Welcome to misalpav.com
लेखक: मदनबाण | प्रसिद्ध:
(श्री शरद यांच्या http://www.misalpav.com/node/26963 या धाग्यावरील अवांतर प्रतिसाद इथे हलवून नवा धागा तयार केला आहे. एखाद-दुसरा संदर्भ त्या धाग्यातील चर्चेबद्दल असू शकतो. - संपादक मंडळ) _____________________________________ मंत्रादि गोष्टींवर लिटरली विश्वास ठेवणे अन कोणी चेष्टा केली की पोरकटपणे आरडाओरडा करणे, इ. मूर्खपणा टाळलाच पाहिजे वटवाघुळ मानवास संस्कॄताची उत्तम माहिती असताना, त्याने असे विधान करावे हे सर्वात धक्कादायक आहे. मननेन त्रायते इति मन्त्रः :- संदर्भ विकी महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम्। यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः।।25।। श्रीमद्भगवद्गीता अध्याय १० श्लोक २५ { जप हा मंत्रांचाच केला जातो} बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम्। मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः।।35।। श्रीमद्भगवद्गीता अध्याय १० श्लोक ३५ { गायत्री छन्दात्मक मंत्र आहे हे तर आता सर्वश्रुत आहे.} मंत्रांचा वापर करुन त्याचा अनुभव, फायदा / तोटा घेणारी मंडळी आजच्या घडीला आहेत, तसेच उध्या ही असतील. अनुभव घेण्यापेक्षा चेष्टा करणे हे अगदी सोपे आहे, हे वाचकांनी लक्षात ठेवावे. जालावर या संदर्भात वाचन / शोध घेत असताना काही माहिती समोर आली { ही माहिती मी अजुन संपूर्ण वाचली नाहीये.} वाचकांसाठी त्याचे दुवे खाली देतो :- An Introduction to the "MantraŚãstra" MANTRAS दोन्ही दुवे हे पिडीएफ चे आहेत. ज्या वाचकांना या विषयात रस आहे त्यांनीच हे दुवे अघडुन वाचण्याचे कष्ट घ्यावेत, टिंगल करण्यास विशेष बुद्धी लागत नाही असा माझा समज असल्याने जे हा विषय एक टिंगल / थट्टा म्हणुनच पाहतात त्यांनी याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे ! प्रयत्नाचा एक भाग तुम्ही किंवा अजून कोणी ज्यांनी अनुभव घेतले आहेत त्यांना विचारणे हाही असतो. वटवाघुळाने अनुभवा विषयी विचारणा केली आहे,म्हणुन जरा टंकन कष्ट घेतो. मंत्र :- कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेन गतं नष्टं च लभ्यते ! हा मंत्र मला माझ्या तिर्थरुपांकडुन कळाला, ज्या ठिकाणी मी सध्या राहतो आहे ती जागा विकत घेतानाची ही घटना आहे.{अनुभव क्रमांक १} या जागेचे {जागा विकत घेण्यासंबंधीच्या व्यव्हारांसकट इतर महत्वाची कागदपत्रे ओरिजिनल} सर्व कागदपत्र घेउन माझे वडिल प्रवास करत होते,{मला वाटत दादर स्टेशनहुन ते डोंबिवलीला येण्यासाठी ट्रेन मधे चढत होते.}प्रचंड गर्दी आणि त्यामुळे झालेल्या धक्का-बुक्कीत त्यांच्या हाताला झटका बसुन ती फाईल त्या गर्दीत पडली. वडिल डब्यात होते,डब्यातल्या गर्दीत ती फाईल शोधणेही त्या क्षणी शक्य नव्हते इतकी गर्दी डब्यात होती.जरा गर्दी कमी झाल्यावर वडिलांनी शोध घेण्याचा प्रतय्न केला पण काहीही सापडले नाही.फाईल फलाटावर पडली का ? ट्रॅकवर पडली का ? की डब्यातच कोणाच्या पायाला लागुन ती बाहेर फेकली गेली असेल ? वडिलांनी घरी आल्यावर हे सर्व आम्हाला सांगितले,ते खूप विचारात होते... जागेच्या सर्व व्यव्हारांचे कागद गहाळ झाल्याने ते अतिशय चिंताग्रस्त झाले होते.थोडावेळ शांत बसले आणि नंतर हातपाय धुवुन झाल्या नंतर त्यांना या वर दिलेल्या मंत्राचे स्मरण झाले ! त्यांनी सात्यत्याने या मंत्राचे उच्चरण अनेक दिवस चालु ठेवले होते आणि अचानक काही दिवसांनी त्यांच्या ऑफिसमधे एका माणसाचा फोन आला, त्याने वडिलांचे नाव विचारले आणि तुमची काही कागदपत्रांची फाईल गहाळ झाली आहे का ? अशी विचारणा केली.वडिलांनी त्या फाईलचे वर्णन केले आणि त्या फाईल चे एकंदर स्वरुप सांगितले,त्यावर त्या माणसाने तुमची फाईल माझ्याकडे आहे, ती घेउन जा असे सांगितले.ती फाइल महत्वाची आहे हे त्या व्यक्तीस त्यातील कागदपत्रांवरुन कळाले होते. शेवटी ती फाइल मिळाली आणि आजवर त्याच फ्लॅटमधे आम्ही राहतोय जिची कागदपत्रे त्या फाइल मधे होती. २)अनुभव २:- एकदा नरसोबाच्या वाडीला मी नदीत अंघोळ करत होतो, ३ -४ पायर्‍या खाली,ज्यांनी नरबाच्या वाडीला कॄष्णेत स्नान केले असेल त्यांना नदीच्या प्रवाहाचा अंदाज येइल.माझ्या गळ्यात साधे कसलेसे तांब्याचे लॉकेट होते, ते मैल्यवान नव्हते की कुठल्याही इतर गोष्टींसाठी उपयुक्त नव्हते,पण मी या मंत्राचा उपयोग सुरु करताच जवळपास १० मिनीटाच एका पोहणार्‍याला ते सापडले आणि तिथेच हे कोणाचे आहे अशी विचारणा सुरु केली,मी ते माझे आहे असे सांगताच ते त्यांनी मला दिले,पण नदीच्या प्रवाहात पोहताना गेलेले लॉकेट परत मिळाले यावर माझाच बराच वेळ विश्वास बसला नव्हता. ३}घरात अनेकदा मला न मिळणार्‍या,दॄष्टीस न पडणार्‍या ,भरपुर शोध घेउन न सापडणार्‍या वस्त्यु या मंत्राने आम्हाला मिळाल्या आहेत, हो आइच्या हातुन घराची किल्ली हरवली तेव्हा ती या मंत्रानेच परत मिळाली. ४)अगदी आत्ताची गोष्ट सांगतो... मी नविन पल्सर घेतली, त्याला मी पेट्रोल लॉक बसवुन घेतले,पण त्या लॉकची मुव्हमेंट घट्ट आहे,त्यामुळे व्हॉल्व ऑन्/ऑफ करताना किल्लीवर दाब येत होता, एका प्रयत्नात ती तुटली,पण त्याची अजुन एक चावी माझ्याकडे होती. मी जवळच्याच चावीवाल्याकडे जाउन तशीच अजुन एक चावी बनवुन घेतली.ती मी माझ्या बॅगेत ठेवली,व एक चावी कीचेनला अडकवली. ऑफिसात आलो...कामाला लागलो,चाव्या पॅटच्या डाव्या खिश्यात ठेवल्या होत्या,काही वेळाने त्या बाहेर काढुन बॅगेतच ठेवावा असा विचार आला,तेव्हा चाव्या खिशातुन बाहेर काढल्या,पण ल़़क्षात आले की पेट्रोल लॉकची चावी कीचेनला नाही ! ती पडली होती ! माझ्या बॅगेत आधीच चावी वाल्याकडुन तयार केलेली चावी होती,त्यामुळे घाबरायचे कारण नव्हते,पण कीचेन मधली चावी पडली होती ते शोधणे तर गरजेचेच होते.मी परत एकदा खिसा तपासला,त्याच्यातच तर राहिली नसेल ना ? मग ज्या ज्या ठिकाणी मी गेलो होते त्या त्या ठिकाणी मी परत गेलो, ज्या मार्गाने ऑफिसात गेलो होतो त्याच मार्गाने उलट फिरुन कंपनीच्या आवारात जिथे बाइक पार्क केली होती तिथे गेलो,पण चावी काही सापडली नाही ! मग नेहमीचाच वरील उपाय केला,ऑफिसात परत जाताना मी सिक्युरिटी गार्डला सांगुन ठेवले की माझी अश्या अश्या प्रकारची चावी हरवली आहे ती सापडली तर मला कळवा,तो पर्यंत मनात अनेकदा वरील मंत्राचा प्रयोग करुन झाला होता,आणि मला चावी मिळणार याची खात्री आधीच झाली,संध्याकाळी कामावरुन घरी निघताना परत सिक्युरिटी गार्डला प्रश्न केला मेरी चाबी मिली ना ! खर तर हा प्रश्न नव्हताच ते अध्यारुतच होते माझ्यासाठी, त्यावर तो म्हणाला साब एक चाबी मिला है, आप चेक करलो वोह आपकी है क्या. मी मेमगेटवर जाउन विचारणा केली.चावी त्यांच्याकडे जमा झालेली होती. ऑफिसच्या एव्हढ्या मोठ्या कँपस मधे हरवलेली चावी परत मिळण्याची ही माझी दुसरी घटना {या आधीही एकदा चावी गहाळ झाली होती},दोन्ही वेळेला चावी मला परत मिळाली. या सर्व घटनांमध्ये वस्तु परत मिळण्याची प्रोबॅबिलीटी किती यावर तुम्ही विचार करु शकता, याला कोणी योगायोग किंवा इतर काहीही म्हणा... माझ्यासाठी हे प्रमाणित अनुभवच आहेत. या मंत्राचा संदर्भ तुम्हाला :- बोध दत्तमाहात्याचा अध्याय ४ था मधे मिळेल. {लेखक :- डॉ. वासुदेव व्यंकटेश देशमुख} जाता जाता :- गुगलुन हा मंत्र जालावर सापडतोय का ते पाहण्याचे सुद्धा प्रतय्न केले तरी माझी हरकत नाही. जे अनुभव आजवर या मंत्रा संबंधी घेतले ते तसेच लिहले आहेत. हा अनुभव मी ठाण्याच्या कट्ट्याला देखील गप्पांच्या ओघात कथन केला होता.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

८ जीबी चा कुठला सापडायला. एक जीबी चा सापडला. मंत्रा मध्ये ताकद आहे कि नाही माहित नाही पण या लेखामध्ये आहे. आता माझे काहीही हरवले कि मी हा लेख नजरेखालून घालणार … ---------------------------------------------------------------------- अंधश्रद्धेकडे झुकत चाललेला

मंत्र - सामर्थ्य आणि अनुभव (संपूर्ण प्रतिसदांसह)धागा वाचल्यावर... माझ्या मनाची कमजोरी हेच मंत्राचे सामर्थ्य आहे.. अशी सही घ्याविशी वाटतीये! ;)

बुवा, एका शंकेचं समाधान करा ना... मनाची कमजोरी कशाला म्हणावे? कुठल्याही प्रकारची भावना उत्पन्न होणं-अगदी शौर्याची, प्रणयाची सुद्धा- मनाची कमजोरी असावी काय?

@कुठल्याही प्रकारची भावना उत्पन्न होणं-अगदी शौर्याची, प्रणयाची सुद्धा- मनाची कमजोरी असावी काय?>>> नाही ती कमजेरी नव्हे... आणि असलीच,तर तिचा मंत्र म्हणून काही परिणाम होण्याशी (ह्या धाग्यात म्हणतात..) तसला काही संमंधही नव्हे. :)

कारण ति कमजोरी आहे असं बुद्ध म्हणतो. आणि मग कुठल्याच प्रकारचं सामर्थ्य काहिच उपयोगाचं राहात नाहि. मग तुम्ही कुठली सही वापरणार?

@कारण ति कमजोरी आहे असं बुद्ध म्हणतो. >>> म्हणू दे. बुद्धानी किंवा अजुन कोणी काय म्हटलं यापेक्षा मी खरं जे असेल. ते पाहुन वागावं,असं मानतो. @आणि मग कुठल्याच प्रकारचं सामर्थ्य काहिच उपयोगाचं राहात नाहि. मग तुम्ही कुठली सही वापरणार? >>> ते त्यानी म्हटलेलं आहे. आणि वर स्पष्ट केल्याप्रमाणे तो माझा विषय नाही. त्यामुळे सहि'चा मुद्दा आपोआपच रद्दबातल होउन जातो.

मला वाटलं तुम्ही विचाराल कोण बुद्ध =)) असो. तो तुमचा विषय नाहि, सहिचा मुद्दा रद्दबातल केला म्हटताय... मंत्रांचे साईड इफेक्ट्स खरच दिसायला लागलेत मिपावर.

@मला वाटलं तुम्ही विचाराल कोण बुद्ध Lol>>> =)) छे..छे.. आमी तर नीरं-बुद्ध =)) कुठले एव्हढे कळणार आंम्हाला? http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd.png @असो. तो तुमचा विषय नाहि, सहिचा मुद्दा रद्दबातल केला म्हटताय... मंत्रांचे साईड इफेक्ट्स खरच दिसायला लागलेत मिपावर.>>> प्यार के होते है..तो मंत्रा'के क्यूं नही??? http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif

अगदी खरेय बुवा =)) =)) पूर्ण सहमत. या धाग्यावर चाललेला निर्बुद्धजखमीपणा पाहून तुम्ही म्हणता तसेच वाटू लागले आहे. संतांच्या नावाने प्रत्यही गळे काढणारे लोक विकारात लिडबिडल्याचा भयाण साक्षात्कार या निमित्ताने पुनरेकवार झाला हे मात्र या धाग्याचे बलस्थानच मानले पाहिजे बाकी. इतके सद्गुणपुतळे इ. असणारे दांभिकसम्राट जेव्हा भ्यँ करून लहान पोरागत गळा काढतात तेव्हा मजा येते खरी.

کورو پندو سنگر تانڈ و دوا پ ر کلی ہوی اتی !!!!تسے مراٹھ گلکے سکے کلیت لڈھلے پان پتی
Koro pndu Singer Howie brings chaos and holistic medicine APP ! Tsy ldhly betel leaf Marathi reach glky Coins च्यायला... त्या वल्ल्याला पकडावं लागतय आता याचा अर्थ समजुन घ्यायला. नक्कीच कुठला तरी शिलालेख वगैरे असावा. पण हे उर्दु आहे... मग काय वाळवंटात शिलालएख शोधले का काय??

कौरवपांडव संगरतांडव द्वापरकाली होय अती तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानपती असे लिहिले आहे. त्या गुगलबाबाने पानपतीचे betel leaf इ.इ. भाषांतर करून धमाल केलेली आहे न्हेमीप्रमाणेच.

तुम्ही कधी हे प्रयोग केले आहेत का? अथवा आत्तापर्यंतच्या अनुभवांवरून उत्तरे दिलीत तरी चालेल.
  1. मंत्र कितीही दिवसांनी म्हटला तर चालतो का?
  2. किती वेळा म्हणायचा?
  3. साधारण किती तास/ दिवस/ महिन्यांनी वस्तू परत मिळते?
  4. आजवर कधी वस्तू मिळाली नाही असे झाले आहे का?
  5. आजवर मंत्र न म्हणताच वस्तू परत मिळाली असे कधी झाले आहे का?
  6. तुम्ही कधी नुसतीच वाट बघितली आहे का एखाद दिवस आणि मग वस्तू मिळाली नाही म्हणून मंत्र म्हणायला सुरूवात केली आहे व वस्तू मिळाली असे झाले आहे का?
आता मलाच पडताळा घेऊन पाहायला सांगणार असशील तर राहू देत कारण मला माझ्या हरवलेल्या वस्तू मिळायला त्याच जागी परत जाणे शक्य नाही आणि इथे मला ओळखणारे लोकही फारसे नाहीयेत जे वस्तू सापडली तर परत आणून देतील. बरेचदा तर वस्तू कुठे पडतात/ विसरल्या जातात तेच आठवत नाही.

अहो एवढी चिकित्सा करायची नसते. श्रद्धा वाढवा !! वस्तु परत न मिळाल्यास, भक्ति ही मोबदल्यात काहीतरी मिळावे म्हणून करायची नसते असे सांगायला शिका !!

भक्ति ही मोबदल्यात काहीतरी मिळावे म्हणून करायची नसते असे सांगायला शिका !!
+१ काय राव, तुम्ही तर धाग्यातली हवाच काढली की. मंत्र काय मुखशुद्धीला वापरायचे का मग :D

कुठला मंत्र म्हटल्यावर बॅटमनची मंत्रशक्तीवरची हरवलेली श्रद्धा परत येईल? ;)

दादा... तुझ्या प्रमाणे माझाही अशा कोणत्याही मंत्रावर विश्वास नाहीये.. मी "तुझ्याकडे अक्कल नाहीये" असं म्हणल्या सारखा का उचकतोयस? "मंत्रशक्तीवर श्रद्धा" नाहिचेना तशीही तुझी!! आणि
असो, बाकी चालू द्या.
हे तू मला सांगतोयस ?!!

ताई, जजमेंटल ओव्हरटोन वाटला म्हणून म्हटले. असो. बाकी नो वरीज & नो नाचणीज हे ओघाने आलेच. अन
हे तू मला सांगतोयस ?!!
हो. येणी पिराब्ळेम ;)

अक्षरसमूहामध्ये काही अर्थ असतो राजे. त्याचा उपयोग काहीच नाही असं कसं काय म्हणता राजे? त्या शब्दाच्या उच्चारातून काही अर्थ व्यक्त होतो त्यामागची भूमिका समजून घ्या की. बॅटमॅनच का? कॅटवुमन म्हणू उद्यापासून तुम्हाला. चालतंय की! राम काय नि कोक काय सारखं ना? मग बॅटमॅन काय नि कॅटवुमन काय? उगा ताणायचं म्हणून ताणायचं!

तो काहीएक अर्थ आपणच दिलेला असतो इतकं कळत नसेल तर डोकेफोड करूनही काही अर्थ नाही. पण आमच्या क्षुद्र असहमतीला तुमच्यासारख्यांनी इतके महत्त्व का द्यावे हे अजूनही कळत नाही. असो.

डोकेफोड ... नाही ब्वा! अर्थ आपण दिलेला असतो म्हणजे कुणी दिला? त्याला तो अर्थ का नि कसा आही? त्यामागे काही विषय/ अभ्यास आहे का? तोच शब्द असेल तर तो तसा का? दुसरा का नाही? जगातल्या बहुतांश साधकांचा निर्वाळा मंत्रांमध्ये ताकद आहे नि त्या मंत्रांच्या अभ्यासानं, जपानं काही एक फरक पडतो. (वेगवेगळे शब्दसमूह वेगवेगळे रिझल्ट्स असं काहींबाबत, बीज मंत्रांबाबत विशिष्ट टप्प्यानंतर ते एकाच जागी नेतात. मात्र ठराविक काळ मं त्रातले शब्द जसे आहेत तसेच वापरावेत.) ठराविक नावांऐवजी दुसरी नावे/ काहीही शब्द वापरुन तेच रिझल्ट आले असा काही विदा असला तर वाचायला आवडेल. तो तसा नसतानाही माझं मत माझं मत म्हणून भुई धोपटणं थांबवावं. असो!

अर्थ आपण दिलेला असतो म्हणजे कुणी दिला? त्याला तो अर्थ का नि कसा आही? त्यामागे काही विषय/ अभ्यास आहे का? तोच शब्द असेल तर तो तसा का? दुसरा का नाही?
हे कन्व्हेन्शन आहे. याला खास कारण नाही. दोनला दोनच का म्हणायचं? याला उत्तर नाही. दोन म्हणजे काय हा अर्थ एकमताने ठरवला गेलाय कधीकाळी. तो अर्थ दर्शवणारा शब्द वा शब्दसमुच्चय काय असावा हा कैकदा राजकीय निर्णय असतो. प्रमाणभाषाही काहीशी अशीच ठरते. याबद्दल पाणिनीय संस्कृत ते पुणेरी मराठी किंवा लंडनमधली इंग्लिश इ.इ.इ. शेकडो भाषांचा विदा देता येईल. हा आर्बिट्ररीनेस सर्व ठिकाणीच पहावयास मिळतो. शेवटी भाषा हा चिन्हांचा संच आहे. त्यांना अर्थ काय असावा, हे आपण ठरवलंय. आपण ठरवलं तर उद्या अधिक चिन्हाला वजा चिन्हही म्हणू शकतो. आपण केलेल्या स्वीकाराव्यतिरिक्त अधिक चिन्हाचं खास स्वतःचं असं 'वेगळेपण' नसतं- मग भलेही जगभरचे लोक अधिक चिन्ह वापरून शेकडो आकडी बेरजा करत असल्याचा विदा दिला तरी यात फरक पडत नाही. तुमचं म्हणणं इतके लोक अधिकचिन्हाचा फायदा सांगताहेत आणि त्याला नाकारणारा मी कोण? तर उत्तर असं की एक उभी अन एक आडवी अशा दोन रेषा परस्परांवर ओढून त्याचा अर्थ अधिक असे म्हणणे हे आर्बिट्ररी कन्व्हेन्शन आहे. जे लिपीबद्दल, तेच भाषेबद्दल. सततच्या वापराने तो अर्थ मनात दृढमूल झाला तरी त्याचे स्वयंसिद्ध असे काही अर्थरूपी अस्तित्व नसते. भाषाशास्त्रात याचा विचार करण्यात येतो.
ठराविक नावांऐवजी दुसरी नावे/ काहीही शब्द वापरुन तेच रिझल्ट आले असा काही विदा असला तर वाचायला आवडेल. तो तसा नसतानाही माझं मत माझं मत म्हणून भुई धोपटणं थांबवावं.
सोयीस्कर ठिकाणीच विदा मागायची सवय नजरेआड करून उदा. देतो. वल्लभाचार्यांची गोष्ट आहे. ती वाचण्याचे कष्ट घ्यावेत. त्यांच्याकडे ते सोवळ्यात असताना एकजण आला आणि ते त्याला 'परे' म्ह. बाजूस हो इ. म्हणाले. त्याला तोच मंत्र वाटला आणि तो पुढे मोठा योगी झाला इ.इ. वाल्मिकींचीही गोष्ट अशीच आहे- मरा मरा फेम. अन शेवटी हे लक्षात ठेवावे 'क्रियासिद्धि: सत्त्वे भवति महतां नोपकरणे'. उपकरणांना नको तितके महत्त्व दिले तर क्रियासिद्धी होत नाही. अमुकच मंत्र पॉवरबाज असतात इ.इ. विचारसरणी ही जातिवंत तुच्छतावादी आणि तितकीच अज्ञानमूलक आहे. मूळ मुद्दा समजला नसेल तर फुकाचा त्रागा करणं कुणी मूर्ख असेल तर आणि तरच समजू शकतो- अन्यथा नाही.

@तुम्ही समांतर रेषा एकमेकींना छेदत नाहीत म्हणून त्रागा करत आहात. >>> तुफ्फान रे धन्या! अपनी तरफ से तेरे को लाख लाख सलाम! __/\__/\__/\__

समांतर रेषा एकमेकींना छेदत नाहीत म्हणून त्रागा करण्या एव्हडे बॅटमॅन निर्बुध्द अजिबात वाटत नाहीत. खरे तर इथे दोन वर्तुळं आहेत, आणी हे जे काही चालु आहे ते फक्त कोणते वर्तुळ कोणत्या वर्तुळाच्या आत आहे याबाबत परिक्षण म्हणता येइल, म्हणूनच मुळात याला त्रागा म्हणनेच चुक आहे.

समांतर रेषा एकमेकींना छेदत नाहीत म्हणून त्रागा करण्या एव्हडे बॅटमॅन निर्बुध्द अजिबात वाटत नाहीत.
निर्बुद्ध वाटत नाहीत म्हणजे निर्बुद्ध असण्याची शक्यता आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला?
खरे तर इथे दोन वर्तुळं आहेत, आणी हे जे काही चालु आहे ते फक्त कोणते वर्तुळ कोणत्या वर्तुळाच्या आत आहे याबाबत परिक्षण म्हणता येइल, म्हणूनच मुळात याला त्रागा म्हणनेच चुक आहे.
अरे वा. तुम्ही दिक्षा वगैरे घेतलीत की काय "तू चुक आहे, मीच बरोबर आहे" म्हणण्याची? प्रत्येकाची प्रश्नाकडे पाहण्याची दृष्टी वेगळी असते. जे मला कधीही न छेदणार्‍या विचारधारा वाटल्या ते तुम्हाला दोन वेगळी विश्वं किंवा वेगळी वर्तुळं वाटली. हे चालायचंच. मात्र तुम्ही "चुक आहे" हा जो निष्कर्ष काढलात त्याचे मात्र आश्चर्य वाटतंय.

निर्बुद्ध वाटत नाहीत म्हणजे निर्बुद्ध असण्याची शक्यता आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला?
वाटत तर नाहीतच. होय... तशी शक्यता नाकारत नाही!
अरे वा. तुम्ही दिक्षा वगैरे घेतलीत की काय "तू चुक आहे, मीच बरोबर आहे" म्हणण्याची?
कूठे मिळते ? आपल्यास बराच अनुभव दिसतोय ?
प्रत्येकाची प्रश्नाकडे पाहण्याची दृष्टी वेगळी असते. जे मला कधीही न छेदणार्‍या विचारधारा वाटल्या ते तुम्हाला दोन वेगळी विश्वं किंवा वेगळी वर्तुळं वाटली. हे चालायचंच. मात्र तुम्ही "चुक आहे" हा जो निष्कर्ष काढलात त्याचे मात्र आश्चर्य वाटतंय
. तुम्हाला आश्चर्यही वाटतं ही एक सकारात्मक गोष्ट आहे. मला यात कुठेही छेदाछेदी दिसत नाही म्हणून त्याला रेषा मानणे चुकच असेच माझे ठाम मत आहे. कारण समांतर रेषा या कधीच जुळणार नाहीत...! पण मानवी मतांचे तसे नसते. ती बदलतात, अगदी याच धाग्यावरही हे सहजी घडु शकते, आणी हे न घडणारच नाहीचसे मानणे म्हणजे एकमेकांच्या निव्वळ अहंभावास मान्यता देणे होय. याला सकारात्मकता म्हणता कदापी येत नाही.

मूर्ख, पालथा घडा वगैरे शब्दांमध्ये तुमच्या दृष्टीनं पॉवर नसते ते आम्ही 'तात्पुरतं' स्वीकारलं. ( हा भाग मान्य करतो) त्यामुळं आमच्यावर काही परिणाम झालेला नाही. असो! भाषाशास्त्राचे नियम बनवून जमलेले शब्द आणि मंत्र अथवा नाम ह्यामध्ये फरक ह्यासाठीच आहे. त्या त्या शब्दामध्ये ताकद असते असा माझा विश्वास आहे, श्रद्धा आहे. ते सिद्ध करणं आम्ही म्ह टल्याप्रमाणं ११ माळा जप करा हा भाग तुम्हाला मान्य नाही. भाषाशास्त्र नसताना उत्पन्न झालेला फक्त ॐ हा स्वतःसिद्ध मंत्र आहे. (अकार, उ कार नि म कार हे तिन्ही वेगवेगळ्या प्रकारे प्राणायामामध्ये वापरले जातातच तो भाग वेगळा आहे) म्हणा रोज आणि फरक तुम्हीच सांगा. असाच विषय कोणतीही प्रतिमा, संस्कार, नसलेल्या दोन व्यक्ती घेऊन मंत्र आणि कोक अथवा दुसरा कुठलाही शब्द अथवा वाक्य घेऊन प्रयोग करु शकता! मरा मरा म्हणण्याची सुरुवात अथवा परे परे वगैरे ह्या गोष्टी काहीच न करता सुरुवात करावी ह्यासाठी सांगितलेल्या आहेत. संस्कृतात मारणे वगैरे काहीही नाही ना? वाल्याला राम उच्चारता येत नव्हतं म्हणून बाबा रे तुला मरा माहिती आहे ना मग मरा म्हण असं म्हणून सुरुवात कर वगैरे कथा आहे. परे परे ची गोष्ट शिष्याचा गुरुप्रति असलेला भाव व्यक्त करण्यासाठी आहे. गुरु नाही, इतर कुणी नाही. त्या नामावर/ मंत्रावर विश्वास आहे/नाही असं असलं तरी नाम काम करतं. त्याच्याबद्दलचा निग्रह काम लवकर करतं. एवढंच. मी थांबतो आहे.

परे परे ची गोष्ट शिष्याचा गुरुप्रति असलेला भाव व्यक्त करण्यासाठी आहे.
प्रत्येक गोष्टीला अध्यात्मिक मुलामा देण्याची तुमची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. :)

मुलामा कसला? परे परे म्हणाल्यानंतर त्या माणसानं आपला निग्रह ठेवून त्याच शब्दांचं आलंबन वापरलं नि योगी झाला. योगी झाला नि वल्लभाचार्य त्याला भेटायला गेले ही कथा गुरुंनी उच्चारलेले शब्द जसेच्या तसे अमलात आणण्या चा परिणामच व्यक्त करतात ना? आता तो माणूस योगी झाला त्याला गुरुमुखातून आलेले शब्द कारणीभूत होते त्याबरोबर त्याचा निग्रह कारणीभूत होता असं म्हटलं तर लगेच आम्ही जिंकलो ची पाटी ऑलरेडी लावली आहे ती दोन फूट वर करणार. (जिंकणं हरणं ह्यापेक्षा योग्य अयोग्य गोष्टींसाठी झगडणं जास्त उत्तम) दोन गोष्टींची सरमिसळ होतेय. १. मनोनिग्रह नि २ शब्दांमध्ये असलेली ताकद. मनोनिग्रह नसेल तरीही शब्द उच्चारत उच्चारत मनोनिग्रह होतो नि काम होतं हे मी आधीही सांगितलं आहे नि आत्ताही सांगतो आहे. ती त्या शब्दांची ताकद आहे. मरा मरा म्हणणारा वाल्या नंतर राम राम म्हणू लागला नि त्याचं काम झालं. रावण म्हणून दुसरं काही काम होईल, तेच काम होणार नाही. आता आवरलं. ;)

मरा मरा म्हणणारा वाल्या नंतर राम राम म्हणू लागला नि त्याचं काम झालं.
वाल्मिकी रामायणातील ह्याचा संदर्भ देऊ शकाल काय? कारण स्वतः वाल्मिकी रामाला म्हणतात प्रचेतसोऽहं दशमः पुत्रो राघवनन्दन | न स्मराम्यनृतं वाक्यं तथेमौ तव पुत्रकौ ||| मी प्रचेताचा (वरूणाचा) दहावा पुत्र आहे. मी कधीही असत्य बोललेले मला स्मरत नाही. हे तुझेच पुत्र आहेत याची खात्री बाळग. संदर्भः http://sanskritdocuments.org/mirrors/ramayana/valmiki.htm

:) मरा मरा थिअरी तुम्हीच आणलीत प्रतिसादात. ती ऐकीव गोष्ट आहे हे आ म्हालाही मान्य आहेच. तरीही सुरुवातीलाच मदनबाण नं म्हटल्याप्रमाणं त्यानं रिझल्ट मध्ये काहीही फरक पडत नाही...