Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चालू घडामोडी - मार्च २०१९

व
वामन देशमुख
Fri, 03/01/2019 - 18:44
🗣 180 प्रतिसाद
एकीकडे भारतीय उपखंडात दाटून आलेले युद्धाचे ढग अजून निवळलेले नसताना, दुसरीकडे पश्चिम आशियात भरलेल्या इस्लामी देशांच्या सहकार्य परिषदेच्या उदघाटन समारंभात भारत सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहिला आहे. याप्रसंगी भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांनी प्रभावी भाषणातून इस्लामी जगताशी मैत्री, सहकार्य आणि परस्पर सहजीवनाचा संदेश दिला आहे. भाषणाचा मजकूर इथे आणि विडिओ इथे आहेत. २०१९ वर्ष हे राष्ट्रीय व जागतिक पातळीवर निश्चितच मोठ्या उलथापालथीचं ठरेल असं मला व्यक्तिशः वाटतं. १. या महिन्यातच (३१ मार्चपर्यंत) भारताकडून पाकिस्तानला अजून एक धक्का दिला जाईल - अ. मौलाना मसूद अझरला पकडणे / मारणे आ. सर्जिकल स्ट्राइक ३.० इ. अजून असंच काहीतरी २. श्री नरेंद्र मोदी हे प्रचंड बहुमताने निवडून येऊन पुन्हा पंतप्रधान बनतील. - महाराष्ट्रातील विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणूका लोकसभेच्या निवडणुकीसोबतच होतील. ३. या वर्षाअखेरीपर्यंत पाकिस्तानचे किमान दोन तुकडे होतील. ४. इझ्रायल चे पंतप्रधान श्री.बेंजामिन नेतान्याहू यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे कदाचित पंतप्रधानपद सोडावे लागेल.
वर्गीकरण
राजकारण
चर्चा (काथ्याकूट)

प्रतिक्रिया द्या
94263 वाचन

💬 प्रतिसाद (180)
ढ
ढब्ब्या Fri, 03/01/2019 - 19:06 नवीन
मौलाना मसूद अझरला पकडणे / मारणे => शक्यता वाटत नाही. सर्जिकल स्ट्राइक ३.० => थोडीफार शक्यता आहे. या वर्षाअखेरीपर्यंत पाकिस्तानचे किमान दोन तुकडे होतील. => अजिबात शक्यता वाटत नाही. श्री नरेंद्र मोदी हे प्रचंड बहुमताने निवडून येऊन पुन्हा पंतप्रधान बनतील. => अगदीच काळ्या दगडावरची रेघ वाटतीये.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Fri, 03/01/2019 - 19:56 नवीन
सध्या बलुचिस्तान आणि सिंध हे दोन प्रांत पाकिस्तान पासून मुक्तता मागत आहेत. त्यात बलोच चळवळ फारच जोरात आहे. याला मोदी सपोर्ट करत आहेत म्हणून पाकिस्तान नाराज आहेच. आता सध्याच्या परिस्थितीत आर्थिक कोंडी आणि सैनिकी हल्ले याबरोबरच बलोच नेत्यांना सपोर्ट करून स्वातंत्र्य मिळवून देणे हा विचार पण मोदी आणि टीम करत असणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढब्ब्या
ढ
ढब्ब्या Fri, 03/01/2019 - 20:24 नवीन
पण, वर्षाअखेरीपर्यन्त म्हणजे फारच optimistic आहे हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ब
बाप्पू Sat, 03/02/2019 - 06:44 नवीन
पाकिस्तान विभाजित होणार आहे.. पण इतक्या लवकर होईल असे वाटत नाही.. ज्या पद्धतीने आणि वेगाने पाकिस्तान चे आर्थिक पतन चालू आहे त्यावरुन अजुन 8-10 वर्षे लागतील असे वाटते..
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 03/02/2019 - 09:03 नवीन
मौलाना मसूद अझरला पकडणे / मारणे => शक्यता आहे. काम चालु आहे. सर्जिकल स्ट्राइक ३.० => आवश्यकता असल्यास केले जाईल या वर्षाअखेरीपर्यंत पाकिस्तानचे किमान दोन तुकडे होतील.=>ह्या वर्षी होईल अशी शक्यता वाटत नाही. पण त्या दृष्टीने वाटचाल सुरु असेल. श्री नरेंद्र मोदी हे प्रचंड बहुमताने निवडून येऊन पुन्हा पंतप्रधान बनतील. => अगदीच काळ्या दगडावरची रेघ वाटतीये. देशाच चित्र येत्या पाच वर्षांत संपुर्ण बदलुन जाईल !!
