Skip to main content

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति २: शिमला ते नार्कण्डा

लेखक मार्गी यांनी सोमवार, 19/08/2019 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
२: शिमला ते नार्कण्डा सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति १: प्रस्तावना २५ जुलैला ट्रेनने स्पीति- लदाख़ सायकल प्रवासासाठी निघालो. मला निरोप देण्यासाठी अनेक सायकल मित्र व घरचे आले. ट्रेनमध्ये गेल्यावर सायकलची पिशवी सहजपणे बर्थच्या खाली ठेवली. खूप आरामात फोल्ड केलेली सायकल व इतर सामानाची पिशवी बर्थच्या खाली मावली तेव्हा बरं वाटलं. आता सायकल ट्रेनमध्येही आरामात नेता येते आहे! सायकल अशा प्रकारे फोल्ड करण्यासाठी त्याचं कॅरीअर, दोन्ही चाकं, स्टॅण्ड, सीट आणि दोन पेडल काढावे लागतात.

युगांतर - आरंभ अंताचा! भाग ३४

लेखक मृणालिनी यांनी सोमवार, 19/08/2019 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
"प्रणाम द्रोणाचार्य." "प्रणाम. काय झाले कृपाचार्य? तुम्ही अस्वस्थ का दिसत आहात अजूनही?" "तुम्ही पाहिलेत ना काय झाले ते." "हो. पण तुम्ही का चिंतेत आहात?" "का नसेन, द्रोणाचार्य?" "कारण तुम्हाला वाटलेली भिती सत्यात उतरली नाही." "म्हणजे?" "दुर्योधन स्पर्धेत विजयी झाला नाही, कुलगुरु. तुम्ही तर आनंदी असायला हवे. चिंतीत नाही." द्रोणाचार्य हसत म्हणाले.a "तुम्ही मला चुकीचे समजत आहात द्रोणाचार्य. दुर्योधनाचा पराजय हस्तिनापुरचा एक आधारस्तंभ इतर आधारस्तंभांपेक्षा कमकुवत असल्याचे द्योतक आहे..... आणि मी कुठे हस्तिनापुरापेक्षा वेगळा आहे, गुरुवर?

सेक्रेड गेम्स २

लेखक किसन शिंदे यांनी रविवार, 18/08/2019 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी आजीच्या कुशीत शिरून गोष्टी एेकताना, त्यात पुढे काय होईल याची उत्सुकता आपल्याला शांत बसू देत नाही. हि उत्सुकता ती गोष्ट/कथा उत्कृष्ट असण्याचं द्योतक म्हणता येईल आणि त्या गोष्टीशी आपण एकरूप झाल्याचं लक्षण म्हणता येईल. या उत्सुकतेपोटीच 'गेम आॅफ थ्रोन्स'च्या आठही सिझन्सना जगभरातल्या तमाम प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. या सर्वांग सुंदर सिरीजचा २०११ ला सुरू झालेला प्रवास नऊ वर्षांनी २०१९ ला संपला, कारण या मालिकेची कथा उत्कृष्ट होती आणि तिने प्रेक्षकांना बांधून ठेवण्याचे काम अतिशय चोख केले. 'कट्टप्पाने बाहुबलीला का मारले'?

जिवाचा सखा..

लेखक आजी यांनी रविवार, 18/08/2019 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
म्हातारपणी टीव्हीसारखा दुसरा मित्र नाही. सतत फक्त टीव्ही बघावासा वाटायला लागला की समजावे, आपले वय झाले. (आणि तोही बघवेनासा झाला की समजावे की आता फारच वय झाले.) मलाही अशीच म्हातारपणाची जाणीव झाली ती टीव्हीमुळे. पेपरमधल्या बातम्या बारीक अक्षरात वाचण्यापेक्षा टीव्हीवरच्या बातम्या बघायला जास्त आवडायला लागल्या. रेडिओवरच्या गाण्याबरोबरच टीव्हीवरची गाणी बघायला आवडायला लागली. टीव्हीवरच्या मालिकेतल्या सासवा सुना, सुनेचा छळ, नायिकेवर-नायकावर येणारी संकटे, त्यातली व्हरायटी, सासूने सुनेवर विषप्रयोग करणे, खलनायकाने नायकाचा अकारण द्वेष करणे यांसारख्या गोष्टीत मन रमायला लागले.

हॉरर

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी शनिवार, 17/08/2019 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
हॉरर ---------------------------------------------------------------------------------------------------------------- एक कर्णकर्कश्श किंकाळी पूर्ण थिएटरमध्ये घुमली ! लोक दचकले . माझ्या शेजारचाही दचकला .एक प्रौढ गृहस्थ. लोकांना त्या हिरॉईनची भयकुंठित अवस्था बघवत नव्हती . हिरॉईन दिसायला एकदमच कडक होती. नवीन. लोकांना अल्पावधीतच ती लय आवडायला लागली होती . पडद्यावर हॉरर चित्रपट चालू होता . टुकार ! ती हिरॉइन सोडता. हॉरर कमी आणि कॉमेडीच जास्त होता साला ! पार्श्वसंगीत मात्र लय भारी होतं. ते काढलं तर टॉम अँड जेरी बरं वाटलं असतं. पण पिक्चर बंडल असला तरी ' हॉरर होता.

वैशालीतला उपमा आणि सुदाम्याचे पोहे

लेखक मित्रहो यांनी शनिवार, 17/08/2019 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारवाडा, सिंहगड, म्हात्रे पूल, बिडकरची मिसळ या प्रमाणेच वैशाली हे पुणेकरांचे एक अत्यंत आदरांचे स्थान आहे. वैशालीतला उपमा खात आणि फर्ग्युसन वर नजर ठेवीत कित्येकांनी तारुण्यात बहार आणली. अशांनी वैशालीच्या उपम्याचा अभिमान दाखविणे स्वाभाविक आहे पण एका तीन वर्षाच्या मुलाने वैशालीच्या उपम्याचा अभिमान दाखविणे जरा जास्तच होते. दादरला माझ्या मैत्रीणीच्या बहिणीचे लग्न होते. मुलाकडली मंडळी पुण्यातली होती. सकाळी नाष्टा सुरु होता. एक साधारण तीन वर्षाचा मुलगा रडत होता.

युगांतर - आरंभ अंताचा! भाग ३३

लेखक मृणालिनी यांनी शनिवार, 17/08/2019 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
युगांतर - आरंभ अंताचा भाग ३३ "आवाज अनोळखी आहे हा विदुर. कोण आहे तो वीर जो द्वंद्व करण्यास आव्हान देऊ इच्छितो.... ते ही अर्जुनाला?" धृतराष्ट्राच्या अंधारलेल्या नेत्रांपुढे एक आशेचा किरण जागृत होत होता..... 'एखाद्या तिसऱ्याच व्यक्तीने अर्जुनाला हरवलं की ही स्पर्धा बाद ठरवून वेगळ्या स्पर्धेचे आयोजन ! मग दुर्योधनच्या राज्याभिषेकात अडथळा नाही.' धृतराष्ट्राला त्या वीराबद्दल उत्सुकता लागून होती.

चमचा !

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 17/08/2019 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
चमचा! आपण पुनर्जन्म वगैरे मानत असू किंवा नसू. पण एक प्रश्न मात्र आपल्याला खूप आवडतो. तो म्हणजे, ‘पुढच्या जन्मी तुला कोण व्हायला आवडेल?’… कारण, या प्रश्नाचं उत्तर एका मानसशास्त्राशी जोडलं गेलेलं असतं. बऱ्याचदा, या जन्मात न जमलेली किंवा राहून गेलेली एखादी गोष्ट जमविणे किंवा पूर्ण होणे हे आपल्या पुढच्या जन्माचं ध्येय असलं पाहिजे, असंच अनेकांना वाटतं. ‘पुनर्जन्म असलाच, तर पुढच्या जन्मी मला अमुक व्हायला आवडेल’, असं या प्रश्नावरचं उत्तर मिळतं, ते त्यामुळेच... ... सुट्टी असेल तेव्हा सकाळच्या नाश्त्यासोबत वर्तमानपत्र वाचायची मजा काही औरच असते. ती मी आज अनुभवत होतो.

अश्वत्थामा

लेखक मायमराठी यांनी शुक्रवार, 16/08/2019 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
।। अश्वत्थामा ।। क्षितिजावर थबके रवि, पोर्णिमेत रेंगाळे शशि, एक न जाई ओटी, दुजा रातीच्या कंठी, एक तेजोमय गर्भ, दुजा शांतीतच गर्क, पूर्वेस वाजता शंख, पृथ्वीस वाटते दुःख, अवचित संध्याकाळी, अवनीही होई हळवी, कधी उजळें प्रकाशहाती, कधी निथळें चांदणराती, विधाताही निष्ठुर होई, मग निर्णय कोण घेई? भावनांचे दीप जळती, आवेगांचे लोळ उठती, मानवास न उमगे कोडे, अश्रू का दाटती नयनी? बघता सुवर्णजन्मा वा पाहता तम पश्चिमा, घेऊन फिरावा माथी, ओला शाप कपाळी, अश्वत्थामा सगळेच, रोज संधीप्रकाशी । - अभिजीत श्रीहरी जोगळेकर