सगळे भाग वाचले.
काहीतरी वेगळं वाचायला मिळाले. याला थोडा बहुत इतिहासाचा (किंवा महाभारत वेगवेगळ्या शैलीत लिहीले गेले त्याचा ) आधार असावा असे वाटते आहे. कदाचित अभिरांचा इतिहास असावा.
एकुणच खुप रसरशीत कलाकृती.
मिपावरील सध्याचे २ धागे बघितल्यावर इथल्या वाचकांचे वागणे थोडे paradoxical वाटले.
इथे महाभारतावर आधारीत पण बरेच स्वातंत्र्य घेऊन लिहिलेली कथा उचलून धरली गेली आहे, मात्र दुनियादारीच्या नशिबी ते भाग्य नाही…:-)
असो, पहिले दोन भाग जितके आवडले तितका हा आवडला नाही.
@ विश्वनाथ मेहेंदळे:
...पहिले दोन भाग जितके आवडले तितका हा आवडला ...
पहिल्या दोन भागातील काय आवडले, आणि शेवटल्यातील काय नाही, हे जरा तपशीलवार लिहिल्यास मदत होईल.
थोडक्यात सांगायचे तर…
शेवटची अभिरमन्युची दोन भाषणे अजिबात नाही आवडली. उगाच ओढून ताणून केलेली वाटली. शिवाय ते गोफण वगैरे पण तर्कसंगत नाही वाटले.
तपशीलवार हवे असेल तर… नंतर लिहितो.
अर्जुनाबरोबर काही सैन्य होते का ? किती ? की तो एकटा होता? रथात की पायी ? तो रथात असल्यास हजारो स्त्रियांसाठी पण रथ होते का ? नसल्यास सर्व एकाच गतीने कसे जात होते? सुमारे दोन महिन्यांच्या प्रवासासाठी (द्वारका ते हस्तिनापूर अंतरः १४०० - १५०० किमी.) अन्न-पाण्याची काय सोय होती? अर्जुनाबरोबर असलेली यादवांची संपत्तिपण अभीरांनी लुटली, तर ती अर्जुनाने कशी एकत्र केली होती ? ती बैलगाड्यांमधे भरली होती की कश्यात ?
अर्जुन अभीरांकडून का आणि कसा पराजित झाला ? त्याचा 'अक्षय' भाता रिकामा का आणि कसा झाला ? कृष्णाच्या पावलात व्याधाने बाण का मारला? (त्याचे पाऊल हे हरिणाच्या तोंडासारखे वाटले, हे मलातरी पटत नाही) यादवांचा आपापसातल्या मारामारीमुळे संपूर्ण नाश कसाकाय झाला ?
कृष्णाने सोळा हजार एकशे आठ स्त्रिया त्यांच्या मुलांसकट आणून त्यांना आश्रय दिला (प्रत्येकीचे एकेकच मूल म्हटले, तरी बत्तीस हजार तोंडे होतात), त्यांचे भरण-पोषण करण्याची जबाबदारी कृष्णाची वैयक्तिक होती की सामूहिक ? वैयक्तिक असल्यास त्याच्या मिळकतीचा स्त्रोत काय होता? सामूहिक असल्यास त्यांचा खर्च चालवण्याच्या मोबदल्यात त्या स्त्रियांना काय करावे लागे ?
...या आणि अश्या प्रश्नांची उत्तरे महाभारत काय देते ? ती तर्कसंगत वाटतात का?
......अर्थात मुळात हे सर्व सुद्धा जर काल्पनिकच असेल, तर प्रश्नच मिटला, मग आता कुणीही काहीही कल्पना लढवाव्यात ...
व्यासांच्या 'जय' नामक इतिहासात वैशंपायनाने भर टाकून 'भारत' आणि सौतीने भर टाकून 'महाभारत' बनवले, ती सर्व भर काल्पनिक की खरी? खरी असल्यास मुळात व्यासांनीच का लिहिले नाही ?
अमूक भाग व्यासांचा, अमूक वैशंपायनाचा आणि अमूक सौतीचा, असे पृथक्करण उपलब्ध आहे का?
अर्जुनाबरोबर यादवांचे उरलेसुरले सैन्य होतेच. श्रीकृष्णाचा पणतू वज्र यांस युधिष्ठिराने इंद्रपस्थाचे राज्य दिले होतेच. वज्रासह द्वारकेतील सर्व प्रजानन, उरलेसुरले सैन्य शश्त्रधारी सैनिकांसह अर्जुनाच्या आधिपत्याखाली द्वारका सोडून पुढे निघाले. पर्वताच्या पायथ्यांशी, नदीकाठी सोयीस्कर ठिकाणे पाहून मुक्काम करत हे सर्व दरमजल करत निघाले. रथ, घोडे, बैल इत्यादींवर द्वारकेतील संपत्ती, धनधान्य इत्यादी लादले गेले होते.
अशातच पंचनद प्रांती अभीरांनी त्या ताफ्यावर हल्ला केला. अर्जुनाला शस्त्रांचे स्मरण होईनासे झाले. तरीही त्याने कित्येक अभीर टिपून ठार मारले. अशातच अर्जुनाचे अक्षय्य भात्यातले बाण संपून गेले, बरोबरीचे वीर यादवसैन्याच्या नाशामुळे, कृष्णार्जुनांच्या मृत्युमुळे आधीच सैरभैर झाले होते त्यामुळे हे उरलेसुरले हतवीर्य सैनिक संख्येने कित्येक जास्त असलेल्या अभीरांना प्रतिकार करू शकले नाहीत.
हे बर्यापैकी तर्कसंगतच वाटते. कृष्णाचा मृत्यु सुद्धा तसा तर्कसंगतच वाटतो. बलरामाचा देहत्याग, यादवांचा प्रभासक्षेत्री झालेला विनाश यामुळे कृष्ण विषण्ण मनस्थितीत भटकत असता मरण पावला.
आफ्टर वॉर कथा आवडली !
जर महाभारत इ.स. पूर्व १५००० ते ७००० मध्ये घडल असेल तर सुनामी ची गोष्ट खरी असायला पाहिजे…त्या काळात समुद्राची पातळी सुमारे ५० ते १०० मीटर्स ने वाढली होती. (ice एज संपत होता म्हणे)
द्वारके समोरच्या समुद्रात अवशेष सापडलेत म्हणे…खरं आहे काय ?
द्वारके समोरच्या समुद्रात अवशेष सापडलेत म्हणे…खरं आहे काय ?
दोन गोष्टी आहेत. अवशेष सापडलेत हे खरंय पण डेटिंग केल्यावर दीडेक हजार वर्षांपेक्षा मागे जात नाहीत ते.
हे वगळता मध्ये एक बातमी वाचली असेल- कोकणात सुमारे ८००० वर्षांपूर्वीची अंडरवॉटर तटबंदी सापडली इ.इ. त्या मोहिमेचे नेतृत्व केलेले डेक्कन कॉलेजचे अशोक मराठे यांचे मंडळात एक लेक्चर होते २०१२ मध्ये ते अटेंड करायचा चान्स मिळाला. त्यांनी त्यात सांगितले की भूजजवळ अख्खी अंडरवॉटर टौनशिप त्यांनी आयडेंटिफाय करून ठेवली आहे परंतु पैसे इ.इ. कारणास्तव ते पुढे चालवता आले नाही.
त्यामुळे द्वारकाच का, त्याच्या आसपासही जुने पाण्याखाली गेलेले अवशेष सापडलेत ही गोष्ट खरीच आहे-पण मरीन आर्किऑलॉजी अजून तितकी जोरात नाही असे वाटते.
द्वारका आणि अन्य ठिकाणी नक्की कधी आणि काय काय उत्खनने झाली याचा आढावा या पेपरमध्ये उत्तम घेतलेला आहे. विजयदुर्ग किल्ल्याजवळची अंडरवॉटर तटबंदी मराठाकालीन असावी असा तर्कही तिथे लावल्या गेला आहे.
http://drs.nio.org/drs/bitstream/2264/30/3/Man_Environ_29_28.pdf
इथे या पेपरमध्ये पान क्र. ३ ते ७ वाचावे. द्वारकेत बुद्धपूर्वकालीन अवशेष मिळाले नाहीत. पण बेट द्वारका इथे हडप्पाकालीन अवशेष सापडतात. दोन्ही ठिकाणी सापडलेली जहाजे रोमन काळ ते मध्ययुगीन काळातली आहेत असे दिसते.
हे रोचक आहे! मी वर दिलेली लिंक २००४ च्या पेपरची आहे.
८००० वर्षांपूर्वीच्या कोंकण संस्कृतीवाल्या व्याख्यानात अशोक मराठ्यांनी सांगितले होते की मानवनिर्मित असण्याचे एक मुख्य कारण म्हंजे कोकणपट्टीत सापडणारे २ प्रकारचे दगड नैसर्गिकपणे एकसाथ कधीच सापडत नाहीत ते तिथे एकसाथ सापडले. रचनेची रेग्युलॅरिटी हा निकष लावला नव्हता, पण तोही लावता येऊ शकेल.
बर्याच किल्ल्यांवरील बुरुज हे नैसर्गिक आहेत पण आपल्या गरजेप्रमाणे त्यांना शिवकाळात आकार दिला गेला, तसाच काहीसा प्रकार ह्या भिंतीचा वाटतो जरी नैसर्गिक नसली तरी ती गरजे प्रमाणे कमी अधिक केली गेली ,तासली गेली असावी कारण भिंतीची रचना आणि ठिकाण सामरिक दृष्ट्या अतिशय महत्वाचे आहे.
हम्म. पण जिथे विशेषतः दरवाजा असतो त्याच्या शेजारचे बुरुज नैसर्गिक नसावेत असे वाटते. असो.
तसाच काहीसा प्रकार ह्या भिंतीचा वाटतो जरी नैसर्गिक नसली तरी ती गरजे प्रमाणे कमी अधिक केली गेली ,तासली गेली असावी कारण भिंतीची रचना आणि ठिकाण सामरिक दृष्ट्या अतिशय महत्वाचे आहे.
मस्त माहिती दिलीस रे !
विचारणा एव्हड्याचसाठी कि जर नंतरच्या काळात द्वारकेचे अवशेष सापडले आणि ते ७००० वर्षे किंवा जास्त जुने असतील तर द्वारका पृथ्वीतलावरील सर्वात जुनी सिविलायजेशन ठरेल. (सुमेर पेक्षा जुनी )
इसापूर्व सुमारे २०० वर्षांपूर्वी च्या ग्रीक राजाचे नाणे त्यात चक्रधारी श्रीकृष्ण दिसत आहे
धन्स :)
अर्थातच, सुमेरियन पेक्षा जुनी ठरेलच द्वारका मग-पण मेहेरगढ इथे तितके जुने अवशेष ऑलरेडी सापडलेले आहेतच.
नाणे इथे दिसत नैये, घरी गेलो की पाहतो. ग्रीकांपैकी काहीजणांनी भागवत धर्म स्वीकारल्याने तशी नाणी येणे क्रमप्राप्तच आहे म्हणा.
@माल्जीरावः ....इसापूर्व सुमारे २०० वर्षांपूर्वी च्या ग्रीक राजाचे नाणे त्यात चक्रधारी श्रीकृष्ण दिसत आहे...
हे चित्र बघण्याची उत्सुकता आहे, पण चित्र दिसत नाहिये.
डावीकडच्या फटूत अनुक्रमे डावीकडून "आगाथॉक्लेऑस" आणि "वासिलेइस" (यातली एक-दोन अक्षरे लागली नाहीत पण संदर्भाने सांगतोय) असे लिहिले आहे. लिपी ग्रीक आहे.
उजवीकडच्या फटूत "आगाथॉक्लेऑस" हेच नाव ब्राह्मी लिपीत लिहिलेले आहे. त्यातले वरून तिसरे टेनिसच्या रॅकेटीत एक पॉइंट असल्यागत दिसणारे अक्षर म्हणजे थ आहे. विकीवरील ब्राह्मी अक्षरांचा तक्ता पडताळून पाहिल्यास हे सहज लक्षात यावे. ब्राह्मीचे रीडिंग "अगथकलुस/ष" असे करता यावे. ते क आहे की कु ते तेवढे नीट कळत नाहीये.
आगाथाक्लेऑस हे नाव, तर वासिलेइस म्हणजे राजा.
अशाच एका नाण्यावरून जेम्स प्रिन्सेपला ब्राह्मी लिपीचा उलगडा झाल्याचे ऐकले होते.
होय... द्वारका (किंवा तत्सम समुद्रात बुडालेले शहर) सापडली आहे.
डॉ. एस. आर. राव, यांच्या नेतृत्वा खालील सहावे 'मराइन आर्कियोलॉजिकल एक्सपेडीशन ऑफ द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, गोवा,' भारतीय वैज्ञानिक चमूने नोवेंबर १९८७ ते फेब्रुवारी १९८८ या कालावधीत या बुडालेल्या नगरीला शोधून काढण्यात यश मिळवले आहे. समुद्राच्या अंतर्भागात वालुकाश्मात बांधकाम केलेल्या इमारतींचे अवशेष आढळून आले आहेत.
महाभारतात द्वारकेचा उल्लेख जोड-द्वीप असा येतो. एक मुख्य द्वीप तर एक राणीवशाचे द्वीप असा. त्यानुसारच संशोधनात देखील दोन वेगवेगळी द्वीपे सापडल्याने महाभारतीय संदर्भाला पुष्टी मिळाली आहे.
१.
२.
३.
४.
मूळ अवशेषान्चा सन्गणकीकृत आराखडा
महाभारतात द्वारकेचा उल्लेख जोड-द्वीप असा येतो. एक मुख्य द्वीप तर एक राणीवशाचे द्वीप असा. त्यानुसारच संशोधनात देखील दोन वेगवेगळी द्वीपे सापडल्याने महाभारतीय संदर्भाला पुष्टी मिळाली आहे.
माफ करा पण हा उल्लेख महाभारतात नेमका कुठे येतो? माझ्या माहितीप्रमाणे उपरोक्त उल्लेख महाभारतातील नसून 'युगंधर' पुस्तकातला आहे.
पश्चिम समुद्राच्या तीरावर रैवतक पर्वताच्या सान्निध्यात पुरातन कुशस्थली नगरावर तीन योजने लांब व एक योजन रूंद अशी भक्कम कोटबंद द्वारकानगरी तयार केली असे महाभारत म्हणते.
सम्पूर्ण संदर्भ मिळणे कठीण आहे.
आजची द्वारका ही मूळ द्वारकेपासून जवळ जवळ ३० किमी दूर आहे. मूळ श्रीकृष्णाची द्वारका आजच्या 'ओखा' बन्दराजवळील 'बेट द्वारका' असावी. बेट द्वारकेचा सध्याचा आकार पाहता (चिन्चोळ्या भूपट्टीने जोडलेली दोन बेटे) जोड-द्वीप ही संकल्पना खरी असावी असे वाटते.
बेट -द्वारका
मी दिलेल्या पेपरात बेट द्वारकेबद्दल उल्लेख आहे. तिथे हडप्पा काळापासून वस्ती असल्याचे अवशेष आहेत. तस्मात "आर्यन" काळ हा पोस्ट-हडप्पा काळ असे धरले तर तिथे द्वारका होती असे म्हणायला हरकत नसावी. तत्कालीन पॉटरी ला पेंटेड ग्रे वेअर असे साधारणपणे नाव आहे. नेटवर पाहताना दिसते, की तिथे ती पॉटरी अल्प प्रमाणात सापडते. तस्मात योग्य त्या टाईम फ्रेममध्ये योग्य ते अवशेष आहेत इतके तरी नक्कीच. त्या पलीकडे पाहिले पाहिजे काय ते.
या पेपरमधे बरीच द्वारकेसांदर्भातील बरीच उपयुक्त माहिती आहे... जिज्ञासूंनी जरूर वाचावे.
http://drs.nio.org/drs/bitstream/2264/507/1/Migration_Diffusion_6_56.pdf
महाभारतात द्वारकेचा उल्लेख जोड-द्वीप असा येतो. एक मुख्य द्वीप तर एक राणीवशाचे द्वीप असा. त्यानुसारच संशोधनात देखील दोन वेगवेगळी द्वीपे सापडल्याने महाभारतीय संदर्भाला पुष्टी मिळाली आहे.
हो, हा उल्लेख 'युगंधर' पुस्तकातलाच आहे
हिस्ट्री chanal वर बेट द्वारका वर आधारित कार्यक्रम वर्षातून एक दोन दा तरी येतो. समुद्र खाली द्वारका नगरीचे अवशेष सापडलेले आहे. द्वारका नागरी तीन वेळा तरी कमीत कमी वसली असावी. महाभारतात वर्णन केलेली द्वारकेची मुद्रा तिथे सापडली आहे. अर्थात द्वारका नगरी पुरातन आहे, इसवी सन १५०० पर्यंतचा इतिहास तिथे सापडतो. अर्थात महाभारताच्या कृष्णाच्या अस्तित्व नंतर ही नगरी अस्तित्वात होती. समुद्राच्या वाढत्या पातळी मूळेच द्वारका लोकांनी सोडली. शिवाय अन्य परिवर्तन ही झाले सरस्वती नदी ही या काळात नष्ट झाली, रेगीस्तान ही वाढले. (कदाचित जंगलतोड आणि पशूंच्या चराई मुळे, असे ही एक मत आहे. कारण त्या वेळची अर्थव्यवस्था पशु आणि गायींवर आधारित होती. महाभारतात खांडववन करण्याचे वर्णन आहे). वेदांमध्ये अकाल, दुभिक्ष या मुळे कुत्र्याचे मांस भक्षण करण्याची परीस्थित एका कुशिक गोत्रीय ऋषी व आली होती. असे ही वर्णन आहे. असो इतिहासकारांचे मत.
श्रीकृष्ण उवाचः
हे अभीरमन्यो,
मी तुला ओळखू शकलो नाही असे तुला वाटले तरी कसे? वास्तविक तुला द्वारकेत आणायचा एकमात्र उद्देशच हा होता की तुला शिक्षित करून,राज्यव्यवहाराचे धडे देऊन तुला परत तुम्हा अभीरांमध्ये पाठवावे व तुझ्या माध्यमातून तुम्हा अभीरांची अज्ञानाच्या अंधकारातून मुक्तता करावी. आता मूळात आही यादवच जरासंधाच्या सततच्या हल्ल्यांपासून मुक्त होण्यासाठी इथवर येऊन ही नगरी स्थापन केली. सतत त्रासलेल्या, गरिबीत पिचलेल्या यादवांना नव्या नगरीची ही संधी फारच मोठी वाटली. साहजिकच तुमच्यावर अत्याचार सुरु झाले. द्वारकेचा राजा वसुदेव, युवराज बलराम. मी मात्र कनिष्ठच. अर्जुनापेक्षा प्रिय मला दुसरे कोणीही नाही. साहजिकच अर्जुनाकडे, पर्यायाने पांडवांकडे माझा सततच ओढा राहिला, साहजिकच मी द्वारकेत कमी व हस्तिनापुरात व त्यानंतर इंद्रपस्थातच जास्त राहिलो, तस्मात यादवांकडून तुम्हा अभीरांवर होणार्या अन्यायाबाबत माझे तुम्हांकडे दुर्लक्षच झाले. अर्जुन व माझ्या मैत्रीचे हे नातेसंबंध अधिक गहिरे करण्याची माझी इच्छा होती त्यामुळेच माझी प्रिय भगिनी सुभद्रा हिचा विवाह मी इतरांशी पर्वा न करता अर्जुनाशी लावून दिला. द्वारकेच्या पाठीशी पांडवांचे प्रचंड सामर्थ्य उभे राहावे हा उद्देशही होताच पण तो तसा दुय्यमच. अर्थात सुभदेच्या बाबतीत तुझ्यावर अन्यायच झाला पण तत्कालिन परिस्थितीचा विचार करता हे शक्य तरी झाले असते का याचा विचार कर. माझ्या कोपिष्ट बंधूने तुला तेव्हाच मृत्युदंड दिला असता. एका परीने मी तुझे तेव्हा प्राणच वाचविले आहेत.
राजसूय यज्ञात मी केलेल्या शिशुपाल वधाबद्दल तू मला दोष देत आहेस पण शिशुपाल आम्हा यादवांचा कट्टर वैरी होता हे तू ध्यानात घेत नाहीस. आपल्या वैर्याने आपला काटा काढण्याआधी आपणच त्याचा काटा काढावा हे तर समाजमान्यच आहे. जरासंधाचा जावई असलेला हा शिशुपाल जरासंधाच्या वधानंतर आम्हा यादवांना सुखाने जगू देणार नाही हे तर उघडच होते. निमित्त मिळताच मी त्याचा काटा काढला पण यात मजकडे यत्किंचितही दोष जात नाही. दोष असलाच तर इतकाच त्यासाठी मी जागा आणि वेळ चुकीची निवडली. पांडवांच्या यज्ञात व्हायचा तो अपशकुन झालाच. पण या निमित्ताने आम्हा यादवांचा दरारा वाढायलाही सुरुवात झाली.
तू म्हणतोस की शस्त्रयाग केलेल्या अर्जुनाला मी युद्धासाठी प्रवृत्त केले. मला तसे करणे भागच होते. वास्तविक मी युद्ध थांबवण्याचा निकराचा प्रयत्न केला. शिष्टाईसाठी मी खुद्द हस्तिनापुरात जाऊन आलो, इतकेच नव्हे तर पांडव संपूर्ण इन्द्रपस्थासाठी आग्रही असताही मी केवळ माझ्या जबाबदारीवर पांडवांसाठी फक्त ५ गावांची मागणी केली पण सत्तांध दुर्योधन तेव्हढीसुद्धा द्यायला तयार झाला नाही. अंध राजा, हतबल भीष्म, पुत्रमोही द्रोण, मदांध दुर्योधन त्याचे कुटील सल्लागार कर्ण, शकुनी आणि दु:शासन. एकूण युद्ध अटळच बनले होते. आणि ऐन युद्धाला प्रारंभ होण्यापूर्वी माझा सखा अर्जुन हात गाळून बसला. अर्जुनासारखा प्रबल वीर जेव्हा असा शस्त्रत्याग करतो तेव्हा सैन्याचे मनोधैर्यच त्याला सोडून जाते. साहजिकच पांडवांचा पराभव तसेच त्यांचा वंशविच्छेदही दुर्योधनाच्या हातून झाला असता. तेव्हा अर्जुनाला पुनः युद्धसंमुख करणे मला भागच होते. विजय हा पूर्णपणे विजयच असतो, जरी तो कुठल्याही परिस्थितीत मिळाला तरी. प्रचंड संहार झाल्याने पांडवांना जरी वृद्ध, अपंग प्रजाच प्राप्त झाली तरी अंतिमत: विजय त्यांचाच झाला. परिक्षिताच्या रूपाने त्यांचा वंश अंकुरु लागला आहे त्याचबरोबर त्यांची प्रजासुद्धा लवकरच बहरेल.
युद्दानंतर मात्र आम्हा यादवांना कोणी शत्रूच न उरल्याने आम्ही यादव मात्र कमालीचे सामर्थ्यशाली झालो. अनिर्बंध सत्ता ही नेहमीच षडविकारांना निमंत्रण देते. युद्धातल्या भीषण संहारानंतर मी सुद्धा द्वारकेतील माझे उरलेसुरले लक्ष सुद्धा काढून घेतले व हळूहळू विरक्तीच्या मार्गावर लागलो. यादवांचा विनाश अटळ होताच. त्यांच्या मरणाने ते गेले. मला त्याबद्दल यत्किंचीतही दु:ख वाटत नाही, किंबहुना मी आता सर्वच सुखदु:खांच्या पलीकडे गेलो आहे. आता माझा मृत्यु तुझ्या रूपाने माझ्या समोर उभा ठाकला आहे याची मला पूर्णपणे जाणीव आहे. माझ्या वधाच्या रूपाने तुझ्यातील खदखदता ज्वालामुखी तरी शांत व्हावा.
प्रतिक्रिया
सगळे भाग वाचले.
वेगळ्या विषयावरचे
वेगळे इंटरप्रिटेशन लैच आवडले.
मिपावरील सध्याचे २ धागे
हम्म....आवड आपली आपली, जे
काय आवडले, काय नाही
थोडक्यात सांगायचे तर…
काही प्रश्न
अर्जुनाबरोबर यादवांचे
कृष्ण विषण्ण मनस्थितीत ???
आफ्टर वॉर कथा आवडली !
सर्वप्रथम- तस्युनामी नाव लैच
द्वारका आणि अन्य ठिकाणी नक्की
इथे या पेपरमध्ये पान क्र. ३
विजयदुर्ग किल्ल्याजवळची
हे रोचक आहे! मी वर दिलेली
बर्याच किल्ल्यांवरील बुरुज हे
बर्याच किल्ल्यांवरील बुरुज हे
मस्त माहिती दिलीस रे !
धन्स
चित्र दिसत नाहिये.
हीच ती नाणी का?
डावीकडच्या फटूत अनुक्रमे
या संदर्भाने विसुनानांचे हे
बासरी धारी देव
खणखणीत (त्या नाण्याच्या आवाजा
क्या बात!!!!!!
होय... द्वारका सापडली आहे.
महाभारतात द्वारकेचा उल्लेख
माफ करा पण हा उल्लेख
सम्पूर्ण संदर्भ मिळणे कठीण
मी दिलेल्या पेपरात बेट
नकाशाबद्दल धन्यवाद.
या पेपरमधे बरीच
महाभारतात द्वारकेचा उल्लेख
हिस्ट्री chanal वर बेट
द्वारकेचे चित्र
जबरदस्त लेखमाला
खूप सुंदर लेखमाला झाली.
कल्पनाविलास आवडला.
कल्पना विस्तार म्हणून आवडली
+१
लेखमाला
+१
+१००
श्रीकृष्ण उवाचः
जे बात वल्लीबाबू, जियो..
जे बात वल्लीबाबू, जियो..
क्या बात, क्या बात!!!!!!!
वाहवा
Pagination