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sat, 03/02/2019 - 16:15 नवीन
त्या मसूद अजहरला मौलाना बोलू नका हो. इंगळ्या ड्सतात सर्वांगाला! मौलाना आदरार्थी वापरतात हो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
ट
ट्रम्प Sat, 03/02/2019 - 13:52 नवीन
पाकिस्तान चे एफ 16 भारतीय पायलट अभिनंदन ने डॉगफाइट मध्ये पाडले , दोन दिवस पाकिस्तान मान्यच करत नव्हता !! त्या एफ 16 मधील पायलट ला गुमशुदा बनविण्या पाकी लष्करा ची तयारी चालू होती . पण त्या पायलट च्या लंडन मधील वकील नातेवाईकाने ट्विटर वर बॉम्ब फोडून त्या पायलट चे नाव जाहिर करून पाकी लष्करा ला तो जीवंत असल्याचे पुरावे दाखवण्यास सांगितले . तसेच भारतीय एयर फोर्स ने पाक ने एफ 16 भारतीय लष्करी ठाण्यावर हल्ला करण्यास आल्याचे पुरावे अमेरिका ला दिले . तरीही अजून पाकिस्तान ने एफ 16 बाबत संदिग्धता कायम ठेवली आहे . त्या मानाने पाकिस्तान वर सध्या असलेला अंतरराष्ट्रीय दबाव , अभिनंदन ला दोन दिवसांत भारतात विनाअट आणले , पाकिस्तान ला एफ 16 बाबत अमेरिकेला द्यावे लागू शकणारे स्पष्टीकरण या गोष्टि पाहता या चकमकीत भारताचा विजय झाला हे निश्चित !!! राहिले फक्त पुलवामा हल्ल्याच्या बदल्या साठी बालाकोट मध्ये भारतीय मिराज विमानानीं उध्वस्त केलेले अतेरीक्याचें तळाचे पुरावे जो पर्यंत मीडिया सामोर येत नाही तो पर्यंत करोड़ो नागरिकांच्या मनाला हुरहुर लागली आहे . कारण त्या स्थळावर जावून अंतरराष्ट्रीय माध्यमानीं 300 अतेरिकी मारले गेल्याचा दावा खोटा ठरविला आहे .
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 03/02/2019 - 16:37 नवीन
कारण त्या स्थळावर जावून अंतरराष्ट्रीय माध्यमानीं 300 अतेरिकी मारले गेल्याचा दावा खोटा ठरविला आहे . त्याठिकाणी आंतरराष्ट्रीय माध्यमांना ४८ तास झाल्यावर नेण्यात आले तोवर बरीचशी साफसफाई केली गेली आहे. तेथील प्रतिमा मिळवण्यात आल्या आहेत आणि त्या माध्यमांना जाहीर करायच्या कि नाही हे सरकारवर आहे असे लष्करी तज्ज्ञ म्हणत आहेत. मुळात तेथे एक अतिरेकी होता कि १०० होते हा एक मुददा अलाहिदा आहे. ( जितके जास्त मारले गेले असतील तितके चांगले) परंतु आता पर्यंत पाकिस्तान जी दर्पोक्ती करत होता कि आमच्यावर हल्ला केला तर आम्ही अणुबॉम्ब डागू आणि हे "असत्य"मान्य करून आपली अगोदरची सरकारे शेपूट घालत होती. पण या वेळेस सरकारने त्यांना स्पष्ट शब्दात सुनावले आहे कि तुमच्या भूमीवर दहशतवादी जेथे जेथे असतील तेथे आम्ही येऊन हल्ला करू आणि अणुबॉम्बची धमकी कुणाला देताय? तुम्ही एक जरी अणुबॉम्ब टाकला तर आम्ही पाकिस्तान जगाच्या नकाशावरून मिटवून टाकू. या धमकीमुळे पाकिस्तानचा अणुबॉम्ब हा कागदी वाघ आहे हे सिद्ध झालंय आणि पाकिस्तानच्या बाबतीत त्यांचा हा निर्वाणीचा उपाय बोथट केल्यामुळे त्यांच्या लष्करी आणि लोकशाही नेत्यांची गोची झाली आहे. हि या हल्ल्याची सर्वात मोठी उपलब्धी आहे. पाकिस्तान आतापर्यंत आमच्या भूमीवरून दहशतवादी काम करीतच नाहीत हे खोटे कायम बोलत आले आहेत त्यामुळे आताही ते तेथे दहशतवादी आहेत हे मान्य करणार नाहीतच.( तसे मान्य केले तर आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांच्याविरुद्ध आग्यामोहोळ उठेल). उडी येथील सर्जिकल स्ट्राईक तरी त्यांनी कुठे मान्य केला आहे? चोराच्या घरी चोरी झाली तर तो पोलिसात तक्रार करूच शकत नाही तशी हि स्थिती आहे. भारताच्या बाबतीत आपल्याकडे kartosat २. risat २ आणि PSLV C ७ हे हेरगिरीचे उपग्रह तुम्हाला पुरेशी माहिती दाखवू शकतीलच परंतु या गोष्टी उघड करणे कितपत शहाणपणाचे आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ट
