Welcome to misalpav.com
लेखक: नानासाहेब नेफळे | प्रसिद्ध:
. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी ह्यांचा सध्या दणक्यात प्रचार चालू आहे. मोदीँना विकासपुरुष या टॅगखाली प्रोजेक्ट केले जात आहे. ज्या प्रमाणे त्यांनी गुजरातचा विकास केला त्याप्रमाणे ते भारताचा विकास करणार आहेत अशी आश्वासनांची खैरात टीव्ही ,सोशल मिडीया, रेडीओवर सतत करण्यात येत आहे .परंतु या विकासपुरुषाच्या प्रचारामागे भाजपची जातीय गणिते चालू आहेत, ज्याचा लेखाजोखा माध्यमं जनतेपर्यंत पोचवत नाही आहेत. आज पर्यंत भाजपाचे जे राजकारण राहीले आहे ते शेटजी भटजी या संज्ञेने ओळखले जाते. भाजपचा पिता 'जनसंघाला सुरवातीला याचा फायदा झाला .आणिबाणी नंतरही जनसंघ सत्तेत आला याला कारण त्याचे सुखवस्तु लोकांचे राजकारण .. परंतु जसे जसे जातीय अस्मितेचे राजकारण सुरु झाले तसा जनसंघ/जनता पार्टी निप्रभ होत गेले व काँग्रेस आणखी प्रबळ झाली. भाजपचा जन्म झाल्यानंतर मात्र हा शेटजी भटजीचा शिक्का पुसण्यासाठी ओबिसींचे ध्रुवीकरण करण्याची सुरवात झालि. भाजपात असलेला ओबिसी नेत्यांचा भरणा याचेच द्योतक आहे. परंतु भाजपने कधिही ओबिसी नेत्यांना अतिमहत्वाची पदे दिलेली नाहीत. एनडीएच्या काळात वाजपेयी ,अडवाणी, प्रमोद महाजन ,मुरली मनोहर जोशी ,यशवंत सिन्हा ,जसवंत सिंग या गैर ओबिसींच्या हातात सुत्रे दिली गेली. ज्याचा परिणाम म्हणजे शायनिंग इंडीयाचा फुटलेला फुगा ..ओबिसींनी डावलले गेल्याच्या भावनेतुन काँग्रेसला व तत्सम पक्षांना मतदान केले .भाजपचा बेस असलेला ओबिसी समाज त्यांच्यापासुन दूर गेल्यानेच त्यांनी आता नरेंद्र मोदींच्या रुपाने ओबिसी कार्ड खेळले आहे. मोदी हे घंची /तेली या ओबिसी जातीचे आहेत. त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार करुन भाजपने दोन प्रकारे त्यांचा प्रचार चालू ठेवला आहे.. भारतभर तरुण वर्गात सोशल मिडीयाचा वापर करुन त्यांना विकास पुरुष म्हणुन पुढे करायचे... त्याच वेळी जिथे जातीय समिकरणे महत्वाची आहेत व दिडशे लोकसभा मतदार संघ आहेत अश्या युपी बिहार व हिंदी बेल्टमध्ये मोदींना ओबिसी म्हणुन प्रोजेक्ट केले जात आहे. याचे कारण ओबिसींची सर्वाधिक संख्या या पट्ट्यात आहे. नुकतेच नरेंद्र मोदींनी बिहारात "माझ्यासारख्या मागासवर्गीयाला भाजपने पंतप्रधानापदाचे उमेदवार केले आहे" त्यामुळे भाजपवरचा ब्राह्मणांचा पक्ष असल्याचा दावा खोटा असल्याचे म्हण्टले आहे. भाजपचे राजकारण नेहमीच संभ्रमाचे राहीले आहे, ऐकीकडे हिंदुत्वाच्या व्याख्येचा दाखला देऊन जातीय आरक्षणाला विरोध करायचा त्याचवेळी अनेक तुकड्यात विखुरलेल्या ओबिसी समाजाचा वापर करुण घ्यायचा ,परंतु वरवर असे करुन चालणार नाही याची चुणुक त्यांना २००४च्या निवडणुंकांमध्ये आली आहे. नरेंद्र मोदींनी भाजप खाऊन टाकला आहे वा त्यांना तसे करताना अंतर्गत विरोध झाला नाही याचे कारण त्यांच्या ओबिसी असण्यात आहे.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

म्हणजे सध्यातरी माणुस गाढवाच्या वरच्या जातीचा आहे ;)

उलट सांगताय... राज्यात २५ टक्के असलेल्या मराठ्यांना इतर समाजाची allergy येते, मनोहर जोशी व नंतरच्या काळात सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर यांचा जीव कासावीस झाला होता.

