खोटे बालंट टाळण्यासाठी काय करावं?
सल्ला हवा आहे.(मिपाकर आनंदाने फुकटात देउ शकतील अशी ही एक महत्वाची गोष्ट.)
बालंट आल्यावर काय करावं?
आम्ही तीन जण कथेतील पात्रे आहोत.मी, माझा मित्र महेंद्र आणि महेंद्रचा मित्र जग्या.
समजा महेंद्र ह्या माझ्या मित्राचे बायकोशी पटत नाही.
एक दिवस त्याने येउन मला सांगितलं की "जग्या काल बायकोशी का पटत नाही असे मला विचारत होता. तु जग्याला माझं बायकोशी पटत नाही असं का सांगितलस?"
.
वस्तुस्थिती:- जग्याशी माझी काहीही ओळखपाळख नाही. महेंद्रचा मित्र म्हणून फार तर "परिचित" इतकच म्हणू शकतो.
मागील कित्येक वर्षात माझा जग्याशी धड संपर्कही नाही.
मगः-
जग्यानं असं खरच सांगितलं असावं का?
मिसळपाव