ट्रेड मार्क Sun, 03/03/2019 - 01:45 नवीन
या धमकीमुळे पाकिस्तानचा अणुबॉम्ब हा कागदी वाघ आहे हे सिद्ध झालंय आणि पाकिस्तानच्या बाबतीत त्यांचा हा निर्वाणीचा उपाय बोथट केल्यामुळे त्यांच्या लष्करी आणि लोकशाही नेत्यांची गोची झाली आहे. हि या हल्ल्याची सर्वात मोठी उपलब्धी आहे. हजारवेळा सहमत! पाकिस्तान अतिरेक्यांचे उगमस्थान आणि आश्रयस्थान आहे हे तरी पाकिस्तान कुठे मान्य करते? ओसामा पाकिस्तानात नाही म्हणून किती जाहिरात चालू होती, पण शेवटी अमेरिकेने सर्जिकल स्ट्राईक करून मारलाच ना? मसूद अझर किडनी फेल झाल्याने आर्मी हॉस्पिटलमध्ये आहे अशी बातमी आहे. त्यातून दुसराही एक मतप्रवाह आहे की बालाकोट हल्ल्यात मसूद अझर सुद्धा मारला गेला असावा किंवा जखमी झाला असावा. तो हल्ल्यात मारला गेला हे मान्य केलं तर नाचक्की तर होईलच पण पाकिस्तानातले धर्मांध त्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दबाव आणतील. म्हणून तो आजारी असल्याची हूल उठवण्यात आली असावी अशी शंका आहे. मुळात तेथे एक अतिरेकी होता कि १०० होते हा एक मुददा अलाहिदा आहे. सहमत. अतिरेकी मारणे हे जरी आपले उद्दिष्ट होते आणि आहे. पण जरी एकही अतिरेकी मारला गेला नसेल (याची शक्यता फारच कमी आहे) तरी आंतरराष्ट्रीय सीमा पार करून ८० किमी आत असलेल्या अतिरेक्यांच्या तळावर हल्ला करणे हे पाकिस्तानचे नाक कापणेच आहे. विशेषतः पाकिस्तानी एअरफोर्स ने "Sleep tight because PAF is awake." हे ट्विट ज्या दिवशी केले त्याच रात्री भारताने हल्ला केला. आणि आपली विमाने पाकिस्तानात ८० किमी आत येऊन हल्ला करेपर्यंत "जाग्या" PAF ला कळले सुद्धा नाही. त्यामुळे तर जाहीररीत्या इज्जतीचा फालुदा झाला. पुलवामा हल्ल्यानंतर PoK मधील लॉन्चिंग पॅड्स वरून सगळे अतिरेकी हलवले होते. उरीसारखा हल्ला PoK मध्ये करू शकतील असे पाकिस्तानला वाटत होते, त्यामुळे त्यांनी त्या अतिरेक्यांना पाकिस्तानात नेऊन ठेवले. आता हा पाकिस्तानला हे नक्कीच माहित आहे की परत जर त्यांनी आपली कुरापत काढली तर भारत पाकिस्तानात कुठेही हल्ला करेल. अर्थात पुढच्या निवडणुकीत मोदी पंप्र नाही झाले तर चित्र वेगळे असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
च
चौथा कोनाडा Sun, 03/03/2019 - 16:54 नवीन
किती अतिरेकी मारले ? यावर एका प्रसिद्ध नाटकाराने तथाकथित जाणात्या राजाची खिल्ली उडवणारी टाकलेली पोस्ट /फ़ोटो पाहून जबरी हसायला आले. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सतिश म्हेत्रे Sun, 03/03/2019 - 19:56 नवीन
PSLV C-7 उपग्रह वाहक चे रॉकेट आहे. तो उपग्रह नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सतिश म्हेत्रे Sun, 03/03/2019 - 19:57 नवीन
रॉकेटचे नाव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश म्हेत्रे
स
सुबोध खरे Mon, 03/04/2019 - 15:08 नवीन
होय चूक मान्य आहे. हा उपग्रह GSAT 7 आहे. https://www.dailypioneer.com/2018/technology/india-to-launch-gsat-7-satellite-for-indian-air-force.html https://www.indiatoday.in/science/story/isro-launches-communication-satellite-gsat-7a-1412861-2018-12-19
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश म्हेत्रे
ड
डँबिस००७ Sat, 03/02/2019 - 15:04 नवीन
