Welcome to misalpav.com
लेखक: ढालगज भवानी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

सहमत. अगदी मनापासुन सहमत. त्यात मुली तश्या प्रखर असतात. मुल त्यांच्या कोषात जातात, बोलतच नाहीत तर मुली खडे बोल सुनवायला लागतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत,"मी करते" असा एक जोरदार आत्मविश्वास असतो. आणि खर सांगायच तर आपणही जरा जास्तच हळव्या असतो.

लेखात मांडलेल्या विचारांशी, भावनांशी १००% सहमत. फक्त वाईट एवढेच वाटले की असा अनुभव 'फक्त आईलाच येतो' असा सुर जाणवला. वडिलांचेही तस्सेच अनुभव असतात. शाळकरी आणि महाविद्यालयिन वयात घरच्यांना फसवून, अंधारात ठेवून केलेल्या कांही 'धाडसी' गोष्टी, अगदी प्रसंगी जीवावर बेतणार्‍या असणार्‍याही, आता आपला मुलगा करत तर नसेल नं? ह्या विचारांनी फार अस्वस्थ होतं. पण शांतपणे विचार केल्यावर जाणवतं आपल्यावर जे घरचे संस्कार होते त्यानेच आपल्याला 'वाहवत' जाण्यापासून रोखलं आहे. तेंव्हा मुलावर प्रभावी संस्कार करणं, संवाद चालू ठेवणं हे आणि एवढेच आपल्या हातात असते. जे स्वातंत्र्य आपल्याला 'त्या' वयात आवश्यक वाटत होते ते आपल्या 'त्याच' वयात आलेल्या मुलाला द्यावं पण, जागरूक राहूनच. मला, वैयक्तिकरित्या, पस्तिशीच्या पुढे आई-वडीलांचे संस्कार कसे महत्त्वाचे होते/आहेत हे जाणवायला लागले. कदाचित त्यालाच परिपक्वता म्हणत असावेत. आई वडिलांचे संस्कार जसे आठवतात तसेच त्यांनी आपल्या बाबतीत केलेल्या चुकाही, त्यांच्या आपल्यावरील निस्सिम प्रेमापोटीच झाल्या होत्या हे कळायचेच वय म्हणजे प्रौढत्व.

"मला, वैयक्तिकरित्या, पस्तिशीच्या पुढे आई-वडीलांचे संस्कार कसे महत्त्वाचे होते/आहेत हे जाणवायला लागले." ह्या वाक्याला मनापासुन दाद..बाकी लेख आणि तुमचा प्रतिसाद छानच... - वाट्या..

छान लिहिले आहेस शुचि. पेठकरकाकांनीही दुसरी बाजू चांगली मांडली आहे, पण ते म्हणत आहेत तसा सूर वगैरे काही जाणवला नाही मला.

ज्या वयात आपल्याला 'आई' समजू लागते (किंवा तसं वाटतं) त्याच वयात आपल्याला आपले वडिलही समजू लागतात (किंवा तसं वाटतं). पण वडिलांचा साधा उल्लेखही न आल्याने मी तसे म्हंटले आहे. अर्थात, लेखिकेचा तसा काही उद्देश नाही/नव्हता हे ही मान्य आहेच.

हो, तुम्हांला काय म्हणायचं आहे ते समजलं मला पण जाणून बूजून ह्यात वडिलांचा अनुल्लेख केलेला आहे असं नाही वाटलं असं म्हणते आहे मी. लेखाचा फोकस आई- मुलीचं नातं एका पिढीतून दुसर्‍या पिढीतही कसं संक्रमित होत रहातं ह्याची जाणीव हा आहे, असं वाटतं आणि तो लेखिकेचा स्वतःचा अनुभव आहे, असंही. तेह्वा जितकं आणि जे लिहिलं आहे ते विषयाला धरुनच आहे. :)

+१०० मुळातच हे प्रकटन एक स्वानुभवातून आलेलं स्वगत असावं असं वाटतं आहे.

पेठकर व यशोधरा यांचे तसेच अन्य सर्वांचे आभार.
आई- मुलीचं नातं एका पिढीतून दुसर्‍या पिढीतही कसं संक्रमित होत रहातं ह्याची जाणीव हा आहे, असं वाटतं
+१००

रिव्हर्स दे-जावू शी मात्र स्तब्ध राहिला गेलो होतो. तो क्षण मात्र मोठा अनाकलनीय सुन्दर होता.

आई नेहेमी म्हणते मला (हो, अजूनहि म्हणते - आईला मुलं नेहमीच लहान!) की "अरे, तू त्या भुमिकेत गेलास म्हणेजे तुला कळेल". पुढे जेव्हा मुलं मुलींची फ्रॅक्चर्स झाली, एखाद्या विषयात काठावर पास झाली, 'पंधरा मिनिटं' हरवली....त्या त्या भुमिकातनं बाप म्हणून वावरताना माझ्या या अशा प्रसंगात आई-दादांचं काय झालं असेल ते नेमकं कळलं! माझ्यापुरता तरी शेवटच्या (अतिशय नेटकेपणाने मांडलेल्या) पॅराग्राफमधे एक बदल करावा लागेल - आईकडून -> आई-वडिलांकडून. छान लिहिलं आहेस.

प्रकटन आवडलं. थोडक्या शब्दांत रिव्हर्स दे जा व्हू चे अनुभव छान मांडले आहेत. आपण लहान असताना आपल्या पालकांकडे एक व्यक्ती म्हणून बघण्याऐवजी भूमिका म्हणून बघतो. तसं होतंय हे आपल्याला जाणवतही नाही, उलट तेच आपल्याकडे एक भूमिका म्हणून बघतात आणि व्यक्ती म्हणून विश्वास ठेवत नाहीत याचा राग येतो. काळ गेल्यावर टेबलं फिरतात, याच नाण्याचं दुसरं चित्र जगायला मिळतं, लागतं. हे छान दाखवलं आहे.
खरं तर थोडा बायकी विषयच.
अशी अपोलोजेटिक सुरूवात मात्र खटकली. माझ्या मते लेखन दर्जेदार असतं किंवा नसतं. चांगलं लिहिलेलं वाचकांना नेहमीच भिडतं. मग त्याला बायकी विषय पुरुषी विषय अशी लेबलं लावण्याची गरज पडत नाही.

आपलेच डोळे एकमेकांकडे जेव्हा रोखुन बघतात त्यांच्याकडे तटस्थ पणे पहाणारी तिसरी बाजु हि मजेदार असावी. त्या वेळी कसे बरं वाटत असेल? हे प्रकटन आवडले हे.वे.सां. न. (उत्सुक)

आपण लहान असताना आपल्या पालकांकडे एक व्यक्ती म्हणून बघण्याऐवजी भूमिका म्हणून बघतो. तसं होतंय हे आपल्याला जाणवतही नाही, उलट तेच आपल्याकडे एक भूमिका म्हणून बघतात आणि व्यक्ती म्हणून विश्वास ठेवत नाहीत याचा राग येतो.
नेमके आणि तंतोतंत!!! भारीच हो गुर्जी. :) (थोडे थोडे डोळे उघडलेला) बॅटमॅन.

चांगलं लिहिलेलं वाचकांना नेहमीच भिडतं. मग त्याला बायकी विषय पुरुषी विषय अशी लेबलं लावण्याची गरज पडत नाही. शत प्रती शत बरोबर. बाकी लेख उत्कृष्टच आहे. प्रश्नच नाही

दवणीय is नॉट = to वाचनीय असे म्हणायचे आहे का तुज

येस्स. दवणीय म्हंजे नीतीमूल्यांचा काढा किंवा गेलाबाजार वाप्रूनवाप्रून शिळ्या झालेल्या शब्दांच्या तेलात तळ्ळेल्या जिल्ब्या असा अर्थ वाचलाय. हा लेख तसा आजिबात वाटत नसल्याने म्हणालो इतकेच. :)

दवणीय म्हंजे नीतीमूल्यांचा काढा किंवा गेलाबाजार वाप्रूनवाप्रून शिळ्या झालेल्या शब्दांच्या तेलात तळ्ळेल्या जिल्ब्या असा अर्थ वाचलाय
चे चे .. फारच चुकीचा अर्थ घेतलात ब्वा असो

:) हाहाहा .... ऐक ना मी एकदा "नंदन" यांच्या लेखावर प्रतिक्रिया दिली होती "नंदन यांचे लेख म्हनजे जणू उंबराच्या फूलासारखे दुर्मीळ व पर्वणीचे असतात" अशा टाइप. सगळ्यांनी इतकी खेचली होती की म्हणे नंदन स्वतः लेखांना "दवणीय" वगैरे म्हणतात अन त्यांच्या लेखावर अशी "दवनीय" प्रतिक्रिया यावी हाच तो पोएटीक का काय न्याय म्हणे =)) =))

बाकी काहीही असो, शुचितै अगदी मनापासून लिहीते. जसे डोक्यात आले तसे सरळ टाइप करते हे नक्की. :) अगदी प्रतिसाद पण मनापासून एंजॉय करणारी आहे ही. कीपीटप शुचि. :)

बेट्या,एक काम कर, वाचनखूण साठवून ठेव. अगदी शुचि (स्वारी स्वारी...भवानी) म्हणते तसं पोरं मोठी व्हायला लागल्यावर वगैरे लांबचं आहे, ज्या दिवशी बाप होशील त्याच्या दुसर्‍याच दिवशी हाच धागा काढून वाच... मग आपण बोलू! :)

>>>ज्या दिवशी बाप होशील त्याच्या दुसर्‍याच दिवशी आधी लग्न कर हो ;) सीरियसली सेम टु सेम प्रतिसाद देण्याची इच्छा होती. अर्थात दोष त्याचा नाही, सध्या तो एका काठावर आहे. दुसर्‍या काठावर गेला की कळेलच.

बापुस व्हायला अन लेकराबद्दलची काळजी जाणवायला लग्नाचं बंधन असलंच पाहिजे असंच काही नाही बरंका प्यारेभैय्या! :)

ह्म्म काय बोलू...प्रत्येक वाक्याशी सहमत. कुठे तरी हे रिव्हर्स देजा वू जाणवत असते व या जगण्यातूनच स्वतःच्या आईची भूमिका कळून येत असते. रोज एकादातरी हाच विचार मनात येतो.

सुंदर प्रगटन.बालक-पालक नातं जोपासायला खरंच अवघड,त्या त्या क्षणी दोघांनाही न उलगडणारं,भूतकाळाची चिरफाड करीत भविष्यकाळ जगायला लावणारं. पण केवळ बालक-पालकच नव्हे तर इतरत्रही भूमिका बदलताना हाच गुंता होतो. जसे सहकर्मचारी (किंवा आपण) बॉस झाल्यावर नाते बदलते,टेबलाच्या बाजूंची अदलाबदल झाली की दृष्टिकोण बदलतो.आपली आणि समोरच्याची विचारसरणी भिन्न वाटत असली तरी एकाच जीवनधारेचा तो उगमाकडचा आणि मुखाकडचा भाग आहे हे ज्या वयात जाणवू लागते, ते प्रौढत्व,ती परिपक्वता.

अगदी हेच म्हणते. फार अवघड! फाजील आत्मविश्वास, सटासटा बोलून मोकळे होणे, सगळं काही गणितासारखे आयुष्य असावे असे वाटणे, वाद घालणे. काळजी करून रोज माझे दोन केस तरी पांढरे होत असतील. रोज शाळेत जाताना, खेळायला जाताना त्याच त्या सूचना मी देते पण मलाही आई तश्याच सूचना द्यायची तेंव्हा "आता तू काय म्हणणारेस ते समजलं, दार नीट लावून घे, पीप होलमधून बघितल्याशिवाय दार उघडू नकोस, अनोळखी माणसाशी बोलू नकोस." असे म्हणत असे, आता माझा मुलगा शाळेत निघताना "तू अमूक एक असंच सांगणारेस ना" असं विचारतो, तरी सांगत राहते. मी मुलाला हेच सांगतीये ना हे माझी आई दम देऊन कबूल करून घेते. ;) आणि हेही सांगते की अजून तर सुरुवात आहे. हैराण होतात पालक! एका मैत्रिणीची मुलं दहावी बारावीची झाल्यापासून तिचा स्वभाव भलताच बदललाय. सतत काळजी. आपण आजकाल बोलायला मोकळेपणाही देतो म्हणून वाट्टेल ते विचारत राहणे, मग आपण रागावणे. मोकळेपणा आणि अगोचरपणा यातला फरक काय हे रोज रोज तेच सांगावं लागतय. पैश्याचे नियोजन साधे, सोपे, अवघड कसेही सांगितले तरी आपण सुलतान असल्यागत राहणे पाहून तर घामच फुटतोय.

हा दोन पिढ्यातील संघर्ष कुणालाच चुकला नाही छान लिहिले आहे . मुलाला ENGINEERIG COLLEGE वसतिगृहात ठेवल्यावर दोन वर्षे झोपेतून एकदम मधेच जाग येत असे. जरूर नसताना भूतकाळ आठवे. बायको विचारणार काय झाले ? तिला सांगण्यासारखे असते तर झोप कशाला उडाली असती ? नशीब थोर. मुलगा पहिली २ वर्षे FIRST CLASS मधे उत्तीर्ण झाला त्यामुळे तो आता नक्की ENGG होणार हि खात्री पटली झोप चालू झाली