Welcome to misalpav.com
लेखक: गंगाधर मुटे | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

आवडलं. परवाच कुठल्यातरी प्रतिसादात शेतीच्या कामात वारीचा कोणताही अडथळा येत नाही हे पटवून देण्याचा प्रयत्न केला होता.

हो! मीच सांगीतल होतं. अन अजुनही सांगेन. कारण शेतकर्‍याची आहे, पश्चीम महाराष्ट्रातली आहे. दसरा ...एक दिवस...पोळ्या केल्या, संध्याकाळी सोन लुटलं, घरच्या देवाला, थडग्याला(पूर्वज) नमस्कार केला, संपला. असा काही फार वेळ खर्ची पडत नाही. दिवाळी जरा लांबते, पण बहुतेक फराळ दोन दिवसात करुन होतो. शेतकरी पद्धत...एका रात्रीला आठदहा कुतुंब एकत्र जमतात. दोन चुलाण्या लावल्या जातात, एकजण बुंद्या पाडायला बसतो. एकिकडे चिवड्याची तयारी. प्रत्येक जण आपापल सामान आणतो. एकाच्या पिठानंतर दुसर्‍याच्या पिठाच्या बुंद्या पाडल्या जातात, वेगवेगळ्या ठेवल्या जातात, वेगवेगळे लादु बनतात, बाकिचे सगळे करंज्या, चकल्या, जवळ जवळ एका रात्रीत दहा घरचा फराळ तयार होतो. मे बी मुटेंचा भाग वेगळा आहे. आम्ही सहकारी तत्वावर आहोत. आम्हाला सोसायटीकडुन कर्ज मिळते. वर्षाच्या शेवटी सोसायटी भरायची. कामकरी वेगळे. त्यांना काहीच भ्रांत नसते, बर्‍याच गोष्टी एकमेकाला अदलाबदली मदत करुन पार पडतात. अन समोर जमिन बोलवत असणारा पंढरपुराला पळणारा शेतकरी मी तरी पाह्यला नाही. जो आळशी असेल तो नक्कीच मरेल. आळसाने मरेल. आणि एका कुटुंबातला एक माणूस देवाला गेला तर बाकिचे काय करत होते? बायको काय करत होती? ती नाही सुरु करत शकत ही कामे? शेतीच्या कामात बाई-माणसाचा फरक हा फक्त बैल जुंपण्यावर अन अवजड उचलण्यापुरताच असतो. खुरपण, निंदणी, फवारणी आमच्या भागात स्त्रीयासुद्धा करतात, उसाच्या शेतात फुल प्यांटा अन शर्ट अथवा शर्टच्या बाह्या बांधुन काम करतात म्हणुन बर्‍याच वहिण्यांना चिडवायचे मी. शहाणपणाने राबणार्‍याचा कधीच तोटा पाह्यला नाही मी. कदाचित शाहू महाराजांची पुण्याई!

पश्चीम महाराष्ट्रातली आहे.
ओहो. इथे ही प्रांतवार फरक आहे का. म्हणजे प्रत्येक भागातल्या शेतकर्‍यांचे प्रश्न (असले तर) वेगळे आहेत.

सारं नाही पण बहुतेक लिखाण पटतंय. सणांची निर्मिती आणि उद्देश दोन माणसांचे, परिवारांचे आणि पर्यायाने समाजाचे एकमेकांशी असलेले संबंध सुधारावेत, त्यातून एकमेकांना पूरक फायदा व्हावा हा होता आणि तो असला पाहिजे तरच तो खरा सण नाही तर सण आणि जत्रा ह्यात फरक काय राहिला. ही सारी दुर्दशा आततायी देखाव्यामुळे आलेली आहे. आपण प्रत्येक सण त्यातील देखाव्यापायी आणि पैशापायी खराब आणि फक्त खराब केलेला आहे. कशाला प्रत्येक सण विकत घेतलेल्या नव्या कपड्यांनी, मिठायानी साजरा करायाला हवा. विशेष करून प्रत्येक सणामागे जे पैशाचे जे शेपूट जोडले जाते ते आधी प्रत्येकाने बंद करायला हवे.

अगदी पटलं. म्हण आहे "ऋण काढुन सण करायची काय गरज?"

आहो तुम्ही तिकडे AC मध्ये बसून नोकऱ्या करताय, मनाला वाटेल तेव्हा शनिवारी रविवारी मोठ्या mall मध्ये जावून खरेदी करून येवू शकता त्यामुळे तुम्हाला कदाचित सणावाराला घेतलेल्या कपड्याची नवलाई नाही वाटणार. पण जरा स्वताच्या गावाकडच्या लोकांची आठवण करा, त्यांना वर्षभरात केव्हा वेळ मिळतो त्याचे जरा गणित करून बघा. सणवार हे ह्याच्यासाठीच असतात कि सर्वांनां १ २ दिवस रोजच्या कामातून सुट्टी मिळावी, थोडाफार गोडधोड थोडीफार खरेदी करावी आनंद साजरा करवा. उद्या तुम्हाला उठून कोणी म्हणाले कि स्वताची खर्च करायची ऐपत नसताना कशाला क्रेडीट कार्डे वापरून खरेदी करता; तर चालेल का ? हा उगाचच भरमसाठ कर्ज कडून सणवार साजरे करणे मलासुद्धा पटत नाही; माणसाने अंथरून पाहून पाय पसरावेत पण बहुतेक शेतकरी/लोक आपली ऐपत बघूनच कर्ज कढतात आणि कष्ट करून ते फेडतात पण.

उद्या तुम्हाला ऊठून कोणी म्हणाले कि स्वताची खर्च करायची ऐपत नसताना कशाला क्रेडीट कार्डे वापरून खरेदी करता; तर चालेल का ?
अहो त्यांना चालले किंवा नाही चालले तरी बँकेला चालेल का? मी ही सुरुवातीला क्रेडीट कार्डावर भरमसाठ खर्च करून वेळेत खात्यात पैसे भरू शकलो नाही. शेवटी ८५०००/- (मुद्दल+व्याज+दंड आकारणी) भरून मान सोडवून घ्यावी लागली. कानाला खडा लावला.

एखाद्या सदस्याबद्दल काहीही माहित नसताना सरळ सरळ एवढे जेनेरीक स्टेटमेंट आणि शाब्दिक गोंधळ कशाला. मी सरळ आणि स्पष्टच सांगतो होय गावाकडच्या लोकांना कामा व्यतिरिक्त भरपूर वेळ असतो. त्याच्या निम्मा जरी नीट वापरला ना तरी कोणापुढे हात पसारावे लागणार नाहीत.

शेतकरी सणासाठी कर्ज काढतात म्हणुन कोणी सांगीतल तुम्हाला खंबो जाप? मी शेतकर्‍याची आहे ते नुसत नावाला नाही! मी शेतकर्‍याचीच मुलगी आहे. स्वतः उभा राहुन शेत बघितलय. तिकडे काय परिस्थीती आहे ती मी नुसती जाणत नाही ती परिस्थीती मला जाळते. मला सणावारांबद्दल, परंपरांबद्दल फारशी जरी नसली तरी थोडीफार आस्था आहे. उगा उठायच अन प्रत्येक परिस्थीतीच खापर भारतिय परंपरा अन देवादिकांवर कशाला फोडायच? आता सणांबद्दल. आपले सण हे आपल्या लोकांच्या आड येण्यासाठी बनवेल का कोणी? निदान माझ्या भागात सणांमुळे कोणाचे शेतीचे नुकसान झालेले मला दिसले नाही. नाही जमला सण करयला दाखवा गुळाचा खडा देवाला चला पुढे अस अ‍ॅटीट्युड असतो आमचा.

शेतकरी सणासाठी कर्ज काढतात म्हणुन कोणी सांगीतल तुम्हाला खंबो जाप?>> कर्जच काय वेळ पण देत नाहीत. भात कापणी आधी मग काय ते दिवाळीच बघु अस मावशीच्या गावात सर्रास पाहिलय. आमच्या मातोश्री त्यावेळी दिवाळीचा फराळ मावशीला, आत्याला, मामाला पाठवत असे. मग कापणी झाली की मळणी वै बाप्या लोकांवर सोडुन बाया दिवाळीचे खडूगळी, कानवलं करायला बसायच्या.

सगळेच शेतकरी कर्ज काढतात असे म्हणायचे नाही मला पण जे नाईलाजाने काढतात त्याचे बोलत होतो मी; मला पण हेच म्हणायचे आहे
"उगा उठायच अन प्रत्येक परिस्थीतीच खापर भारतिय परंपरा अन देवादिकांवर कशाला फोडायच?"
मी स्वतः शिक्षण बरोबर शेतातच काम करत होतो आगदी म्हशी धुण्यापासून ते मळणी करण्यापर्यंत. माझ्या घरी सुद्धा तुमच्यासारखे पहिले शेतातले काम बघितले जते. फक्त मुद्दा एव्हढंच होता कि आपण सगळे सध्या चांगल्या सोयीसुविधा मुले हळूहळू सणांची नवलाई / मज्जा विसरत चाललो आहोत. माझे नाव खंबो जाप नाही बो जाप आहे (टक्यावर बोजाग्यावर लटी) ;-) स्वगत :- च्यामारी id बदलावा का ?

तुमच्या आयडीवरून तो कशाचा शॉर्टफॉर्म असेल असा आजिबात बोध होत नै. स्वाक्षरीत लाँग फॉर्म ठेवला तर लग्गेच कळेल. बाकी लाँग फॉर्मवरून तांबड्या-पांढर्‍याचे गाव कळ्ळे ;)

बाकी लाँग फॉर्मवरून तांबड्या-पांढर्‍याचे गाव कळ्ळे काय निरीक्षण का काय म्हणतो मी… =))

इतके दिवस सण-वार हे शेती आणि पर्यायानी शेतकर्‍याशी संलग्न आहेत असं मानत होतो (वारीचा अपवाद). पण हा नजरिया वेगळा आहे. आवडला. जे.पी.

खूप नीट आणि कालक्रमाप्रमाणे लिहिल्याने अतिशय संगतवार लिहिलेला लेख आहे. आणि शेतकर्‍यांच्या दृष्टिकोनातून एक वेगळा विचारही आहे. पण अनेक गोष्टी पटल्या नाहीत. १. रावसाहेब सावकाराचा कावेबाजपणा हा एका धूर्त माणसाचा डाव आहे ज्याला चक्रधर फसला. त्यात सणाचे किंवा वारीचे कारण कितपत आहे हा चर्चेचा मुद्दा आहे. २. कापूस हे परंपरागत पीक नसावे असा अंदाज आहे. नगदी पीक म्हणून गेल्या काही दशकात वर आलेले आणि दुर्देवाने कर्जाच्या विळख्याने आणि आत्महत्यांमुळे कुप्रसिद्ध झालेले आहे. पूर्वी - अगदी दोन एकशे वर्षामागे इतक्या मोठ्या प्रमाणावर कापूस लावला जात होता का की ज्याचा शेतकर्‍याच्या आयुष्यावर परिणाम होईल आणि या सणवारांचा असा उलटा 'उपयोग' केला जाईल? ३. नागपंचमीला करंजी, लाडू, चकल्या -- बाप रे .. कल्पना नव्हती की गरीब शेतकर्‍यांकडे हा सण दिवाळीइतका मोठा असतो. पश्चिम महाराष्ट्रात कणकेचे गूळ किंवा पुरणाचे दिंड तेवढे पाटावरच्या नागोबाला पुजेला नैवेद्याला असतात. चुभुदेघे ४. राखी हे पूर्वी बहिणीला जरा माहेरवाशीण होण्याचे किंवा भावाला भेटण्याचे निमित्त होते. पंचक्रोशीतल्या नात्यागोत्यात खूप जास्त प्रवास खर्च होत नसावा. ५. बैलपोळा तीन दिवस हाही स्थानिक रिवाज असावा. ६. श्रावण व्रतवैकल्यांचा महिना. त्यात इतर खर्चिक सण कुठले असतात.. ७. दिवाळी ही सुगी साजरी करण्यासाठी असते असे पूर्वी वाचले होते. ८. संक्रांतीला सुगडात तेव्हाची पिके काही प्रमाणात ठेवून प्रतिकात्मक रित्या आलेल्या पीकाचा आनंद किंवा कृतज्ञता व्यक्त होते असे सांगतात. संक्रांतिलाही गुळाची पोळी, तिळगूळ.. काही प्रकार होतात. ज्यात खर्च होऊ शकतो! ९. होळी रे होळी पुरणाची पोळी.. इथेही साजरा करायला वाव आहे. १०. नंतर येतो गुढीपाडवा. वर्षाचा पहिला दिवस. गोडधोड करण्याची संधी.. ११. आकाशदिवे हे घरी बनवले जायचे.. खूप काही खर्चिक प्रकार २०-२५ वर्षांमागे नव्हता तर जेव्हा ही पद्धत पडली तेव्हाही नसावा. हे मुद्दे माझ्या अल्प माहितीप्रमाणे आहेत. शेतकर्‍यांच्या अडचणी / आयुष्य याचा अर्थात प्रत्यक्ष अनुभव नाही. त्यामुळे काही कमीजास्त असेल. पण एकूण मुद्दा इतकाच की सण हे बरेचदा त्या त्या ऋतूमानानुसार योजलेले आहेत. श्रावणात हवा खराब असताना वातूळ खाऊ नये याचे निर्बंध, दिवाळीत थंडी येते तेव्हा तेल लावून गरम पाण्याने शरीराची काळजी घेतली जाते, जानेवारीच्या कडाक्यात तीळ आणि गूळ शरीराला उष्णता देतात. अनेक अशा गोष्टी आहेत ज्या धर्मकर्तव्याचा / परंपरांचा मुलामा लावून दिल्या आहेत ज्यायोगे त्या पाळल्या जाव्यात आणि त्यामागचे कारण न समजताही सामान्य लोकांना त्याचा फायदा व्हावा. पण त्यात परंपरांची भर पडत पडत न पेलवणारे रुढींचे ओझे तयार होते. आणि मूळ उद्देश बाजूला राहून अशा प्रकारची विमनस्कता आणि डिटॅचमेंट (मराठी?) येते. कालमानाप्रमाणे योग्य त्या चांगल्या गोष्टी चालु ठेवून समाजाचे दडपण - peer pressure न ठेवता सण साजरे केले तर त्यातला आनंद घेता येऊ शकतो. प्रत्येक समाजघटक हा बाकी समाज माझ्यावर अन्याय करण्यासाठीच टपलेला आहे अशा विचारात राहिला तर त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. त्यामुळे लेख चांगला असला तरी हे तात्पर्य मात्र अजिबात पटले नाही : "परंतु शेतीमधल्या मिळकतीचा संचय शेतकर्‍याच्या घरात होताच कामा नये, शेतकरी कायमच कर्जबाजारी राहावा हा उद्देश स्पष्टपणे डोळ्यासमोर ठेवूनच सणांची निर्मिती आणि रीतिरिवाज अगदी प्राचीन काळापासून नियोजनबद्धरितीने आखल्या गेले आहे, हे उघड आहे. "

पण एकूण मुद्दा इतकाच की सण हे बरेचदा त्या त्या ऋतूमानानुसार योजलेले आहेत
खास शेतकर्‍यांना टारगेट करण्यासाठी असं केलं असेल असं वाटत नाही. उलट शेतकरी हा पुर्वीपासुनच समाजाचा खुप मह्त्वाचा घटक आहे. सावकारी नंतर आली असणार. सावकारांनी हे सण असे आखले हे म्हणणं हास्यास्पद आहे. हो पण कुठल्या का कारणाने होईना, शेतकर्‍याच्या आर्थिक गणितांवर सणवाराच्या चक्रामुळे फरक पडत असेल हे मान्य..

हुशार शेतकरी कधीच कर्जबाजारी होत नसतो ... आमच्या एकडे पश्चिम महाराष्ट्रात उस शेतकरी एकरी किमान १ -२ लाख (किमान) कमावतात !! कर्‍हाड कोल्हापुरच्या शेतकर्‍यांच्या दारात स्कॉर्पियो ...पजेरो लागल्या आहेत ... पंजाब मध्येही शेतकरी श्रीमंतच आहेत . बंगाल तमिलनाडु इथेही नक्कीच असतील ... शेतकर्‍याच्या कर्जबाजारी होण्याला इतर अनेक कारणे आहेत ... त्यातले एक हे सण आणि त्यावर होणारा पैशाचा अन वेळेचा अपव्यय हेही एक कारण असु शकेल अगदीच नाही असे नाही . "पण केवळ हेच कारण आहे" असं सुचित करणं ...एका विशिष्ठ चॅनलायझिंग पोलरायझिंग चा प्रकार वाटतो . अवांतर : शेतकर्‍यांची कर्ज बाजारी होणाची कारणे असा एक सर्वसमावेशक लेख लिहावा अशी विनंती आहे . त्यातही विशेष करुन आधुनिक शेतीविषयीचे घोर अज्ञान ह्यावर लेख अपेक्षित आहे .

हे एक लिहायचे राहिले . शेती हा एक बिझीनेस आहे समाजसेवा नाही असे समजुन शेती केली , एक्स्पेन्सेस , टर्नओव्हर , रिव्हेनु ह्यांच्या व्यवस्थित ट्रॅक ठेवला आणि आलेल्या पृऑडक्टचे व्यवस्थित मार्केटिंग केले तर फायदा व्हायला पाहिजे !! इथे मला तरी फक्त २ पृऑब्लेम दिसतात १) शेतकरी ह्यातल्या बर्‍याच गोष्टी ऑटसोर्स करतो , मग हे आऊटसोर्सड लोकं ज्यांना दलाल म्हणतात ते ह्याचा फायदा उचलतात ...सो हे सारं शेतकर्‍यांनी इन हाऊस करणे अत्यंत आवश्यक आहे . २) शेतकरी कृषी उत्पन्न समीती नावाचा काहीतरी प्रकार आहे जो म्हणे शेतमालाच्या किमती ठरवतो . ( ह्याबद्दल ठोस माहीती नाही , करेक्ट मी इफ आय एम रॉन्ग ). हे असं जर काही असेल तर ते अन्याय्य आहे , शेतकर्‍यांनी घाम गाळुन पिकवलेल्या शेती उत्पन्नाचा दर ठरवण्याचा अधिकार शेतकर्‍यालाच असला पाहिजे . हे आणि असे इतर काही प्रॉब्लेम जर व्यवस्थित सोडवले तर आर्थिक अपयशाचे खापर सण संस्कृतीवर फोडायची वेळ येणार नाही .

शहरी लोकांच्या शेतीबद्दलच्या चुकीच्या कल्पना हाही एक मोठा प्रॉब्लेम आहे...

आमच्या एकडे पश्चिम महाराष्ट्रात उस शेतकरी एकरी किमान १ -२ लाख (किमान) कमावतात !! कर्‍हाड कोल्हापुरच्या शेतकर्‍यांच्या दारात स्कॉर्पियो ...पजेरो लागल्या आहेत ... पंजाब मध्येही शेतकरी श्रीमंतच आहेत .
मुद्दा अत्यंत योग्य.. अन्य कारणेच जास्त असतात.. पण उदाहरणं सर्वच बागायती.. :) लहान लहान शेतकर्‍यांनी एकेक एकरात रडतखडत आणि अडचणींचे डोंगर उपसत, तक्रार करत शेती करत राहण्याऐवजी मोठ्या प्रमाणावर शुद्ध व्यावसायिक यांत्रिक शेती वाढण्याच्या दृष्टीने इंडस्ट्री डेव्हलप होण्याची काही जादू झाली तर उत्तम होईल.. शेतकर्‍यांचं काय? त्यांनी कुठे जायचं असा प्रश्न येईलच. पण तो आत्ताही आहेच. त्यावर उपाय काढला पाहिजेच. फक्त बुडीतखाती व्यवसाय आहे याची खात्री असतानाही तोच करत राहण्यात अर्थ नाही हेही खरं. सध्याही शेतकरी अन्न तयार करण्याचं पुण्य करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि मानवजातीचं एरवी काय होईल अशा उच्च भावनेतून नक्कीच शेतीत रखडत राहात नाहीत. दुसरा पर्याय नाही आणि दुसरं स्किल नाही म्हणूनच करतात.

ज्या शेतकर्‍यांना शेती तोट्यात चालण्याशी संबंधित समस्या आहेत. ज्या शेतकर्‍यांना मालाचे भाव रास्त न मिळाल्याने ते आणखी गाळात जातात. ज्यांची मध्यस्थांकडून पिळवणूक होते.. ज्यांना योग्य बियाणे रास्त दरात मिळत नाही.. इत्यादि अनेक समस्यांनी जे कर्जबाजारी अथवा पूर्ण नरकासमान अवस्थेत शेती करत आहेत त्या विशिष्ट शेतकरीगटाला तो व्यवसाय सोडून अन्य काही करणं शक्य नाही (स्वाभाविकपणे शेतीतच असल्याने अन्य स्किल डेव्हलप न झाल्याने, अन्य फॉर्मल शिक्षण नसल्याने, भांडवल नसल्याने, वय झाल्याने, बदलाची तयारी नसल्याने अशा अनेक कारणांनी) म्हणून तो तोट्यात असूनही तेच करत राहतो. अन्य व्यावसायिक / नोकर इत्यादि ज्यांचा काहीतरी व्यवसाय अथवा नोकरी वर्षानुवर्षे तोट्यात / बिनपगारी जात आहे, उत्पन्न देत नाही, मिझरेबल स्थितीत जगायला लावते आहे, निराशाजनक आहे अशा स्थितीत ते तीच करत राहात नाहीत. जर दुसरे ऑप्शन्स असतील तर आतबट्ट्याचा धंदा बंद करतात आणि अन्य काही करतात. कारण ऑप्शन्स असतात. अन्ननिर्मिती हे उदात्त कार्य आहे. ते कोणीतरी केलंच पाहिजे. अन्यथा अखिल मानवजात खाणार काय? हे मुद्दे कितीही सत्य असले तरी ते मनात ठेवून शेतकरी शेती करत नाहीत. तस्मात मजबुरीने एकेकटेपणाने लहान लहान तुकड्यात, हालअपेष्टांत शेती करण्याऐवजी सरकारी आणि खाजगी पुढाकाराने एकत्र (बल्क) उत्पादन, निव्वळ व्यावसायिक बुद्धीने आणि केवळ यिल्ड बेस्ड असलेली, यांत्रिक्-एफिशियंट मार्गाने, तांत्रिक आणि अपडेटेड ज्ञानयुक्त नोकरदार अधिकार्‍यांनी मॅनेज केलेली शेती सुरु झाली तर शेती हा एक ठसठसणारा आणि भळभळणारा प्रॉब्लेम न राहता किफायतशीत उद्योग होईल अशी आशा. दोन पिढ्यांमागे माझंही कुटुंब १०० टक्के शेतीवर अवलंबून होतं. त्यामुळे मी कोणीतरी बाहेरचा उपदेश करतोय असं नव्हे. इति.

मी काही शेतकरी नाही,त्यामुळे जास्त काही बोलणे हे योग्य नाही पण पश्चीम महाराष्ट्रात बहुतेक शेतकरी हे शेती सोबत काही जोडधन्दे सुद्धा करतात जसे कि दुग्ध व्यवसाय ई,अर्थात या साठी त्याना बरीच मेहनत घ्यावी लागते तसेच त्यामुळेच त्याना अधीक आर्थिक फायदा होतो,बाकी शेतकर्यानी जर उद्या धान्यच पिकवले नाही तर आमच्या सारख्याना (शहरी माणसाना) उपाशी रहायची पाळी येइल.

पश्चीम महाराष्ट्रात बहुतेक शेतकरी हे शेती सोबत काही जोडधन्दे सुद्धा करतात जसे कि दुग्ध व्यवसाय ई,अर्थात या साठी त्याना बरीच मेहनत घ्यावी लागते तसेच त्यामुळेच त्याना अधीक आर्थिक फायदा होतो.
हेच ते वर म्हटलेल्याचं उदाहरण - न चालणार्‍या धंद्याखेरीज काही (पूरक अथवा वेगळे) करणे.. पण सगळेच तसं करत नाहीत. त्यासाठी जमिनीचा प्रकार, पाण्याची अनुपलब्धता , मूळ व्यवसाय (शेती) याचा आकार अशा अनेक गोष्टींवर हे अवलंबून आहे. मूळ मुद्दा हा शेती किफायतशीर नाही असं ज्यांना दिसतं / जाणवतं त्यांनीही ती तशीच पुन्हापुन्हा करत राहण्याविषयी आहे.
बाकी शेतकर्यानी जर उद्या धान्यच पिकवले नाही तर आमच्या सारख्याना (शहरी माणसाना) उपाशी रहायची पाळी येइल.
चोक्कस.. पण ही भीती आपल्यासारख्या शहरी माणसांच्या बाजूने सत्य आहे. पण आपल्यासारख्या शहरींबाबत तशी भीती खरी ठरु नये (पक्षी: आपण शहरी लोक्स उपाशी मरु नये) अशा मानवतावादी हेतूने शेतकरी हलाखीतही हा व्यवसाय ओढत राहात नाहीत. ते मुळात व्यवसाय / प्राप्ती या इच्छेनेच शेती करतात आणि (सरकारच्या उदासीनतेमुळे, चुकीच्या सरकारी व्यवस्थेने इ इ इ) तोट्यात जाऊनही तोच करत राहतात यामागे दुसरे काही येत नाही म्हणून करत रहावं लागतं, हा मुद्दा होता.

+१ गवि. माझ्या गावात शेती नसली तरी गो़कूळ कडुन म्हैशी घेउन त्याचा दुधाचा धंदा + शेती काम केलं जात. एका पुरुष मजुराचा ५० रुपये मजुरी असा भाव आहे, स्त्री ४० किंवा ४५. + संजय निराधारचे पैसे जर घरात कमावता नसेल तर+ मुलींसाठीचे भत्ते+ शेती नसेल तर त्याचे आण़खी काही रोख पैसे मिळताहेत. माझ्या गावत एकही पुरुष ग्रॅज्युएट झाला नाही असा नाही आहे या पिढीचा. बाहेर नोकर्‍या नाहीत म्हणुन निवांत शेती करतात, त्याची लाज नाही कारण शिकत असताना या कामाची कंटीन्युटी होती. काहीजण इचलकरंजीला गेले, मागावर, पण मग तेथे इतकी व्यसन वाढली की आईबापांनी शिव्या देउन परत आणल, अन शेतकामावर लावल. एकुण शहरात जाऊन बकाल आयुष्य जगण्याऐवजी शेतात राबुन जगण प्रिफर केल जातय यातच सगळ आल.

सणापेक्षा लोक( शेतकरी आणि इअतर सर्व तशीच प्रवाह्पतित/ peer pressure खाली जगणारी सामान्य माणसं) लग्नसमारंभावर जास्त खर्च करतात असे निरिक्षण आहे. पण त्यासाठी लग्न्ससमारम्भ हा प्रकार सर्व्सामान्य माणसाला बुडवण्यासाठीच श्रीमंतांनी तयार केला गेलेला आहे, असं आपण म्हणणं योग्य नाही. वरच्या गोष्टीतल्या चक्रधराकडे 'विवेक' नाही याला बाकी कोण काय करणार?

मुटे साहेब - असा विचार करा, की चक्रधर सारखे मूर्ख शेतकरी आहेत त्यामुळे तुमच्या सारख्या शहाण्या शेतकर्‍यांचा फायदा होतो. मूर्ख शेतकर्‍यांमुळे उत्पादन कमी होत असेल आणि तुमच्या सारख्या शहाण्या शेतकर्‍यांच्या मालाला जास्त भाव मिळेल.

रोचक धागा. उलट-सुलट मते वाचायला मिळत आहेत, हे उत्तम. माझ्या माहितीप्रमाणे 'राखी' हा सण उत्तर भारतियांकडून आलेला असून मराठी लोकात फार पूर्वीपासूनचा नाही. माझ्या लहानपणी भाऊबीज असे, पण मध्यप्रदेशात रहात असूनही तिथल्या (इंदौरी उच्चार: 'तिथल्ल्या') मराठी लोकात राखी हा सण नव्हता. ... सिनेमा व दूरदर्शन मुळे राखीचे महत्व जास्त प्रचारित झालेले आहे.

जुन्या मराठी साहित्यात (लोकगीते, आत्मचरित्रे, धार्मिक साहित्य, आठवणी इ. सर्व) साहित्यात 'राखी' चा उल्लेख येतो का? असल्यास तो केव्हापासूनचा आढळतो, हे कुणाला ठाऊक असल्यास कळवावे. जुन्या सणांचे ठाऊक नाही, मात्र हल्लीचे अनेक 'डे' उदा. वालेंटाईन डे, फादर्स डे, मदर्स डे, एवढेच काय, 'हॅप्पी बर्थ डे' वगैरे मात्र निव्वळ गिफ्ट, कार्डे इ. विकले जावे म्हणून प्रचारित केले जात आहेत, असे वाटण्याजोगी परिस्थिति आहे. असे नित्य नवनवीन 'डे' प्रचारात येत आहेत.

साहेब राखी म्हणु नका रक्षाबन्धन असे म्हणा,हिन्दीत राखीचा अर्थ वेगळा होतो हे आपल्याला माझ्यापेक्षा जास्त माहीत असेल कारण आपले बरेच आयुष्य हे मध्यप्रदेशात गेले आहे.

"हिन्दीत राखीचा अर्थ वेगळा होतो " मी आजपर्यंत समजत होतो हे मराठी संस्थळ आहे. वरचं सगळं हिंदीत लिहिलं आहे हे आत्ताच समजलं. "राखीपौर्णिमा" हा शब्द कुठे वापरावा की तो हिंदीत नाही म्हणून व्याकरणदॄष्ट्या चुकीचा आहे?

माझ्या बोलण्याचा चुकिचा अर्थ घेवु नका आणि चित्रगुप्त यानी आधी असेच उध्रुत केले आहे की राखी हा सण महाराष्ट्रात आधी नव्हता आणि माझ्या माहिती प्रमाणे आपण़ मराठी माणसे नारळीपौर्णिमा हा शब्द वापरतो राखीपौर्णिमा असा नाही (चु भु द्या घ्या )

"शेतकरी कायमच कर्जबाजारी राहावा हा उद्देश स्पष्टपणे डोळ्यासमोर ठेवूनच सणांची निर्मिती आणि रीतिरिवाज अगदी प्राचीन काळापासून नियोजनबद्धरितीने आखल्या गेले आहे, हे उघड आहे " अतिशय विद्वत्तापूर्ण लेख.

लेखाची मांडणी आवडली. सर्वच पटले नाही. पण लेखनातल्या काही पैलूंना दाद दिली पाहिजे. बाकी,मागे गेलेल्या चार लेखांची लेखमालिका या निमित्तानं विसरता आली. धन्स :) दिलीप बिरुटे

शेती करण्याशी दुरान्वये संबंध नाही पण तरीही बरेचसे मुद्दे पटतात. तथापि सणवार, अन्त्य्संस्कारातील खर्च, लग्न कार्यातील खर्च...हे ग्रामीण भागातील प्रमुख ..(top ३)मुद्दे आहेत असे ऐकतो... शेतीसाठी काढलेले कर्ज निदान येणाऱ्या उत्पन्नाशी निगडीत आहेत ... परंतु वरील गोष्टींसाठी काढलेली कर्जे पूर्णपणे अनुत्पादक खर्च आहेत तेही वार्षिक उत्पन्नाच्या कित्येक पट बाय द वे...सावकाराकडे कर्ज काढणारे शेतकरी कोण? (काही एकर) जमिनीचा मालक / काम करणारा मजूर कि आणिक कोणी?....

आमचा एक आय टी मधला मित्र सांगत होता. आपल्या घरातल्या सणांना सुटी मिळत नाही. पण परदेशी सणांना मात्र मिळते. सगळं क्लायेंटच्या मनावर. अमेरीकन, युरोपियन क्लायेंट असेल तर ख्रिसमस, बॉक्सिंग डे, थँक्सगिविंग वगैरे. आखाती देशातला असेल तर त्यांचे सण, उपास तापास, आखाती व्रतवैकल्ये वगैरे महत्त्वाचे.

लेखातील मुद्दे कै च्या कै आहेत. सण म्हणजे सरकारी फतवा नाही कि सगळ्यांनी पाळलाच पहिजे. एखाद्या शेतकर्याला जमा नसेल तर त्याने करू नये. उगाच शेतकरी म्हणून पुळका आणू नये.

१०००-२००० वर्षांपूर्वी निर्माण झालेले 'सामाजिक सण' आणि आजची 'शेतकीय अर्थव्यवस्था' असे शब्द एकत्र जोडले कि लोकांना रोचक वाटतील असा शेकडानी गोष्टी सांगता येतील. मुटेसाहेबांचा लेख 'गरीब' शेतकार्‍यांनी आजच्या घडीला काहीच 'मनोरंजनात्मक्/उत्सवात्मक' करू नये इतके सांगून थांबवता येतो. पण वाचकांना नसलेले ज्ञान लेखात पाहिले कि वाचक इंप्रेस होतात आणि मग त्यांना तो मुद्दाच 'काही कारण नसताना' पटू लागतो. बोनस मिळण्याची वेळ आणि नोकरदारांनी विमा/गुंतवणूक/लग्नकार्य्/पर्यटन्/जबरदस्त खरेदी करण्यावर असाच जबर्‍या लेख लिहिला जाऊ शकतो आणि वाचकांना इंप्रेस करत कंपन्या हे सगळं कसं 'गैर' वळी होत असतं हे पटवता येऊ शकतं.

बोनस मिळण्याची वेळ आणि नोकरदारांनी विमा/गुंतवणूक/लग्नकार्य्/पर्यटन्/जबरदस्त खरेदी करण्यावर असाच जबर्‍या लेख लिहिला जाऊ शकतो आणि वाचकांना इंप्रेस करत कंपन्या हे सगळं कसं 'गैर' वळी होत असतं हे पटवता येऊ शकतं.
जबर्‍या एकदम!!!