पुलवामा हल्ल्याच्या बदल्या साठी बालाकोट मध्ये भारतीय मिराज विमानानीं उध्वस्त केलेले अतेरीक्याचें तळाचे पुरावे आंतरराष्ट्रिय मीडियाच आता सामोर आणत आहे !! https://youtu.be/sMalp7f8lrM
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sat, 03/02/2019 - 16:20 नवीन
मसूद अजहर व हाफिज सईद कदाचित भारताला मिळतील, एकदोन दणके दिल्यावर, पण त्याने काहीच फरक पडणार नाही, कारण ह्या व्यक्ति फक्त मुखवटा आहेत, प्रत्येक पाकिस्तानी हा हाफिज सईद व मसूद अझरच आहे, जोपर्यंत हे किंवा भारतीय वा इतर मुस्लिम कट्टरता सोडणार नाहीत तोपर्यंत हा दहशतवाद संपणार नाही
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sat, 03/02/2019 - 16:22 नवीन
मसूद अजहर व हाफिज सईद कदाचित भारताला मिळतील, एकदोन दणके दिल्यावर, पण त्याने काहीच फरक पडणार नाही, कारण ह्या व्यक्ति फक्त मुखवटा आहेत, प्रत्येक पाकिस्तानी हा हाफिज सईद व मसूद अझरच आहे, जोपर्यंत हे किंवा भारतीय वा इतर मुस्लिम कट्टरता सोडणार नाहीत तोपर्यंत हा दहशतवाद संपणार नाही
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sat, 03/02/2019 - 16:23 नवीन
मसूद अजहर व हाफिज सईद कदाचित भारताला मिळतील, एकदोन दणके दिल्यावर, पण त्याने काहीच फरक पडणार नाही, कारण ह्या व्यक्ति फक्त मुखवटा आहेत, प्रत्येक पाकिस्तानी हा हाफिज सईद व मसूद अझरच आहे, जोपर्यंत हे किंवा भारतीय वा इतर मुस्लिम कट्टरता सोडणार नाहीत तोपर्यंत हा दहशतवाद संपणार नाही
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Sat, 03/02/2019 - 17:09 नवीन
भंकस बाबा प्रत्येक धाग्यात 3/ 3 वेळा प्रतिसाद आलाच पाहिजे असा काही नियम आहे काय तुमच्यासाठी ?
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Sat, 03/02/2019 - 18:08 नवीन
भंकस बाबा दूर कुठेतरी रिमोट एरिया मध्ये राहत राहायला असल्या मुळे प्रतिसाद टाईप केल्यावर ' प्रदर्शित करा ' वर क्लिक केल्यानंतर प्रतिसाद लवकर पुढे ढ़कलला जात नाही , मग ते सारखे ढकेलतात =) = )
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sat, 03/02/2019 - 18:32 नवीन
हाच प्रॉब्लम आहे हो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ड
डँबिस००७ Sun, 03/03/2019 - 16:09 नवीन
पाकिस्तान स्थित कुविख्यात अतिरेकी अझर मसुद हा ठार झालेला आहे अशी बातमी आता फ्लॅश होत आहे. ठरावीक न्युज टीव्ही ही बातमी दाखवत आहेत. अझर मसुद एअर स्ट्राईकच्या वेळेला बालाकोट कँप मध्ये झोपलेला होता अशी बातमी सांगते. काही दिवसा पुर्वी पाकिस्तानच्या मंत्र्याने अझर मसुद खुप आजारी आहे, ईस्पितळात आहे हे स्वतःच कबुल केलेले होते. अझर मसुद हा भारताने केलेल्या एअर स्ट्राईक मध्ये ठार झालेला आहे ही बातमी पसरु नये म्हणुन ही पुर्व तयारी चालु असावी असा कयास सुद्धा आहे.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 03/03/2019 - 16:40 नवीन
हो, बरोबर. अजून अधिकृत सुत्रांकडून याला दुजोरा मिळाला नाही असे टिव्ही च्यानेल्स सांगत आहेत. आणि ही आमच्या च्यानेलची अधिकृत बातमी नाही, आम्ही सोशल मिडियावर काय चर्चा सुरु आहे ते सांगत आहोत. बहुधा उद्या संध्याकाळ पर्यन्त पाक ही अधिकृत बातमी घोषित करेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
भ
भंकस बाबा Sun, 03/03/2019 - 16:31 नवीन
मी पण आत्ताच बातमी ऐकली. जर असे झाले असेल आणि जर पाकिस्तानने अधिकृतरित्या कबूल केले की मसूद अजहर भारतीय आक्रमणातून मारला गेला आहे तर रागा, केजरीवाल, ममता या सर्वांची गोची होणार आहे. ह्यांच्या प्रतिक्रिया या बेस्ट कॉमिक परफॉर्मेंस ऑफ द इयर ठराव्या.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 03/03/2019 - 16:43 नवीन
अधिकृतरित्या कबूल केले की मसूद अजहर भारतीय आक्रमणातून मारला गेला आहे
नाही मान्य करणार हे पाकिस्तान. मुत्रपिंड / क्यान्सर हेच मृत्यूचे कारण असं सांगत राहणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
भ
भंकस बाबा Sun, 03/03/2019 - 17:01 नवीन
भारताने असेच फैलावले पाहिजे की हे येडं आमच्या कार्रवाइतच मेलं. त्यामुळे पाकला अंतर्गत युद्धाला सुद्धा तोंड द्यावे लागेल. तिकडे अबू हमजा देखील मोठया गमजा मारू लागला आहे. कदाचित पाकिस्तानातच लपून बसला असावा. एकूण पाकिस्तानचे दिवस खराब आलेले दिसतात. सैम अंकलने जोर लावल्यास इन्शा अल्लाह टुकड़े होंगे पाकिस्तानके जास्त दूर नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
ट
ट्रम्प Mon, 03/04/2019 - 06:14 नवीन
हल्ली मला केजरी , पवार , चव्हाण , ममता आणि रागा सारखे प्रश्न पडायला लागले आहेत !!!!! अमेरिकेने जर एफ 16 पाकिस्तान ला विकले होते तर पाकिस्तान ने त्यांचा उपयोग भारतावर हल्ला करायला वापरू दे नाही तर अल कायदा च्या अतेरिकीक्या नां मारायला वापरू दे !! अमेरिकेने पाकिस्तान ला मेमो देण्याचे क़ाय कारण ?
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 03/04/2019 - 09:10 नवीन
अमेरिकेका सर्व सामरिक आणि हाय टेक विक्री करताना काही बंधनकारक अटी घालते. ह्या अटी अमेरिकेतील सर्व सरकारी / खाजगी कंपन्या आणि अमेरिकन आयपीआर वापरून तिसर्‍या देशात बनवलेल्या हाय टेक उत्पादानांच्या विक्रिवरही लागू असतात. अ) विक्री केलेली वस्तू काही ठराविक कारणांसाठी वापरावी. उदा: पाकिस्तानला एफ-१६ विकताना, ती फक्त स्वसंरक्षण आणि अतिरेकीविरोध यासाठीच वापरावी व त्यांचा दुसर्‍या सार्वभौम राष्ट्राविरुद्ध आक्रमण करण्यास उपयोग करू नये अशी अट होती. भारताच्या संरक्षणसंसाधनांवर (भारतीय सैन्याचे ब्रिगेड हेडक्वार्टर आणि इतर संसाधने) आक्रमक हल्ला करण्यासाठी ही विमाने वापरल्याचे निर्विवाद पुरावे (राडार सिग्नेचर्स, फक्त एफ-१६ वर बसवल्या जाणार्‍या AIM-120 AMRAAM मिसाईलचा भारतात पडलेला तुकडा, इ) भारताने प्रसिद्ध केल्यामुळे पाकिस्तान अडचणीत सापडला आहे. आ) मूळ करारात काहीही कलम असले तरी, ते अमेरिकन संसद नवीन बिल पास करून उरलेली विक्री, सुटे भाग, सेवा (servicing), इ बंद करून आधी विकलेल्या वस्तूही निकामी करू शकते. अशीच व्यवस्था वापरून, भारताने केलेला अणुस्फोट, एनपिटीवर सही करण्यास नकार, इ कारणांसाठी, अमेरिकेने भारताला अणुतंत्रज्ञान क्रायोजेनिक इंजिन्स आणि सुपरकाँप्युटर्स विकण्यावर घातली होती. ही सगळी व्यवस्था, सामरिक व हाय टेक क्षेत्रांत अमेरिकेचा, वरचढपणा व नियंत्रण, सतत कायम रहावे यासाठी आहे. या अटींचा भंग केल्यास अमेरिका इतर आर्थिक, इ निर्बंध (एम्बार्गो) घालू शकते / घालते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
व
विजुभाऊ Mon, 03/04/2019 - 07:05 नवीन
मसूद अझर ह आजारी आहे . तो घराबाहेरही पडू शकत नाही हे काल साम्गत होते आता त्याला हॉस्पिटल मधून जैश च्या कँप मधे हलवले आहे अशी बातमी येत आहे. मुळात त्याला हॉस्पिटल मधे कधी नेले हे मात्र ते सांगत नाहीत.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 03/04/2019 - 07:07 नवीन
आज आणखी बातमी समोर येत आहे युके च्या न्यायालयाने विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचे आदेश दिले आहेत.
  • Log in or register to post comments
ब
बंबात जाळ Mon, 03/04/2019 - 14:10 नवीन
त्याचा इथे काय संबंध ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
आ
आनन्दा Mon, 03/04/2019 - 18:19 नवीन
हा धागा चालू घडामोडींचा आहे. याचा चलूघडामोडींशी संबंध नाही असे वाटतेय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंबात जाळ
ब
बाप्पू Tue, 03/05/2019 - 06:16 नवीन
युवराज राहुल, सोनिया, शीला, जावई बापू, प्रियंका यांच्या घोटाळ्यांचे पुरावे असणारे आणि इन सब कि जांच होनी चाहिये. आहू आहूं... असे बोंबलत आणि खोखत फिरणारे श्री श्री श्री अरविंद खुजलीवाल यांनी काँग्रेस सोबत युती केली असून दोघेही 3-3 जागा लढणार आहेत.. मराठीच्या मुद्द्याचा कॉपी राईट घेतलेले, छगन भुजबळ, अशोक चव्हाण, अजित पवार यांना शिव्या घालून आपले राजकीय अस्तिव कसेबसे टिकवणारे, सुप्रसिद्ध नकलाकार श्री राज ठाकरे हे आगामी निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत लढणार आहेत.. अजुन हे ऑफिशियली समोर आले नसले तरी रोज चर्चा, प्रतिचर्चा, वाटाघाटी चालूच आहेत. मोदीजी यांना हरवण्यासाठी अजुन या देशात काय काय होणार आहे हे देव जाणो.
  • Log in or register to post comments
श
शब्दानुज Tue, 03/05/2019 - 15:38 नवीन
आप आणि कॉंग्रेस दिल्लीसाठीमद्धे स्वतंत्ररित्या लढणार आहे. कॉंग्रेसने युतीचा प्रस्ताव फेटाळला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू
ब
बाप्पू Tue, 03/05/2019 - 18:20 नवीन
अच्छा.. धन्स फॉर द अपडेट..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दानुज
ट
ट्रम्प Tue, 03/05/2019 - 11:48 नवीन
मला खरच दिल्ली मधील मतदारांचे आश्चर्य वाटते !!! भाजप , काँग्रेस , सपा , बसपा हे पक्ष सोडून या केजरीवाल ला कुठल्या बेस वर निवडून आणले ? बर माणूस सुरुवातीला जरा बरा वाटला पण तो फुगा थोड्याच दिवसांत फुटला , पंजाब आणि दिल्ली वगळता उर्वरित भारतात याचा नवीन पक्ष तोंडावर आपटला . पण एक मात्र नक्की इथुन पुढे आमच्या सुजान महाराष्ट्रात तर आप औषधालाही शिल्लक राहणार नाही .
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Tue, 03/05/2019 - 18:15 नवीन
आप ची हवा ऑलरेडी उडून गेलीये.. मला खात्री आहे कि केजरीवाल कुठेही विजयी होणे आता अशक्य आहे कारण केजरीवाल यांच्या कोणत्याही बोलण्यावर विश्वास ठेवणे अवघड आहे...! काँग्रेस ची एखादी सीट येईल पण काँग्रेस आणि आप हि युती नक्की फसणार आणि निवडणूक निकाल जाहीर झाल्यावर युवराज आणि मफलरलाल दोघेही EVM EVM जाप करणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
अ
अर्धवटराव Wed, 03/06/2019 - 18:28 नवीन
पण दिल्ली स्टेट इलेक्शन बहुतेक केजरीवालच जिंकेल. जनसामान्यांचा भरपूर सपोर्ट आहे साहेबांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू
आ
आनन्दा Wed, 03/06/2019 - 19:01 नवीन
हो.. कधी कधी वाटते की मफलरलाल चांगले काम करतायत, पण ममता दीदींशी स्पर्धा करणारा आक्रस्ताळेपणा आणि अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे बघितले की त्यांना अजून बरीच मार्गक्रमणा करायची आहे याची खात्री पटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
ट
ट्रेड मार्क Wed, 03/06/2019 - 19:35 नवीन
मला तर वाटतंय की लोकसभा पण आप किंवा काँग्रेसने जिंकावी म्हणजे केजरीवाल किंवा राहुल पंतप्रधान होईल. अगदीच नाही तर ममता अथवा मायावती आहेतच. मोदींनी गेल्या ५ वर्षात जी गडबड करून ठेवलीये ती यांना निस्तरता येईल. केजरीवालनी तर नोटबंदी रिव्हर्स करण्याची मागणी केली होती, ती पण त्यांना अमलात आणता येईल. पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक आणि हल्ले होणार नाहीत म्हणजे युद्धाची भीती नको, सैन्याने किती अतिरेकी मारले याचा हिशोब विचारायला नको. पाकिस्तानबरोबर नुसती शांततेची बोलणीच कशाला सिद्धू सारखे गळ्यात गळे पण घालता येतील. पाकिस्तानी क्रिकेट टीमला सन्मानाने भारतात बोलावून सामने आयोजित करता येतील, ज्यातून भरपूर पैसे मिळतील. रोखीचे व्यवहार जोमाने चालू होऊन परत रोखीने व्यवहार करणारे छोटेमोठे उद्योगधंदे परत उभे राहतील आणि त्यातून कितीतरी बेरोजगारांना रोख पैसे देणाऱ्या नोकऱ्या मिळतील. टॅक्सपेयरची संख्या परत ३-३.५% येऊन आपल्या सगळ्यांना सवयीची असलेली आधीची परिस्थिती येईल. गब्बरसिंग टॅक्स जाऊन परत २०-२५ वेगवेगळे टॅक्सेस लावता येतील. राफेलचा व्यवहार रद्द करून परत नव्याने बोलणी चालू करता येतील आणि फक्त ५२० कोटींमध्ये एक विमान अशी १२६ विमाने येतील. तसेच बाकी पण मोदींनी केलेले डिफेन्सचे व्यवहार रद्द करून नव्याने बोलणी सुरु करता येतील. खरं तर भारत एकदम शांतताप्रिय देश झाल्यामुळे सैनिकांची आणि असल्या आयुधांची फारशी गरज भासणार नाही. उगाच खर्च कशाला करायचा कारण वापर तर फक्त प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन या दोनच दिवशी परेड साठी वापरले जाणार. समस्त शेतकऱ्यांना (त्यात पवार आणि सुळे पण आले बर्का) कर्जमाफी जाहीर होईल (पैसे गरीब शेतकऱ्यांना मिळतील का नाही हा विचार मनात आणायचा नाही, योजना जाहीर केली याला महत्व आहे.). बिनकामाच्या शेतकरी पीक विमा योजना तसेच आयुष्मान भारत सारखया योजना बंद करता येतील किंवा नव्याने नामकरण करून टिम्बटिम्ब गांधी व तत्सम नावाने नव्या रूपात चालू केल्या जातील. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे मिपावर राजकीय चर्चा होणार नाहीत. भक्त मंडळीच्या तोंडाला कुलूप बसेल. संसदेत उगाच आरोप प्रत्यारोप होणार नाहीत त्याऐवजी लोक एकमेकाला मिठ्या आणि डोळे मारतील. देश (म्हणजे फक्त हिंदू बरंका) परत २०१४ च्या आधीसारखा सहिष्णू होईल, त्यामुळे काही प्रसिद्ध कलाकारांना असुरक्षित वाटणे बंद होईल. असे रामराज्य लवकरच अवतरावे अशी आपण प्रार्थना करूया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव गुरुवार, 03/07/2019 - 14:55 नवीन
तरी अनील कपुर म्हणालाच होता नायक-२ बनला पाहिजे म्हणुन...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रेड मार्क गुरुवार, 03/07/2019 - 15:09 नवीन
सिनेमा बनला तर बनेल, पण मी मे २०१९ च्या लोकसभा निवडणुकांबद्दल बोलतोय. रागा पंतप्रधान व्हावा अशी बऱ्याच लोकांची इच्छा आहे तर पूर्ण होऊन जाऊ दे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव गुरुवार, 03/07/2019 - 22:37 नवीन
अच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
अ
अनिरुद्ध.वैद्य Wed, 03/06/2019 - 13:58 नवीन
नुकतेच एफ्डीएमध्ये महाराष्ट्राला मागे टाकलंय देल्ही न. ही महाराष्ट्रासाठी नामुष्कीची बाब आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ट
ट्रम्प Tue, 03/05/2019 - 12:10 नवीन
दिल्ली मध्ये विरोधकांच्या सूरत सुर मिसळून , हातात हात घालून बारामतीच्या जाणत्या राजाने एयर स्ट्राइक चा पुरावा मागीतला !!! तो पर्यंत ठीक होत , पण काल नाशिक मधील सभेत घणघणाती भाषण करताना साहेबांनी " शौर्य केले कोणी , अन छाती फुगवतयं कोण ? " असे विचारत इनडाइरेक्टली एयर स्ट्राइक मान्य केली . म्हणजेच अजून एक यू टर्न !!! = ) = )
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Tue, 03/05/2019 - 12:18 नवीन
2014 मधील निवडून मध्ये बेफाम वक्ताव्ये करून भाजप ला अप्रत्यक्षरित्या मदत करणारे दिग्विजयसिंह यांनी पुन्हा एकदा बाह्या सरसावल्या !!! " पुलवामा हा अपघात होता " असे वक्तव्य करून पुन्हा एकदा भाजप सायबर सेनेला आमंत्रण दिले , ट्रोलर्सनी ट्विटर वर धूमाकुळ घालत दिग्गी राजाचे ' त्या ' एंकर चे तसले फोटो अपलोड करून दिग्गी ला ब्रेक लावायचा प्रयत्न केला .
  • Log in or register to post comments
ढ
ढब्ब्या Tue, 03/05/2019 - 15:49 नवीन
पाकडे सध्या सगळीकडे विडीओ पुरावे सादर करत आहेत. काल म्हणे भारताच्या पाणबुडी ने त्यांच्या जलक्षेत्रात घुसखोरी करण्याच्या प्रयत्न केला. हा प्रयत्न पाकिस्तानने म्हणे हाणून पाडला. या दाव्यासोबत पाकने मीडियाला एक फुटेजही दिलं. https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/pakistan-navy-claims-indian-submarine-tried-to-enter-its-territorial-waters/articleshow/68270877.cms खरे काय घडले माहीत नाही, पण मिडीया कवरेज मध्ये त्यांनी बाजी मारलीये असं वाटतय.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 03/06/2019 - 09:18 नवीन
पाक हद्दीत गेलेली पाणबुडी अशी वरून विमानातून दिसेल यावर ज्याला पाणबुडीबद्दल काहीही माहिती नाही असा माणूसच विश्वास ठेवेल. तेंव्हा पाकिस्तानने दिलेला व्हिडीओ हा सरळ सरळ खोडसाळपणाचा आणि सनसनाटी पिकवण्यासाठी केलेला भंपक दावा आहे. ज्यांना त्यातील थोडे फार तथ्य जाणून घ्यायचे आहे त्यांनी मी लिहिलेली मालिका(दुवा खाली आहे) वाचून घ्यावी. http://www.misalpav.com/node/41452 तसेच http://www.misalpav.com/node/23687 या दुव्यात माझ्या मित्राच्या बाबतीत झालेली रोमांचकारी स्थिती वाचता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढब्ब्या
ढ
ढब्ब्या Wed, 03/06/2019 - 20:01 नवीन
खोडसाळपणा असेलही (आहेच). पण असे काय घडले की त्यान्ना आत्ताच असले काही सुचले. कदाचित काही distraction strategy असेल, किंवा भारतीय पाणबुडीने असे खरेच काही करु नये म्हणून भितीपोटी केलेला फालतूपणा .. पण असल्या पांचट्पणाचा काही खरच उपयोग होत असेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 03/07/2019 - 05:21 नवीन
आपल्या सिंधु वर्गाच्या पाणबुडीवर २२० ते ३०० किमी टप्पा असलेली क्लब वर्गाची क्षेपणास्त्रे आहेत. ज्यातुन २०० ते ४५० किलो स्फोटके डागता येतात. तेंव्हा हल्ला करण्यासाठी पाकिस्तानच्या सागरी हद्दीत जाण्याची काहीही गरज नाही. https://en.wikipedia.org/wiki/3M-54_Kalibr उगाच समुद्रात एखादी पाणबुडी(भारतीय असेलच असे नाही तर पाकिस्तानी पाणबुडी पण असू शकेल) आपला सराव करत असतानाच फोटो घेतला आहे आणि चावट पणा म्हणून आम्ही पाणबुडीला ताकीद दिली असे जाहीर केले आहे. पाकिस्तान किती खोटारडे पणा करतो आहे हे त्यांच्या मसूद अझहर बद्द्लच्याकोलांट्या उड्यांवरून दिसत नाही का>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढब्ब्या
ट
ट्रम्प Tue, 03/05/2019 - 17:32 नवीन
अशी कितीही दिग्गी श्टाइल पाकडयानीं बाजू मांडू दया !! त्यांना विचारतय कोण ? गेली 60 / 65 वर्ष भारत , अफगानिस्तान , ईरान , या देशात घुसखोरी करून विंध्वस करणाऱ्या पाक ची अंडी पिल्ले सगळ्या जगाला माहित आहेत .
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा