मला पडलेले काही अत्यंत गंभीर प्रश्न - भाग १
मला पडलेले काही अत्यंत गंभीर प्रश्न खालीलप्रमाणे (कृपया प्रामाणिक व खरीखुरी उत्तरे द्यावीत. कृपया प्रतिसाद गोडसे/गांधी/मोदी/सावरकर, धर्मनिरपेक्षता, काँग्रेस/भाजप, ब्राह्मण/अब्राह्मण इ. जहाल विषयांच्या वळचणीला नेऊ नये ही नम्र विनंती).
(१) घोडा व बैलाच्या तळपायांना खिळे मारून नाल ठोकले जातात. चालताना ते खिळे त्यांना बोचतात का? चालताना खिळ्यांमुळे त्यांच्या तळपायांना जखमा होतात का?
(२) संसदेच्या किंवा विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मंत्रीमंडळाने तयार केलेले भाषण राष्ट्रपती किंवा राज्यपाल वाचून दाखवितात.
मुद्देवंचितांसाठी खुषखबर! काही हुकमी उपाय
खुषखबर! सध्या सोशल नेटवर्क्स मधे अनेक लोकांना भेडसावणार्या एका समस्येवर हा दिलासा आहे. केवळ मुद्दे शिल्लक नाहीत म्हणून अशा नेटवर्क्स वर होणार्या वादांमधे अनेकांचे डिस्क्रिमिनेशन होते. त्यांना मग एकतर वैयक्तिक पातळीवर तरी यावे लागते किंवा वाद सोडून जावे लागते, व पुन्हा "पळून गेले" वगैरे ऐकावे लागते.
पूर्वी हे नव्हते. एखाद्याने प्राचीन काळी एखाद्या विषयावर जे लिहीले होते तेच त्याचे/तिचे सार्वकालिक मत आहे असे गृहीत धरून चालत असे. त्यामुळे त्याच्या/तिच्या इतर विषयांवरच्या इतर मुद्द्यांना प्रतिक्रिया म्हणून ते पूर्वग्रह पुढे आणता येत असत. पण आता असे करणे अवघड होऊ लागले आहे.
थोडे अद्भुत थोडे गूढ - १
प्राचीन काळी उत्तर अमेरीकेतील कॅनडाच्या प्रदेशात ऑन्गीएर्स नावाची एक जमात राहत होती. या जमातीत एक सुंदर तरुणी होती. त्या तरूणीच्या वडिलांनी तिचा विवाह तिच्या मनाविरुद्ध आपल्या जमातीच्या वयोवृद्ध राज्याशी लावून देण्याचा निर्णय घेतला. परंतु तिला हा निर्णय मान्य नव्हता! तिचं एका दुसर्या तरुणावर प्रेम होतं. हा तरुण एका प्रचंड मोठ्या धबधब्याजवळ असलेल्या गुहेत राहत असे. तो गर्जणार्या वार्याचा देव म्हणून ओळखला जात होता!
आपल्या मनातील राजाविषयीचा तिटकारा तिने व्यक्त करताच मोठा गहजब झाला. जमातीतल्या लोकांनी तिला वाळीत टाकण्याची शिक्षा फर्मावली.
क्रिम पफ Swans
कष्ट होताती जीवासी (ज्ञानेश्वर)
कष्ट होताती जीवासी (ज्ञानेश्वर)
संत साहित्याशी आवड तशी जरा लवकरच लागली म्हणावयास हरकत नाही. कॉलेजात असतांना एक मित्र गुणगुणत होता "उड उड रे काऊ. तुझे सोन्याने मढवीन पाऊ " मी खुश होऊन विचारले ’कोण कवी रे ?" तो म्हणाला "ज्ञानेश्वर" मी म्ह्टले " काय थापा मारतोस ! संत असे कधी लिहितील काय ?" तो म्हणाला, "खरेच ". मी लायब्ररीत जाऊन कविता (हो, कविताच, अभंग नाही ) शोधून काढली व असा प्रथम वाचनातच प्रेमात पडलो. तो पर्यंत वसंत बापट. मंगेश व विंदा, बोरकर यांच्याबरोबर म.वा. धोंड (मराथी लावंणी) हेच आमच्या वाचनात व पाठांतरात होते.
माझ्या मुलाला आकुर्डी, पुणे, इथे पेइंग गेस्ट किंवा भाड्याने घर हवे आहे...
प्रिय मिपाकरांनो,
मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की, माझ्या मुलाला इंजिनियरिंग साठी आकुर्डी इथल्या इंजिनियरिंग कॉलेजला प्रवेश मिळाला.
सध्या तो जागेच्या शोधात आहे.
आपल्या मिपाकरांपैकी कुणाकडे आकुर्डीला भाड्याने जागा उपलब्ध असेल तर फार उत्तम.
बादवे,
जमल्यास आकुर्डीतल्या घरगूती खानावळीची माहिती दिलीत तर फार उत्तम.
आणि
इंजिनीरिंगच्या क्लासेसची माहिती मिळाली तर फार उत्तम.
कळावे लोभ आहेच, तो वाढावा...
मुवि (सध्या मुक्काम पोस्ट यानबू उर्फ यानबिवली.)
भीमाशंकर - दुर्गाडूंचा स्वर्ग - शिडी घाट मार्गे - एक दिवसीय ट्रेक
भीमाशंकर - दुर्गाडूंचा स्वर्ग - शिडी घाट
भीमाशंकर हा असा ट्रेक आहे कि यात दुर्गा डूंच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. धबधबा,चढाई , Rock patch,ladder, देवदर्शन, निसर्ग सौंदर्य,धुके काय लिहू नि काय नको इतक्या गोष्टी आहेत. पावसाळ्यात नि श्रावण मास सुरु होण्याअगोदर भीमाशंकर ट्रेक तो बनता है boss !!!!!!!!!!
भीमाशंकर हे १२ ज्योतीर्लिंगांपैकी एक ! तसेच भीमाशंकर हे सर्वात लहान अभयारण्य आहे जेमतेम १०० वर्ग किमी. येथे राज्य प्राणी शेकरू हा आढळतो, परंतु ज्याचे दर्शन फार दुर्लभ आहे. आता पर्यंतच्या दोन वारीत शेवटच्या वारीत mala केवळ शेपूट पाहून समाधान मानावे लागले.
दहीहंडी
दरवर्षीप्रमाणेच कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह जोर धरत होता. दहीहंडीसाठी शहराशहरात, गावागावात गोविंदापथकं तयारी करत होती. पण जेमतेम दोन हजार लोकवस्तीच्या सुजाणपूर मधलं चित्रं काही वेगळंच होतं. सरपंचांच्या आदेशानंतर दहीहंडीला एक आठवडा उरलेला असल्यापासूनच गावात हंड्या उभारल्या गेल्या होत्या. गावाच्या प्रत्येक पाड्याची एक हंडी अशा प्रकारे एकूण दहा दहीहंड्या गावात उभारल्या गेल्या. या हंड्या गोपाळकाल्याच्या पाच दिवस आधीपासूनच उभारल्या गेल्या. या हंड्यांची उंची इतकी होती की जिथे लहानात लहान मुलाचाही हात सहज पोचेल. म्हणजे जेमतेम दोन फूट.
मिसळपाव