Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मुंबईत गोळीबार/बॉम्बस्फोट..! (चर्चा क्र. २)

व
विकास
Wed, 11/26/2008 - 23:18
🗣 84 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
19541 वाचन

💬 प्रतिसाद (84)
प
प्रियाली Wed, 11/26/2008 - 23:34 नवीन
कृपया, वरील फोटो काढून टाकावा असे मला वाटते. इथे लोक आपला राग आणि दु:ख व्यक्त करण्यासाठी काहीतरी लिहितील त्या प्रत्येकाला प्रत्येकवेळी या नराधमाचे दर्शन घडवून आणणे अयोग्य वाटते असे माझे व्यक्तिगत मत आहे. चीड येईल असा फोटो आणि मुद्रा आहे.
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 11/26/2008 - 23:34 नवीन
थोड्यावेळा पूर्वी गाडीत रेडीओवर नॅशनल पब्लीक रेडीओवर सतत मधून मधून यावरून जाहीर करणे चालू होते त्यामुळे प्रसंग खूपच गंभीर आहे हे समजत होते. पटकन जेव्हढे फोनवर बघता आले तेव्हढे वाचले पण कधी एकदा घरी येऊन पहातोय असे झाले होते... वाईट वाटलेच, चीडपण आली पण त्याहूनही त्रागा (फ्रस्ट्रेशन आले) झाला.... पण आत्ता ही वेळ नाही म्हणून इतकेच म्हणत पुढे काय चालले आहे ते पहातो. यामधे बळी पडलेल्या सामान्य तसेच पोलीसांना श्रद्धांजली आणि लवकरात लवकर इतरत्र अडकलेली माणसे सुटावीत अशी इश्वरचरणी प्रार्थना.
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 11/26/2008 - 23:36 नवीन
शब्द सुचत नाहीयेत काही. सर्व निरपराध लोकांची व्यवस्थित सुटका होऊ दे अशी प्रार्थना. सर्व शहिद पोलीस व नागरिकांच्या आत्म्यास शांती मिळू दे. रेवती
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 11/26/2008 - 23:38 नवीन
प्रत्येक खोलीच्या खिडकीत स्नॉर्केल शिडी नेऊन आत अडकलेले लोक बाहेर काढत आहेत! २ अतिरेकी अजूनही आत आहेत असे समजते! चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 11/26/2008 - 23:44 नवीन
प्रेस ट्रस्ट ऑफ इंडीया च्या संकेत स्थळावर भारतीय प्रमाण वेळ ४:१५ पहाट, अजून बातमीपण नाही....
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Wed, 11/26/2008 - 23:55 नवीन
डेक्कन मुजाहिदीन वगैरे लोकल फुटकळ अतिरेकी संघटनांचे हे कृत्य नसावे असे विध्वंसाचा आवाका बघुन वाटते आहे. डेक्कन मुजाहिदिन वगैरे निव्वळ धूळफेक असावी. इतका भिषण हल्ला 'अल कायदा' सारखी अमानुष संघटनाच करु शकते. अमेरिकेत/युकेत घुसण्यापेक्षा भारतात येउन त्यांच्या नागरिकांना ओलिस ठेवणे सोपे वाटले असावे. सीएनएन, फॉक्स वरील चाललेले अखंड कव्हरेज पाहुन पाश्चात्य देशांचे लक्ष वेधून घेणे हाच ह्या भ**चा उद्देश दिसतो.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण गुरुवार, 11/27/2008 - 03:24 नवीन
ह्या मादर*दांचा हेतू लोकांच्या मनात भीती उत्पन्न करणे हा होता असे स्पष्ट दिसते. एनडीटीव्हीवर वाचलेल्या बातमीनुसार एखाद्या कॉलेजकुमाराप्रमाणे पाठीवर सॅक घेऊन हे अतिरेकी वावरत होते. एकादोघांनी स्वतः हिंदू आहोत अशी दिशाभूल करण्याकरिता मनगटाला लाल रंगाचा दोराही बांधला होता. बोरीबंदर वगैरे स्थानकांवर गोळीबार करण्यामध्ये अमेरिकेच्या नागरिकांना धोका पोचवणे हा नेमका हेतू नसावा. मात्र एकंदर परिस्थिती किती बिघडत चालली आहे. उद्यापासून कोणीहा असा विचार करू लागेल की शेजारी उभा असलेला तरुण झटकन बॅगेतून एके ४७ काढेल आणि गोळीबार करेल... अशी समाजस्वास्थ्य बिघडवणारी ही योजना आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
उ
उपमन्यू गुरुवार, 11/27/2008 - 07:10 नवीन
ह्या मादर*दांचा हेतू लोकांच्या मनात भीती उत्पन्न करणे हा होता असे स्पष्ट दिसते
आपल्या भावनेशी मनापासून सहमत....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
च
चतुरंग गुरुवार, 11/27/2008 - 00:02 नवीन
सुगावा लागू नये आणि लक्ष्य सतत हलते रहावे हा उद्देश. निश्चीतच अतिशय नियोजनबद्ध हल्ला होता. कुलाब्या जवळ एक पेट्रोलपंपहि पेटवून दिलाय असे समजते. सगळीकडे घबराट उडवून देणे, गोंधळाचा फायदा घेऊन लोकांचे खून पाडणे हाच उद्देश दिसतो. शस्त्रे आधुनिक आहेत त्यामुळे मोठ्या संघटनेचा हात आहे हे नक्की. चतुरंग
  • Log in or register to post comments
य
योगी९०० गुरुवार, 11/27/2008 - 00:15 नवीन
आबा मिडियाशी बोलताना कापत होते...कारण ...???...भुजबळांनी मधे तोंड घालून आबांना वाचवले... खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
उ
उमा गुरुवार, 11/27/2008 - 00:29 नवीन
आबांची मुलाखत कुठे बघायला मिळेल? बातमी ऐकुन सुन्न झालेय मन. शहिद अधिकार्याना अभिवादन.
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे गुरुवार, 11/27/2008 - 02:13 नवीन
उद्या पुन्हा कामाला लागण्या ऐवजी आपण सगळ्या देशभर सरकारवर अतिरेकी पकडण्यासाठी दबाव आणला पाहिजे. हे ज्यांचे कोणाचे काम आहे त्यांना कंठस्नानच घालायला हवे. किती दिवस बाश्कळ सहनशीलतेचे पाढे पढत हे हल्ले मूकपणे बघत बसायचे. बस्स झाले... जनता म्हणून आपण काय करू शकतो? अर्थात तात्या आणी मंडळी रक्तदानाला गेले आहेत. पण त्यापुढे काही करता येईल काय? विषेशतः जे मुंबईत नाहीत त्यांना सुद्धा?
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ गुरुवार, 11/27/2008 - 02:47 नवीन
उद्या पुन्हा कामाला लागण्या ऐवजी आपण सगळ्या देशभर सरकारवर अतिरेकी पकडण्यासाठी दबाव आणला पाहिजे. हे ज्यांचे कोणाचे काम आहे त्यांना कंठस्नानच घालायला हवे. किती दिवस बाश्कळ सहनशीलतेचे पाढे पढत हे हल्ले मूकपणे बघत बसायचे. बस्स झाले...
असेल तिथे घुसून ठोका मा****ना.... - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भास्कर केन्डे
स
सुक्या गुरुवार, 11/27/2008 - 02:35 नवीन
अगदी सुन्न होउन बातम्या पाहातो आहे. काय बोलावे तेच कळत नाही. बंदुकिच्या टोकावर निरपराध लोकांना धमकावने ह्यात काय पुरुषार्थ आहे ? सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला गुरुवार, 11/27/2008 - 03:00 नवीन
काय चाललये कळत नाय !! आता पाणी डोक्यावरून चाललये..... सहन शक्ती संपलीये ...... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण गुरुवार, 11/27/2008 - 03:05 नवीन
निंदनीय आणि अतिशय वाईट प्रकार. काहीही गुन्हा नसलेल्या शेकडो निष्पाप लोकांना या प्रसंगात प्राण गमवावे लागले. अक्षरशः सुन्न झालो आहे. काहीही बोलण्याची मनस्थिती नाही.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 11/27/2008 - 03:07 नवीन
मृतांची संख्या ८१ तर २१९ जण जखमी झाले आहेत..दिल्ली वरुन स्पेशल टिम(एन एस जी) मुंबईत आली आहे. ताज आणि ऑबेरॉय हॉटेल मधे अतिरेक्यांनी लोकांना ओलिस ठेवण्यात आले आहे तसेच ताज हॉटेल मधे अतिरेक्या़कडुन आग लावण्यात आली आहे,,ही आग विझवण्याचे प्रयत्न चालु आहेत. मुंबई मधील शाळा व कॉलेज आज बंद असणार आहेत. मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर
  • Log in or register to post comments
ल
लवंगी गुरुवार, 11/27/2008 - 03:19 नवीन
अश्या लोकांना गोळ्या घालण्यापेक्ष्या रस्त्यावर लोकांच्या हातात दिले पाहिजे.. हाल हाल करून नरक यातना दिल्या पाहिजेत .. काय काय भोगाव लागतय मुंबईला.. नजर लागली आहे या सैतानाची
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण गुरुवार, 11/27/2008 - 03:16 नवीन
मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानुसार मुंबईत 10 ठिकाणी हा हल्ला झाला. मात्र फक्त 6 अतिरेकी ठार झाले... 9 'संशयित' अतिरेकी पकडले आणि 3 पसार झाले असे वाचले. हा एकंदर प्रकार समजेनासा झाला आहे. मूठभर लोक काही हत्यारे घेऊन आख्खा देश वेठीला धरू शकतात हे अनाकलनीय आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 11/27/2008 - 03:45 नवीन
राहिले त्या अतिरिक्यांना गोळ्या घालाव्यात.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला गुरुवार, 11/27/2008 - 03:53 नवीन
पकडून काहीही उपयोग नाही.. एक अफजल गूरू पूरेसा आहे... आता तरी सरकार डोळ्यावर कातडे पांघरून बसणार नाही,अशी अपेक्षा ... एकदाच काय तरी जालीम उपाय करायला हवा.. बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 11/27/2008 - 04:13 नवीन
ह्या सर्व घटनेत जसे अनेक सामान्य बळी गेले, धार्मिक हला, लोकशाहीवरील हल्ला वगैरे झाला. तसेच सामान्य मुसलमानांना पण तोटा झालाय. उद्या जर उद्योगधंदे सामान्य मुसलमानांना अप्रत्यक्ष घेयचे टाळायला लागले, सामान्य अ-मुस्लीम जर त्यांच्याशी संबंध जरा लांबून ठेवू लागले तर त्यातून अजून प्रश्न वाढतात... त्याच बरोबर असे होते तेंव्हा "दहशतवादाला धर्म नसतो" म्हणायचे, "मानवी हक्क सांगायचे" आणि आरोपपत्र नसताना देखील "हिंदू टेररीझम" "टेरर गुरू" वगैरे म्हणायचे याने दुसरे प्रश्न तयार होतात. या नष्टचक्रावर उपाय काय वाटतो?
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण गुरुवार, 11/27/2008 - 04:23 नवीन
साध्वी प्रज्ञासिंग आणि कर्नल पुरोहित यांच्यासारख्या हिंदू दहशतवाद्यानी जे उद्योग केले त्यावेळी तुमच्या माझ्यासारखे सामान्य हिंदू काहीही करू शकले नाहीत. त्याचप्रमाणे आज ह्या हलकटांनी जे उद्योग केले त्याबाबत सामान्य मुसलमान काही करू शकतील असे वाटत नाही. निदान मी तरी या प्रसंगानंतर एखाद्या सामान्य मुस्लिमाशी परक्याप्रमाणे वागेल असे वाटत नाही. या नष्टचक्रावर उपाय म्हणजे अशा नष्टचक्रांचे परिणाम योग्य प्रकारे समजावून सांगणे आणि दहशतवाद्यांना धर्माचे लेबल न लावणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 11/27/2008 - 04:39 नवीन
माफ करा पण मुस्लीम धर्मात 'जिहाद' ची कल्पना आहे. मुस्लीमांनी मुस्लीमेतरांची हत्या करावी त्यांच्याविरुद्ध प्राणपणाने लढावे असे जिहाद सांगतो. अशी जगातील बहुतेक मुस्लिमतरांची ( हिंदू, ख्रिस्ती, बौद्ध) धारणा आहे. बरेच मुस्लीम तसे मानतात. जिहादचा अर्थ त्यांना भले माहित नसेल,(माहित नाहीच) दहशतवादी धार्मिक, धर्माभिमानी, धर्मप्रेमी, धर्मांध, धर्मवेडे, असेच असले पाहिजेत असेही नाही पण निरपराध लोकांची हत्या करणार्‍यांची सरासरी काढली तर ती कोणत्या धर्माची आहे हे सांगायला ज्योतिशाची गरज पडणार नाही. मग आम्ही अशा लोकांना धार्मिक लेबले लावली तर बिघडले कोठे ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
प
पांथस्थ गुरुवार, 11/27/2008 - 05:41 नवीन
सहमत आहे. मालेगाव हल्ल्यांमधे मिडीयावाले हिंदु दहशतवादी असा उल्लेख करु शकतात तर मुस्लीम दहशतवाद म्हणण्यात मला काहि वावगे वाटत नाहि. - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उ
उपमन्यू गुरुवार, 11/27/2008 - 06:59 नवीन
प्रा. डॉ. दिलीप बिरुटे यांच्याशी पूर्णपणे सहमत. कुराणाच्या हिंदी भाषांतराच्या आंतरजालावरील दुव्यासाठी (डाउनलोड करता येण्याजोगी PDF धारिका) येथे पहा http://www.scribd.com/doc/6784741/QuranEPaakHindiTranslate पण डाउनलोड करण्यासाठी आपल्याला आधी या संकेतस्थळाचे सदस्य व्हावे लागेल. अन्यथा Download Tab वर टिचकी मारूनही ती आज्ञा कार्यान्वित होणार नाही. (अवांतर याच संकेतस्थळावर गीतारहस्याची डाउनलोड करता येण्याजोगी PDF धारिका उपलब्ध आहे(श्लोकांवरील टीका सोडून). दुवा : http://www.scribd.com/people/documents/635222/folder/24465 )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आ
आजानुकर्ण गुरुवार, 11/27/2008 - 13:33 नवीन
मटामध्ये मृतांची नावे आहेत ही वाचा. आता तरी हा हिंदूंवरचा हल्ला न मानता भारतावरचा हल्ला मानावा आणि सर्वांना शासन करावे असे वाटण्यास हरकत नसावी. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सुमारे १०१ जण मृत्युमुखी पडल्याचे वृत्त आहे. त्यातील शवविच्छेदनासाठी नेलेल्या मृतांची उपलब्ध नावं पुढीलप्रमाणे... जेजे हॉस्पिटल * शशांक शिंदे * जयवंत पाटील * सलीम अहमद लाला * मेझनीन हारावाला * मुरलीधर चौधरी * जाधव (होमगार्ड) * बाळासाहेब भोसले * योगेश शिवाजी पाटील * सुभाष व्ही. पाटील * अंबादास पवार * एच. मटवाला * सीताराम साखरे * एडीआर-५४ कुलाबा ( हा त्या व्यक्तिच्या बिल्ला क्रमांक असावा) * बाबूसाहेब दारगुडे * मीराबाई चरणी * इजाज हाजी * अशफ अल्लारखा * शेख ( एवढेच नाव उपलब्ध आहे) * कमल मोटवानी नायर हॉस्पिटल * विनोद गुप्ता * अरखा लालजी सोलंखी * सुनील ठाकरे * सुशीलकुमार शर्मा * काझी हिदायतुल्ला * प्रकाश मंडल * अमानत मोहम्मद अली केईएम हॉस्पिटल * आफरिन कुरेशी * चंदुलाल तांडेल * अमिनाबाई * शिरीष सावला चारी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
विकास गुरुवार, 11/27/2008 - 06:33 नवीन
धार्मिक भेद न करणे हाच उपाय मान्य आहे. म्हणून पुर्वी जसे होते तसेच आत्ता देखील मनापासून सगळ्यांसाठी पाळायचे. धार्मिक लेबल न लावणे. पण आता परत वर आपणच "हिंदू दहशतवादी" असे म्हणालातच! बरे दुसरा भाग म्हणजे आज साध्वी प्रज्ञा/पुरोहीत आदींच्या संदर्भात जेव्हढी टिका हिंदू करत आहेत, त्यांच्यावर अजून आरोपपत्र नसून देखील त्यात वृत्तपत्रे आले, समाज चलवळीत कामे करणारे आले, वगैरे. तशी टिका मुसलमानी बुद्धीवादी मुसलमान दहशतवादावर करताना दिसतात का? आता परत बघूया कोण कोण आत्ताच्या कृत्याचा निषेध करतय ते... निदान मी तरी या प्रसंगानंतर एखाद्या सामान्य मुस्लिमाशी परक्याप्रमाणे वागेल असे वाटत नाही. प्रश्न तुमचा आणि माझा नाही आहे. शिवाय माझे वाक्य मी आपल्या "उद्यापासून कोणीहा असा विचार करू लागेल की शेजारी उभा असलेला तरुण झटकन बॅगेतून एके ४७ काढेल आणि गोळीबार करेल... अशी समाजस्वास्थ्य बिघडवणारी ही योजना आहे. " या विधानाच्या संदर्भात केले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
व
विसोबा खेचर गुरुवार, 11/27/2008 - 04:18 नवीन
अजूनही कारवाई सुरूच आहे.. ओबेऱोय हॉटेलात अतिक्यांनी पुन्हा ग्रेनेडचा हल्ला केला आहे... ताज परिसरात कर्फ्यू लागू केलेला असून युद्धजन्य परिस्थिती आहे.. अनेक परदेशी नागरीकांना ओलिस ठेवले असून त्यांना सोडवण्याचे निकाराचे प्रयत्न सुरू आहेत.. कमांडोजना आणि पोलिसांना लौकरच या युद्धात यश मिळो व परदेशी नागरीकांची सुखरूप सुटका होवो, हीच प्रार्थना.. तात्या.
  • Log in or register to post comments
म
मिंटी गुरुवार, 11/27/2008 - 06:31 नवीन
तात्यांशी एकदम सहमत.... हे सगळं करण्यामागे त्यांचा नक्की उद्देश काय तर त्यांना हैदराबाद भारतापासुन तोडुन पाकिस्तानात समावेश व्हावा असं वाट्टंय..... चिड याची येते की हे असं करणारे हे सगळे आतंकवादी आपल्याच देशाचे नागरीक आहेत... हैदराबादचे.... मुसलमानांना त्रास होऊ नये म्हणुन हे सगळं कृत्य करण्यात येतय..... X(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसुनाना गुरुवार, 11/27/2008 - 06:52 नवीन
मिंटी, तुम्ही हे कुठं वाचलं त्याचा दुवा द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिंटी
य
यशोधरा गुरुवार, 11/27/2008 - 05:39 नवीन
अजूनही कारवाई सुरुच आहे का? इतका वेळ का लागतोय?
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत गुरुवार, 11/27/2008 - 06:32 नवीन
एक बातमी - http://timesofindia.indiatimes.com/We_want_all_mujahideen_released_says_terrorist/articleshow/3762100.cms - अभिजीत
  • Log in or register to post comments
व
वैभवपवार गुरुवार, 11/27/2008 - 06:30 नवीन
आपले सरकारच याला जवाबदार आहे . आफ्ज्ल गुरु ला अजुन फाशि दिलि नही ...अतिरेक्यन चि सेवा करन्यात गुन्तले आहे
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 11/27/2008 - 06:35 नवीन
