक्ती करू नका म्हणालेत ... आणि हो डॉक्टर्ड टेप च्या आधारे एखाद्याला देशभक्ती विरोधक ठरवण्याची , निसटती बाजूही तेव्हडी सांभाळून घ्यालच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार गुरुवार, 12/06/2018 - 05:43 नवीन
....आणि हो डॉक्टर्ड टेप च्या आधारे एखाद्याला देशभक्ती विरोधक ठरवण्याची , निसटती बाजूही तेव्हडी सांभाळून घ्यालच....
डॉक्टर्ड टेपचे बद्दल निर्देश पुन्हा पुन्हा करता येतात. पण इन डॉक्ट्रीनेशनने जे बिघडते त्याचे काय करणार ? तथाकथितांचा लाडका उमर खालीद चेन्नईत जाऊन काश्मिर भारताचा नसल्याचा अपप्रचार करतो त्याचे काय करायचे ? हा अख्खा युट्यूब डोक्टर्ड आहे कि इन-डॉक्ट्रीनेशन आहे ? हि एक युट्युब लिंक देतोय ज्यातील अँकर 'दुनियाकी सबसे बडी जम्हूरीयत काश्मिरमे कितनी खूबसुरत नजर आती है' म्हणतो अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीत ज्यांनी त्या वाक्यावर टाळ्या वाजवल्या त्यांना काय म्हणायचे ? देशप्रेमी ? काश्मिर मध्ये लोक्शाहीला डंख करणारा दहशतवाद आणि त्या मागे असलेले शांततेच्या धर्माच्या तत्वज्ञानावर पांघरूण घालायचे आणि मग 'दुनियाकी सबसे बडी जम्हूरीयत काश्मिरमे कितनी खूबसुरत नजर आती है' म्हणून टाळ्या मिळवायच्या ? टाळ्या वाजवणार्‍यांना खाल्ल्या थाळीत छेद करताना लाजा वाटत नाहीत ? त्यानंतरचे काश्मिरी प्राध्यापक स्त्रीचे भाषण काही देशप्रेमी नाही ती काश्मिरी आहे तिचे सोडून देऊ , पण अशा व्यासपिठावर बसलेल्या आणि काश्मिर भारताचा भाग आहे ह्या बद्दल ब्र सुद्धा न काढणार्‍या अर्बन नक्षलांना नेमके काय म्हणायचे ? जे एन यु मधील टेप डॉक्टर्ड असतील पण ज्या सुकुमाराचे नाव घेतले गेले त्याने ' स्वतःच्या बायकोचे नाव भारतमात ठेवतो ' म्हणत आपल्या टवाळीतून जे हिनत्व पुढे आणले त्याचे काय करायचे ? कलकत्याच्या जादवपूर विद्यापीठात सरळ सरळ '***मांगे आजादी' म्हणत मोर्चा काढणार्‍या विद्यार्थ्यांचे काय करायचे ? त्यांच्यात देशभक्ती जागृत करण्यास कमीपडलेल्या शिक्षक आणि प्राध्यापकांना उपकुलपतींना काय आदर्श शिक्षकाचे पुरस्कार द्यायचे ? आणि देशप्रेम पातळ असलेल्यांच्या निसटत्या बाजू सांभाळूंन घेणार्‍यांना नेमक्या किती दिव्यांनी ओवाळायचे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mrcoolguynice
M
mrcoolguynice गुरुवार, 12/06/2018 - 06:29 नवीन
असल्या लोकांवर कठोर कायदेशीर करवाई व्हावि ही आपेक्षा. आणि तसा आग्रह आपण सर्वानी गृह खात्याकड़े लावून धरायला हवाच. गृह खाते असल्यांच्या मुसक्या बांधायला काहीच हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा