Skip to main content

स्वरभास्कराची महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाने घेतलेली मुलाखत.

लेखक गणपा यांनी सोमवार, 24/01/2011 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
आज मटामध्ये, तीस-एक वर्षांपुर्वी आकाषवाणीवर पुलंनी अण्णांच्या घेतलेल्या मुलाखतीचे काही अंश छापुन आलेत. त्याच मुलाखतीची ही ध्वनीफीत.

देव नाही देवालयी

लेखक रमताराम यांनी सोमवार, 24/01/2011 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्याच्या दक्षिणेकडे असलेल्या सिंहगडाकडून एकच रस्ता शहराकडे येतो. शहरात येताना आम्हाला हाच रस्ता घ्यावा लागतो. पण शहरात येताना दत्तवाडीपासून सरळ दांडेकर पुलाकडे न जाता आम्ही नेहमी आत वळतो, नि तेथील कॉलनी नर्सिंग होम जवळच्या लहान रस्त्याने पुढे जातो. हा जो थोडा दूरचा रस्ता आम्ही घेतो त्याला एक कारण आहे. या आतल्या रस्त्याला एक देवालय आहे. जाताजाता त्या देवालयातील देवाचे - ओझरते का होईना - दर्शन घडावे म्हणून. गेले चार वर्ष मात्र या देवाचे दर्शन दुर्मिळच झाले होते. असे म्हणतात की तुमच्या आमच्या पापांचे हलाहल पचवणार्‍या देवालाही कधी कधी ते भोवतेच नि त्यालाही काही त्रास सहन करावाच लागतो.

भाजप आणि आर एस एस

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 24/01/2011 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
साधन शुचितेची सतत चर्चा करणारा पक्ष म्हनून भाजपचे नाव घेतले जाते. भाजप हा एक स्वतन्त्र पक्ष असून संघाशी त्याचा संबन्ध नाही असे वारंवार सांगितले जाते. संघ भाजपची धोरणे ठरवीत नाही असेदेखील सांगितले जाते. एखादी गोष्ट भाजप ने केली की ती गोष्ट संघाने केली की भाजप म्हणजे संघ नव्हे असे देखील सांगितले जाते. भ्रष्टाचारी लोकाना संरक्षण देवू नये हे खरे पण त्यांची पाठराखण देखील करू नये. आदर्श घोटाळ्यावरून महाराष्ट्राचे मुख्यमन्त्री खुर्चीवरून पायउतार झाले . पण भाजपला कर्नाटकातील त्यांच्या मुख्यमन्त्र्यांबद्दल हे मान्य नसावे.

[नेहमीप्रमाणे ;-)] सोप्पी [पा.क्रु.] टोमॅटोची भाजी

लेखक Pearl यांनी सोमवार, 24/01/2011 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
काल रात्री उशीरा घरी आल्यावर, घरी फक्त पोळ्या शिल्लक असल्याने पटकन होणारी कोणती भाजी करावी असा विचार मनात आला. मग टोमॅटोची भाजी केली. तिची पा.क्रु. देत आहे. साहित्यः बारीक चिरलेला लाल टोमॅटो, बा. चि. कांदा, तिखट, मीठ, साखर, फोडणीचे साहित्य क्रुती: कढईमध्ये थोडे तेल घेउन ते चांगले तापल्यावर त्यात थोडे मोहरी-जिरे टाकले. तडतडल्यावर त्यात हिंग, हळद, घालून त्यावर कांदा चांगला परतला. मग त्यात बा. चि. टोमॅटो घातला. चांगला परतला. मग चवीपुरते तिखट, मीठ आणि थोडी साखर घातली. भाजी चांगली परतली :-) अशी सोप्पी भाजी तयार. [या भाजीत साखर नेहमीपेक्षा थोडी जास्त घालावी. म्हणजे ती अधिक रुचकर होते.]

हरे कबाब

लेखक शुभांगी कुलकर्णी यांनी सोमवार, 24/01/2011 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारा वेळ: २० मिनिटे लागणारे जिन्नस: १) पालक धुवुन बारीक चिरुन १ वाटी २) मेथी असेल तर धुवुन, बारीक चिरुन १ मोठा चमचा ३) मटार १ वाटी ४) हिरवी मिरची (४-५)+लसुन (५-६ पाकळ्या) + आलं १ छोटा तुकडा एकत्र वाटुन ५) मक्याचे दाणे १/२ वाटी ६) कोथिंबीर १/२ वाटी धुवुन, बारीक चिरुन ७) हरभरा डाळ १ चमचा मोठा भिजलेली ८) कॉर्नफ्लोअर २ चमचे मोठे ९) मीठ चवीनुसार १०) धणे जीरे पुड १ चमचा छोटा ११) एक उकडलेला बटाटा १२) तीळ अथवा काजू सजावटीसाठी १३) तेल क्रमवार पाककृती: प्रथम मक्याचे दाणे व मटार उकळत्या पाण्यातुन काढुन घ्यावेत. मटार थोडे जाडसर ठेचुन घ्यावेत. हरबरा डाळ व मक्याचे दाणे मिक्सीमधुन बारीक वाटुन घ्यावेत

हिरा हरपला - भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे देहावसान!

लेखक अनिता यांनी सोमवार, 24/01/2011 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
निशब्द ..... ** आपल्या सर्वांचे लाडके मा. पं. भीमसेन जोशी यांचे निधन झाल्याची बातमी आताच याहु वर वाचली. त्यांना दिलेल्या "भारतरत्न" ह्यापुरस्काराने त्या पुरस्काराचीच शोभा वाढली. त्यांच्या बहुढंगी गायनामुळे आणि भारदस्त आवाजामुळे ते चिरकाल आपल्या स्मरणात राहतील. अशा ज्येष्ट आणि श्रेष्ठ प्रभूतीला माझी मिसळपाव परिवारातर्फे श्रद्धांजली. - हंस http://www.misalpav.com/node/16435 ** आवाहन! मित्रहो, इथे संगिताचे शौकिन आणि जाणकार खूपच आहे.

थिअरी

लेखक नितिन थत्ते यांनी सोमवार, 24/01/2011 08:36 या दिवशी प्रकाशित केले.
काल २३ जानेवारी. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. काल मिसळपाववर त्यासंबंधी अनेक लेख येतील अशी अपेक्षा ठेवून होतो. परंतु कोणालाही, विशेषत: सशस्त्र लढे हेच स्वातंत्र्य मिळण्याचे कारण आहे असे मत असलेल्यांना, त्यांची आठवण झाली नाही.

[कोडे] स्त्रीमुक्ती आणि जीवशास्त्र

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 24/01/2011 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
पुरुषाची बुद्धिमत्ता एक्स या गुण सूत्रामूळे आईकडून येते असे नवे संशोधन सांगते. स्त्री मध्ये दोन एक्स असतात. म्हणजे स्त्री बुद्धिमत्तेची डबल वाहक झाली. असे असूनही, म्हणजे डबल बुद्धिमत्ता असूनही ती पुरुषप्रधान व्यवस्थेची बळी ठरली. म्हणजे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे वचन इथे खोटे ठरले. हे एक नवे कोडे मला पडले आहे. कुणी तज्ञ खुलासा करतील काय? संदर्भ -http://discovermagazine.com/2005/oct/sex