ताजमध्ये कमांडोंच्या प्रतिहल्ल्यात ३ अतिरेकी ठार. गुजरात पोलिसांनी म्हणे गेल्या महिन्यात इशारा दिलेला होता की मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता आहे. पोलिसांसारख्या महत्वाच्या आणि जबाबदार सुत्रांकरवि मिळणार्‍या ह्या बातमीवर गांभिर्याने विचार केलेला दिसत नाही. मुंबई परत पुर्वपदावर येत आहे. *(अवांतरः १. दहशतवादाला चेहरा नसतो हे वेळोवेळी चर्चिले गेले आहेच. सध्याची करुण आणि संतापदायक परिस्थिती पाहता 'हिंदू दहशतवाद' आणि 'मुस्लिम (किंवा अ-हिंदू) दहशतवाद' अश्या वादात सध्यातरी कलगीतुरे करणे व्यक्तिशः मलातरी योग्य वाटत नाही. २.ए.टी.एस.चे कै.हेमंत करकरे ह्यांच्या बलिदानानंतर निदान काहीकाळ तरी त्यावर तात्विक का होईना वाद घडु नयेत असं मनापासुन वाटतं. समस्त मिपाकर सुजाण आहेतच. निदान ह्या परिस्थितीत तरी तात्विक वाद बाजुला ठेऊन एकत्र रहावे ही हात जोडुन कळकळीची विनंती. माझे हे बोलणे अयोग्य, अस्थानी असल्यास् / वाटल्यास क्षमस्व! )
  • Log in or register to post comments
म
मैत्र गुरुवार, 11/27/2008 - 07:06 नवीन
अतिशय उत्तम आणि संयत प्रतिक्रिया धमु, काहीही अस्थानी नाही. हा देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला आहे. त्यात धर्म असलाच तर तो त्या अतिरेक्यांनी जी काही कथित मागणी केली आहे तेवढाच. गोळी झाडणारा आणि निरपराधी लोकांचे जीव घेणारा एक गुन्हेगार असतो. त्याची जात धर्म हा त्याच्या नावाचा किंवा आयडेंटिफिकेशन चा भाग आहे बस. ए टी एस वरच्या वादाला सध्या पडदा टाकावा. हेमंत करकरे यांना अभिवादन होत आहे कारण ते प्रमुख होते मोठे अधिकारी होते तरी जिवावर उदार होऊन पहिल्या आघाडीत लढले. पण नाव नसलेले बाकी नऊ कर्मचारी तितकेच महत्त्वाचे. त्यांना मरणानंतर सुद्धा तो मान नाही. एका चॅनेलवर एक साधा हवालदार पाहिला काल रात्री ज्याच्या पोटात गोळी लागली होती. त्यांना चक्कर यायला लागली. काही लोक गोळा झाले. एका बलदंड माणसाने चक्क त्या पोलिसाला हातावर उचलून घेतले आणि काहीही दुसरे साधन नव्हते म्हणून एका स्प्लेंडर च्या मागे हातात घेऊन ते हॉस्पिटल ला गेले. मला अक्षरशः पोटात ढवळलं.. केवळ भयाण. तो मनुष्य गेला तर एका कॉन्स्टेबलला काय मदत मिळणार. अतिशय वाईट वाटलं. दुसरा एक मुद्दा: हे इतके मोठे अधिकारी पुढे का गेले. करकरे यांच्या शेवटच्या व्हिडिओ मध्ये ते सैन्या सारखं हेल्मेट व बुलेटप्रूफ जॅकेट घालताना दिसले. मग त्यांना छातीत तीन गोळ्या कशा लागल्या? यात या शूरवीराचा अवमान करण्याचा हेतू नाही. उलट या माणसांचे जीव अति महत्त्वाचे आहेत. इतके स्वस्त नाहीत ... ते आले आणि आता तयार होत आहेत ही बातमी पाहून झोपलो आणि सकाळी करकरे डेड वाचून विलक्षण त्रास झाला. सर्व शहीद, पोलिस आणि जीव धोक्यात घालून लोकांना बाहेर काढणार्‍या अग्निशमन दलाच्या जवानांना विनम्र अभिवादन. आत्ताच वाचलं की हा राष्ट्रावर हल्ला आहे. सरकारवर कुठलीही टीका न करता सर्व पक्षांनी एकत्र यावे. इतक्या जहाल नेत्याकडून हे ऐकून वाटलं की अजून सगळं संपलं नाही. हीच संधी आहे एकत्र येण्याची.. आणि ही गरज आहे -मँडेटरी म्हणतात तशी. http://www.ndtv.com/convergence/ndtv/story.aspx?id=NEWEN20080074274&ch=633633799855468750 अवांतर: झेंडा अर्ध्यावर आणून राष्ट्रीय दुखवटा जाहीर करावा आणि भारतीय सेनेच्या इतिहासाला आणि नावाला शोभेल असा प्रतिहल्ला करावा. जय हिंद. (अतिशय दु:खी)....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
