Welcome to misalpav.com
लेखक: जॅक डनियल्स | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

ही लेखमाला कधी संपूच नये. थोडी भर घालून आणि ज्या दिवशी समारोप होईल त्या नंतर मिपा तर्फे दोघांचाही सत्कार करू या...

सरकारनामा मधे दिलिप प्रभावळकरांच्या तोंडी फुर्श्याचा उल्लेख आहे तो पण अंगावर काटा आण्तो आता तर अजुण जास्त. पु. भा. प्र.

जे डी, "अत्यंत खळबळजनक लेखमाला" अशी बातमी टिव्हीवर आली तरी आश्चर्य वाटणार नाही ! खूप माहितीपूर्ण आणि तेवढेच खुसखुशीत लेख असतात तुमचे. पुभाप्र !

छान लेख नेहेमीप्रमाणे हे. वे. सां. न. ल. आमचेही काही अनुभव... Peth1 Peth2 एकदा पेठच्या ट्रेकला हे साहेब काहीबाही खाऊन आरामात पडले होते. आजूबाजूच्या जवळपास ५० लोकांची कसलीही चिंता न करता. आम्हाला बर्‍यापैकी पोझेस देखील दिल्या. अर्थात आम्ही हे सर्व फोटोसेशन लांबूनच केले. खाली उतरताना एका जागी विश्रांती घेत असताना एका दुसर्या ग्रूपने आम्हाला सांगितले की, कोणी एका महाभागाने त्याला हातात घेतले. झाल. सापाने त्याच्या मनगटाचा मुका घेतला. तो मुलगा लगेच खाली उतरून गेला, त्याचे नंतर काय झाले कळले नाही. पण न राहवून घरी जाऊन आधी साप शोधून काढला फोटोवरुन. बांबू पीट वाइपर होता अस वाटल. जे डी नक्की सांगू शकतील. एक माहीती अशी कळली होती की, साप चावल्यावर त्या मुलाच्या मनगटातुन रक्त उडाले. अशा वेळी, विष बाहेर पडून, त्याचा प्रभाव कमी होईल का? खरे काका सांगू शकतील. Nane1 असाच एकदा नाणेघाटात अगदी गुहेच्या बाहेर हे पिल्लू दिसलं. एवढ्या छोट्याश्या त्या पिल्लाच्या नजरेत सुद्धा एक प्रकारची जरब होती ! त्याचा अतिशय आक्रमक पवित्रा बघण्यासारखा होता. जे डी हाही बांबू पीट वायपर आहे काय ?

मस्त अनुभव आणि फोटो सुद्धा ! खालच्या फोटो मधला साप "मलबार पिट व्हायपर" (मलबार चापडा )आहे. तो साध्या पिट व्हायपरचाच भाऊ असतो पण अंगावर सुंदर नक्षी असते. सगळे पिट व्हायपर हे घोणस-फुरसे च्या कुटुंबातीलच असतात. त्यामुळे त्यांचे विष हिमो-टोक्सिकच असते. "रक्त उडाले" थोडी अतिशोयोक्ती वाटते, जास्त करून व्हायपर ब्लेड मारल्या सारखा दात घासतो. आणि ते दात घासणे पण महागात पडू शकते त्यात पण माणूस ढगात जाऊ शकतो. पण चापड्याच्या चावण्याच्या केसेस कमी ऐकल्या आहेत, कारण तो जंगलात राहतो.

जे डी साहेब भारतात आल्यावर आपल्याला भेटायला आवडेल केंव्हा आणि कधी येताय म्हणजे आपल्या सवडीनुसार कट्टा सुद्धा ठरविता येईल.

नक्की ! मी ७ डिसेंबर ला पुण्यात येतो आहे. फक्त डिसेंबर चा शेवटचा आठवडा मित्राच्या लग्नाला जात आहे, बाकी वेळ पुणे(पर्वती)- ठाणे(तलावपाळी) मध्येच आहे.

वा आपण हि आमच्या मैफिलीतील दिसता (ठाणे(तलावपाळी) वर संध्याकाळी पडीक असणाऱ्या लोकांची मैफिल.) मग आपले जमलेच. येण्यापूर्वी जाहीर करा. व्यनि करतोच आहे

नक्की, माझे घरच तलावपाळी वर साई-कृपा च्या बाजूला आहे. त्यामुळे सगळ्या शाळेच्या आणि कॉलेज च्या सुट्ट्या तिकडेच पडीक असायचो. मी साधरण पणे १ एक आठवडा तरी ठाण्यात येईन, तेंव्हा नक्की भेटू.

दर वर्षी किती प्रेमाने आणि ओढीने आम्ही आमच्या कोकणात जायचो - अगदी बिनधास्त. आणि हे लेख टाकून तुम्ही आम्हाला जाम टरकवलेत……. आता ह्या सुट्टीत जायचे कुठे……मोठ्ठा आ! जोक्स अपार्ट… लेखमाला खरंच अप्रतिम झाली आहे. इतकी सचित्र आणि योग्य माहिती कोणीही कधीही दिली नव्हती. एक भाबडा प्रश्न - समजा मी रानात उभा आहे आणि अचानक माझ्या लक्षात आले की पायाला काहीतरी घासत आहे. समजा तो एक साप आहे. तर मी स्वस्थ उभं राहावं की ताडदिशी उडी मारून त्यापासून लांब जावं?

समजा मी रानात उभा आहे आणि अचानक माझ्या लक्षात आले की पायाला काहीतरी घासत आहे. समजा तो एक साप आहे. तर मी स्वस्थ उभं राहावं की ताडदिशी उडी मारून त्यापासून लांब जावं? अशा परिथितित होणारी क्रिया प्रतिक्षिप्त (reflex action) असते... विचार करून काही करण्याएवढा वेळ नसतो. तुम्ही गोठून जावून स्तब्ध उभे राहणार की घाबरून ताडदिशी उडी मारून लांब जाणार हे तुमच्या मूळ मानसिक ताकदीप्रमाणे "होईल", तुम्ही "करणार नाही".

इस्पीकचा एक्का बरोबर आहेत, रिफ्लेक्स वरती सगळे अवलंबून आहे. साप हा जिवंत प्राणी असल्यामुळे तो शेवटच्या क्षणी कसे वागेल हे सांगता येत नाही. तसेच घोणस सारखा साप असेल तर उडी मारून पण उपयोग नाही. त्यामुळे "परिस्थितीत जे योग्य वाटेल ते करा" हेच माझे उत्तर आहे.

सापांच्या (खासकरून भारतातले बिग फोर) दातांची भेदन क्षमता किती असते? म्हणजे पायात फॉर्मल पँट घातली असेल किंवा जीन्स घातली असेल तर ते कापड भेदून साप चावू शकतो का? पायात जाड पायमोजे आणि शूज घातले असतील तर एवढा सरंजाम पावलांचं सर्पदंशापासून रक्षण करायला पुरेसा आहे का?

ओजस.. आज बर्‍याच दिवसांनी वाचायला जरा वेळ मिळाला आणि हा लेख वाचून काढला.... मस्तच लिहित आहेस. आता लेखमाला सुद्धा वाचून काढतो वेळ मिळाला की. :)

सहिच्च ! जॅक डनियल्स तुमची लेखनशैली जबरदस्त आहे , "साप" म्हटला तरी माझ्या अंगावर काटा येतो तुमचे लिखाण खुप विनोदी अन माहीतीपुर्ण आहे ,त्यावरुन एक किस्सा आठवला मागच्या दिवाळीतला मी अन माझा भाउ बाइकवरुन जात होतो तर एका ठीकाणी बरीच गर्दी जमा झालेली होती कुतुहलापोटी गाडी थांबवली समोर एक टपरिवजा दुकान होते लाकडी फळ्यांचे , काय आहे बघु तरा जरी म्हणुन भाउ गर्दित शिरला मी थोडी बाजुलाच उभी होते नंतर गर्दीतुन आवाज आला पळा पळा चावेल चावेल तशी मी जरा गर्दीत घुसुन पाहिले तर आम्चे बंधु दोन फळ्यामध्ये अडकलेल्या किमान ४-५ फुट लांबी अन चांगला जाडजुड नागाला त्या फटीतुन बाहेर काढ्ण्याचा प्रयत्न करत होते ते बघुन मला घेरी यायचीच बाकि राहीली होती बाकिच्या लोकंचा आरडाओरडा चालुच होता " अस करा न तस करा / डोक ठेचा नाहीतर चावेल असे एक एक सल्ले लोकांचे , मी जीव खाउन माझ्या भावाला ओराडत होते कि तु सोड त्याला चावेल तो ,त्याला आइ बाबांना नाव सांगेन अशा धम्क्याही चालु होत्या शेवटी मह्त्प्रयासाने त्याने तो नाग शेपटीला पकडुन बाहेर काढला त्याचे ते अव्याढ्व्य रुप अन त्याचे फुत्कार पाहुन बर्याच जणांची माझ्यासर्खी बोलती बंद झाली होत्ती , तो पर्यन्त एकाने एक गोणी आणुन दीली त्यात त्याने तो व्यवस्थित घालुन गोणीचे तोंड बांधुन एका कॉलवर आलेल्या सर्प्मित्राच्या स्वाधीन केला ,इतर लोकांनी माझ्या भावचे अभिनंदन केले त्या सर्प्मित्राने सुद्धा, पण माझी जी भीतीने गाळन उडाली होती ती मलाच माहीती त्या रात्री मला झोप आली नाही आपल्या बिछण्यात नाग तर नसेल ना म्हणुन मी १० वेळा अंथरुन झटकुन घेतले असेल ;)

बाकीच्या विषारी सापांना वाकुली दाखवून ही लेखमाला आता बिनविषारी भाऊबंदांकडे वळते आहे ह्यामुळे किंचित भ्रमनिरास झालाय पण जेडी म्हणतायत तसं अनुभव नसताना माहिती देणं हेही चुकीचेच. याचे कारण असे, की केवळ माहिती तशी गुगल करूनही मिळते. पण तुमच्या लेखांसारखे लेख विरळाच. नव्हे, इतर कुठेही पाहिले नाहीत. (थोडे आशाळभूतपणे - लिहा हो. तुमचे नसतील तर इतरांचे अनुभव सांगा. पण तुम्ही आवर्जून लिहा. :| ) 'साप' हे खरंच छोटेखानी पण आवर्जून संग्रही असावे असे पुस्तक आहे. डोंगरयात्रेला जाताना जसे मॅक्रो छायाचित्रणासाठी 'फ्लॉवर्स ऑफ् सह्याद्री' घेऊन जावे तसेच खैरेसाहेबांचे 'साप' सुद्धा न्यावेच न्यावे. अभिजांची प्रतिमा खल्लास करणारी - कलेजा हो... त्याबद्दल छाचिंना अगोदरच (प्रेमाने) खडसावण्यात आले आहेच... ;) आता फुरशांचा किस्सा. एका प्रसिद्ध तीर्थक्षेत्राच्या गावी अण्णांनी शाळकरी मुलांसाठी (तसे सर्वांसाठीच) सापांची माहिती देण्यासाठी प्रदर्शन भरवले होते. तो काळ तुमच्या त्या दूध का कर्ज, नागिन सारख्या शिनेमांच्या दुधावर पोसलेल्या पब्लिकचा. प्रथमच असे प्रदर्शन लोक पहात होते, त्यामुळे झुंबडच झुंबड. मैदानात टेबल, टेबलावर सापांच्या काचपेट्या, अण्णा एकेका सापाची माहिती देताहेत. सोबतच कळकळीने विविध अंधश्रद्धांचीही चिरफाड करताहेत. असे दृश्य. अण्णांनी फुरशाची काचपेटी समोर ठेवली आणि माहिती द्यायला सुरुवात केली. लोकांचा बेशिस्तपणा, गलका, याने नीट काही ऐकू येतच नव्हते. अण्णा सांगू लागले, "हा फुरसे. महाराष्ट्रातल्या प्रमुख चार विषारी सापांपैकी एक आहे. लहान आहे, पण धोक्याच्या इशारा देण्यासाठी हा साप जो आवाज काढतो तो चांगलाच घाबरगुंडी उडवणारा असतो." समोरच्यांच्यापैकी कुणीतरी शंका काढली - "मग आत्ता का आवाज काढत नाही? आम्हांला दाखवा ना कसा आवाज असतो ते." "आत्ता शांत पडून आहे, पण चांगलाच मोठा आवाज असतो." - अण्णांचे शांत उत्तर. तेवढ्यात मागून कुणीतरी एक आवाज टाकला, "एक फटका द्या त्याला म्हणजे काढेल आवाज." खीः खीः खीः खीः. पब्लिकच ते. लागलं खिदळायला. अण्णांनी जमेल तेवढं डोकं शांत ठेवत मोठ्याने विचारले, "कोण बोललं रे? जरा पुढे येता का. बक्षीस देतो." आमचा हा शूरवीर टग्या निर्लज्जपणे बसलेल्या गर्दीतून वाट काढत खिदळत आणि आजूबाजूच्यांना आपण कसे लय भारी असे जणू दाखवत पुढे आला. अण्णा - "हं, काय म्हणता?" शूरवीर - "त्याला एक फटका द्या." एकवेळ फुरश्याने उसळून घेतलेला चावा त्याला कळला असता, पण अण्णांचा हात कधी त्याच्या गालावर सण्णकन् पडला हे त्यालाही कळलं नाही. त्याच गर्दीतून आता शरमेने मान खाली घालून आणि गाल चोळत तो परत गेला. नंतरचा सर्व कार्यक्रम अगदी पिनड्रॉप सायलेन्समध्ये पार पडला. पण हे सर्व पाहिलेल्या मला पर्यावरणाबद्दलच्या लोकांच्या अनास्थेवर खूप अंतर्मुख करून गेला. :(

लेखमाला. लिहिण्याची पद्धतसुद्धा अगदी गोष्ट सांगितल्यासारखी. मला स्वतःला सापाची भीती वाटली नाही तरी आवर्जून जाऊन पकडणार नाही. लहानपणी गारुड्याने एकदा त्याच्याजवळचा नाग हातात दिलेला त्यावेळचा थंड, बुळबुळीत स्पर्श मेंदूत कुठेतरी कोरला गेलाय त्यामुळे असेल कदाचित पण या प्राण्याबद्दल तितकी जवळीक नाही होऊ शकली (अर्थातच कुठेतरी वाईट वाटतं). पण सळसळत जाणारे हे जनावर दिसते मात्र अशक्य सुंदर यात वाद नाही. -रंगा

भाग ७ मध्ये मी नागाबद्दल लिहिले आहे ते वाचा. ती एक अंधश्रद्धा आहे.
डूख धरणे ही भावना आहे, नागाचा मेंदू डूख धरण्यासाठी विकसित झाला नसून खाणे कसे शोधायचे यासाठी विकसत झाला आहे. आपल्या घरी बायको- आई ने स्वयंपाक नाही बनवला तर नाक्यावर जाऊन आपण भाजी-पाव खाऊ शकतो पण नागाला मात्र उंदीर (२ आठवड्यातून एकदा का होईना ) स्वतः शोधायचा असतो. जो काही नंतर वेळ उरतो त्यामध्ये स्वतः चे इतर भक्षकापासून (गरुड, घार, माणूस इ.) रक्षण करायचे असते. त्यांची वधूवर सूचक मंडळे नसल्याने दरवर्षी नवीन नागीण (:)) स्वतः शोधून आपली प्रजा वाढवायची असते. त्यामुळे त्याला डूख धरणे वगैरे अश्या फालतू कामांसाठी वेळच नसतो

सही जवाब ! पीएचडीच्या शेवटच्या डिफेन्स मध्ये मिपा चा उल्लेख मी जरूर करणार आहे. इकडच्या दक्षिण-गोऱ्याना पण कळू दे मिसळपाव काय आहे ते...;)

इकडे शक्यतो परत या नंतर. राहेजमाने पे कदम रख तो कोई भी मंजिल पा लेता है। राही तो वो है जो मंजिल भी खुद चुनता है और राह भी खुद बनाता है।

तरीही जे डी साहेब, वास घेण्याच्या तीव्र शक्तीमुळे सापाना हे माग ठेवणे शक्य होत असेल ? खर खोट माहीत नाही पण बर्‍याच कथा ऐकल्या आहेत.

