बाबा आणि खुशीची नेपाळ सफर
"तुझी लढाई फक्त तुझ्या स्वतःबरोबर आहे. दुसऱ्या कुणाबरोबर नाही. इतरांकडे लक्ष देऊ नकोस." बाबा ऐकत होता. अडकून पडलेलं एक दार उघडत होतं. बाहेरून मदत मिळाल्यावर बऱ्याच वर्षांपासून अडकलेलं दार उघडलं. एके दिवशी बाबा विचार करत होता, "जर आपण दार अडकूच द्यायचं नाही असं ठरवलं तर?" ठरवणं हि पहिली पायरी. सतत जागरून राहून प्रयत्नपूर्वक पुढे जाणं हि योग्य वाटचाल. आपली वाट आपणच शोधावी लागते. दुसऱ्या कुणावर सोडून देऊन चालत नाही. असे शेकडो धडे जगाच्या बिनभिंतीच्या शाळेत मिळतच असतात. शिकणाऱ्याला. शिकायची इच्छा नसणाऱ्याची घागर रिकामीच राहते.
मिसळपाव