Welcome to misalpav.com
लेखक: स्वतन्त्र | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

खूप मेहनत आणि काळज्या असतात. सतत चांगले काम करत राहणे आवश्यक असते तर तुम्ही स्पर्धेत टिकाल. नोकरी एकदा लागली मिळणारे पैसे निश्चित असतात. त्याहून जास्त मिळणार नाहीत. पण कामाची क्वालिटी टिकवून ठेवलीच पाहिजे असे नसते. त्यामुळे ताणतणाव कमी. अर्थात तुम्ही किती पैसे मिळवाल यालाही मर्यादा असतात. तुमच्या मनाची ठेवण जर जोखीम सहज घेण्याची असेल तर धंदा सुरू करावा. नाहीतर स्थैर्य हवे असेल तर नोकरी पकडावी. पेठकर काकांनी नोकरी आणि धंदा दोन्ही गोष्टी यशस्वीपणे केल्यात. ते जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकतील.

अल मख्तूब … मख्तूब … जे व्हायचे ते लिहिलेलेच असते… त्यामुळे जे आहे त्याचा आनंद घ्या. तरीही ज्यांना वाटत असेल की आपल्या ठरवण्या- न- ठरवण्याप्रमाणे घडते, त्यांनी त्यातल्या त्यात समाधान आणि आनंद देणारा पर्याय निवडावा आणि त्याचे जे फळ पदरी पडेल त्याचा आनंदाने स्वीकार करावा.

नोकरी करणार कि धंदा, हे लिहिलंय ज्याचं त्याचं … वाचता येण्या- न- येण्यानं काय फरक पडणार जे लिहिलंय त्यात? ते कुणी वाचावं, म्हणून थोडीच लिहिलेलंय.

सध्या अधिक पैसा कशात आहे ? नोकरी कि धंदा ?
काय उत्कृश्ट जमते त्यावर अवलंबुन. पण प्रांजळ उत्तर हवय तर भ्रष्टाचार.
शिवाय आज शिकून सुद्धा लोक इतके पैसे मिळवू शकत नाही जेवढे पैसे हे लोक थोडा जम बसल्यावर सहज मिळवू शकतात.
कारण शिक्षण धंदा करायला शिकवतेच असे नाहि कि माणसाचे नशिब वा अनुकुलता/प्रतिकुलता ही बदलु शकत नाहि.
मग शिक्षणाचा फक्त Investment म्हणून विचार केला.तर आज शिक्षण माणसाला किती पैसा मिळवून देऊ शकते ?
रग्गड. पण जर टॉप रेंकिग मधेच असाल तरच. उगा का आपल्या तान्हुल्यां/सोणुल्यांना इनफंटावस्थेतच रेसिंग साठि प्रिप्येर केल्ये जात्ये ? पन हाफ नॉलेज इस देंजरस उदाहरणार्थ अभिमन्यो.