Skip to main content

सांज फुले

लेखक चांदणशेला यांनी रविवार, 03/10/2021 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
सांज फुलांनी भरू दे काळोखा रंग सावल्यांत उतरू दे धूसर झाली मावळतीची वाट मोहरला लाल केशरी क्षितिजाचा तट पंखात घेऊन भोवतीची वारे परतू लागली चुकार पाखरे सूर्य मिटून राने अंधारली प्रकाशज्योत अलगद विजून गेली अंबरी आकार घेई अर्धी चंद्रकोर रात्र पावलाने पुढे येई हळुवार
काव्यरस

'मी'पणाच्या वर्तुळाभोवती

लेखक चंद्रकांत यांनी शुक्रवार, 01/10/2021 21:17 या दिवशी प्रकाशित केले.
'इगो' ही मोठी समस्या असते. आपल्याकडेही ते असावेत (?) फक्त दिसत नसावेत किंवा नाहीत एवढेच. काहीना खरेच काही दिसत नाही. त्यांनी ती नजर कमावलेलीच नसते. ते कसब आत्मसात करण्याची कला अवगत नसते अशा लोकांना. काहीना दिसले तरी जाणवत नाहीत अन् जाणवले तरी मन हे मान्य करेलच असंही नाही. काहीना सोयीच्या गोष्टी सोयीस्कर करण्याचं कसब साधलेलं असतं. काहीना बरंच काही जमतं, काहीना काहीच नाही. सगळ्यांना सगळंच जमतं असं नाही. म्हणून ते काही कुचकामी ठरत नाहीत.

बोली टिकल्या तर टिकेल मराठी

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शुक्रवार, 01/10/2021 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे बोलीभाषा जिवंत राहिल्या, तर प्रमाण मराठी जिवंत राहील आणि बोलींशी युती केल्यानंच ती प्रवाही होईल. तंत्रबंधात अडकल्यानं भारताची पारंपरिक ज्ञानभाषा असलेल्या संस्कृतप्रमाणं तिला मृत भाषा होऊ द्यायचं की तिचं प्रवाहीपण टिकवायचं?

अलक (अति लघु कथा)

लेखक मालविका यांनी शुक्रवार, 01/10/2021 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
अलक 1 त्यांच्या शाळेची ट्रिप कोकणात समुद्र किनारी जाऊन आली होती. सगळ्या जणी एकदम खुश होत्या. समुद्र कसा वाटला त्याच वर्णन त्या बाईंना सांगत होत्या. समुद्रावरून वाहणारा तो खारटसर वारा, त्याचा चिकट असा स्पर्श, पायाखालची मऊ मऊ वाळू, पावलांना हळुवारपणे पाण्याने भिजवणार्या लाटा सगळं मोहवून टाकणारं होतं. अगदी पाण्याला हात लावून, त्याची चव घेऊन त्यांनी समुद्र अनुभवला. एकामागून एक येणाऱ्या लाटा संपतच नव्हत्या. नुसतीच पावलं भिजली होती, अजून थोडी पुढे जायची इच्छा होती पण मॅडम ची परवानगी नव्हती. त्या सगळ्या जणी उत्साहाने समुद्राचं वर्णन करत होत्या.

डोळ्यांनी फळे खावित का?

लेखक स्वधर्म यांनी गुरुवार, 30/09/2021 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या डाळिंबांच्या बागेत आलेली ही फळे: फळे ही फळे ‘भगवा’ या वाणाची असून गेल्या दोन वर्षात, कसलेही रासायनिक खत न घातलेल्या आणि कोणतेही किटकनाशक न फवारलेल्या झाडांना आलेली आहेत. आमच्या सेंद्रीय शेती अभ्यास गटातील मित्र - मार्गदर्शकास जेव्हा चार फळे खाऊन बघण्यासाठी पाठवली, तेंव्हा त्यांना ती छान वाटली. खरे सांगायचे तर आतले दाणे चांगले डाळिंबी असले, तरी ती दिसायला अजिबात सुंदर नाहीत, आणि खूप खूप गोड नाहीत. मी जेव्हा मित्राला असे विचारले, तेंव्हा त्यांचे म्हणणे होते, की फळाची नैसर्गिक चव तशीच असते.

गुरुजींचे पालकांना पत्र

लेखक भम्पक यांनी मंगळवार, 28/09/2021 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय पालक, सगळीच मुलं पुढे जाऊन डॉकटर, इंजिनिअर बनत नाहीत.प्रत्येकाच्या वकुबाने प्रत्येक जण तसा बनतो.आणि हो डॉकटर,इंजिनिअर बनणे हे काही यशस्वीतेचा मापदंड नाही.कळेल पुढे पोरांना.पण त्यांना चांगला माणूस घडवूया आपण.आम्ही तर आहोतच,परंतु तो तुमचे अनुकरण करणार आहे त्यामुळे तुम्ही सावध असा.या चार भिंतीत आम्ही जगाचे शिक्षण देऊच त्याला,परंतु तुमचा सहभाग हा त्यात सिंहाचा वाटा असेल. हा समाज प्रत्येक घटकाचा बनलेला आहे, प्रत्येक घटक हा त्याच्या उपयुक्तते प्रमाणे महत्वाचा आहे.म्हणजे अगदी खालच्या पातळीवरचाही मनुष्य तेवढाच महत्वाचा आहे जेवढा वरिष्ठ पातळी वरचा.आपण हे त्याला बिंबवूया.म्हणजे तो प्रत्येकाचा आदर

अजून दरवळतो सुगंध

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 28/09/2021 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
विजय तेंडुलकरांच्या समग्र साहित्याचा आढावा घेणाऱ्या ‘अ-जून तेंडुलकर’ या पुस्तकाचा वाचकांना यापूर्वी इथे परिचय करून दिला आहे. त्या पुस्तकात सुमारे पंचवीस नामवंतांनी तेंडुलकरांच्या विपुल साहित्याचा परामर्श घेतला आहे. ‘तें’नी हाताळलेल्या अनेक साहित्यप्रकारांपैकी त्यांचे सदरलेखन हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्या प्रकारच्या लेखनाचा मी चाहता आहे. अशा लेखनापैकी ‘कोवळी उन्हे’ हे पुस्तक माझे भलतेच आवडते आहे. याच धर्तीवर ‘तें’चे अजून एक पुस्तक म्हणजे ‘रातराणी’.