तरबत्तर, बारडी, बुकणा, दमगीर असले शब्द खूप दिवसांनी वाचायला मिळाले. आज्जीच्या पिढीतल्या सांगलीतल्या लोकांकडून ऐकले होते. अशा खास शब्दांमुळे खुमासदार झाली आहे कथा!
बाकी आपल्याकडे शंकर पाटील असोत की अगदी अलिकडचे आसाराम लोमटे असोत, ग्रामीण कथा म्हणजे वैफल्य (फ्रस्ट्रेशन) च्या कथा असेच समिकरण असते. नाहीतर मग बेरकी व्यक्तीमत्वांच्या, चावट किंवा फजितीच्या कथा. ही कथा अशीच पुढे जाईल असे वाटले होते पण तिचा शेवट अशा प्रकारे न होता एकदमच अनपेक्षित झाला. शेवट हा कथेचा आत्मा असतो तो एकदम सॉलीड जमलाय.
अधूनमधून लिहा, फक्त दिवाळी ते दिवाळी नको, ही प्रेमाची विनंती.
कथा आवडली. ग्रामीण भाषा, कथेचा ग्रामीण बाज, शब्द आणि चल चित्रपट पाहतोय अशी लेखन शैली. वाचकांनी वाचत जावं आणि शेवटाला काय वाढून ठेवलं असेल त्याची उत्कंठा लागून जाते. 'धुरपदाचं सौंदर्य, रामाची लगट आणि शरिराचं बोलणं' यावर लेखकाने जोर लावला नसता तर, कदाचित नवल वाटलं असतं. संजोपरावांच्या कथेतल्या ग्रामीण स्त्रिया कायमच आपलं सौंदर्याने भरभरुन आणि आखीव,रेखीव असतात या वर्णनात लेखक कमी पडत नाही. एकत्र कुटुंबातल्या गावगोष्टी अतिशय सुंदरपणे मांडल्या आहेत. विहिरीची गोष्ट जरा लांबत चालते पण कथेच्या शेवटासाठी धावपळ आवश्यक असावी, असे वाटले. आवडली कथा. नियमित लिहिते राहावे.
माझा जन्म आणि संपूर्ण आयुष्य शहरातच गेले त्यामुळे ह्या ग्रामीण शब्दांची ओळख कथा - कादंबऱ्यातुनच झाली. ह्या कथेतील अनेक शब्दांचे अचूक अर्थ कळले जरी नाहीत तरी संदर्भामुळे कोठेही समजायला अडचण आली नाही.
कथा इतकी सुंदर आणि ओघवत्या भाषेत लिहिली आहे की आपण सतत रामाबरोबर चालत आहोत व त्याचे जे काही कष्ट, चिंता, अस्वस्थता हे सर्व अगदी जवळून अनुभवल्यासारखे वाटले. गावातल्या लोकांचे स्वभाव, त्यांच्याकडे असलेला रिकामा वेळ, फुकाचे सल्ले हे अगदी ओळखीचे वाटले. बहुतेक लोकांकडे एव्हढा रिकामा वेळ असतो की गावात जेसीबी आला तर त्याला बघायला अर्धे गाव लोटते. भरपूर वेळ हाताशी असल्यामुळे घाई किंवा लगबग, कामाची निकड ही फक्त संबंधित व्यक्तीला असते बाकी सगळे त्याची मजाच बघत असतात.
साठीत पुन्हा मूल होणे ते देखील घरात नातवंडे खेळत असताना हे नाही म्हंटले तरी थोडेसे लाजिरवाणंच असतं, जे ह्या कथेत अतिशय समर्पकपणे मांडलंय. मात्र धुरपदी दोन मुलांची आई असताना तिला स्व:ताला, दिवस गेले हे कसे कळले नाही ? हे थोडेसे अकलनीय आहे. रामासाठी तो दिवस अतिशय त्रासात गेला हे मला स्वतालाही जाणवले.
प्रतिसाद देणार्या सर्वांचे आभार.
कथा कोल्हापुरी भाषेत लिहिलेली असल्याने काही शब्द अपरिचित असणे शक्य आहे. इथे मंचावर किंवा व्य नि मध्ये विचारल्यास मी अर्थ सांगू शकेन.
पुन्हा दिवस जाणे हे धुरपदालाही अपेक्षित नसल्याने ते तिच्या लक्षात आले नसावे असे मला वाटते. किरकोळ त्रास झाला असला तरी तिने तो अंगावर काढला असावा. आपल्या दुखण्याची फार वाच्यता करण्याचा तिचा स्वभाव नाही. साठीत (रामा साठीचा, म्हणजे धुरपदा पन्नास-पंचवन्न वर्षाची असावी) दिवस जाणे दुर्मिळ असले तरी अशक्य नाही. निरोगी प्रकृती आणि कष्टांची सवय असलेले शरीर असले की इतर संस्थांप्रमाणेच प्रजननसंस्थाही बराच काळ सक्षम राहाते.
तुमच्या कथेतील व्यक्तीरेखा उभी करताना त्याचे जे विस्तृत वर्णन करता ना , अगदी समोर उभा राहतो तो माणूस. तुमच्या लेखनाबाबत खूुप आदर आहे. ही कथाही आवडली.
तरबत्तर, बारडी, बुकणा, दमगीर असले शब्द खूप दिवसांनी वाचायला मिळाले. आज्जीच्या पिढीतल्या सांगलीतल्या लोकांकडून ऐकले होते. अशा खास शब्दांमुळे खुमासदार झाली आहे कथा!
बाकी आपल्याकडे शंकर पाटील असोत की अगदी अलिकडचे आसाराम लोमटे असोत, ग्रामीण कथा म्हणजे वैफल्य (फ्रस्ट्रेशन) च्या कथा असेच समिकरण असते. नाहीतर मग बेरकी व्यक्तीमत्वांच्या, चावट किंवा फजितीच्या कथा. ही कथा अशीच पुढे जाईल असे वाटले होते पण तिचा शेवट अशा प्रकारे न होता एकदमच अनपेक्षित झाला. शेवट हा कथेचा आत्मा असतो तो एकदम सॉलीड जमलाय.
अधूनमधून लिहा, फक्त दिवाळी ते दिवाळी नको, ही प्रेमाची विनंती.
उत्कृष्ट. समोर बसून कोणीतरी गोष्ट सांगतंय असा भास झाला. अगदी आवाज ऐकू यावा तसा. व्यंकटेश माडगूळकर आठवले. धन्यवाद. असेच आणखी पुष्कळ वाचायला मिळो.
कथा आवडली. ग्रामीण भाषा, कथेचा ग्रामीण बाज, शब्द आणि चल चित्रपट पाहतोय अशी लेखन शैली. वाचकांनी वाचत जावं आणि शेवटाला काय वाढून ठेवलं असेल त्याची उत्कंठा लागून जाते. 'धुरपदाचं सौंदर्य, रामाची लगट आणि शरिराचं बोलणं' यावर लेखकाने जोर लावला नसता तर, कदाचित नवल वाटलं असतं. संजोपरावांच्या कथेतल्या ग्रामीण स्त्रिया कायमच आपलं सौंदर्याने भरभरुन आणि आखीव,रेखीव असतात या वर्णनात लेखक कमी पडत नाही. एकत्र कुटुंबातल्या गावगोष्टी अतिशय सुंदरपणे मांडल्या आहेत. विहिरीची गोष्ट जरा लांबत चालते पण कथेच्या शेवटासाठी धावपळ आवश्यक असावी, असे वाटले. आवडली कथा. नियमित लिहिते राहावे.
-दिलीप बिरुटे
ग्रामीण बाजाची कथा छान..काही वेगळे शब्द वाचायला मिळाले.
संजोपराव, सिर्फ नाम ही काफी है! एकदम झक्कास!
- (संजोपरावांचा पंखा) सोकाजी
नेमके ग्रामीण शब्द, संवादांचा बाज,दैनंदिन जीवन व व्यक्तिचित्रण सगळेच 1 नंबर...
कथेचा शेवट वाचताना अगदी आशीच अवस्था झाली बघा.
आमचे आजोबा मोठे प्रस्थ,त्यांचे कुळवाडी सकाळी ओसरीवर पान जमवत अशीच भाषा बोलायचे. गुदस्ता हा तर आजोबांचा फेव्हरिट शब्द होता.
कथा आवडली हे वेगळे सांगावयास नको.
सन्जोप राव तुम्ही सगळे प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभे केले. ग्रामीण वातावरण निर्मिती अप्रतिम !!
निव्वळ झाक लिवलय बगा
माझा जन्म आणि संपूर्ण आयुष्य शहरातच गेले त्यामुळे ह्या ग्रामीण शब्दांची ओळख कथा - कादंबऱ्यातुनच झाली. ह्या कथेतील अनेक शब्दांचे अचूक अर्थ कळले जरी नाहीत तरी संदर्भामुळे कोठेही समजायला अडचण आली नाही.
कथा इतकी सुंदर आणि ओघवत्या भाषेत लिहिली आहे की आपण सतत रामाबरोबर चालत आहोत व त्याचे जे काही कष्ट, चिंता, अस्वस्थता हे सर्व अगदी जवळून अनुभवल्यासारखे वाटले. गावातल्या लोकांचे स्वभाव, त्यांच्याकडे असलेला रिकामा वेळ, फुकाचे सल्ले हे अगदी ओळखीचे वाटले. बहुतेक लोकांकडे एव्हढा रिकामा वेळ असतो की गावात जेसीबी आला तर त्याला बघायला अर्धे गाव लोटते. भरपूर वेळ हाताशी असल्यामुळे घाई किंवा लगबग, कामाची निकड ही फक्त संबंधित व्यक्तीला असते बाकी सगळे त्याची मजाच बघत असतात.
साठीत पुन्हा मूल होणे ते देखील घरात नातवंडे खेळत असताना हे नाही म्हंटले तरी थोडेसे लाजिरवाणंच असतं, जे ह्या कथेत अतिशय समर्पकपणे मांडलंय. मात्र धुरपदी दोन मुलांची आई असताना तिला स्व:ताला, दिवस गेले हे कसे कळले नाही ? हे थोडेसे अकलनीय आहे. रामासाठी तो दिवस अतिशय त्रासात गेला हे मला स्वतालाही जाणवले.
कथा अतिशय सुंदर व मनापासून आवडली.
हे थोडेसे अनाकलनीय (अकलनीय) आहे. रामासाठी तो दिवस अतिशय त्रासात गेला हे मला स्वतालाही जाणवले.
प्रतिसाद देणार्या सर्वांचे आभार.
कथा कोल्हापुरी भाषेत लिहिलेली असल्याने काही शब्द अपरिचित असणे शक्य आहे. इथे मंचावर किंवा व्य नि मध्ये विचारल्यास मी अर्थ सांगू शकेन.
पुन्हा दिवस जाणे हे धुरपदालाही अपेक्षित नसल्याने ते तिच्या लक्षात आले नसावे असे मला वाटते. किरकोळ त्रास झाला असला तरी तिने तो अंगावर काढला असावा. आपल्या दुखण्याची फार वाच्यता करण्याचा तिचा स्वभाव नाही. साठीत (रामा साठीचा, म्हणजे धुरपदा पन्नास-पंचवन्न वर्षाची असावी) दिवस जाणे दुर्मिळ असले तरी अशक्य नाही. निरोगी प्रकृती आणि कष्टांची सवय असलेले शरीर असले की इतर संस्थांप्रमाणेच प्रजननसंस्थाही बराच काळ सक्षम राहाते.
कथा आवडली