Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ऋग्वेद: खगोल विज्ञान : पृथ्वी सूर्याची परिक्रमा करते

व
विवेकपटाईत
Mon, 08/02/2021 - 12:28
💬 78 प्रतिसाद
आयं गौः पृश्निरक्रमीदसदन्मातरं पुरः। पितरंच प्रयन्त्स्व:॥ ऋषिका: सार्पराज्ञी, देवता: सार्पराज्ञी, सूर्य (ऋ. १०/१८९/१) अर्थ: पृथ्वी गति करते. पृथ्वी आकाशगंगा रुपी मातेच्या घरात आहे. पृथ्वी आपल्या पिता सूर्याची परिक्रमा करते. ऋग्वेद म्हणजे ज्ञान आणि विज्ञानाची खाण. या खाणीत अनेक अनमोल रत्न आहेत. पृथ्वी सूर्याची परिक्रमा करते, हे सत्य आपल्या वैदिक ऋषिंना माहित होते, तरीही याचे श्रेय त्यांना देण्याचा प्रयत्न आपण केला नाही याचे कारण आपली गुलाम मानसिकता. आपल्या वैदिक ज्ञानाची माहिती सर्वांना कळावी यासाठी हा प्रपंच. गमन करणारी प्रत्येक वस्तूहि "गौः" असते. इथे "गौः" शब्दाचा अर्थ पृथ्वीच का? हा प्रश्न मनात येईलच? याचे स्पष्टीकरण: वरील ऋचाची ऋषिका सार्पराज्ञी आहे. पहिली देवता सार्पराज्ञी आहे. आपली आकाशगंगाहि सर्पिल आहे. अंतरिक्षात ती सापासारखी कुंडली मारलेल्या अवस्थेत दिसते. बहुतेक ऋषिकाने आकाशगंगेला सार्पराज्ञी असे संबोधले असावेत. दुसरी देवता सूर्य आहे. भक्त हा आपल्या देवतेची परिक्रमा करतो, हि आपली प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. ऋचेत गमन करणारी वस्तू सूर्याची परिक्रमा करत आहे. दृष्टा ऋषिका आपल्या पृथ्वीवरच राहणारी मानव होती. तिने आयुष्यभर दिवस-रात्र जागून खगोल विज्ञानाचे विशेषकरून आपल्या आकाशगंगेचे अध्ययन केले असेल म्हणून तिचे नावहि सार्पराज्ञी असे पडले असावे. तिला झालेल्या साक्षात्काराचे वर्णन तिने छंदबद्ध भाषेत वरील ऋचेत केले आहे. पृथ्वीसाठी "गौः" हा शब्द वापरला. तिच्यामुळे जगाला प्रथमच कळले कि पृथ्वी सूर्याची प्रदक्षिणा करते.

प्रतिक्रिया द्या
25583 वाचन

💬 प्रतिसाद (78)
ग
गॉडजिला Mon, 08/02/2021 - 13:15 नवीन
पृथ्वी सूर्याची परिक्रमा करते, हे सत्य आपल्या वैदिक ऋषिंना माहित होते, तरीही याचे श्रेय त्यांना देण्याचा प्रयत्न आपण केला नाही याचे कारण आपली गुलाम मानसिकता.
संस्कृत भाषेचा अभ्यास नासा करते कारण...जसे सोप्या बेरीज वजबाकी अथवा गुणाकारामधे जशी संख्यांची जागा बदलली तरी उत्तर तेच येते जसे ३००+ १२० = ४२० अथवा १२० + ३०० = ४२०. तसेच संस्कृत ओळीतील शब्दांची जागा बदलली तरी त्याचा अर्थ तोच राहतो जसे अहम अस्मि ब्रम्हा == अहम ब्रम्हा अस्मि. पण I am bramha != am I bramha. इंग्लिशमध्ये मात्र अर्थ बदलतो... म्हणूनच अत्यंत स्टेबल languge म्हणुन नासा संस्कृतचा अभ्यास करत आहे वापरही करायचे प्रयोजन ठेवते... पण मुद्दा हा आहे की आपण गुलाम नव्हतो तेंव्हा १००% लोकाना संस्कृत येतं होती ? नाही तर त्यामागे कोणती गुलामी मानसिकता होती ? बाकि आपलं असो की परक्याचे जे योग्य त्याचा उचित सन्मान झालाच पाहिजे पण उठसूठ गुलाम मानसिकतेच्या नावाने गळे काढत बसणे अज्ञान होय. मग इंग्रजांनी जेंव्हा त्यांचे ज्ञान भारतीयांना शिकवण्यासाठी (त्यांचे कारकून तयार करायला) संस्कृत भाषा निवडली तेंव्हा सर्वांना ही भाषा येतं नाही म्हणून भारतातील समाज सुधारकांनी त्यास आक्षेप घेतला (जसे राजा राम मोहन रॉय वगैरे) व तुम्हीं आम्हाला इंग्रजीतून ज्ञान द्या ही शिफारस केली तर ते चूक अथवा गुलाम मानसिकतेचे ठरतात ? मग गुलाम मानसिकता इंग्रजानी रुजवली की आपल्यात ती आगोदरच होती ?
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 08/03/2021 - 05:37 नवीन
२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
ग
गॉडजिला Tue, 08/03/2021 - 11:08 नवीन
मी आपल्याच प्रतिक्रियेची वाट बघत होतो... असो प्रतिसाद कळला नाही जरा सविस्तपणे लिहाल का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Tue, 08/03/2021 - 20:03 नवीन
म्हण्जे तुम्ही अगदी उत्कृष्ठ प्रतिनिधी आहात गट क्र. २ चे ! इतकेच म्हणायचे होते ! बाकी संवाद करण्यात काहीच अर्थ नाही ! शुभं भवतु !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
ग
गॉडजिला Tue, 08/03/2021 - 20:21 नवीन
मी तुमचे हे म्हणने वाचण्यात बिजी होतो....
मला आता कोणत्याही ग्रूप आयडेंटीटीचा तिटकारा वाटायला लागलाय ! काय फरक पडतो तुम्ही कोणत्याजातीत जन्माला आला म्हणुन ? त्यात तुमचे काय कर्तृत्व ? जनरली , कोणत्याही व्यक्तीवर त्याची व्यक्तिभिन्नता पुसुन ग्रूप आयडेंटी लादणारी व्यक्ती / सिस्टीम केवळ त्याचा दुरुपयोग करुन घेत असते असे माझे ठाम मत बनले आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Tue, 08/03/2021 - 20:42 नवीन
ती वैयक्तिक पॉलीसी आहे, म्हणजे कसं की स्वतःला कोणताही ग्रुप आयडेंटिटी मध्ये विभागुन घ्यायच नाही, पण इतरांना मात्र ( विशेषतः गट क्र. २ मधील लोकांना ) त्यांचा ग्रुप किती भारी आहे , त्यांची ग्रुप आयडेंटिटी किती हुच्च आहे , त्यांची ग्रुप आयडेंटीटी ही त्यांच्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग आहे हे दाखवुन द्यायचे ! अजुन सोप्प्या शब्दात सांगायचं तर इतरांसाठी ध्येयवाक्य - " शिका , संघटित व्हा आणि संघर्ष करा " आणि स्वतःसाठी ध्येयवाक्य " पारंपारिक शिक्षण घेऊ नका, संघटित तर मुळीच होऊ नका आणि संघर्ष करायचा तर विचार सुध्धा मनात आणु नका " ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
ग
गॉडजिला Tue, 08/03/2021 - 20:47 नवीन
अजुन येउद्या... तुमचे विचार वाचायला मजा येते(सगळेच पटत नाहीत तरीही). कृपा करा जसे आहात तसेच रहा अर्थपुर्ण लिखाणाच्या अजिबात फंदात पडु नक्का..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
त
तुषार काळभोर Tue, 08/03/2021 - 01:13 नवीन
यह सदा गमनशील और तेजस्वी सूर्य उदयाचलको प्राप्त हुआ है| और पूर्व दिशा में अपनी माता पृथिवी को प्राप्त करता है| अनंतर अपने पिता द्युलोक की ओर शीघ्रतासे जाते समय अत्यंत शोभायमान होता है| This moving many coloured (Sun) has arrived, he has sat down before his mother (Earth) in the East and advances to his Father Heaven. हिन्दी संदर्भ इंग्रजी संदर्भ इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार द्वारा चालवल्या जाणाऱ्या वेदिक हेरिटेज (वैदिक वारसा) या संकेतस्थळावर हे सुक्त आणि त्याचे हिंदी + इंग्रजी भाषांतर उपलब्ध आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 08/02/2021 - 17:01 नवीन
हाच अर्थ अचूक आहे आणि त्याच्या पुढचे दोन श्लोक सुद्धा ह्याच अर्थाची पुष्टि करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
स
स्वधर्म Tue, 08/03/2021 - 12:30 नवीन
अभिनंदन. असा नेमका संदर्भ हुडकून प्रतिवाद करणे खूप कमी जणांना जमते. तोही वैदिक ज्ञानाच्या संकेतस्थळावरून शोधला आहे, म्हणजे वादच नाही. धागाकर्त्यांनी कृपया प्रतिसाद द्यावा, ही माफक अपेक्षा. कालच यू ट्यूबवर एक जुना सिनेमा पहात असताना त्यात विनोबांचा गीताईमधला एक श्लोक दाखवला होता. त्याचा अर्थ इतका समाजहिताच्या विरोधी लागतो, की आश्चर्य वाटले. म्हणून एका गीतेच्या अभ्यासक मित्राला विचारले असता, त्याने अर्थ फिरवून बरोबर तो वाईट दिसणार नाही, अशा प्रकारचा खुलासा पाठवला. श्रध्दाळूंबरोबर सारासार चर्चा करता येत नाही, असाच आजवरचा अनुभव आहे. निदान विवेक पटाईत यांनी लावलेला अर्थ बरोबर नाही, आणि वैदिकांकडे त्यावेळी नेमके ज्ञान नव्हते इतकी कबुली मोठ्या मनाने दिली तर खूप बरे वाटेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
प
प्रचेतस Tue, 08/03/2021 - 12:43 नवीन
मुळात पृश्नि ह्या शब्दाला पृथ्वी असे समजल्यामुळे घोळ झाला असावा असे वाटते. पृश्नि ह्याचे विविध अर्थ आहेत -ठिपके, प्रकाश किरण, सूर्यपत्नी, एक ऋषी. ह्यापैकी ह्या श्लोकात सर्वात अचूक अर्थ आहे तो सूर्यकिरण अर्थात सूर्य हाच. शिवाय हे सूर्यसूक्त आहे आणि पुढील दोन श्लोकांत ह्याचाच अनुशंगाने सूर्याची स्तुती केलेली दिसते. पृथ्वी सूयाभोवती फिरते असे धागालेखकाचे म्हणणे केवळ सिलेक्टिव्ह रिडींग आहे असे म्हणावेसे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
व
विवेकपटाईत गुरुवार, 08/12/2021 - 07:17 नवीन
पसार झालो नाही. फक्त बघत होतो किती लोक आपल्या डोक्याचे वापर करतात. ऋग्वेदात सूर्यला सूर्यच म्हंटले आहे. "गौ" नाही. परिक्रमा सूर्य किरणे करत नाही. त्यामुळे गौ शब्दाचा अर्थ फक्त पृथ्वी होऊ शकते. पाश्चात्य तिन्ही विद्वानांना संस्कृत भाषेचे विशेष ज्ञान नव्हते. कुणीही पाणिणी व्याकरण, निरुक्त,धातूपाठ इत्यादि अध्ययन केलेले नव्हते. जे आम्हाला माहीत नाही यांना कसे माहीत होते. मग आपल्या सोयी नुसार गायीला (स्त्री लिंग ) पुलिंगी सूर्य बनवून टाका. आणि शिक्षित गुलाम, साहेबांनी जे लिहले तेच सत्य. असो. नमो॑ मि॒त्रस्य॒ वरु॑णस्य॒ चक्ष॑से म॒हो दे॒वाय॒ तदृ॒तं स॑पर्यत । दू॒रे॒दृशे॑ दे॒वजा॑ताय के॒तवे॑ दि॒वस्पु॒त्राय॒ सूर्या॑य शंसत ॥ १॥ (10/37/1)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
व
विवेकपटाईत Sat, 08/07/2021 - 09:07 नवीन
हा सरकारी संस्थेचा चूक अर्थ आहे, हीच ती गुलामी मानसिकता. इथे वृषभ शब्द नाही गौ हा शब्द आहे. चुकीच्या भाष्यात गौः शब्दाचा अर्थ वृषभ असा केलेला आहे. किमान थोडे स्वत:च्या डोक्याचा वापर पण करावा. ऋग्वेदात पुलिंग बैल शब्दासाठी वृषभ (वादळ) हा शब्द वापरला आहे. याच मंडळातील १०२ वे सुक्त. म्हणजे समकालीनच. नि । अ॒क्र॒न्द॒य॒न् । उ॒प॒ऽयन्तः॑ । ए॒न॒म् । अमे॑हयन् ।वृ॒ष॒भम् । मध्ये॑ । आ॒जेः । तेन॑ । सूभ॑र्वम् । श॒तऽव॑त् । स॒हस्र॑म् । गवा॑म् । मुद्ग॑लः । प्र॒ऽधने॑ । जि॒गा॒य॒ ॥ १०.१०२.५ २. याशिवाय ऋग्वेदातील शाकल शाखा, ब्राम्हण ग्रंथात ऐतरेय (३/४४ ) मध्ये हि स्पष्ट केले आहे सूर्य स वा न कदाचनास्तमेति नोदेति ....इति ३. बाकी भक्त देवतेची परिक्रमा करतात. देवता नाही. शिवाने गणेशाची परिक्रमा केलेली नाही. बाकी मी हा अर्थ वेदांचे गाढे अभ्यासक ब्रम्हमुनी यांच्या भाष्यातून घेतला आहे. स्वामी दयानंद ते अधिकांश भारतीय विद्वानांनी हाच अर्थ काढला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
त
तुषार काळभोर Sat, 08/07/2021 - 10:21 नवीन
किमान थोडे स्वत:च्या डोक्याचा वापर पण करावा. >> मला संस्कृत, तेही संयुक्त, केवळ तीन वर्षे होतं. त्यामुळे तुमच्या इतका मी प्रकांड पंडित नक्कीच नाही. मला स्वतःला जे कळत नाही, त्या बाबतीत, (स्वतःच्या डोक्याचा वापर करून) अधिकृत संदर्भ तपासणे, एवढेच मी करू शकतो. अर्थात वेदांचे गाढे अभ्यासक ब्रह्ममुनी, स्वामी दयानंद ते अधिकांश भारतीय विद्वानांनी काढलेला अर्थ हा अधिकृत अर्थापेक्षा जास्त अचूक असणार, यात शंका नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
त
तुषार काळभोर Mon, 08/02/2021 - 17:20 नवीन
?
  • Log in or register to post comments
न
नीळा Tue, 08/03/2021 - 08:36 नवीन
ज्ञान आणि अभ्यास कमी आहे माझा तरी एक गोष्ट मला लक्षात येत नाही... वेदांमध्ये इतके सगळे अचुक वैज्ञानिक ज्ञान आहे तर मग.. पृथ्वी शेश्यांच्या मस्तकावर आहे...ग्रहणात राहु केतु सुर्य गीतात ह्या व यासारख्या भाकड कथा कोणी लीहील्या? आणि मुख्य म्हणजे काय लीहील्या.....त्यात कोणाचा फायदा होता?
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Tue, 08/03/2021 - 11:43 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीळा
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 08/12/2021 - 08:18 नवीन
पृथ्वी शेश्यांच्या मस्तकावर आहे
हा हा विषयच संपला. आभार मानायला हरकत नै आता या धाग्यावर. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीळा
क
कॉमी Tue, 08/03/2021 - 12:48 नवीन
धागालेखकाने दिलेला अर्थ जरी खरा मानला तरी त्यातून भारतीयांची पृथ्वी सुर्याभोवती फिरते अशी समजूत होती इतकाच अर्थ निघतो. त्यात केवळ वडील मुलगी इत्यादी रूपके आहेत. कोणत्या निरीक्षणांवरून काय अनुमान निघाले याबद्दल काही नाही. त्यामुळे जरी श्लोकाचा अर्थ आहे तसा मानला तरी गुलामी वैगेरे जरा जास्त वाटते.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 08/12/2021 - 09:20 नवीन
त्यामुळे जरी श्लोकाचा अर्थ आहे तसा मानला तरी गुलामी वैगेरे जरा जास्त वाटते.
जास्त नै अति. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी
ट
टवाळ कार्टा Tue, 08/03/2021 - 12:57 नवीन
असे अजूनही बरेच वैज्ञानिक शोध बाकी असतील पण आपल्या पुराणांमध्ये आधीच लिहून ठेवले असतील...असे शोध जगासमोर आणायला आपल्याला कोणी थांबवले आहे का? अजून किती दिवस्/आठवडे/वर्षे/दशके/शतके "हे आमच्या पुराणांमध्ये आधीच लिहून ठेवले आहे" असे म्हणत गार गार वाटून घेणार आहोत?
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Tue, 08/03/2021 - 15:02 नवीन
तो म्हणजे भारतीयांनी गमावलेली आधुनिक ज्ञानाच्या बाबतीत प्रभुत्वाची मानसीकता जागरूक अथवा तीव्र करणे. पण यासाठी गरजेची सीन्ससियरिटी, अभ्यासाची खोली आणि लिखाणाची सामावेशक वैज्ञानिक समज याकडे दुर्लक्ष करून निव्वळ आपली अस्मिता कुर्वाळून जेंव्हा जेंव्हा आपल्या श्रेष्ठत्वाची जाणीव जागवायचा प्रयत्न दिसतो तेंव्हां फक्त अलिबाग से आयेला है क्या असेच म्हणावेसे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ड
डाम्बिस बोका गुरुवार, 08/05/2021 - 17:05 नवीन
कशाला अलिबाग चे नाव? त्यापेक्षा सौदी वरून आला आहेस का, हे जास्ती प्रस्तुत वाटते. आपल्या OUTDATED कल्पनांना कवटाळून बसणारी सौदी जमात इथे FIT बसते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 08/05/2021 - 17:12 नवीन
लै दिवसांनी दिसलात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डाम्बिस बोका
R
Rajesh188 Tue, 08/03/2021 - 16:23 नवीन
पण त्या प्राचीन ज्ञाना चा वापर करून त्या मध्ये भर टाकण्यात भारतीय कमी पडले. सर्व शास्त्र मध्ये प्राचीन ग्रंथात ज्ञान असून ते समजून त्याचा अभ्यास करून भारताने उत्तुंग झेप घेणे अपेक्षित होते. पण आज अवस्था अशी आहे तंत्र ज्ञन, विज्ञान आरोग्य शास्त्र, शस्त्र ,अस्त्र ज्ञान ह्या मध्ये भारत दुसऱ्या देशावर अवलंबून आहे. लढावू विमान पण भारताला दुसऱ्या देश कडून मागवावे लागत आहेत. दुनिया कर्तुत्व ला सलाम करते.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Tue, 08/03/2021 - 18:35 नवीन
दुनिया नुसत्या ज्ञानाला नाही तर कर्तुत्वाला सलाम करते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
ग
गामा पैलवान Tue, 08/03/2021 - 18:05 नवीन
नीळा,
वेदांमध्ये इतके सगळे अचुक वैज्ञानिक ज्ञान आहे तर मग.. पृथ्वी शेश्यांच्या मस्तकावर आहे...ग्रहणात राहु केतु सुर्य गीतात ह्या व यासारख्या भाकड कथा कोणी लीहील्या?
