माझ्या अल्पमतिप्रमाणे -
१. दुसरा स्वस्त पर्याय ग्रहकांना उपलब्ध नाही
२. नियम पाळायचेच नाहीत इतके आपण ग्राहक म्हणून बेशिस्त आहोत
३. व्यवस्थेचा (इथे पोलिसांचा) वचक नाही, त्यांना हप्ता पोहोचवून काम भागतं आणि ते ही निर्ल्लज्ज पणे कानाडोळा करतात अशा अवैध टपर्यांकडे..
सद्ध्या मुंबईत (दक्षिण, दक्षिण्-मध्य) सकाळी साडेसहा ते नऊ ह्यावॅळात रस्त्यावर उभे राहून पोहे, उपमा, वडे विकले जातात, प्रमाण इतकं हाताबाहेर गेलय की सगळ्या हॉटेलवाल्यांचा सकाळचा धंदा ऑलमोस्ट बसलाय, इमाने इतबारे हॉटेल चालवणारे रडकुंडीला आलेत. मग ही फेअर कॉपिटीशन आहे की सामान्य गरिबाने केलेला काळाबाजर? डोकं चालत नाही...!
मग ही फेअर कॉपिटीशन आहे की सामान्य गरिबाने केलेला काळाबाजर?
एकूण गिर्हाईकांच्या प्रमाणात हॉटेलवाले प्रामाणिकपणे किती कर भरतात हा संशोधनाचा मुद्दा आहे.मुंबईत उडुपी हॉटेलवाल्यांचे कौतुक असते.पण जादा चटणीला जिची किंमत ५० पैसेही नसते तिला ५ रुपये आकारले जातात.
ब्रॅन्ड कुठला ह्यावरही किंमत अवलंबून असते. अॅरो,पिट्रींग्लंडचे सदरे,विजारी महाग असतातच.तो दुकानात्/मॉलमध्ये एका हंगामात एकाच किंमतीला मिळेल.मॉलवाले फेस्टिव सीझनच्या नावाखाली माल (upto 50% off)च्या पाट्या लावून स्वस्तात विकतात.अर्थात त्यामागे गिर्हाईक जादा माल विकत घेईल हे गणित असते.
१००-१२५ रुपयात तयार होणारा शर्ट आपण १०००-१५०० रुपयाला घेतो.
नाई ब्वा.. मि तर काही महिन्यापूर्वीच लक्ष्मी रोड वरून २५० रुपयाचा शर्ट आहे का म्हणून विचारत फिरत होतो. मिळाला सुद्धा एके ठिकाणी. आता तिथूनच घ्यायचे ठरवलेत शर्ट.. २५०, ३००, ३५० मध्ये मस्त मिळतात शर्ट.
कुठं?
मी पण जावं म्हणतो..
१००० चा एक घेण्यापेक्षा १००० चे ३-४ घेऊन वापरले तर वापरताना व्हरायटीपन होईल.
अन् १००० चा शर्ट २ वर्षं टिकणार असेल आणि ४ शर्ट ६-६ महिने टिकले तरी चालेल.
जर आपल्याला आपले शहर साफ, सुंदर, सुरक्षीत हवे असेल, तर या गोष्टीना बाधा आणणार्या घटकांना विरोधच करायला हवा. अगदी प्रत्यक्ष विरोध करायचा नसेल तरी कमीत कमी त्यांना उत्तेजन तरी देउ नये.
फक्त १५ दीवस कुणीही रस्त्यावरच्या फ़ेरीवाल्यांकडून काहीही खरेदी केली नाही तर सगळे फ़ुटपाथ, रस्ते मोकळे होतील. शहराची साफ सफाइ करायला पालीकेची यंत्रणा पुरेशी पडू लागेल. पोलीस, अतीक्रमण वीभाग व इतर काही सरकारी खात्यांचा वेळ आणि करदात्यांचा पैसा वाचेल.
पण जर आपण थोडाफार पैसा वाचवण्यासाठी रस्त्यावरच्या फेरीवाल्यांसारख्या गोष्टींना उत्तेजन देणार असू, तर आपली लायकीच बकाल आणि उकीरडा झालेल्या शहरात रहायची आहे असेच म्हणावे लागेल.
कर्ज घेऊन नंतर त्याचे हप्ते भरू नयेत आणि मग बँकेशी रिनिगोशिएट करावे अशा अर्थाचा आपला प्रतिसाद पूर्वी वाचला होता. [पक्षी- नैतिकता-कायदा वगैरे गेली तेल लावत. आपला फायदा आपण पहावा].
त्या पार्श्वभूमीवर हा प्रतिसाद आश्चर्यजनक वाटतो. (मतपरिवर्तन?)
:)
त्याचं असं आहे, की ज्या गोष्टी करता येण्याजोग्या आहेत त्यावर चर्चा करुया.
साफ- सुंदर आणि सुरक्षित यात फरक आहे.
लोकांचे रोजगार हिरावून घेतलेल्या स्वच्छ पण सामाजिक खदखद असणार्या अशांत शहरात राहण्यापेक्षा कायदे वाकवून का होईना पण जिथे नैतिक मार्गाने लोकांना दोन पैसे मिळवता येतात अशा शहरात/ समाजात राहणे कधीही चांगले.
लोकांचे रोजगार हिरावून घेतलेल्या स्वच्छ पण सामाजिक खदखद असणार्या अशांत शहरात राहण्यापेक्षा
व्वा.. म्हणजे रिक्षा ना प्रवाशाना लूटू द्यावे नाही तर ते अशांत असतील; खिसेकापूंना काही खिसे कापू द्यावे नाही तर ते अशांत होतील; सरकारी ऑफिस मधल्या एजंट लोकांकडे दुर्लक्ष करावे नाही तर ते अशांत होतील; झोपड्पट्टी वाल्यांच्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करावे नाही तर ते अशांत होतील; यादी मोठी आहे. अशांत लोकांना "शांत" करण्यासाठी रबरी बुलेट्स आणि बांबू कधीही वापरता येतात हे लक्शात ठेवावं.
आमच्या परमदयाळू, गोर गरिबांच्या कैवारी,दिनदलीतांसी आधारू,माय्नोरीटीस गोंजारू अश्या काँग्रेस सरकारने रस्त्यावर व्यवसाय करणार्यांना सुरक्षा आणि परवाना देणारे बिल आणले आहे…रस्त्यावरच्या भाजीवाल्यांविरुद्ध गळा काढणार्यांनी बसा कोकलत !!
२००-३०० रुपयांच्या पिज्जा खाणार्यांनी २-३ रुपयांचा विचार करणं योग्य आहे का ?
२००-३०० रुपयांच्या पिज्जा खाणारे २-३ रुपयांचा विचार करत नाहित. सहा महिन्यातुन एखादा पिझ्झा खात असतिल तर गोष्ट निराळी...
यावर नक्कीच आहे. अशी डबल स्टँडर्ड्स वाली लोकं जागोजागी बघायला मिळतात आणि ती डोक्क्क्यात जातात. तळपायाची मस्तकात.
आपण कष्ट करुन मिळवलेल्या पैश्यावर टॅक्स भरतो, त्यातुन हे रस्ते बनतात. हे भाजीवाले ते रस्ते फुकट वापरतात. ह्यांच्या मुळे वाहतुक कोंडी होते.आपले कीती पेट्रोल आणी वेळ वाया जात असेल ( सिंहगड रोड बघा )
घाण करुन ठेवतात. महानगर पालिके ने सफाई ची माणसे काय ह्या फु़कट्यांसाठी ठेवली आहेत का?
वजनात मारतात. उर्मट बोलतात.
पुण्यातल्या बर्याच भाजी विकणार्यांचे उत्पन्न टॅक्सबल आहे, पण एक पैसा टॅक्स भरत नाहीत.
पैसे जास्त गेले तरी चालतील पण मॉल किंवा लीगल दुकानातुन भाजी घेत जा.
चार दमड्या मिळवून दोन चार रुपये ट्याक्स भरणार्या टिपिकल मध्यमवर्गीय माणसाचा हा निर्बुद्ध प्रतिसाद आहे.
इन्कम ट्याक्स वगळता , इनडायरेक्ट ट्याक्सेसही असतात, ते सगळेच भरत असतात.
लीगल दुकान म्हणजे काय? रस्त्यावर बसणार्या लोकांकडूनही नगरपालिका रोजच्या रोज पावती फाडून पैसे गोळा करत असते. ( पुण्यात ही शिष्टिम नाही की काय? )
"टिपिकल मध्यमवर्गीय माणसाचा हा निर्बुद्ध प्रतिसाद आहे."
अहो हे सगळे मिपा पण आजकाल असेच आहे. असे माझे मत आहे.
मग अशावेळी शहाणी माणसे दूर राहतात.हे आपल्या सारख्या सुज्ञ माणसांना पण सांगावे लागते म्हणजे निर्बुद्धाहून निर्बुद्ध कोण?
या धाग्यावरील वरील सर्व प्रतिसाद वाचताना सहज एक विचार मनात आला की इथे फक्त भाजी वरच चर्चा चालू आहे, पण हल्ली दुकानदार दूध आणतो त्याचेही रोज 2 रु. प्रमाणे महिन्याचे एक्सट्रा पैसे चार्ज करतो.घरातील रद्दी हा अजून एक मुद्दा होऊ शकेल, पुण्यात बर्याच ठिकाणी रद्दीचे दर वेगवेगळे असतात, सध्या आमच्या भागात 9 रु, तर मॉडेल कोलोंनीत 12 रु.,आमच्या सोसायटी बाजूचा 6रु. ने घेतो, कारण काय तर तो किराणा माल देण्यासाठीच फक्त या कागदांचा वापर करतो म्हणे.म्हणजे आपल्या सारख्या सामान्यांच्या खिश्यातून महिना minimum 100/- असे खर्च होतात.
वरती एक मुद्दा फुलांचा आला होता, मी सुद्धा डेक्कनला एक मोटठा हार 80रु घेतला दसर्याच्या दिवशी. मला सुद्धा तो महाग वाटला, ते विकणारा एक 18-19 वर्षाचा मुलगा होता, तो स्वता हार बनवत होता आणि त्याच्याहून छोटा त्याला मदत करत होता. मी विचार केला जाऊ देत मुलगा मेहनत करतो आहे ना, माझे थोडे पैसे जास्त गेले पण विचार केला कितीतरी मुल, तरुण बेरोजगार असतात, जे खरच नुस्त बसून राहण्यापेक्षा काही उद्योग करत आहेत तर त्यांच्यासाठी जाऊ देत माझे थोडे पैसे जास्त.
सगळ्यांच्या मतांचा आदर करून आपण आपले विचार व्यक्त करू यात.
एक प्रश्न उसुकता म्हणून- दारू चे दर किती दिवसांनी किवा महिन्यांनी वाढतात.कारण त्या भाववाढीचा कुठे उल्लेख नसतो, किवा भाव वाढले म्हणून चर्चा मी तरी वाचली नाही कुठे.
खर्या मिपाकराची बरीच लक्षणे मिळाली...
विचारांना नव्या दिशा....
१. दूध वाले
२. रद्दी वाले
३. हार वाले (अ.आ. ह्यांनी ही दिशा आधीच दाखवली होती)
४. दारू वाले
एका एका दिशेत १०० प्रतिसादांचे बळ आहे....
तर चौथ्या दिशेत ५०० प्रतिसादांचे बळ असल्याने तो एक वेगळा धागा काढण्यात येईल.
वरील प्रतिसाद विनोदी असल्याने गहन विचार करू नका ही विनंती.......
नाही मी गहन विचार खूपच कमी करते,कारण असा विचार करावा तर बरीच बुद्धी खर्ची करावी लागते, आधीच ईतकी वर्ष अभ्यास करून बुद्धी खर्ची घातली आहे सो आता अजिबात गहन विचार करत नाही.
पण तेवढं 4थ्या दिशेसाठी नवीन धागा काढा नक्की कुणीतरी, तेवडीच आमच्या ज्ञानात थोडी भर पडेल.
कदाचित माझ्या प्रतिसादाने आपण नाराज झाला असाल तर... माफी मागतो...>>>>>>>>> प्लीज असे बोलून मला लाजवू नका. मला आज्जीबत राग नाही आला. उलट तुम्ही दुसर्यांचा, त्यांचा भावनांचा विचार करता हेच खूप छान वाटले.
पो.पा. लिंक शोधत आहे....
तो पर्यंत आमसूले खा....
http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5204332738114588355&SectionId=22&SectionName=%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0&NewsDate=20130810&Provider=-&NewsTitle=%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%82%20(%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0)
अगागागागागागागागा..........चालणारी आमसुले बेक्क्क्क्क्क्क्कार एकदम =)) =)) =)) फेसबुकवर मुक्तपीठ प्रतिक्रिया फ्यान क्लब नामक पेज आहे, तिकडे चिकटवतो हे, बहुत धन्यवाद =))
काय कमेंट आहेत, वा वा वा.
१. Amit - शुक्रवार, 23 ऑगस्ट 2013 - 02:31 PM IST
उडणारे जिरे नाही का पहिले लेखिकेने? आम्ही त्यांना डास म्हणतो …
२. Sud - बुधवार, 14 ऑगस्ट 2013 - 04:43 PM IST
उद्या घरात ढेकुण पाहून त्यांना "चालणारा अक्खा मसूर " नका म्हणू किंवा भुंग्याला बघून "चालणारे व उडणारे चोकलेट एक्लेर्स " नका म्हणू हो
३. श्री - सोमवार, 12 ऑगस्ट 2013 - 08:15 PM IST
लेख मस्त आहे आणि सत्य घटना आहे....मागे एकदा आमच्या घरात २०० विंचू घुसले होते आणि एका रांगेत चालले होते........बायको म्हणाली विंचू आहेत....मी म्हणालो नाही....हि तर चालती आमसुले आहेत............मग आम्ही ती बरणीत ठेवली आणि पित्त झाला कि एक आमसूल खायचो............या पेक्षा मजा एकदा आली......आमची मांजरी रात्री आम्हाला वाघाचा आवाज काढून घाबरवायची ..मग आम्ही तिची मजा केली...एकदा ती सकाळी प्रतार्विधीलीला जात असताना मी वाटेत झोपलो......तिला वाटला कि हा माणूस आहे ...............अश्या खूप सत्य घटना आहेत माझ्याकडे .................@ सकाळ .........कृपया छापाल ना ?????????????/
४. बबली - सोमवार, 12 ऑगस्ट 2013 - 10:14 AM IST
बिचारी पोर. सदाशिव पेठेत वाढलेली... तिस बरे कसे माहित अशणार विंचू.. आमसुले माहित कारण.. त्याची मस्त अशी चव येते आमटी मध्ये घातले वर..
५. sachin - शनिवार, 10 ऑगस्ट 2013 - 07:06 PM IST
नशीब आमसुलाचे सार करून प्यायला नाहीत. काय तर म्हणे चालणारी आमसुले. उद्या एखादी घूस बघून म्हणाल कि चालणारी बीटे.
६. गुरु महाराज - शनिवार, 10 ऑगस्ट 2013 - 06:50 PM IST
कोकणात मी अंघोळ करत बसलो चुकुन दगड हलला,बघतो तर काय ! मगर होती ती....... दच्क्लात......पुढे ऐका....माज्या हातात साबन होता ना ? अहो ते अंडा हॉट तीच....आणि ते फुटून पिल्लू बाहेर आल आणि ते चक्क आमसुले खायला मगु लागल....बोला आता......आता दलु का दलन मुक्त पीठाच...
७. Andy USA - शनिवार, 10 ऑगस्ट 2013 - 06:50 PM IST
काळ्या मुंग्या प्रथम पहिल्या तो अनुभव पुढच्या लेखात "चालणारी मोहरी" म्हणून लिहा. केव्हा वाचीन असे झालेय.
हहहहहहहहहहह्पुवा!!!
वॉर्निंग : शाकाहा-यांनी वाचू नये
वास्को च्या मासळीबाजारात कोळणीकडून मासळी घेताना दाबून, उलटीपालटी करून घेण्यात मजा येते. मॉलमधली महागडी मासळी चवीला पण चांगली नाही लागत.
इथून खालचा मजकूर सार्वजनिक (शाहा देखील वाचू शकतात)
मॉल संस्कृतीबद्दलचा एक लेख. मटा मधे छापून आला होता.
http://www.maayboli.com/node/21238
मासळीवरून पुण्याची आठवण झाली. हर्णेला कुणी राहतं का ?
पुण्यात असताना एक जण हॉटेलसाठी थेट हर्णेवरून मासळी मागवायचे. आम्हाला टेंपो आला कि त्यातली हवी ती घेता यायची. ताजी मासळी असायची ती. बरेच दिवस टिकायची. आमच्या शेजारचे एक बंगाली गृहस्थ भल्या पहाटे उठून नाना पेठेत जायचे. बाहेर निघताना भांड्याचा आवाज यायचा. या रहस्याचा शोध घेतल्यावर कळालं कि अल्पना टॉकीज (कुठे आहे ही ?) जवळ बारामतीवरून एक जण सकाळी सकाळी येतो. इंदापूर कि कुठून गोड्या पाण्यातली मासळी तो आणायचा. हा बंगाली लोकांचा वीक पॉइण्ट असल्याने भल्या पहाटे उठून जायला त्यांना काहीच वाटायचं नाही. मॉल मधल्या मासळी, भाज्यांवर हे बंगाली बाबू खूप उसळून बोलायचे. त्यांच्या बरोबर एकदा मार्केट यार्डात जाउन फळं, भाजी आणि किराणा आणला होता. हवा तसा माल आणि पैशांची बचत हवी असेल तर असंच करायला पाहीजे. मार्केट यार्डाचाच मॉल बनवला तर ? शेतक-यांनाही फायदा आणि गि-हाईकांनाही.
प्रतिक्रिया
का हो खातात तिथे जावुन?
खर॑च प्रश्न अहे..
चटणी
१००-१२५ रुपयात तयार होणारा
ब्रॅन्ड
१००-१२५ रुपयात तयार होणारा
कुठं?
व्यवस्थेचा अभ्यास करायची गरज नाही.
कर्ज घेऊन नंतर त्याचे हप्ते
त्याचं असं आहे, की ज्या
लोकांचे रोजगार हिरावून
अशांत लोकांना "शांत" करण्यासाठी
चालू द्या
तुमचं माहिती जाळं सॉलिड दिसतंय :)
स्ट्रीट व्हेंडर बिल !
.
चांगला लेख आहे. ग्रेटथिन्करTM
बाकी सगळ्यावर भाष्य नाही पण
२-३
ह्या भाजीवाल्यांना रस्त्यावरुन हाकलून दिले पाहीजे.
निषेध!! निषेध !!
.
हे पटले बघा...
चार दमड्या मिळवून दोन चार
या धाग्यावरील वरील सर्व
अभिनंदन.....
नाही मी गहन विचार खूपच कमी
@ त्रिवेनि ....
कदाचित माझ्या प्रतिसादाने आपण
हे अगदी बरोबर बोललात :)
अहो हीच
बेवडे रीत वाचून मुपी वरची ती
हे असे कोडे नका टाकू हो....
सापडली एकदाची.
धन्यवाद....
अगागागागागागागागा.........
धन्यवाद...कशाला,,,,,?
काय कमेंट आहेत, वा वा वा.
हे वाचून कुणीतरी मॉल मध्ये गेला आणि....विचारले तर...
=)) =)) अगदी अगदी!!
अशा प्रकारे......
बादरायण न्हवे
.
त्या हिमालयाच्या उशीतनं बाहेर पडा आता.
वॉर्निंग : शाकाहा-यांनी वाचू
मासळीवरून पुण्याची आठवण झाली.
Pagination