Skip to main content

रन फॉरेस्ट रन

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 24/11/2015 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर मध्यंतरी 'काही वेगळे चित्रपट' या धाग्यावर हॉलीवुडचे बरायचश्या सुंदर चित्रपटांचे उल्लेख मिळाले, त्यापैकी 'टॉम हँक्स' अभिनीत 'फॉरेस्ट गम्प' पासून सुरवात केली. निसर्गाने मानवाला बनवताना कोणते रसायन वापरले याचा उलगाड़ा अजूनही आपल्याला झालेला नाही, फॉरेस्ट गम्प मधून पुन्हा एकदा हे रसायन समजुन घेण्याचा प्रयत्न केला आहे. विन्स्टन ग्रूम या लेखकाने लिहिलेल्या "फॉरेस्ट गम्प' याच शीर्षकाच्या कादंबरीवर हा चित्रपटला ऑस्करचे उत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शन, अभिनेता, संपादन इत्यादी एकूण सहा पुरस्कार मिळाले.

डोम्या म्हणे...

लेखक कौतुक शिरोडकर यांनी मंगळवार, 24/11/2015 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
माननीय लीलासूत श्री. भंसाली यांच्या ऐतिहासिक असहिष्णूतेचा वाढता गदारोळ पहाता, सिनेसृष्टीतील काही नामवंत कलाकार, त्यांनी महत्प्रयासाने कमवलेले पुरस्कार परत करण्याच्या तयारीत आहेत याची उडती बातमी कळताच डोम्याने चोच टवकारली. येणार्‍या जाणार्‍या कोळीणीच्या पाट्या न्याहाळत बसलेल्या कावळ्याकडे एक तुच्छ कटाक्ष टाकून त्याने ताबडतोब उडत उडत अभिनयाचे बादशाहा श्री. शाहरुख खान यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळेस किंगखान जवळ-जवळ शेजारी बसलेल्या त्यांच्या फार जवळच्या मित्राशी चर्चा करत होते. डोम्याला ते दर्शनी भांडणं वाटलं. पण ती चर्चाच होती असं दोघांनी छातीठोकपणे (एकमेकांची छाती ठोकून) सांगितलं.

प्राचीन भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती - भाग २

लेखक भानिम यांनी मंगळवार, 24/11/2015 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या भागात आपण भारतीय संस्कृतीच्या प्रसाराला कशी सुरवात झाली आणि भारतीय शास्त्राध्यापक तिबेटपर्यंत कसे पोहोचले ते पाहिले. या भागात आपण चीन आणि इतर आशियाई देशांत भारतीय संस्कृतीचा प्रसार कसा झाला ते पाहुया. हान राजघराण्यातील 'मिंग ती' या सम्राटाच्या आमंत्रणानुसार इ. स. ६७ मध्ये 'कश्यप मार्तंग' आणि 'धर्मरक्षित' हे दोन भारतीय विद्वान चीनमध्ये गेले आणि त्यानंतर नालंदा, तक्षशीला, विक्रमशीला आणि ओदान्तपुरी येथील अनेक विद्वान तेथे पोहोचले. ख्रिस्त पश्चात चौथ्या शतकात 'वी' राजघराण्यातील सम्राटाने बौद्ध धर्म हा राजधर्म म्हणून घोषित केला.

गोष्टः अकबर बिरबलाची!

लेखक पिवळा डांबिस यांनी मंगळवार, 24/11/2015 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा अकबर बादशहाच्या दरबारात 'सगळ्यात चांगले हत्यार कोणते?' याविषयी चर्चा चालू होती.... कुणी म्हणालं की, "तरवार वा पट्टा. जोवर हातात दम आहे तोवर चिंता नाही." कुणी म्हणालं की, "धनुष्य-बाण. दूरवरूनच गनीम गारद करता येतो." अजून कुणी म्हणालं की, "तोफ. एका गोळ्यात अनेक गनीम मारता येतात." वगैरे, वगैरे... बिरबल काहीच बोलत नाहिये हे पाहून बादशहाने त्याला मुद्दाम विचारलं, "क्यों बिरबल, तुम्हारा क्या खयाल है?" बिरबलाने दोन क्षण विचार केला आणि उत्तर दिलं, "जी हुजुर, ये सब लोक सही फर्मा रहे है.

बेसन पोळा / पिझ्झा काहीही ......

लेखक पियुशा यांनी मंगळवार, 24/11/2015 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
राम्राम मिपाकर्स , सध्या पावसाळा परत सुरु झालाय ;) आमच्याकडे शिळ्या पोळ्या उरल्या की नेहमीच त्याचा तिखट चुरा नाही तर तुप गुळ घालुन गोड मलिदा बनवतात. पण काल धो - धो पाउस कैतरी चमचमीत करावे असे राहुन राहुन वाटत होते पण भजी / वडे तेलकट पदार्थ नकोसे वाट्त होते. काय क्रावे बरे ? असा विचार करता करता आहे त्या साहित्यात ही रेसेपी सुचली न प्रयत्न सगळ्याना आवडला देखील म्हणुन इथे हा रेसेपी प्रपंच :) पदार्थ झालाय पण बारस कै जमल नै आपल्याला :) साहित्य : १ )शिळ्या पोळ्यांचे तुकडे.

इशकजादे – ३

लेखक मांत्रिक यांनी मंगळवार, 24/11/2015 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येकजण भराभर सॅक्स उचलून बाहेर पडायची घाई करीत होता. तो थोडासा थांबला. नकळत रितूदेखील थोडी थांबलेली आहे हे त्याच्या लक्षात आलं. आता मुद्दाम काहीतरी कारण काढून मागे थांबणं आलं. पण नाही, रितू तिच्या मैत्रिणींसोबत बाहेर पडली. ती त्याच्यासाठी थांबलेली नव्हती. विवेक ती बाहेर पडेपर्यंत तिच्याकडे पहात होता. तिच्यामागे अजून दोन तीन मुली होत्या. एकसलग बडबड चाललेली त्यांची. काहीतरी चुकीचं घडलं आहे हे त्यांच्या कुणाच्याच लक्षात आलं नाही. पण विवेकने ते पाहिलं. त्याला ही संधी पाहिजेच होती. तो लगेच खुशीत धावला. एव्हांना त्या सर्वजणी ग्रंथालयापर्यंत पोहोचलेल्या सुद्धा होत्या.

सुधांशु नूलकर काकांसोबत ओरिगामी कट्टा- २२ नोव्हेंबर २०१५

लेखक प्रसाद गोडबोले यांनी मंगळवार, 24/11/2015 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
सुधांशु नूलकर काकांसोबत ओरिगामी कट्टा- २२ नोव्हेंबर २०१५ नुकताच सुधांशु नूलकर काकांसोबत ओरीगामी कट्टा पार पडला. तेव्हा काढलेली काही प्रकाशचित्रे येथे मिपाकरांसोबत शेयर करीत आहे. तशी कट्ट्याला चर्चा बरीच झाली पण सध्या कसें आहें कीं संपादक विश्रांती घेत असल्याने , उगाच काही वाद उद्भवु नये अन आमचा आयडी ( ह्या कारणाने ) संपादित होवु नये म्हणुन कट्ट्याचा वृत्तांत लिहिण्याचा मोह आवरत आहे. मिपा धोरणानुसार चारोळी धागे उडवले जातात तसे होवु नये म्हणुन उगाचच वरील ३ आणि हे वाक्य खरडले आहे , एरव्ही हा धागा ह्त्म्ल वापरुन अन एक्सेलमधे प्रोग्राम लिहुन लिहिण्यात आलेला आहे. प्रचि क्

कॅलरी

लेखक दमामि यांनी मंगळवार, 24/11/2015 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्ना गॅलरी एक हात ढेरीवर ठेऊन, अन दुसरा उगाच पाठीमागे घेऊन, मी उभा आहे, गॅलरीत! तुझ्या झुलत्या एअरवॅाकर बरोबर पाय दमून गेले फार! इथेच बसून नाही का लावत तुझ्या ट्रेडमिलचा पट्टा पायाला! नाही.....बारीक नव्हतोच कधी गुटगुटीत होतो खूप म्हणून कॅलरीज नाही उतरत आजही! मला नाही जमत पळायला, त्या कॅलरीज जाळायला! इतकं सारं पोहूनही स्लिमबिम होणं नाही जमत मला ! पण....तू तिथे भजी बनवलीस कि इथे माझा डाएटमोड होतो एवढेच बारीक जाणवते! अन, अवेळी उठून मी एक हात ढेरीवर ठेऊन उभा राहतो गॅलरीत तू हाक मारेपर्यंत.....!
काव्यरस

बिहारचा प्रवास उलट ?

लेखक shawshanky यांनी मंगळवार, 24/11/2015 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
बिहार विधानसभा निवडणुकीचे कवित्व अद्याप संपलेले नाही. नीतिशकुमार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव आणखी काही काळ सुरू राहणार आहे. त्यास कोणाची हरकत नसावी कारण नीतिश हे अत्यंत मवाळ आणि नेमस्त नेते आहेत.बिहारचा विकासदर देशाच्या विकासदरापेक्षा जास्त करून दाखविण्याची किमया त्यांनी साधली होती. मात्र चेहऱ्यासाठी बिहारी जनतेने मतांचे भरघोस दान केले त्या नीतिश यांचा चेहरा गेल्या काही दिवसांत भाजपच्या कमळापेक्षाही जास्त कोमेजलेला दिसतोय.

महापौर बंगल्याचे सेनेला चॉकलेट !!

लेखक अनिकेत एस जोशी यांनी मंगळवार, 24/11/2015 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
सरता सप्ताह दीपोत्सवाचा होता. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. जरी बिहारमध्ये भाजपाचा सपशेल पराभव झालेला असला तरी कल्याण डोबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकीत त्यांनी चांगल्या जागा मिळवल्या असल्यामुळे ‘वर्षा’वरचे वातावरण बरे होते. शिवाय तिकडे कोल्हापुरातही ताराराणी आघाडी समवेत भाजपाचा महापौर बसू शकतो अशी एक शक्यता सुरुवातीला वाटू लागली होती. त्यामुळे त्याही आघाडीवर भाजपात वातावरण आनंदाचे होते. असा या साऱ्या आनंदमयी वातावरणात त्या आधीच्या पंधरा वीस दिवसांचे सारे राजकीय कवित्व विसरून जाण्याचेचे संकेत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीसांनी दिलेच होते.