अचूक वैज्ञानिक ज्ञान म्हणजे नेमकं काय? तुम्हांस एक गंमत सांगतो. इलेक्ट्रॉनचं नाव ऐकलं असेल तुम्ही. हा कण म्हणे अणुगर्भाच्या भोवती फिरंत असतो. ही सुद्धा एक भाकडकथाच आहे. आकाशात ढगांवर ढग घासून म्हणे वीजनिर्मिती होते. हीसुद्धा एक भाकडकथाच आहे. शालेय पुस्तकांत खरी म्हणून ठोकून दिलेली, पण प्रत्यक्षात भंपक अशी समजूत आहे. डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत ही पण एक पराकोटीची भाकडकथा आहे. सांगायचा मुद्दा काये की शेषाच्या मस्तकावर पृथ्वी आहे वगैरेसाठी केवळ हिंदूंना दोष देणे नको. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 08/03/2021 - 18:14 नवीन
तुमच्या मताशी सहमत आहे.प्रवाह बरोबर वाहत न जाणारा व्यक्ती च खरा विज्ञान वादी असतो. आता जे विज्ञान म्हणून जे काही सांगितले जाते ते नवीन अंध श्रद्धा निर्माण करत आहे. प्रवाह विरूद्ध स्वतःची मतं असणारी माणसं दुर्मिळ असतात. त्या दुर्मिळ माणसात तुम्ही एक आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Tue, 08/03/2021 - 22:58 नवीन
Rajesh188, स्तुतीबद्दल धन्यवाद. ती देवांनाही आवडते. मी तर पडलो मर्त्य माणूस! :-) आता जे विज्ञान म्हणून जे काही सांगितले जाते ते नवीन अंधश्रद्धा निर्माण करत आहे, हे तुमचं विधान जाम सत्य आहे. विज्ञानाच्या नावाखाली अंधश्रद्धा माजू द्यायची नसेल तर तात्विक प्रशिक्षण घ्यावं लागतं. तात्विक प्रशिक्षण सार्थ करण्यासाठी श्रद्धा लागते. थोडक्यात काय, विज्ञान मुळातून शिकायचं असेल तर श्रद्धा हवीच. अंधश्रद्धेस श्रद्धाच संपवू शकते. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
ग
गॉडजिला Tue, 08/03/2021 - 18:41 नवीन
तुम्हांस एक गंमत सांगतो....
ठीक काहे भरपूर हसलो आता आता गंमत बाजूला राहूदे भाकडकथा काय काय नाहीत ते सांगा बरे... ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
R
Rajesh188 Tue, 08/03/2021 - 19:48 नवीन
भाकड कथा कोणत्या आहेत आणि कोणत्या नाहीत हे ठरवणार कोण. ज्या मुद्द्यावर प्राचीन ज्ञान भाकड कथा आहेत असे काही म्हणतात त्याच मुद्द्यावर आधुनिक संकल्पना ह्या पण भाकड कथा च ठरतात हा सूर्य आणि हा जयद्रथ हे दोन्ही ठिकाणी सिद्ध होत नाही. पण जेव्हा माणसाला कपडे घालायचे पण माहीत नव्हत तेव्हा अती प्रगत विचाराचे लिखाण झाले आहे , वास्तू शास्त्राचे अद्भूत रचना तेव्हा निर्माण झाल्या आहेत. संस्कृती अती उच्च स्थानावर जावून नष्ट होते हा निसर्ग नियम आहे प्राचीन ज्ञान ही ज्ञाना ची अतिउच्च पातळी होती त्या नंतर ती नष्ट झाली. उद्या काही घडले आणि आताची संस्कृती नष्ट झाली तर काही लाख वर्ष नी२०२१ मध्ये माणसाने काय काय प्रगती केली होती ही भाकड कथा च असेल. काहीच पुरावा सापडणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
ग
गॉडजिला Wed, 08/04/2021 - 09:28 नवीन
भाकड कथा कोणत्या आहेत आणि कोणत्या नाहीत हे ठरवणार कोण. तो प्रश्नच नाही. गामा पैलवानाजी भाकडकथा कोणत्या नाहीत आता सांगतीलच... तुम्हीं जरा ऐकायचे काम करा बरं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
न
नीळा Tue, 08/03/2021 - 18:56 नवीन
आपल्या संस्कृतीत इतकं ज्ञान असताना ही चुकीची माहिती असलेली पुराण कोणी आणि का लीहीली? आता उदाहरणार्थ ग्रहणात राहु केतु सुर्याला गीळतात? हे कसे शीरले बाकी अणु बीणु .... डार्विनला मधे न आणता सांगा बर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Tue, 08/03/2021 - 23:10 नवीन
नीळा, तुमचा प्रश्न रास्त आहे, पण माझ्याकडे निश्चित उत्तर नाही. म्हणून मी विज्ञानातल्या भाकडकथांचं उदाहरण दिलं. या भाकडकथांमुळे विज्ञानाचं काहीही बिघडंत नाही. तर मग वैदिक भाकडकथांमुळे भारतीयांचं तरी काही का बिघाडावं? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीळा
ट
टवाळ कार्टा Wed, 08/04/2021 - 12:51 नवीन
इलेक्ट्रॉनचं नाव ऐकलं असेल तुम्ही. हा कण म्हणे अणुगर्भाच्या भोवती फिरंत असतो. आकाशात ढगांवर ढग घासून म्हणे वीजनिर्मिती होते. डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत
या भाकडकथा आहेत असे म्हणायचे आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Wed, 08/04/2021 - 16:18 नवीन
हो. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 08/05/2021 - 12:14 नवीन
इलेक्ट्रॉनचं नाव ऐकलं असेल तुम्ही. हा कण म्हणे अणुगर्भाच्या भोवती फिरंत असतो. आकाशात ढगांवर ढग घासून म्हणे वीजनिर्मिती होते. डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत
या सगळ्या भाकडकथा आहेत ते कशाच्या आधाराने लिहिले त्याचा रेफरन्स इथे देता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गॉडजिला Wed, 08/04/2021 - 13:06 नवीन
या भाकडकथांमुळे विज्ञानाचं काहीही बिघडंत नाही. जेंव्हा जेंव्हा एखादी बाब वैज्ञानीक भाकडथा आहे हे विज्ञानच सिध्द करते तेंन्ह्वा विज्ञान धर्म, देश वगैरे अस्मिता न बघता त्याच्या चुका/ सुधारणा/ नावीन्य मान्य करते आपलेसे करते. त्याचा उपयोगही करते. तर मग वैदिक भाकडकथांमुळे भारतीयांचं तरी काही का बिघाडावं? तर मग वैदिक भाकडकथांमुळे काही भारतीयांचं तरी काही का बिघाडावं हा प्रश्न जास्त उचित होइल... पण तो चर्चेचा मुद्दा तुर्त नाही कारण वैदीक भाकडकथा मधुन कोणाचे बिघडले आहे याचा अभ्यास मिपाकर मार्कस ओरलस यांनी आधिच केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
क
कॉमी Wed, 08/04/2021 - 16:02 नवीन
कोरोना जितके थोतांड आहे तितकेच उत्क्रांती आणि इलेक्ट्रॉन भाकडकथा म्हणून मान्य आहेत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
क
कपिलमुनी Tue, 08/03/2021 - 19:12 नवीन
धागाकर्ता प्रचारकी
पोस्ट टाकून पसार !
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत गुरुवार, 08/12/2021 - 07:16 नवीन
पसार झालो नाही. फक्त बघत होतो किती लोक आपल्या डोक्याचे वापर करतात. ऋग्वेदात सूर्यला सूर्यच म्हंटले आहे. "गौ" नाही. परिक्रमा सूर्य किरणे करत नाही. त्यामुळे गौ शब्दाचा अर्थ फक्त पृथ्वी होऊ शकते. पाश्चात्य तिन्ही विद्वानांना संस्कृत भाषेचे विशेष ज्ञान नव्हते. कुणीही पाणिणी व्याकरण, निरुक्त,धातूपाठ इत्यादि अध्ययन केलेले नव्हते. जे आम्हाला माहीत नाही यांना कसे माहीत होते. मग आपल्या सोयी नुसार गायीला (स्त्री लिंग ) पुलिंगी सूर्य बनवून टाका. आणि शिक्षित गुलाम, साहेबांनी जे लिहले तेच सत्य. असो. नमो॑ मि॒त्रस्य॒ वरु॑णस्य॒ चक्ष॑से म॒हो दे॒वाय॒ तदृ॒तं स॑पर्यत । दू॒रे॒दृशे॑ दे॒वजा॑ताय के॒तवे॑ दि॒वस्पु॒त्राय॒ सूर्या॑य शंसत ॥ १॥ (10/37/1)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कोहंसोहं१० Wed, 08/04/2021 - 00:40 नवीन
वेदांमध्ये अचुक वैज्ञानिक ज्ञान आहे यात शंका नाही...पण ते भौतिक ज्ञान नाही तर आत्मिक अथवा आध्यात्मिक ज्ञान. कोणत्याच काळामध्ये भौतिक ज्ञान हे परिपूर्ण नव्हते आणि असणारेही नाहीं. ते काळाप्रमाणे विकसित किन्व सन्कुचित होत जाणार. आपण नेहमी हीच चूक करतो. उगाच आत्ता माहित असलेले भौतिक नियम आपल्या पूर्वजांनी आधीच शोधून काढले होते हे दाखवण्याच्या अट्टाहासापायी उगाच दोन गोष्टींमध्ये बादरायण संबंध दाखवत राहतो. अनेक भौतिक गोष्टींबद्दलचे ज्ञान आपल्या पूर्वजांना होते यात दुमत नाही पण त्याहूनही कितीतरी उच्च सत्य जे आपल्या उपनिषदांमध्ये आहे जे कालातीत आहे आणि राहणार आहे हेच नेमके आपण विसरलो आहोत. हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींनी ज्या आध्यात्मिक सत्याचा अविष्कार केला नि जे काही वेदांतात लिहून ठेवले आहे त्याचा आत्ता कुठे पाश्चात्य लोक विचार करत आहेत. अभिमान बाळगायचा तर वेदातील ज्ञानकांडामध्ये जे आध्यात्मिक ज्ञान सांगून ठेवले आहे त्याचा बाळगा आणि त्याचा प्रचार करा कारण त्याच्या वर असे दुसरे ज्ञानचं नाहीं. आणि या या अर्थाने भारतीय संस्कृती खरोखर श्रेष्ठ ठरते. परंतु आपले दुर्दैव असे की आपण वेदांमधील कर्मकांड किंवा पुराणांमधील गोष्टीच उचलून धरतो आणि पुन्हा त्याकडे पाठ फिरवतो। केवळ काही उपनिषदे वाचून त्याचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न जरी केला तरी समजून जाईल किती श्रेष्ठ ज्ञान सांगून ठेवले आहे।
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 08/04/2021 - 05:37 नवीन
उत्तम प्रतिसाद ! आमच्या पुस्तकात हे अगोदरच लिहुन ठेवले आहे हे सांगण्यात सगळ्याच धर्माच्या अज्ञानी व्यक्ती पुढे असतात. आपल्या ऋषीमुनींनी जे काही शोधले ते भौतिक ज्ञानापेक्षा कितीतरी अधिक श्रेष्ठ होते हे कळेल तो सुदिन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोहंसोहं१०
ग
गॉडजिला Wed, 08/04/2021 - 12:08 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोहंसोहं१०
ग
गामा पैलवान Wed, 08/04/2021 - 16:24 नवीन
गॉडझिला,
भाकडकथा काय काय नाहीत ते सांगा बरे... ?
भाकडकथा हा शब्द माझा नाही. नीळा यांनी पौराणिक कथांना भाकड म्हंटलं. म्हणून त्या अनुषंगाने विचार करून मी विज्ञानातल्या काही विवादास्पद कथा शोधल्या. तुम्ही एखादी बिनभाकड कथा सांगितलीत तर त्या अनुषंगाने यथाशक्ती विचार करेन म्हणतो. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Wed, 08/04/2021 - 17:01 नवीन
तुम्हाला ज्याला भाकडकथा म्हणता येणार नाही असे अस्सल काहीतरी माहिती असेलच की. मला ते फक्त जाणुन घ्यायचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Wed, 08/04/2021 - 19:39 नवीन
गॉडझिला, तुमच्या चौकस वृत्तीचा आदर आहे. पण माझ्या मतांनी असा काय फरक पडणारे? असतील काही गोष्टी बिनभाकड. ही सृष्टी अनंतप्रसवा आहे. भाकडकथांसोबत रसाळकथाही असतील. माझ्या मतांनी कुणालाही कसलाही फरक पडणार नाहीये. माझं स्वत:चं असं फार कमी आहे या जगात. धन्यवाद! :-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
ग
गॉडजिला Wed, 08/04/2021 - 20:48 नवीन
फर्क पडणार आहे का नाही यासाठी वेगळा धागा काढु, त्यात नवीन विषय डोक्यात आला तर त्यासाठीही अजुन एक धागा काढु, इथे तो विषय नको, तुर्तास वर ज्याची विचारणा आपल्यास केली आहे त्याची पुर्ती करावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Wed, 08/04/2021 - 22:36 नवीन
गॉडझिला, पूर्ती अवश्य करेन. भाकडकथा या संकल्पनेचा मी उदाहरणाद्वारे विस्तार केला. तशीच एखादी बिनभाकड कथा कृपया सांगावी. मग तिचा मी यथाशक्ती विस्तार करेन. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
ग
गॉडजिला Wed, 08/04/2021 - 22:52 नवीन
तशीच एखादी बिनभाकड कथा कृपया सांगावी
ही मी तुम्हाला केलेली विनंती आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा