Welcome to misalpav.com
लेखक: विश्वनाथ मेहेंदळे | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

असे हरण्याचे प्रसंग आले की प्रत्येक वेळी काही ना काही कारण असतेच पळायचे. समोरा समोर सामना होतच नाही. प्रतिसाद अवांतर आहे. कृ. ह. घ्या.

बंड्याच्या नियमाने बुद्धीबळ खेळा, कारण पट बंड्याचा, कवड्या बंड्याच्या, खेळण्यासाठीची जागा बंड्याची. (तुम्ही आपले सुट्टीत त्याच्याकडे गेलेले ) तेव्हा विजय आणि पराभवाचा विचार करण्यापेक्षा बंड्याशी खेळण्याचा आनंद घ्यावा उग फार विचार करुन नये असे वाटले आणि नै पटलं तर आपण आपला स्वत: बुद्धीबळाचा डाव मांडावा आणि बंड्याला खेळायला निमंत्रण द्यावे तो आला की आपल्या नियमाने त्याला बुद्धीबळ खेळवावे आणि अजिंक्यपद राखावे. :) -दिलीप बिरुटे

नै पटलं तर आपण आपला स्वत: बुद्धीबळाचा डाव मांडावा आणि बंड्याला खेळायला निमंत्रण द्यावे तो आला की आपल्या नियमाने त्याला बुद्धीबळ खेळवावे आणि अजिंक्यपद राखावे.
१. बंड्याचा हेतू केवळ अजिंक्यपद राखणे हाच आहे काय? २. बंड्यासाठी अजिंक्यपद राखण्याचा हाच एकमेव मार्ग आहे काय? या २ प्रश्नांचा विचार करण्यास प्रवृत्त होत आहे

>>>>"A government is the most dangerous threat to man’s rights: it holds a legal monopoly on the use of physical force against legally disarmed victims." कधी घेतलीस रे ही सिग्नातुरे? आडौली. :)

रोचक मुद्दे आहेत !!! पण इफेक्ट बघा. कथानायक व्यवस्थित खेळत राहिल्याने त्याचा खेळ सुधारेल. बंड्याच्या अशा वागण्यामुळे तो जन्मभर केवळ आपल्या घरात राजा राहील. खेळात काडीची प्रगती नाही होणार. शिवाय सदर सामना आणि त्या आधीचे काही सामने समस्त बालगोपाळ मंडळी बघत होती, त्यांच्यापुढे बंड्याची अखिलाडू म्हणून नाचक्की होणार. बंड्या कोत्या मनाचा म्हणून प्रसिद्ध होणार. मग त्याचे परीणाम त्याला बाकीच्या खेळांत किंवा इतरही आस्पेक्ट मध्ये दिसू शकतील. शेवटी बंड्या जन्मभर केवळ बुद्धिबळ खेळत बसणार नाही ना, ते ही स्वतःच्याच पटावर.

पण लेखकाची सही मात्र
=========================== माझं ऐसी अक्षरे वरील लेखन ऐसी अक्षरे वरील नवीन लेखन ===========================
खेळ काय असावा याकडे निर्देश करते.

>>> मी ऐसी विकत घेणार आहे लवकरच... तुम्हाला माहित नव्हते ??? अरे????? तू मालक असलास तर आम्ही मेंबर. बाकी प्रतिक्रिया खूप सुचतात. १. एवढ्यात विकायची वेळ आली का? वाटलेलंच. २. काढलं विकायला? चालत नसेल नीट. ३. कोण घेणार? ४. विमे- बंड्या इन द मेकिंग. ५. कशाला कुणाच्या नादाला लागतोस? ६. आता चर्चा होणारच. शतक नक्की. होऊ दे खर्च. सध्या एवढंच. =))

हो. कारण मुळात विमेनं संक्षींना दिलेला प्रतिसाद सीरियस नव्हता. (ह्यानं विकत घ्यायला मालकांनी विकायला हवं ना? ;) तशी बोलणी सुरु असतील तर आधीच म्हटल्याप्रमाणं विमेच्या संस्थळाचा मेम्बर व्हायला नक्की आवडेल. ) त्या अनुषंगानं 'सुचणारे प्रतिसाद' देखील 'मुद्दाम' दिले आहेत. असो.

विमेकाकांनी कधी नव्हे ते लिहिलं म्हणजे कै तरी भारी असणार! गहन गोष्टींचा आपल्याला झेपेल तेवढा अर्थ लावायचा हो!

बंड्याच्या नियमाने बुद्धीबळ खेळा
बंड्याला वाटेल तेव्हा तो नवा नियम(!) बनवू शकेल (खेळाच्या मध्ये सुद्धा) हे लेखकाला माहीत नव्हतं. म्हणून लेखकाला आश्चर्य वाटलं बहुदा. असो, बंड्या म्हटलं की 'वार्‍यावरची वरात' मधल्या गरूड-छाप तपकीर वाल्याची आठवण येते. पुलः हे काये?? तपकीरवाला: हे... बंड्यासाठी. पुलः कोण बंड्या? तपकीरवाला: आमचा बंड्या, सातवा. पुलः हं !!! कितियेत? तपकीरवाला: नऊएत... सध्या...

बंड्याला काय वाटते यावर खर तर मस्त चर्चा होईल. पण अब वो चर्चा करने के दिन गये. यावरुन छायाचित्र : चतुर कावळाया उपक्रमवरच्या गोष्टीची आठवण झाली. -दिलीप बिरुटे (उपक्रमच्या आठवणीने डोळ्यात पाणी आलेला)

लेख लिहिल्याबद्दल विमेकाकांचे हार्दिक अभिनंदन विमेकाकांचा लेख आनंदाचं उधाण चर्चेला आमंत्रण हीच यातली मेख एक घाव हज्जार तुकडे, निम्मे इकडे निम्मे तिकडे एकच फाईट वातावरण टाईट!! होऊ दे (बँडविड्थचा) खर्च!!!!

'बंड्या' नेहमी अजिंक्यच राहणार. बंड्याच्या ह्या स्वभावामुळं बंड्याच्या विरोधात आणखी एक बंड्या येतो, तो जुन्या बंड्याला मात देतो नि स्वतः बुद्धीबळ खेळतो. थोडे दिवस इमानदारीत खेळतो... कधी मधी हरताना त्याला काही वाटत नाही. पण काही दिवसांनी सगळी पोरं आपल्याकडंच खेळायला येत आहेत हे बघून नव्या बंड्याला मज्जा वाटू लागते. मग काय होतं?????? अवांतर होईल म्हणून नको ब्वा! असंच ना प्रा. डॉ. ??? ;) ;)

आनंदकडे घड्याळ नाही असे दिसते ! आनंदी कार्लसन गडे...

बंडेच,बंडे... चहूकडे (ह्या निमित्ताने, विरोधी उमेदवाराचा अर्जच स्वीकारला जावू नये,तो पात्रच होवू नये, ह्यासाठी यशस्वी प्रयत्न करणारे घड्याळवाले बाबा आठवले.)

बंड्याचं माहीत नाही, पण मुगाबेची अशी कथा सांगतात. तो स्वतः हुकुमशहा असल्यामुळे त्याला हरण्याचं वावडं होतं. आणि त्याच्याकडे इलेक्ट्रॉनिक बोर्ड होता (अजूनही असेल अर्थातच). कोणी कुठच्या मूव्हज केल्या हे लोकांना मोठ्ठ्या स्क्रीनवर दिसायचं. मग कधीकधी काय व्हायचं, की मुगाबेचा वजीर गेला किंवा लवकरच चेकमेट होणार अशी पाळी आली की स्क्रीनवर प्रोजेक्ट करणारे लोक भराभर आधीच्या मूव्हज काढून टाकायचे. त्यामुळे मुगाबेचं प्यादं अनाहितपणे पुढे आलंच नाही, त्यामुळे वजीराला धोका निर्माण झालाच नाही, वगैरे वगैरे सगळी सत्यं अनएक्झिस्ट व्हायची. स्टालिनच्या काळात छापील प्रकरणं असल्यामुळे हे कष्टदायक असायचं, मुगाबेला मात्र एका क्लिकसरशी हे करता यायचं. स्क्रीनवर सगळा डाव मनापासून बघणारांना मात्र प्रश्न पडत असे की आधीच्या सगळ्या मूव्ह्जचं झालं तरी काय? त्यावर मुगाबेचं उत्तर असे, 'काळजी करू नका, त्या मूव्हज काढून टाकलेल्या नाहीत. मी माझ्याकडे व्यवस्थित जपून ठेवलेल्या आहेत. पण आपण इथपासूनच पुढे खेळू.'

आमचं अभिवादन स्विकारा, घासकडवी गुरूजी..... :D

अहो सोप्प आहे, नाना फडवणीस युद्धावर गेला नाही कधी समशेर पाजळायला, त्याची लढाई बाहेर.. तसं बंड्या तुम्हाला बुद्धिबळाच्य पटाबाहेर बुद्धिचं बळ लावतोय (प्रसंगी इतर कुठलही बळ लावेल कदाचित..) तस्मात, आउट ऑफ द बॉक्स (म्हणजे बोर्ड) खेळायला शिकायला हवं आणि तसे पेच/ प्रतिपेच तयार ठेवायला हवेत बंड्याच्या समोर उभं राहायचं म्हणजे!

तरच तुमच्या शर्तींवर खेळ होईल. जर सर्वसाधनं दुसर्‍याची असतील तर दरवेळी न्याय्य गोष्ट होईल असं नाही, तस्मात त्याच्या शर्तींवर खेळायला हवं. अर्थात, आहे त्या परिस्थितीत देखिल बंडूविरुद्ध जिंकणं काही कठीण नाही कारण कपटापेक्षा बुद्धी केंव्हाही श्रेष्ठ आहे; फक्त तुमचा स्वतःवर विश्वास हवा. थोडक्यात, ज्यांच्या हातात काही नाही त्यांच्यासमोर कैफियत मांडून सहानुभूती मिळेल पण तिचा उपयोग नाही, तो जिंकण्याचा मार्ग नव्हे.

अहो काका, मी काय म्हणते, तुम्ही पुढच्यावेळेस कुठलातरी गमतीचा खेळ खेळा की. असे हरण्या-जिंकण्याचे खेळ का खेळायचे म्हणते मी.... भांडणच नको!!

कुठलाही खेळ, अगदी पत्ते किंवा गोट्या पण, जिंकण्यासाठी खेळला जातो. सबब, जिंकणार म्हणून कथानायकाला आनंद होण्यात गैर काही नाही. पण तो जिंकू पाहत होता तो केवळ "खेळ". बंड्याला हे कळेल तो सुदिन.

' असे हरण्या-जिंकण्याचे खेळ का खेळायचे म्हणते मी.... भांडणच नको!!'' हरण्या जिंकण्याचे खेळ अशा सवंगड्याशी खेळावेत जिथे हरलो तरी जिंकलोचा आनंद मिळतो आणि भांडण गोड वाटते

नातेवाईकांकडे जाऊन तुमच्या वयाच्या मुलांशी मस्त मैदानी खेळ खेळण्यापरास हे गप्पा उर्फ गॉसिपिंग करायचं काय सुचलं म्हणे? श्या! :D

स्वभावाला औषध नसतं म्हणतात !! बंड्या हा असाच आहे समजून खेळणार्‍यांना त्रास कमी होत असावा. वागण्याचा कंटाळा येऊन जुने खेळाडू गेले तरी नवे मिळत असतीलच की बंड्याला. त्यांना त्याचा स्वभाव कळला की ते बंद होत असतील मग पुन्हा नवीन कोणतरी. जुने खेळाडू कमी होऊन नवीन येणं बंद झालं असेल तेव्हा कदाचित बंड्याला उपरती झाली असावी. अशा बंड्यांच्या स्वभावाला औषध नसतं. त्यांना फाट्यावर मारावं म्हणजे आपला त्रास कमी होतो. अर्थात पुढे ज्याची त्याची इच्छा!