Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चालू घडामोडी : जानेवारी २०२०

व
वामन देशमुख
Wed, 01/01/2020 - 16:42
🗣 124 प्रतिसाद
सर्व मिपाकरांना नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! अ. महाराष्ट्रातील नवीन सरकारचा दुसरा शपथविधी नुकताच पार पडला आहे. लवकरच खातेवाटप होऊन कारभार मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे. तिन्ही पक्षांत, विशेषतः शिवसेनेत अंतर्गत कुरबुरी सुरु आहेत त्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय मार्ग काढतात हे पाहणं रोचक ठरेल. बाकी, हे त्रिघाडीचं सरकार १ जानेवारी २०२१चा सूर्योदय पाहील का? आ. केंद्र सरकारपुढील या वर्षातील उद्दिष्टे / आव्हाने - १. नागरिकत्व (सुधारणा) कायद्याची (२०१९) अंमलबजावणी २. देशातील नागरिकांची नोंदवही (NRC) ३. लोकसंख्या नियंत्रण कायदा ४. पाकव्याप्त काश्मीरवर ताबा इ. यावर्षातील दिल्ली आणि बिहारच्या निवडणूका जिंकणे मोदी-शहांना शक्य होईल का? ई. अमित शहांना पंतप्रधानपदी बसवल्याशिवाय काँग्रेसी, सेक्यूलर, पुरोगामी, डावे इ. लोक स्वस्थ बसणार नाहीत असं त्यांच्या सद्य वर्तनातून दिसतंय. ता. क. - मिपावरील पूर्वीच्या जाणत्या लेखकांनी नवीन वर्षात तरी पुन्हा लिहितं व्हावं ही मनापासून विनंती.
वर्गीकरण
काथ्याकूट

प्रतिक्रिया द्या
61293 वाचन

💬 प्रतिसाद (124)
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 01/23/2020 - 14:44 नवीन
टोब्या, अरे पण तरूणाना नोकर्या नाहीत, महागाई वाढलेली आहे, जी डी पी का काय म्हणतात तोही चांगलाच घसरलेला,जी.एस.टी.चे संकलन खूप कमी (३ लाख कोटी कमी), अनेक व्यवसायांचे बारा वाजलेले... ह्याविषयी तरी मिडियात कुठे चर्चा आहे? सगळे भाउ,अर्नब पाकिस्तनाच्या आणी मुस्लिमांच्या मागे लागलेले. रविशकुमार सारखा एखादा विरळा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
स
सर टोबी गुरुवार, 01/23/2020 - 16:08 नवीन
सध्याचा काळ हा पुनःनिर्माणाचा आहे. हि परिस्थिती थेट स्वातंत्र्य लढ्यासारखीच आहे. मोदींनी अजून स्पष्ट सांगितले नाही परंतु 'तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा' सारखी घोषणा ते लवकरच करतील. आपल्या सर्वांना त्याग हा करावाच लागणार आहे. देशाची फाळणी ज्या तत्वावर झाली त्याच तत्वाप्रमाणे देशाची उभारणी व्हावयास हवी होती. परंतु काँग्रेसच्या भिकार धोरणांमुळे तेंव्हा ते शक्य झाले नाही. आता इतक्या वर्षांनी भारतभूमीवर मोदींच्या रूपाने क्रांतिसूर्य उगवला आहे. आपल्याला तरी फक्त त्यागच करायचा आहे. मोदी तर अहोरात्र कष्ट घेतात. आपण कोणीही आता माघार घ्यायची नाही असा निश्चय केला पाहिजे. स्वगत: या ठिकाणी श्रीगुरुजी या आयडीची प्रकर्षाने आठवण येत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
स
सालदार गुरुवार, 01/23/2020 - 16:22 नवीन
ह्या पुनःनिर्माणाबद्दल जरा विस्कटून सांगाल का? हि परिस्थिती थेट स्वातंत्र्य लढ्यासारखीच आहे>> - नक्की कुणाविरुद्ध हा लढा आहे? आपल्या सर्वांना त्याग हा करावाच लागणार आहे.>> - ह्या त्यागाचं फळ नक्की काय असणार आहे? मोदी तर अहोरात्र कष्ट घेतात>> - मोदी जर अहोरात्र कष्ट घेत आहेत तर मग त्याचं फळ जिडीपी, नोकर्‍या, महागाई यात का नाही दिसत? कुठे जात आहेत इतके कष्ट?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 01/23/2020 - 16:24 नवीन
श्रीगुरुजी हे संघाचे प्रवक्ते मा.गो.वैद्य आहेत अशी चर्चा एक्केकाळी होती. खरे खोटे माहित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
ट
ट्रम्प Fri, 01/24/2020 - 18:26 नवीन
त्याचप्रमाणे आपण शाहिनबाग मध्ये caa विरोधात आंदोलन करणाऱ्या मुस्लिम महिलां बरोबर रात्रदिवस आंदोलन करत असता . खरं खोटं माहीत नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
ट
ट्रम्प Fri, 01/24/2020 - 18:40 नवीन
ब्राझील , ब्रिटन , अमेरिका , चीन , जर्मनी महत्वाच्या या सगळ्या देशाचा जी डी पी सुद्धा गेली १० वर्ष घसरला आहे , याला सुद्धा मोदी कारणीभूत आहेत का ? जागतिक आर्थिक व्यवस्था च कोलमडलेली असताना फक्त भारताची आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे अशी अपेक्षा ठेवणार्याना नक्की काय म्हणायचे आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 01/27/2020 - 06:43 नवीन
मग २०१२/२०१३ मध्ये भाजपा नेते अर्थव्यवस्थेवरुन संसदेत थयथयाट करायचे.. मनमोहन सिंगाना अर्थशास्त्र शिकवु पाहायचे.. तो काय प्रकार होता ? बरे, आर्थिक स्थिती सोडा, पण सामाजिक सलोख्याची पुरती वाट लावली ह्या भाजपावाल्यानी हे तर भक्त मंडळीही मान्य करू लागली आहेत. माजी भक्त चेतन भगत पण आता "सरकारने जरा विचार करून कारभार करावा.. सामाजिक सलोख्यचे भान ठेवावे" असे म्हणू लागला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ट
ट्रम्प Mon, 01/27/2020 - 18:01 नवीन
मोजून फक्त पाच उदाहरणे भक्त मंडळी ची नावे द्या ( राजकीय इ्छा पूर्ण न झाल्या मुळे बोंबलणारे शौरी , शत्रुघ्न नकोत ) जे मान्य करत आहेत की भाजप ने सामाजिक सलोख्याची वाट लावली . आणि काय शिकवले ममो ला २०१२ मध्ये त्याचे पण उदाहरण द्या , उगीचच रागा सारख्या ढगात गोळ्या मारण्यात काय अर्थ आहे ? चेतन भगत हा पूर्णपणे व्यवसाइक लेखक आहे , ही मंडळी वांग्याच्या प्रकारात मोडतात . गांधी कुटुंबाच्या हुजरेगिरी मुळे ममो भाजप आणि तमाम भारतीयांचा आवडता बकरा होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
श
शा वि कु गुरुवार, 01/23/2020 - 17:43 नवीन
लोकसत्तेतही आली आहे बातमी... Link पण यात तर आपला नम्बर सुधारल्याचा दिसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
श
शा वि कु गुरुवार, 01/23/2020 - 17:53 नवीन
तुमचा "भाषा आणि संस्कृती: एक अवलोकन" हा लेख आणि तुमचे मोदींबद्दलचे मत अगदीच परस्परविरोधी वाटते हो !
पण प्रत्येक कुत्र्याचे दिवस असतात या उक्तीप्रमाणे संस्कृती रक्षकांना देखील सुगीचे दिवस आले. सुधारक या शब्दाची चमक आता सनातन या शब्दाला आली आणि सुधारक मरतुकड्या कुत्र्यासारखे केविलवाणे झाले.
म्हणजे मोदींना मी सस्कृती रक्षक समजायचो, म्हणुन.
  • Log in or register to post comments
स
स्वलिखित Fri, 01/24/2020 - 11:23 नवीन
खूप तटस्थ भूमिका घेण्याचा आव आणतात इथेही काही लोक ,, असे किती videos दाखवू जे पाहून आणि ऐकून bp पाच पंचवीस ने वर खाली होईल ,, पण प्रेम उतू चाललंय ना ,, काय करणार !! डायरेक्ट दाखवू शकत नाही म्हणून तटस्थ ....
  • Log in or register to post comments
ज
जानु Fri, 01/24/2020 - 18:03 नवीन
काकांनी काल भिमा कोरेगाव वर आपले मत मांडले, आव्हाड आणि काका यांच्या त वरुन केंद्राने ताकभात ओळखला, भिमाकोरेगाव चा तपास NIA कडे दिला. सरकार अर्बन नक्षल ला सोडणार नाही, हे नक्की. पवार साहेबांबद्दल आता अनादरही वाटत नाही. सरकारने काकांना धक्का दिला असे म्हणावे का?
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Sat, 01/25/2020 - 05:48 नवीन
काही जणांना माझ्या अपेक्षेप्रमाणे अचंबित करून गेलेत. त्या मागची भूमिका निदान त्या लोकांना तरी कळावी म्हणून हा प्रतिसाद. मोदींचा उदय आणि त्यांचे स्थिरावणे हा भारतीय राजकारणातील सत्तरच्या दशकाइतकाच एक वेदनादायी अनुभव आहे. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आणि काळाबाजार, सततचे संप आणि आंदोलनं, राजकारणातील एकारलेपण आणि होयबा मंडळींचा संताप यावा इतका लाळघोटेपणा असा अनुभव थोड्या फार फरकाने फिरून परत आला आहे असे वाटते. फक्त त्यावेळेस हे दिवस सरतील कि नाही अशी शंका होती. आता हे दिवस कधी तरी संपतील असा विश्वास आहे. मुद्दा समजावून सांगताना उपरोधाइतके काही प्रभावी साधन नसते असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. त्याचाच वापर मी त्या दोन प्रतिसादात केला. सध्याच्या परिस्थितीत राजकीय भूमिकांपासून चर्चेपुरते का होईना बाजूलाच व्हावे असे आजकाल प्रकर्षाने वाटते. असाच विचार बऱ्याच जणांचा असावा असे वाटते कारण 'चालू घडामोडी' या धाग्याची घसरत चाललेली लोकप्रियता. माईसाहेब आणि शा वि कु: चांगल्या गोष्टींवरचा तुमचा विश्वास अबाधित राहावा म्हणून हा खास प्रतिसाद तुमच्यासाठी.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Sat, 01/25/2020 - 08:26 नवीन
पारच गंडलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
ट
ट्रम्प Sat, 01/25/2020 - 06:33 नवीन
जे एन यु विद्यार्थी जरील इमाम चा एक व्हिडिओ व्हायरल झालाय , त्यात तो स्पष्टपणे सांगतोय आम्हाला बगैर मुस्लिमांच्या हमदर्दी ची गरज नाही , आम्ही आमच्या ताकतीवर आसाम भारता पासून वेगळं करू शकतो , काही दिवस किवा कायमचं !!!! पण तरी सुद्धा जे एन यू , शाहीन बाग समर्थक आणि तमाम लेफ्टिष्ट शेजारनीचा नवरा गेला तर स्वतःचाच नवरा गेल्या सारखं विलाप करणे सोडणार नाहीत . https://twitter.com/MilitaryUpdate_/status/1220847574698971138?s=09
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 01/25/2020 - 10:07 नवीन
ट्रम्प, ते येडं भारताची कुक्कुटमुंडी पिरगळायच्या बाता मारतंय. जणू काही पाकिस्तान व बांगलादेशास chicken neck नाहीच्चे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ट
ट्रम्प Sat, 01/25/2020 - 13:40 नवीन
गा. पै , न्यूज चानेल वर तुकडे तुकडे गैग ला सतत निर्दोष साबित करण्यासाठी लेफ्टिस्त आणि पुरोगाम्यांची जी स्पर्धा चालते त्याची अक्षरशः किव वाटत होती . पण आता शाहीन बागचा मुख्य आयोजक जरिल ने ऐका फटक्यात बगैर मुस्लिमांची गोची करून टाकली . जरिल हा व्हाईट कॉलर दहशतवादी निघाला आणि caa ला विरोध करणे म्हणजेच जारील इमाम ला समर्थन ..... उठा , रा काँ चे आव्हाड / पवार , कॉंगी चे आदर्श नेते चव्हाण या सगळ्यांना आणि आपल्या मिपाकरांना नक्कीच प्रश्न पडला असेल आता नक्की काय करायचे ???
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 01/26/2020 - 10:33 नवीन
ट्रम्प, मला शाहीनबागेमागे मोदींचा हात दिसतो. मोदी लुच्चा व डांबरट इसम आहे. मनात आणलं तर तासाभरात शाहीनबाग साफ होईल. पण मुद्दामून निदर्शनं चालू ठेवू दिलीयेत. दिल्लीच्या निवडणुका आल्यात ना. कुठलंही धृवीकरण मोदींच्या फायद्याचंच आहे. माझ्या मते निवडणुका संपल्या की शाहीनबाग विसर्जित होईल. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ट
ट्रम्प Sun, 01/26/2020 - 14:21 नवीन
असू शकत :) :) :) त्या आंदोलनाचा असा ही एक फायदा झाला की शाहीन बाग मुळे बऱ्याच मुस्लिमांनी आयुष्यात पहिल्यांदाच आज तिरंगा फडकवला आसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 01/27/2020 - 06:30 नवीन
नुसता तिरंगा फडकावुन देशप्रेम सिद्ध होत नाही रे ट्रम्पा. त्या विजय मल्ल्याच्या प्रत्येक विमानावर तिरंगा होताच. बाकी देशातले बघुतांशी घोटाळ्यातल्या लोकांची नावे पाहिली की देशप्रेम सिद्ध करण्याची गरज कोणाला आहे ते कळते. मित्तल, बंसल, शहा,पटेल्,पारेख,चोक्सी. जयस्वाल. देशाची वाट लावायला ही मंडळी कारणीभूत आहेत. पुर्वी हीच मंडळी धान्यात भेसळ करून विकायची. शिक्षण क्षेत्रातही ही मंडळी घुसल्याने पार वाट लागली आहे. ह्या मंडळीना देशाबाहेर हाकलले तर देशाची अर्थ्व्यवस्था सुरळीत होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ट
ट्रम्प Mon, 01/27/2020 - 17:42 नवीन
राष्ट्रगीतला नकार देणारे , तिरंग्या ला अभिवादन न करणारे आणि देवतांचे फोटो जाळणारेची कड घ्यावीशी का वाटली ? त्याच प्रमाणे गांधी फॅमिली , राष्ट्रवादीचे भुरटे , आणि शाहीनबागड्याचां देशाची अर्थव्यवस्था सुरळीत करण्यात काय योगदान आहे ते सांग . त्या नंतर आपण देशप्रेमी आणि देशद्रोही याबद्दल चर्चा करू ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
म
मदनबाण Sat, 01/25/2020 - 20:06 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Bharat Hum ko Jaan Se Pyaara Hai... :- Roja
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 01/29/2020 - 07:29 नवीन
https://www.ndtv.com/india-news/nirbhaya-rape-case-akshay-singh-files-curative-petition-in-supreme-court-against-death-sentence-2171266 पुन्हा पुढे ढकलली जाणार फाशी. सर्व आरोपींच्या फाशीची एकाच दिवशी एकाच वेळी कार्यवाही झाली पाहिजे अशी काही कायदेशीर आवश्यकता असते का? ज्यांचं अपील सर्व लेव्हल्सवर फेटाळून झालंय त्यांना आता काय वेगळा रिलीफ मिळण्याची शक्यता आहे म्हणून थांबवलं आहे?
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Fri, 01/31/2020 - 18:20 नवीन
आता काय तर म्हणे एका बरोबर बाकीच्यांनी जेल मध्ये अत्याचार केला !! आरोपींची बाजू मांडणाऱ्या सिंग नावाच्या वकिलाला दोन न च्या ठिकाणी गोळ्या घातल्या पाहिजेत . त्या आरोपींच्या पेक्षा शर्मनाक काम हा वकील करतोय . आज पुन्हा फाशी पुढे ढकलण्यात आली , न्यायव्यवस्था सुद्धा इतकी केविलवाणी का झाले आहे तेच समजत नाही . सुप्रीम कोर्टाने अपील स्थगित फेटाळल्या वर खालचे न्यायाधीश सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून पटकन का निर्णय घेत नाहीत . या मुळेच हैदराबादी पोलिसांनी केलेले शूटा आऊट केंव्हाही योग्यच वाटते .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा