पावसाळी भटकंती: तुंग, कठीणगड( Tung, Kathingad)
लोणावळ्याच्या दक्षिणेला पवना नदीच्या काठी दुतर्फा उंच उंच डोंगररागा पसरलेल्या आहेत. त्यात प्राचीन काळापासून मानवाच्या वावराची खूण सांगणारी बेडसे, भाजे लेणी आहेतच शिवाय लोहगड विसापुरसारखे बलदंड किल्लेही आहेत. या शिवाय तुलनेने दुय्यम असलेले तिकोना, मोरगिरी असेही काही किल्ले आहेत. असाच एक सुळका आकाशात झेपावलाय. त्यावर तटबंदीचे पागोटे चढवलय आणि नाव दिलय "तुंग".तुंग म्हणजे उत्तुंग किंवा उंच. शिवाजी महाराजांनी त्याचे चढण्याचे कठीणपण ध्यानात घेउन नाव दिले "कठीणगड".पवन मावळाचा आणखी एक रक्षक.
मला भेटलेले रुग्ण - ४
http://www.misalpav.com/node/40426
सीन न. १
तुमच्या मुलाला दमा आहे , असं म्हणायचा अवकाश आईच्या डोळ्यात पाणी आणि काळजीत पडलेला बाप विचारतो " कोणत्या टेस्टस् लागतील अजून ?"
"कितीही खर्च आला तरी सांगा आम्ही करायला तयार आहोत !!"
"कोणतीही टेस्ट सांगा आम्ही तयार आहोत , काही बाकी ठेवू नका ...."
मी म्हणतो "अहो गरज होती तेवढ्या झाल्यासगळ्या आता काही करायची गरज नाही , तुम्ही काळजी करू नका ; १००% फरक पडेल ... तेवढे inhalers चालू ठेवा नियमीत "
सीन नं.
ती सध्या काय करते
संद्याकाळी मनाला अनामिक हुरहूर लागून राहिली होती आणि मन भूतकाळाच्या रेशमी पडद्यामागं पोहोचल होत. का कुणास ठाऊक पण कधी नाही ती तिची आठवण येत होती . म्हणजे अगदी प्रेमबिम नव्हतं..... का होत ? माहित नाही पण एक हुरहूर होती तिच्या बद्दल . आज राहून राहून तिची आठवण येत होती, खरंच कशी असेल ती ? आणि काय करत असेल.. कुठे असेल .. ती सध्या काय करते ?
*********************************************************************************
आज तिला पाहिलं कशी दिसतेय हि चेह-यावर सूज आहे कि काय , किती बेढब झालीय हि आता . ती तेव्हा कशी दिसत होती आणि आता कशी दिसतेय .
जेथे जातो तेथे....
जेथे जातो तेथे तो माझा सांगाती
चालतो तयाला हाती धरुनिया
गेलो कोठेही तरी देतो आधार
दाखवितो मार्ग सदैव मजला
सगळे ते नम्बरं ठेवी ध्यानी नीट
कनेक्टेड रात्रंदिन केलो देवा
तयासी मी सदा खेळतो कौतूके
नेट वरी सुखे संचार अंतर्बाही
बॅटरी होता डाऊन जीव कासावीस
धाव घेतो सत्वर चार्जर कडे
इंग्रजी, मराठी टाईपतो वेगे
त्यानेची अंगठे बहाद्दर केलो देवा
जगात नेटवर्क्स विविध अनेक
ड्युएल सिमकार्ड वापरी प्रसंगी
बॅलन्स तो संपतो असा भरभर
रि-फिलचे बळ अंगी देई देवा
रात्री साथ देई माझिया उशाशी
प्रभाते आन्हिकाआधी दर्शन तयाचे
फोन अलार्म संगीत प्रसंगी वाटाड्या
नानाविध रिंग-टोन भुलवी मजला
फोटो, चलतचित्रे ठेवीतो
काव्यरस
हॅना आरेण्ट आणि हुकुमाची ताबेदारी (Obedience To Authority)
एखाद्या चित्रपटाचे परीक्षण लिहिताना आपण दोन प्रकारे ते काम करू शकतो
१. त्या चित्रपटाची कथा, त्यातली कला, दिग्दर्शन, त्यातल्या नटांचे अभिनय इ. ह्यांचे विश्लेषण, रसग्रहण किंवा अगदी चिरफाडही आणि
२. त्या चित्रपटात आलेल्या विषय वस्तूचे, मांडलेल्या विचार, तत्वज्ञानाचे - ऐतिहासिक, सामाजिक. धार्मिक किंवा तदनुषंगिक इतर प्रकारे विश्लेषण... .अक्षय अविरत निर्मळ
या भल्या पहाटे थोडे
मी तुझेच गाणे गावे
अन गात्रा मधले कोडे
अलगद सुटून जावे
ती वीण मखमली मनाची
अन श्वास समर्पित व्हावा
त्या जगनियंत्यासाठी
हा देहच निमित्त व्हावा
विरघळून जावे अलगद
मी पण माझे नुरावे
त्या अक्षय सुखामध्ये मी
अवचित भान हरावे
ते नकोच लौकिक जगणे
अन श्वासही संकोचावा
तू माझा अन मी तुझाच
हा भोगच अक्षय व्हावा
मी भरून पावलो अवघा
ही तुझीच मिठी अवखळ
मी विरून हलका होतो
अक्षय अविरत निर्मळ
- बंगलोर , १ ऑगस्ट २०१७, ०६.३६ वाजता
पैठणी दिवस भाग-१
झाली! सगळी तयारी झाली. दंतमंजन, पांघरूण, कपडे, साबण, इ. बारीकसारीक सामान भरून झाले. " प्रवासाला जाताना जितके कमी सामान न्याल तेवढे हाल कमी होतात." या जगमान्य सल्ल्याला अनुसरूनच बॅग भरणे सुरू होते. पण एक महिन्याच्या थांबा असल्यामुळे नाही म्हणता म्हणता 2 बॅग्स गच्च भरल्या होत्या. अरे हो! पण तुम्हाला सांगायचेच राहिले आम्ही कुठे निघालो ते. त्याच अस आहे की , माझे शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद येथे सुरू होते. त्या वेळी मी आंतरवासिता (इंटर्नशिप) करत होतो. एका वर्षांच्या प्रशिक्षणात एका महिन्यासाठी ग्रामीण रुग्णालयात सेवा देणे अनिवार्य असते.
अनोळखी
अनोळखी
पलटून तुला पाहताना
मज अनोळखी तू वाटे,
ती नजर तुझ्या डोळ्यातील
का आपली ना भासे
क्षितिजातल्या धुक्यात
हरवून गेली वाट,
वाटे रिक्त जग सारे
सुनसान ही पायवाट
ते स्वप्न आपले
विरले कसे नि कुठे,
का वाढला हा अबोला
विश्वास का न उरला
चुकलो कुठे ग आपण
राहिली प्रीत का अधुरी,
स्वप्नातले ते सारे
भंगले कसे मनोरे
वळणावर मी तु़झ्या त्या
पाहे वाट अजूनी तुझी,
नि तू सोडुनी गेली अशी
जशी नव्हतीच कधी माझी
- रवि बदलापुरेकर
काव्यरस
'उषःकाल होता होता' : एक शंका
'उषःकाल होता होता' हे सुरेश भटांचे गीत मी 'आठवणीतली गाणी' या संस्थळावर वाचले व ऐकले.
मूळ गाण्यात ६ कडवी आहेत पण, त्याच्यारेडिओवरील ध्वनीमुद्रिकेत मात्र ४ च कडवी आहेत. गाळलेली २ कडवीही सुंदर आहेत हे लक्षात आले.
तसेच हे गाणे 'सिंहासन' चित्रपटात असल्याचे तेथे लिहीले आहे. माझी शंका अशी आहे की हे गीत या चित्रपटाच्या खूप पूर्वीच लिहीले होते का व नंतर या चित्रपटासाठी घेण्यात आले? म्हणून ती २ कडवी वगळली आहेत का ?
मिसळपाव