Welcome to misalpav.com
लेखक: सचीन | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

जगात भाटांची कमतरता कधीच नव्हती. पण उत्तम भाट मिळणे मात्र नेहमीच कठीण होते. तेव्हा ह्रार्दीक हाबिणंदण ! येथेही एक छोटासा संदेश आहे

सचिन यांचे या उपलब्धी बद्द्ल अमच्या कडूनही अभिनंदन ! लालू प्रसाद जर तुरुंगात गेलेच तर या भाटगिरीच्या आधारावरच ते सुखात राहतील तेथे ! बाकी त्यांच्या खटल्याचा निकाल सुप्रिम कोर्टात कधी लागायचा ......? की सध्या जे काय चालले आहे त्यातच सचिनबुवा खुष आहेत. मला असे वाटते की लालूप्रसादना शिक्षाच व्हायला नको कारण त्याने भारातातील ६००० जातींच्या भावना दुखावतील !

एक तो सचिन ज्याच्या मास्टरस्ट्रोकवर आपण फिदा होतो आणि आता त्यानंतर तुम्हीच. त्या सचिनच्या अस्तानंतर झालेला ह्या सचीनचा उदय, आम्हांस जाणवणारी त्या स्ट्रोक्सची पोकळी तुमचे हे लेख भरुन काढतील ह्यात शंकाच नाही.

लालू हे चार घोटाळ्यात दोषी असतील तर न्यायालय त्यांच्या योग्य तो न्याय करेलच. पण लालूंचे इतर गुणही महत्वाचे आहेत ते कसे दुर्लक्षित केले जावू शकतात. लालू जर भ्रष्ट असतील तर ते प्रधान मंत्री होवू नयेत हे स्पष्ट आहे. भ्रष्ट आणि दंगलखोर नेते प्रधानमंत्री होवू नये असे मनापासून वाटते..

बरोबर आहे. १९८४ च्या शीखविरोधी दंगलींमधे आरोपी असलेले जगदीश टायटलर, ललित माखन, सज्जन कुमार, हरकिशनलाल भगत इत्यादी ज्या पक्षाचे आहेत त्यापक्षाचे सर्वोच्च नेतेही पंतप्रधानपदाच्या लायकीचे नाहीत मग. बरोबर ना? दंगलींनंतर तसंही राजीव गांधी म्हणाले होते, एक मोठा वृक्ष पडतो तेव्हा जमीन हादरतेच. तरी ते झालेच की पंतप्रधान.

जे काम चांगले केले त्याला चांगले म्हणायला कसली डर.लालू भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात गेले असले तरी त्यांनी दंगलीत बिहार मध्ये दंगल होवू न देता जे लाखो निरपराध जीव वाचवले त्याचे मोल कमी होईल का ?

आमचं एक सोडा... झोपेचं सोंग घेतलेल्याला आम्ही काय उठवणार, महाग्रेट (तुमच्या मते) लालूप्रसाद यादवही ते करू शकणार नाहीत ! जर ते मिपा वाचत असतील तर हसून हसून पोटदुखीने बेजार होऊन हॉस्पिटलमध्ये भरती होतिल... त्यांना तुमचे लेख ईमेल कराच ही आग्रहाची विनंती. मात्र अजून एक नक्की, लालू हॉस्पिटलमध्ये जाण्याअगोदर इतका 'ग्रेट' अंधानुयायी दिल्याबद्दल त्यांच्या इष्टदेवतेला चढावा चढवण्यासाठी प्रथम देवळात जातिल. मेरा भारत महान ! अजून एकः एकाची चूक दाखवून दुसर्‍याची चूक माफ होते समजणार्‍याला काय म्हणायचे ते तुमचे तुम्ही ठरवा. आमच्या मते दोघांचीही कायदेशीररित्या उघड चौकशी होऊन योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे.