डूख धरणारा एकमेव प्राणी माणूस. आणि माणसांचे घ्राणेंद्रिय सुबोध खरेसाहेबांनी आधीच सांगितल्याप्रमाणे खूपसे बधीर झाले आहेच उत्क्रांतीच्या ओघात. तरीही सापांवरचा संशय अजूनही गेला नसल्यास त्याला इलाज नाही..!

लेखमालिका उत्तम सुरु आहे. फक्त दरवेळी येउन प्रतिसद द्यायला जमतेच असे नाही.

उत्कृष्ट लेखमालिका लिहल्याबद्दल खूप खूप धन्यवाद…. कृपया इथे मी दिलेल्या तू नळी अरील उपचाराबद्दल आपले मत व्यक्त करावे … http://www.youtube.com/watch?v=3rFlNu-ze3s

धन्यवाद् ! मी डॉक्टर नाही, पण जे काही अनुभवले आहे आणि पहिले आहे त्या वरून सांगू शकतो की अश्या व्हिडीओ मुळेच खूप नुकसान होते आणि अंधश्रद्धा पसरल्या जातात. पहिली गोष्ट म्हणजे सापाचे विष शरीरात क्षणार्धात पसरते, ३ तास वगैरे लागत नाही, जर कधी नसे वर चावला असेल तर ३ तासात तो माणूस तिरडी वर पण असतो. जे काही दाखवले आहे, ते त्यामुळे काही कामाचे नाही, एकतर सुरवातीलाच सापांची चुकीची माहिती दिली आहे. मण्यार-नाग आणि घोणस -फुरस असे दोन वेगळे ग्रुप आहेत, मागच्या लेखात लिहिले आहे ही त्यांचे कुटुंब वेगळे असल्याने विष पण वेगळे असते. शेवटी जे औषध सागितले आहे, ते तर काय असेल मला माहित नाही, पण सापाचे विष हे व्हेनोम असते, त्यामुळे रक्तात औषध द्यावे लागते , तोंडाने १० लिटर औषध ओतून पण काही उपयोग नाही. साप चावला तर (जीव वाचवायचा असेल तर)सरकारी दवाखान्यात जावे. लिंक बघून खूप करमणूक झाली !

जेडी साहेब व खरे साहेब,शंकेचे समाधान केल्याबद्दल धन्यावाद …. आपण दोघांनीही प्रतिक्रिया दिल्याने हि उपचार पध्दत व्यर्थ आहे हेच सिद्ध झाले आहे…

जेडी पुर्ण ले़खमाला वाचुन थक्क व्हायला होत..खुपच अभ्यासपुर्ण माहिति तुम्हि आणि डॉ.खरे साहेबानि दिलि. काल निखिल वागले ह्याचा ग्रेट भेट बघत होतो..डॉ. प्रकाश आमटे मुलाखत होति त्यानि सरळ मण्यार उचलुन आपल्या ५ वर्षाच्या नातवाच्या हातात दिलि....पण ते बघताना मला मात्र तुमचे लेख आठवले आणि त्या लहान मुलाविषयी काळजी वाटायला लागली.

वाट पाहत होतो. शंभरावा प्रतिसाद माझा. असो मण्यार तुम्ही हाताळता तेंव्हा ती कोणत्याही तर्हेने उद्दीपित झालेली नसली तरच ती हाताळतात आणी दिवसा मण्यार तशी मंदबुद्धीच असते. तशा स्थितीत ती मुळीच चावत नाही. डॉक्टर आमटे ना हे माहित आहे त्यामुळे ते अशाच वेळी तिला मुलांच्या हातात देतात. शिवाय तिचे पोट भरलेले असले तर ती उगाच कष्ट करीत नाही.

थोडा अवांतर आहे प्रतिसाद. मला सापाची भिती बसलेली आहे. भूत, मगर, वाघ, सिंह यांचं काहीच वाटत नाही हे विशेष. सापाचा फोटो, व्हिडीओ पहायचंही टाळतो नाहीतर स्वप्नात साप येतात. सापाची स्कीन देखणी असल्याचं म्हटलं जातं पण याबाबतीत माझ्याकडून सपशेल पास असतो. त्यातून फुरसं कडकडून चावतं हे माहीत असल्याने हा साप आवडत नाही. भितीयुक्त उत्सुकतेतून धागा उघडला गेला..