विकलांची गोळाबेरीज: हे n व त्यांची पिल्लावळ कुठून पैदा झाली? (Importance of ‘n’ in integration)
विक्रम राजा नेहमी प्रमाणेच एकांतात तजविजा करीत वेताळाच्या स्थानाकडे निघाला होता. दर अमावास्येच्या रात्रीचा प्रहर आता महालात बसून सारीपाट खेळण्या ऐवजी काही मननात, विचारात जात होता. त्यातही पदार्थविज्ञानाविषयीच्या विचारांमध्ये व त्याचे दैनंदिन जीवनातील उपयोगांविषयीच्या चर्चेत तर वेताळ फारच रस दाखवत होता. पण विक्रमाचे दीर्घविचारी मन प्रजाजनांना केवळ एक संख्या म्हणून मानत नव्हते. उलटपक्षी प्रत्येक प्रजाजनाच्या मनात आनंद असला तर राज्य ही आनंदी होईल या विचाराने तो सतत कार्यमग्न होता.
मिसळपाव