य
यशोधरा गुरुवार, 11/27/2008 - 07:11 नवीन
मैत्र, धमु सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र
स
स्मिता श्रीपाद गुरुवार, 11/27/2008 - 06:37 नवीन
अजुनही ताज च्या बाहेर कारवाई सुरु आहे... इतकी भयानक घटना .....आज पेपर वाचु नये असं वाटत होतं......बातम्या वाचताना डोळ्यात पाणी कधी आलं कळलच नाही... देवा...आता तरी जागा हो.... :-(
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 11/27/2008 - 07:21 नवीन
हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटेसह नऊ पोलिस शहीद झाले , अहो शहीद केले म्हणा ! ह्या नालयक, नाकर्त्या, नामर्द सरकारच्या नेभळट धोरणाचे बळी आहेत हे. अजुन किति दिवस सगळ्यात मोठ्या लोकशाहिचा झेंडा हलवत बसणार आहे ? मला तर कधि कधि वाटते आपला देश ह्या अतिरेकी लोकांना सराव करण्यासाठी आंदण दिला आहे. ९/११ नंतर अमेरिकेत हल्ला करण्याचे विचार सुध्दा करणे अवघड बनवले आहे त्या देशानी, पण आपल्याकडे सगळा आनंदी आनंद आहे. फक्त तारिख आणी ठिकाण बदला आणी द्या निषेधाचे खलिते पाठवुन !! |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।। आमचे राज्य
  • Log in or register to post comments
क
कवटी गुरुवार, 11/27/2008 - 10:29 नवीन
निळा ट्याग बंद केला. कित्तेक किलो आर्.डि.एक्स. जप्त. आजुनही २ दिवस पुरेल येवढा दारुगोळा अतिरेक्यांकडे. आरे या रां*च्याना दुसरे उद्योग नाहित का? कष्ट कर कमव आणि सुखाची भाकर खा ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ग
गुरुजी गुरुवार, 11/27/2008 - 06:45 नवीन
हे स्फोट विधानभवन मंत्रालय अशा ठिकाणी व्हायला पाहीजे होतो आणि अतिरेक्यानी नेत्याना ओलिस ठेवायला हवं मग सालं सरकार वठणीवर येईल आता नाहीतरी सरकारला निवडणुकीशिवाय जनतेचं महत्व नाहीच ते काय म्हणतील मरतायत ना मरुदेत मदत फक्त जाहीर करायला पुढे सरकाय यावर फार तर दोन दिवस उड्या मारेल नंतर शांत बसेल आणि वर 'पोटा कायद्याची काही गरज नाही' म्हणायला तयार
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ गुरुवार, 11/27/2008 - 07:54 नवीन
सहमत. मला वाटत एकदा तरि मंत्री नावाचा एखादा कीडा मारला गेला पाहिजे. मग जागे होतील. सामान्य माणसाल्या बसलेल्या झळेचे हे लोक फक्त 'तीव्र शब्दात निषेध' करु शकतात. - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुरुजी
ध
धमाल मुलगा गुरुवार, 11/27/2008 - 08:16 नवीन
नको हो मालक! असं काही मनातही आणू नका! एखादा मंत्री गचकला ह्यात तर बाकीचे बोंबाबोंब करुन अतिरेकी असलेल्या इमारतीच्या छतावर एखादं 'चार्टर्ड प्लेन' उतरवून त्या अतिरेक्यांच्या पाया पडुन त्यांना इमानात बसवून एखाद्या सुरक्षित (अतिरेक्यांसाठी!) अशा देशात 'दिल्या घरी सुखी रहा' म्हणत पाठवणी करतील.....हे सगळं तुमच्या, माझ्या, सगळ्यांच्या कर भरलेल्या पैशातून!!!! अहो, जिथं हिंदुस्थानाच्या लोकशाहीचं परमोच्च स्थान 'संसद' ह्यावर हल्ले करणारा अफजल गेली इतकी वर्षं सुखात आणी सुरक्षितपणे (हे एव्हढ्यासाठी, की जर त्या कुत्तरड्याला रस्त्यावर आणलं तर दगड्यानं ठेचुन त्याचा जीव 'मायबाप जन्ता'च घेईल.पण मग त्याच्या नावावर राजकारण करणं शक्य नाही ना होणार? ) फुकटच्या रोट्या तोडतोय तिथं एखाद्या मंत्र्यासंत्र्याला त्रास झाला तर काय आपला हा अजगर जागा होणार आहे? दुर्दैव देशाचं! मेरा भारत परेशान !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पांथस्थ
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 11/27/2008 - 09:57 नवीन
वाटत नाही हो! इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हे दोन आजी/माजी पंतप्रधान दहशतवाद्यांनीच मारले ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पांथस्थ
च
चतुरंग गुरुवार, 11/27/2008 - 06:54 नवीन
हे सूत्र अत्यंत कठोरपणे अमलात आणणे जरुर आहे. प्रतिकार केला तर गोळ्या घालून मारा. पकडले गेले तर लवकरात लवकर जास्तितजास्त माहिती काढून फासावर लटकवा! न्याय हा महिन्या दोन महिन्यातच मिळायला हवा. १९९३ चे बाँबस्फोट खटले १३-१३ वर्ष चालतात ह्यातच आपली नाचक्की आहे. काय वचक बसणार आणि कसली दहशत वाटणार? ज्यांना शिक्षा झाल्या आहेत त्याची लगेच अंमलबजावणी! अफजल गुरु - लगेच फाशी देऊन टाका, लगेच आज देता आली तर उत्तम, कसली वाट बघता? अरे वाट बघत बसलात म्हणून वाट लागली आहे आता!! चतुरंग
  • Log in or register to post comments
स
स्वप्निल.. गुरुवार, 11/27/2008 - 07:31 नवीन
वाटाघाटी नकोत..सर्व अतिरेकी ठार झालेच पाहीजे.. चतुरंगशी ११० % सहमत.. झाले ते अतिशय वाइट आहे.. स्वप्निल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
उ
उम्मि गुरुवार, 11/27/2008 - 07:06 नवीन
आम जनतेनेच सरकारवर दबाव आणला पाहीजे या समुळ भ्याडांना(सामान्य नागरीकांना ओलीस धरणारयांना) मौत के घाट उतारण्यासाठि.... हिच वेळ आहे दहशतवाद उखडुन टाकण्याची... साल्यांना, सळो की पळो करुन सोडल पाहीजे....... उम्मि.
  • Log in or register to post comments
व
विसुनाना गुरुवार, 11/27/2008 - 07:15 नवीन
शिवराज असे ओजस्वी नाव धारण केलेले भारताचे गृहमंत्री दिल्लीत (मुंबई) हल्ल्यानंतरची पहिली मुलाखत देताना सांगत होते, "एकूण पाच ठिकाणी हल्ले झालेले आहेत. नक्की किती लोक मेले ते उद्या सकाळी स्पष्ट होईल. माझ्या अधिकार्‍यांना मी मृतांची यादी बनवण्यास सांगितले आहे. उद्या सकाळी ते तुमच्याशी याबाबत सविस्तर बोलतील आणि ती यादीही तुम्हाला देतील." या महानुभावांच्या चेहर्‍यावरचा पराभव आणि आवाजातला फोलपणाचा भाव इतका स्पष्ट होता की हे महर्षी भारताचे गृहमंत्री नसून जन्ममृत्यू नोंदणी करण्यास फिरत असलेले कारकून असावेत असे वाटले. भारतात सरकार फक्त मृत व्यक्तींची यादी बनवण्यापुरते आणि ती यादी संपर्क माध्यमांना पुरवण्यापुरते शिल्लक आहे असे स्पष्ट जाणवले.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 11/27/2008 - 07:21 नवीन
इतके शेळपटासारखे भाव चेहेर्‍यावर होते की मला लाज वाटली! काय तो खोल गेलेला आवाज? अरे असला भीषण हल्ला होऊन इतकी माणसं हकनाक गेली आहेत तुमच्या आवाजात, देहबोलीत, चेहर्‍यावर काहीही दिसू नये? काय म्हणावं? असले लांच्छनास्पद लोक भारताच्या गृहमंत्रीपदी असल्यावर उद्या घराघरातून घुसून लोकांना गोळ्या घातल्या जातील तरीही आपण निषेधच करत बसू!! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
व
विसुनाना गुरुवार, 11/27/2008 - 07:42 नवीन
निषेध करायला तरी आपण जिवंत असू का? :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा