पाठवणी
आपल्या जीवनात घडणाऱ्या काही घटना खूप छोट्या असतात पण त्यांच्यात सभोवतालचे वातावरण काही वेळासाठी का होईना पण बदलण्याची अफाट शक्ती असते. याचाच अनुभव मी काल घेतला.
माझ्या मित्राच्या बहिणीचे लग्न होते. आदल्या दिवशी पासूनच आम्ही लग्नघरी तळ ठोकला होता. काय आहे ना लग्नघर म्हटले की अनेक गोष्टी येतात. बरीच कामे असतात, धावपळ असते आणि घरातील लोकं आलेल्या पाहुण्यांची बडदास्त ठेवण्यात अडकलेले असतात. त्यामुळे कामासाठी जितके जण जास्त तितके चांगलेच. बरे अनेकदा तर मुलगी सासरी गेल्यावरही मित्रांची कामे संपतील असे नाही. असो.
लग्न खूपच छान लागले.
मिसळपाव