महाभारत... (शतशब्दकथा)
"बरेच दिवस ते युध्द सुरूच होत. न भूतो न भविष्यति असा तो संग्राम होता. एकाहून एक भयानक आणि संहारक अस्त्र शस्त्र वापरली गेली. लाखो लोक मारले गेले, जे युद्धातून वाचले ते उपासमारी आणि रोगराईने मृत्युमुखी पडले. जेव्हा युद्ध संपले तेव्हा जमीन रक्ताने लाल झाली होती, ब्रम्हास्त्राच्या अति वापराने निर्माण झालेल्या काळ्यामिट्ट ढगांनी सुर्य देखील झाकोळला गेला होता, सगळीकडे अंधःकार पसरला होता. निसर्गाची अपरिमित हानी झाली होती. समस्त मानवजातीला याची किंमत मोजावी लागणार होती"
हे सगळे ऐकून चिंतातूर होत त्याने प्रश्न केला,"मला हे जमेल?"
"मला पूर्ण विश्वास आहे.
मिसळपाव