Welcome to misalpav.com
लेखक: हुप्प्या | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

चांदूरकराची वाचाळ बडबड ऐकून झाली आता वारसाहक्काने राजकारणात आलेले नितेश राणेही तोच राग आळवत आहेत. आता लताबाईंचे थेट नाव घेऊन त्यांचा भारतरत्न पुरस्कार काढून घ्या अशी मागणी ह्या राणे कुलदीपकाने केली आहे. दिल्लीची मोगलाई आणि महाराष्ट्राचे हे नवे जहागिरदार आपल्या दौलतीच्या जिवावर चांगलेच माजले आहेत. भारतरत्न दिलेल्या व्यक्तीने अमुक एका पक्षाशी एकनिष्ट राहिले पाहिजे असे काही कलम आहे का? भारतरत्न काढून घेण्याची भाषा करणार्‍या लोकांना निवडणुकीत चौदावे रत्न दिसेल अशी आशा!

पंडित ह्रीदाय्नाथ मंगेशकर यांना बांडगुळ म्हणून इथे अकलेचे तारे तोडले गेले , जाऊन अगोदर त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी ऐकावी

जगात अनेकांकडे प्रतिभा असते. परंतु त्यातील काहीजणांनाच कर्तृत्व सिद्ध करता येते. दुसर्याच्या प्रसिद्धीचा फायदा उठवणे ही बांडगुळी वृत्तीच आहे.

हुप्प्या यांचे मिपावरील इतर लिखाण बरेच रिजनेबल आहे, अन्यथा त्यांनाच मिपाचे बांडगूळ म्हटले असते. त्या मंगेश कर द्वयींना काही पदव्या अनावश्यक आहेत आणि प्रसिद्धी अवाजवी आहे हे नम्रपणे नाही तर कठोरपणे म्हणता येते. पण बांडगूळ शब्द अगदीच पातळी सोडून आहे.