>>>>महाराष्ट्र स्वताला पुरोगामी राज्य समजते ते अक्षरशः दंगलीच्या आगीत पोळत होते. माणुसकीचा, माणसाचा मुखवटा गळून पडला होता नि आतले हिस्त्र श्वापद दिसत होते विरुद्ध धर्मियाच्या नरडीचा घोट घ्यायला चटावलेले. आपले तीक्ष्ण सुळे पाजळत वाट पाहत असलेले दुसऱ्या जमातीची... आतुरतेने. त्यांच्या रक्ताने आपला धार्मिक कंड शमवायला. मग ती निरागस पोरेबाळे असोत कि पुढील आयुष्याचे स्वप्न मनाशी रंगवणारी नवयुवती. धार्मिक श्वापदे त्यांचा फडशा उडवून दुसरा नरबळी शोधायला जात....पुरोगामी ? म्हणवणाऱ्या राज्यांची हि अवस्था तर बिहार सारख्या राज्यांचे हाल काय होतील. रत्नाकर मतकरी, नारायण धारप आठवले. छान लिहीता तुम्ही. भयकथा ट्राय करा.

त्याहून जास्त उद्रेक अशा प्रकारच्या खोट्या नि दुर्दैवी प्रचाराने होत असतो, झालेला आहे. बाकी सुरुवात बहुतेकदा का नि कशी होते हे आम्हाला सांगितलं नाहीत तरी आपणास ठाऊक असावंच. मिरजेच्या दंगली कशा सुरु झाल्या ३-४ वर्षांपूर्वीच्या? पुन्हा तोच विषय काढून साध्य काय करणार आहोत ? बाकी बिहारमध्ये लालू नि त्याची पिलावळ हेच सगळ्यात मोठे गुंड आहेत. तेच राज्य चालवत असताना कशी बरं दंगल होईल? बहुतांश सगळीकडे तसंच म्हणता येईल. :)

धार्मिक वातामुळे मुंबईत सामान्य माणूस हि दंग्यात उतरला होता. दंग्यात फक्त गुंडच उतरतात ह्या समजाला तडा दिला बाबरी पतनाच्या दंग्याने. देशाला मागे नेण्याचे कार्य ह्या दंगलीने केले होते .

तुफान विनोदी लेख! हसून हसून पुरेवाट झाली. 'सचीन' एकापाठोपाठ एक आणि 'एक से बढकर एक' विनोदी लेख पाडत आहेत. पु.ल. देशपांड्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी १३ वर्षांनी पूर्ण भरून निघाली याचा मनोमन आनंद वाटतो. गेल्या दहा हजार वर्षात इतका विनोदी लेख वाचला नव्हता. सचीन, पुलेशु. असेच विनोदी लेख पाडत जा. आमची मस्त करमणूक करा. तुम्हाला विनोदी लेखांसाठी काही नवीन विषय सुचवतो. खालील विषयांवर विनोदी लेख पाडावे ही नम्र विनंती. - सत्यवचनी, एकपत्नीव्रती आधुनिक राम अर्थात एन डी तिवारी - राष्ट्रमाता सोनिया - जाणता राजा पवारसाहेब - अतिरेकी, गुन्हेगारांचा कर्दनकाळ आबा ('आबां'च्या ऐवजी शिवराज पाटील हे नाव सुद्धा चालेल) - कणखर तरीही मृदु, कर्तव्यकठोर प्रशासक मनमोहन सिंग . . . अजून बरेच विषय आहेत. सध्या एवढेच लिहा. आणि फार हसवू नका.

अजून बरेच विषय आहेत. राष्ट्रीय मम्मी...सोनिया गाँधी राष्ट्रीय रोबोट…मनमोहन सिंह राष्ट्रीय गेम चेंजर…राहुल गांधी राष्ट्रीय चिंता…सलमान की शादी राष्ट्रीय रहस्य…सोनिया गांधी राष्ट्रीय गिरगिट… मुल्लायम राष्ट्रीय रथ यात्री…लालकृष्ण आडवाणी राष्ट्रीय चुगलखोर…स्वामी अग्निवेश राष्ट्रीय स्ट्रगलर…अभिषेक बच्चन राष्ट्रीय दामाद… रॉबर्टवढेरा राष्ट्रीय कोयल…मीरा कुमार राष्ट्रीय गहनों की दुकान…बप्पी लहरी राष्ट्रीय पागलखाना… बिग बॉस का घऱ राष्ट्रीय हंसी… राहुल महाजन राष्ट्रीय जासूस… दया राष्ट्रीय गर्लफ्रेंड…दीपिका पादुकोण राष्ट्रीय रईसज़ादा..सिद्धर्थ माल्या राष्ट्रीय टेलीफोन ऑपरेटर…दिग्विजय सिंह राष्ट्रीय गणितज्ञ…कपिल सिब्बल(जीरो लास) राष्ट्रीय किसान – अमिताभ बच्चन राष्ट्रीय मसखरा… लालू यादव राष्ट्रीय इंतज़ार…राहुल का प्रधानमंत्री बनना राष्ट्रीय दहशत…रा वन का सीक्वल राष्ट्रीय गाली…आम आदमी राष्ट्रीय हाथ… हरविंदर सिंह राष्ट्रीय गाल… शरद पवार राष्ट्रीय बहन-मायावती राष्ट्रीय मां-बहन…राखी सावंत. (चेपुवरून.)

राष्ट्रीय कोयल…मीरा कुमार (री) या बाई बोलतात तेव्हां हसायला येतंच. प्लास्टीक सर्जरी केल्यासारखे कायम हसत असल्यासारखे गाल वर आलेले दिसतात. खासदारांना दटावताना त्या स्वतःच विनोद करतायेत असंच वाटतं.

+१ सहमत… मीरा कुमारी ह्या बोलताना हसतात कि हसताना बोलतात… कि हसत हसत बोलतात ??? सचीन... लेख येउ द्या याबद्दल पण...

>>> राष्ट्रीय चुगलखोर…स्वामी अग्निवेश स्वामी अग्निवेश म्हणजे भगवे कपडे घातलेला दिग्विजय. दिग्विजयने भगवे कपडे घातले की तो अगदी अग्निवेशसारखा दिसेल किंवा अग्निवेशने खादीचे कपडे घातले की दिग्विजयचाच भास होईल इतके त्या दोघात साम्य आहे. दोघांचे चेहरे डोळ्यासमोर आणून बघा म्हणजे साम्य लक्षात येईल. पण हे साम्य इथेच संपत नाही. दोघेही काँग्रेसचे दलाल, दोघेही भोंदू, दोघेही आचरटासारखे बरळणारे आणि दोघेही बेताल आरोप करणारे. दोघांनाही कोणीही गांभिर्याने घेत नाही. दोघेही मेंटल केस वाटतात.

राष्ट्रीय गाढव- पटत नसले तरी पद्म पुरस्कारामूळे मूग गिळून बसलेले सर्व तज्ञ मंडळी राष्ट्रीय अपराधी- आयकर चुकविणारे, बेंकाची कर्जे थकविणारे, वीज चोरणारे, ट्रकमधला उस पळविणारे,कामात चालढकल करणारे, अहवाल दाबून ठेवणारे, सिलिंडर पेक्षा जास्त पैसे मागणारे,सिगनल तोडणारे. किमान थर्ड पार्टी इस्शुरन्स न काढणारे,ट्राफिक कडे लक्ष न देता गप्पा ठोकणारे,निवडणुकीत पिकनिकला जाणारे , कामगाराला ओ टी न देता फुकट जादा काम करून घेणारे ......म्हणजेच आपण सर्व .

आम्ही वरच म्हटलंय या देशात मूळ गिळून बसतात ते तज्ञ ! बाकी सचिन हे नाव राष्ट्रीय दंगलखोर ला योग्य आहे ! एकाने ५० वर्षे पडद्यावर दंगल केली तर दुसर्‍याने मैदानावर ! एक आता मिपावर करीत आहे !

>>> राष्ट्रीय दंगलखोर कोण असावे बरे? तज्ञांनी उत्तर द्यावे अर्थात काँग्रेस आणि काँग्रेसी विचारांचे निधर्मांध पक्ष (म्हणजे राकाँ, समाजवादी, राजद, बसप वगैरे वगैरे). सूचना - हे तज्ञांनी दिलेले उत्तर असल्याने या उत्तरावर शंका घेऊ नये.

१९८४ च्या शीख दंगलीला जबाबदार असणारे टायटलर, सज्जनकुमार, माखन, हरकिशनलाल भगत आणि या सगळ्यांच्या पापांवर पांघरूण घालणारे "विशाल वृक्ष पडला की जमीन हादरतेच" असं निर्लज्जपणे सांगणारे राजीव गांधी.

1947 Bengal….5,000 to 10,000 dead …CONGRESS RULE. 1967 Ranchi….200 DEAD……….CONGRESS RULE. 1969 Ahmedabad…512 DEAD……..CONGRESS RULE. 1970 Bhiwandi….80 DEAD………….CONGRESS RULE. 1979 Jamshedpur..125 DEAD……CPIM RULE (COMMUNIST PARTY) 1980 Moradabad…2,000 DEAD…CONGRESS RULE. 1983 Nellie Assam…..5,000 DEAD…CONGRESS RULE. 1984 anti-Sikh Delhi…2,733 DEAD…CONGRESS RULE 1984 Bhiwandi….146 DEAD….CONGRESS RULE 1985 Gujarat…..300 DEAD..CONGRESS RULE 1986 Ahmedabad……59 DEAD…..CONGRESS RULE 1987 Meerut….81 DEAD…CONGRESS RULE 1989 Bhagalpur……1,070 DEAD……CONGRESS RULE 1990 Hyderabad……300 PLUS DEAD….CONGRESS RULE 1992 Mumbai….900 TO 2000 DEAD….CONGRESS RULE 1992 Aligarh….176 DEAD…..CONGRESS RULE

>>> ह्या लेखात तुम्हाला काय विनोदी वाटले ? तुमचा नम्र स्वभाव आवडला. अहो या लेखातल्या प्रत्येक वाक्यात ठासून विनोद भरलेला आहे. तरी बरं लेख छोटा आहे. २-३ पाने असती तर हसून हसून प्राण कंठाशी आले असते.

बिहारात दंगल झाली नाही नि महाराष्ट्रात झाली हा तुम्हाला विनोद वाटतो. दंगल त्यातील नरसंहार हा तुमच्यासाठी विनोदाचा विषय असावा

तुम्ही केलेले महाराष्ट्रातल्या दंगलीचे वर्णन हा एक प्रचंड विनोद आणि बिहारात दंगल झाली नाही हा त्याहून मोठा विनोद! धन्य आहे तुमच्या विनोदी स्वभावाची.

बाबरी पतनानंतर मुंबईत मानवतेला फासणाऱ्या दंगली झाल्या लष्करास पाचारण करावे लागले होते परिस्तिथी काबूत आणायला.बिहार मध्ये मात्र लालुजीनी दंगल होवून दिली नाही अडवानींची रथयात्रा त्यांनीच रोखली.लालू खरा नेता राजधर्माचे पालन करणारा.

>>> "लालू खरा नेता राजधर्माचे पालन करणारा." लालूच्या राजधर्म पालनाचे एक जबरदस्त उदाहरण आहे. लालूच्या थोरल्या लेकीचे लग्न १२-१३ वर्षांपूर्वी पाटण्यामध्ये झाले होते. लग्नाच्या वर्‍हाडी मंडळींसाठी लालूच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी टाटा मोटर्सच्या शोरूम फोडून त्यातून बर्‍याच जीप, कार्स पळवून नेल्या. तसेच अनेक फर्निचरची दुकाने फोडून त्यातले नवे सोफासेट, बेड, खुर्च्या इ. घेऊन गेले. दुकान मालक पोलिसात गेल्यावर पोलिसांनी माणुसकीच्या भूमिकेतून उगाच दुकान मालकांना भविष्यात त्रास नको म्हणून तक्रारी घेतल्या नाहीत. लालूला हे समजल्यावर त्याचा संताप अनावर झाला. लग्न झाल्यावर लगेच सर्व फर्निचर, गाड्या जिथल्या तिथे नेऊन देण्याचा त्याने आदेश दिला. लग्न झाल्यावर ७-८ दिवसांनी लालूच्या कार्यकर्त्यांनी एका रात्री गुपचूप सर्व गाड्या, फर्निचर दुकानाबाहेरच्या फूटपाथवर नेऊन सोडले. ज्याच्या वस्तू घेतल्या त्याला परत करणे यालाच म्हणतात राजधर्माचे पालन.

अजून पण लोक लालूचे नांव घेतात.... लालूच्या काळात संध्याकाळी ५ वाजल्यापासून रस्ते बंद असायचे. इतका दबदबा होता पण पुढे नितीश कुमार ह्यांचे राज्य आले आणि लोक परत रस्त्यावर यायला लागले.आज काल रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत दुकाने वगैरे उघडी असतात...की ही पीछेहाट नाही, ह्या नितीशच्या राज्यात. असो.... आपल्याला तर लालूच प्रिय.

मी कल्पनाशक्ती लढवत नाही आहे. तुम्ही स्वतः कधी बिहारला गेला असाल किंवा तुमचे काही बिहारी मित्र असतील तर त्यांना विचारू खात्री करून घेवू शकता.

"अडवानींची रथयात्रा त्यांनीच रोखली" बरयाच वेळेला हे एकच वाक्य बोलून दाखवताय.... अडवानींची रथयात्रा रोखणे हा काय चमत्कार आहे का? ती रथयात्रा रोखून त्यांनी असा काय पराक्रम केला ? जरा आपल्या विनोदी शैलीत स्पष्टीकरण द्या सचीन.…

सचिन सारखे व ग्रेट थिंकर सारखे आय डी ही येथील शान आहे ! नाहीतर हे धागे एकांगी होतील. आमच्या सारखा घटनेत ही काही " रिडल्स" आहेत असे म्हणणारा इथे आवश्यक आहे त्या प्रमाणे १५ ऑगस्ट १९४७ नंतर भारत देशात कोणतेही " रिडल" नाही असे ठासून सांगणारे अभ्यासक ही येथे हवे आहेत. त्याशिवाय तत्वबोध नाही.

>>>>"लालू खरा नेता राजधर्माचे पालन करणारा." तिकडेच जाउन राहत का नाही मग तुम्ही?????

बाबा राज( गोपनीयता ) चे कारण सांगून रास्ट्रवादी ची गोची करताहेत असा जबाब कलिक यांचा दावा आहे ! याला म्हणतात राज धर्म. आदर्शचा आहवाल दाबून ठेवणे हे त्याचे एक रूप आहे !

इन एनी केस, सहा वर्षे खासदार बनता येणार नैचे लालुंना, हे काय कमीये? बाकी एक "लोकनेता" म्हणून काही वर्षे त्यांनी गाजवली हे निर्विवाद,पण बदलत्या काळाबरोबर जुळवून घेऊ न शकलेल्या नेत्यांचेच असे नाही कोणत्याही व्यक्तीचे जे होते ते त्यांचे झाले आहे.

बाकी एक "लोकनेता" म्हणून काही वर्षे त्यांनी गाजवली हे निर्विवाद,
त्या गाजवलेल्या काळातील लीलाच त्यांना नंतर भोवत आहेत हे देखील निर्विवाद. ;)

"लालू खरा नेता राजधर्माचे पालन करणारा" असे म्हणून धागाकर्त्याला लालू हे मनसेचे कार्यकर्ते आहेत असे सूचित करावयाचे आहे. लोकहो उगी पिडू नका त्यांना.