Welcome to misalpav.com
लेखक: विकास | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

याच जाळ्यात सचिन तेंडुलकर अडकून खासदार झाला. पण नंतर प्रचारासाठी त्याचे नाव यायला लागल्यावर तो सावध झाला व अजून खोलात रूतला नाही.
सचिनचे नाव मध्य प्रदेशात प्रचार करण्यासाठी वापरणार होते काँग्रेसवाले. ८ डिसेंबरला निकाल बघून आपण प्रचाराला गेलो नाही हा किती योग्य निर्णय होता हे त्याला कळले असेल :)
आजच वाचले. २०१४ च्या निवडणुकासाठी काँग्रेस नंदन निलेकणींना बंगळूर मधून उभे करून त्यांचे नाव भावी पंतप्रधान म्हणून जाहीर करणार आहे म्हणे. मोदींना टक्कर द्यायला त्यांच्यासारखा स्वच्छ चेहरा उपयोगी पडेल म्हणे.
मनमोहन सिंहांचे काँग्रेस पक्षाने ज्या पध्दतीने पोतेरे करून टाकले ते बघून निलेकानी या फंदात पडले नाहीत तर चांगले होईल. जे काही चांगले झाले असेल त्याचे श्रेय गांधी घराण्याचे आणि वाईट झाले असेल त्याचा दोष इतरांचा ही मायलेकरांची (विशेषतः लेकाची) रित लपून राहिलेली नाही.युपीए सरकारच्या कारिकिर्दीतल्या भ्रष्टाचाराचे खापर मनमोहनसिंहांवर फोडून ही मंडळी नामानिराळी राहणार हे बघून निलेकानी यात पडले नाहीत तर ते नक्कीच चांगले होईल.

आपण सी डी देशमुख हे नाव आठवून पहा ! मनमोहन सिंग यांच्या कडे जर खरोखरच काही व्हिजन होती तर त्यानी कधीच राजीनामा द्यावयास हवा होता. पोतेरे होण्यात त्यानी धन्यता मानली. नीलेकेणी यांनी संचलित केलेला आधार कार्डाचा कार्यक्रमच अत्यंत बेशिस्तीचा उत्तम नमुना होता. त्यावर न्यायसंस्थेनी देखील प्रश्न चिन्ह उभी केलीयत. ते आय डी प्रूफ आहे की अ‍ॅड्रस प्रूफ यात अजुनही एकवाक्यता दिसत नाही. त्याना राजकारणात ओढल्यास आणखी वाटोळे होईल. या देशाचे जर व्हायचे असेल तर देशमुख ( विलासराव किंवा अनिल नव्हेत ), भाटिया, केजरीवाल , शेषन यांच्या सारखे नोकरशहाना आपण निवडून दिले पाहिजे.मन्मोहन, यशवंत सिन्हा यांच्या सारख्याना नव्हे !

आपण सी डी देशमुख हे नाव आठवून पहा ! मनमोहन सिंग यांच्या कडे जर खरोखरच काही व्हिजन होती तर त्यानी कधीच राजीनामा द्यावयास हवा होता.
+१.अर्थातच पोतेरे होऊ देण्यात त्यांना काही आक्षेप नसेल तर त्यांचे पोतेरे व्हायचेच.
नीलेकेणी यांनी संचलित केलेला आधार कार्डाचा कार्यक्रमच अत्यंत बेशिस्तीचा उत्तम नमुना होता.
आधार कार्ड हे बँक खाते आणि बोटांचे ठसे लिंक करणे याबरोबरच ओळख, जन्मतारीख आणि पत्ता या तीनही गोष्टींसाठी एकत्र प्रूफ असणार असे सुरवातीला सांगितले होते.पण मग त्यात पूर्ण जन्मतारीख न लिहिता केवळ जन्मवर्ष द्यायचे प्रयोजन समजले नाही.तसेच त्या आधार कार्डाच्या फॉर्मवर पत्ता व्यवस्थित लिहायला जागा नाही--उदाहरणार्थ डॉ.रामकृष्ण परमहंस मार्ग यासारखे रस्त्याचे नाव पूर्णपणे त्या फॉर्मवर मावणे जरा कठिणच.तसेच "I have no objection to the UIDAI sharing information provided by me to the UIDAI with agencies engaged in delivery of welfare services" हा प्रश्न आणि त्याचे yes आणि no हे दोन पर्याय मनात थोडासा गोंधळ निर्माण करतातच. असो

१९८४ नंतर अमिताभचे काय झाले होते ते आठवत असेलच. गेल्या वर्षी अमिताभने कुठेतरी लिहीले-बोलल्याचे आठवते (आता मिळत नाही आहे). जेंव्हा १९८५ च्या निवडणुकांनंतर आणि मला वाटते बोफोर्स संदर्भात त्याचे नाव गुंतले होते, तेंव्हा तो बाळासाहेबांना भेटायला गेला होता. त्यांनी अमिताभला एकच प्रश्न अशा अर्थी विचारला की 'तू काही केले आहेस का' म्हणून. त्याने "नाही" म्हणून स्पष्टपणे सांगितले, नंतर ठाकर्‍यांनी त्याला एकच सल्ला दिला (जो इतर कोणिही त्याला दिला असता पण तसे वजन नसते...) "राजकारणात पडू नकोस.." त्याने तो अर्थातच ऐकला. हा किस्सा पुसटसा आठवत असूनही सांगायचे कारण इतकेच की योग्य (विचारांचा आणि वजनाचा) सल्लागार (मेंटर अर्थाने) असला तर चांगले होऊ शकते. कुठेतरी असे वाटते सचीनला अनेक बडे हितचिंतक आहेत. (आणि तसा देखील तो स्वतः जमिनीवर पाय ठेवून आहेच.) नीलकेणी इन्फोसिस सोडून आधार कार्डासाठी कसे आले ह्याचे कुतुहल आहेच. आधी नीलकेणी सोडतात, मग मुर्ती निवृत्त होतात, मग मुर्ती परत आपल्या मुलास घेऊन येतात... सगळेच एका कोड्याचे तुकडे म्हणून ठरवले तर रोचक ठरू शकतील. पण त्यांचा तो अंतर्गत मामला आहे. पण कुठेतरी वाटते की अशा लोकांसाठी सेफ बेट ही नियुक्ती असते अथवा सेफ निवडणूक. त्यामुळे कदाचीत पुढे-मागे ते राजकारणात आले तर राज्यसभेतून येतील आणि जर काँग्रेसचे राज्य परत आले (जी नक्की शक्यता आहे) तर पुढच्या राष्ट्रपतीपदासाठी त्यांचे नाव देखील घेतले गेले तर आश्चर्य वाटणार नाही. पण पंतप्रधानपदासाठी अगदी ते घोड्यावर बसले तरी काँग्रेसमन (मन- मराठी आणि इंग्रजीही!) मान्य करेल असे वाटत नाही. फार तर कात्रज दाखवण्यासाठी उपयोग करतील झालं. त्या ऐवजी काँग्रेस कुठल्या तरी गांधी घराण्याशी इमानदार नेत्याचे नाव जाहीर करू शकते आणि उद्या जर काँग्रेस सत्तेवर आली तर मग वय, तरूण रक्त वगैरे कारणे देत त्यांनाच बाजूस देखील होण्यास सांगू शकेल अथवा त्या व्यक्तीस उपपंतप्रधान (तसेच चूक झाल्यास बळीचा बकरा) करून राहूलबाबांना हँड्सऑन ट्रेनिंग देण्यासाठी आणि इमेज तयार करण्यासाठी करू शकतील. आठवते त्याप्रमाणे: १९८९ च्या निवडणुकांनंतर व्हिपी सिंग यांनी पंतप्रधान होण्याची महत्वाकांक्षा अत्यंत हलकेच (sybtly) दाखवली होती, जणू काही "मला ते पद मिळाले नाही तरी फरक पडत नाही." कारण चंद्रशेखर यांना ती प्रचंड महत्वाकांक्षा होती. मग "सर्वानुमते" देवीलाल यांना पंतप्रधान म्हणून निवडले गेले आणि प्रोजेक्ट केले गेले. नंतर जेंव्हा शपथ घेण्याची वेळ आली तेंव्हा देवीलाल म्हणाले, "तरूण रक्तास मिळाले पाहीजे", आणि व्हिपी सिंग पंतप्रधान झाले तर देवीलाल उपपंतप्रधान! मला वाटते चंद्रशेखर यांनी फसवल्याचे कळल्यावर चिडून सभात्याग केला का असेच काहीसे झाले.

महाराष्ट्रात तरी राष्ट्रवादी चा संधीसाधुपणा सगळेजण जाणून आहेत. येथे तो शेतकर्‍यांचा नाही तर उद्योजकांचा पक्ष आहे. त्यांच्या स्पष्ट अओद्योगीक धोरणामुळे ते इथे तगून आहेत. मात्र त्यानी स्वतन्त्र पणे निवडणूक लढवली तर मात्र साधे बहूमत जाऊदेत पक्ष पुन्हा उभा राहील का हा प्रश नाहे. पवार पंतप्रधान होऊ शकतात फक्त एक्च गोष्ट व्हायला हवी. पिंपरी चिंचवड बारामती सह असलेला भाग वेगळा देश म्हणूण डिक्लेअर झाला तरच ते शक्य आहे.

प्रधानमंत्री पदाची ऑफर देऊन पवारांना एन.सी.पी. काँग्रेसमधे विलीन करण्यास पटवण्यात आलं तर.

तर पावर साहेब खालील वाक्य म्हणतील १) हिमालय संकटात असताना सह्याद्रीने स्वस्थ कसे बसावे ? २)मूळा रा का काय व का काय दोन्ही एकाच विचाराचे पक्ष आहेत. आमची भाउबंदकी नसून भावकी आहे. ३) धर्मनिरपेक्षता हा सर्व दारिद्र्यावरचा नामी उपाय आहे हे पटल्यावरून मी आता " स्वगृही " आलो आहे. ४)सोनिया या भारताच्या सूनबाई आहेत . शिवाजी राजानी नाही का एका सून बाईंचा सन्मान केला होता. अध्यक्षपदी त्याच राहतील.

महाराष्ट्रात कॉंग्रेस राष्ट्रवादी युतीला ३० जागा मिळण्याची शक्यता वाटतेय. उरलेल्या १८ जागा ह्या शिवसेना मनसे नि भाजपा(७ +३+६ =१६ ) इतर २ जागा इतर.ह्यात विभागल्या जातील असे वाटतेय. मोदी लाटेचा प्रभाव महाराष्ट्रात अजिबात जाणवणार नाही कारण मुळात असली काही लाटच नाही.

ह्या पराभवानंतर काँग्रेसने गंभीर आत्मचिंतन केले असावे. ह्या विचारमंथनातून हे मौक्तिक प्राप्त जाहले! http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5005590422781410440&SectionId=28&SectionName=ताज्या बातम्या&NewsDate=20131211&Provider=- वृत्तसंस्था&NewsTitle=सोनिया गांधी संपूर्ण देशाच्या माता- खुर्शिद धन्य धन्य ते काँग्रेसजन गांधी घराण्याला तन मन धन! हा आणि असलेच धडे शिकणार असतील तर पुढच्या विलेक्शनला काय दिवे लावणार ते दिसतेच आहे! कॉंग्रेस ही गांधी घराण्याने चालवलेली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्याचा भास होतो आहे.

"सोनिया गांधी या केवळ राहुल गांधी यांच्याच नाही तर आमच्यासह संपूर्ण देशाच्या माता आहेत.' खुर्शीद यांचे हे वाक्य भन्नाटच आहे. त्यांना प्रियांकाचा विसर पडलेला दिसतोय. तसेच असे राष्ट्रमाता वगैरे म्हणणे चूक वाटते. :(

कॉंग्रेस ही गांधी घराण्याने चालवलेली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्याचा भास होतो आहे.
सहमत... येणाऱ्या निवडणुकांमध्ये " पप्पू " आणि " राणीसाहेब "काय दिवे लावतात ते पाहणे intresting असणार आहे

आपल्या नकाशात उत्तराखंड आलेला नाही. तेथे भाजपा ला ३-४ जागा मिळू शकतील. आणि कर्नाटकात येडीउरप्पा परत भाजपा मध्ये येणार असे जवळ जवळ नक्की झाले आहे. त्यामुळे तेथेही १५ पर्यंत जागा मिळू शकतात. या शिवाय, आन्ध्रामध्ये कोन्ग्रेसचा बोर्या वाजणार हे नक्की आहे. तेथे जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षाला व तेलुगु देशम ला २५ तरी जागा मिळतील असा अंदाज करता येईल. जयललिता यांच्याकडून ३० सदस्यांचे समर्थन मिळावे . बिजू जनता दल कडे सध्या १४ जागा आहेत्त. हे सगळे एकत्र झाले तर भाजपाचा आणि मोदींचा संघ काशीला ( २७३ जागा) पोहोचेल असे भाकित करावयास हरकत नाही.

झि २४ तास वाहिनिचा आजचा सवाल , निवड्नुकितल विजया मुळे अरविंद केजरिवाल हवेत गेले का? या वाहिनिने आसा का प्रश्न विचारावा ?

उद्याचा सवाल असाही असेल निवडणुकीतील पराभवाने गणपतीने शीला दिक्षिताना पाण्यात ठेवले आहे काय ? अहो, त्याना काय वेळ घालवायचा असतो. आता ते आव्हाड, चौधरी, अभ्यंकर, भंडारी, सावंत याना रेग्युलर मस्टरवर घेणारेत म्हणे !

आयबीएन वर आलेल्या बातमी नुसार लोकसभेच्या मतदारसंघानुसार आत्ताच्या विधानसभा मतदारसंघातली मते एकत्रीत केली तर (आत्ताच्या निकालाप्रमाणे) एकूण ७ जागांपैकी भाजपाला ६, आप ला १ आणि काँग्रेसला ० जागा मिळतील.

मोदींनी मतदानयंत्रातील प्रत्येक पाचवे मत भाजपला जाईल असे सेटिंग केल्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला अशी धक्कादायक बातमी आता हाती आली आहे. या मतदानयंत्रांचे प्रोग्रॅमिंग अहमदाबादमध्ये होते. त्यामुळे अर्थातच मोदींना मतदानयंत्रात काहीही फेरफार करणे सहज शक्य आहे. अधिक माहिती इथे

छ्या! वर केलेल्या निरिक्षणातले एक खोटे ठरवलेच काँग्रेसने ;) आता दारू, पैसे घेतल्याचा आरोप आणि तेथील मतदारांना हे काँग्रेसी 'मूर्ख' कधी म्हणतात ते पहायचे :P

दारू बिरू काही नाही... आमच्याकडे "अफूची गोळी" आहेच की! ;) (अर्थात ती या वेळेस किती वापरली गेली कल्पना नाही!)

दिल्लीत अल्पसंख्य आहोत म्हणून सत्ता नाकारून भाजपाने चाल खेळलेली आहेच. आता काँग्रेसने देखील आप ला विनाशर्त पाठींबा जाहीर केला आणि तसे पत्र नायब राज्यपालांना दिले आहे. भाजपाने चांगली रीस्क घेतली तशीच काँग्रेसने नक्कीच चांगली खेळी खेळली आहे. त्याला उत्तर कसे दिले जाते यावर केजरीवालांचे नेतृत्व आणि राजकीय प्रौढत्व समजेल.

काँग्रेसने हात दाखवुन अवलक्षण केलं. त्यांनी भाजपला घोडा बाजार करण्याची खुल्ली ऑफर दिली आहे असं करुन. काँग्रेसमधुन चार आमदार फुटुन भाजपाला जाऊन मिळतील तर आश्चर्य वाटायला नको. तसंही काँग्रेसला बाहेरुन पाठिंबा द्यायला लागणार म्हणजे एकही मंत्रीपद मिळ्णार नाहि नाहितर.