नानासाहेब नेफळे (मिपा) = ग्रेट थिम्कर (ऐ अ) = पालथाघोरस (मा बो) मोदीची जाहीरात अशीच करत रहा ! उभा भारत आपला आभारीच राहील !!

राजकीय लेख लिहताना सनदशीर मार्गाने एखाद्याचे जातीविशेष सांगणे यात गैर काही नाही.फ्रीडम ऑफ स्पीच एण्ड एक्स्प्रेशनचे घटनेतले कलम याचा अधिकार देते. अट्रोसीटीची तक्रार फक्त SC/ST व्यक्तीच इतरांवर दाखल करु शकतात.त्या इतरांमध्ये 'ओबिसीही' आले. एखाद्या ब्राह्मणाने मराठ्यांची ,मराठ्यांनी माळी माणसाच्या जातींचे उल्लेख अपमानजनक पद्धतीने केल्यास एट्रोसिटी कलम लागू होत नाही ,परंतु उपरोक्त तिघांपैकी कुणीहि SC/ST समाजातील व्यक्तीच्या जातीचा अपमानजनक उल्लेख केला तर त्यांना जातीवाचक शिवागाळीचा कायदा लागू होतो.ऐट्रोसिटी कायद्याबद्दल बरेच गैरसमज आहेत हे मात्र नक्की.

सारख्या ह्याच्या-त्याच्या जातीपातीच्या शिळ्या कढीला ढवळून लोकांना काय आनंद मिळतो कोणास ठावूक... तोच तोच पणाचा कंटाळा यायला लागला आहे आता.

कंटाळा तुम्हाला हो कारण तुम्ही बामन ना. ह्या तुम्हाला काय कळणार ५००० वर्ष तुमच्या बाप जाद्यांनी काय काय अत्याचार केले. ह्या काय काळातच नाय तुम्हाला हो. तुम्ही जेंव्हा त्यांच्या घरी राबाल तेंव्हाच खरी जातपात नष्ट होईल. काय बरोबर ना हो नेफळे

चैतन्य ईन्या साहेब, तुम्हाला माझी जात कशी काय कळली हो... की उगाच आपले ब्राह्मण्द्वेशाने भारुन सगळ्यांनाच ब्राह्मण ठरवताहेत. असो... मला येथे माझी जात उघड करण्याची काही गरज व सक्ती भासत नाही त्यामुळे तुमचे चालु द्या... आणि जमलेच तर मोठे व्हा.

वास्तवीक जातीच्या चष्म्यातून राजकारण आणि एकंदरीतच बघणे मला मान्य नाही. मात्र या धागाप्रस्तावात बराच बाष्कळ पणा दिसल्याने त्यातील संदर्भित मुद्यांवर लिहीत आहे. आज पर्यंत भाजपाचे जे राजकारण राहीले आहे ते शेटजी भटजी या संज्ञेने ओळखले जाते. ते सुरवातीच्या काळात डाव्या विचारवंतांच्या (अप)प्रचारामुळे आणि नंतरच्या काळात डाव्यांनीच भरलेल्या प्रसिद्धीमाध्यमांमुळे होत राहीले. जर इंटरनेटमुळे माध्यमे मुक्त झाली नसती तर अजूनही भाजपाचा आवाज ऐकायला आला नसता... भाजपा/जनसंघ आणि त्यांची पितृसंस्था संघ यांच्यात जातीवरून काही घडत नाही. भाजपचा पिता 'जनसंघाला सुरवातीला याचा फायदा झाला .आणिबाणी नंतरही जनसंघ सत्तेत आला याला कारण त्याचे सुखवस्तु लोकांचे राजकारण .. जनसंघाला फायदा काय झाला? आणिबाणीनंतर जनसंघ सत्तेत कधी आला? आणिबाणीनंतर जनता पार्टीच्या बॅनर वर निवडणुका जिंकल्या गेल्या आणि नंतर सरकार कोसळल्यावर भारतीय जनता पक्ष अस्तित्वात आला. परंतु जसे जसे जातीय अस्मितेचे राजकारण सुरु झाले तसा जनसंघ/जनता पार्टी निप्रभ होत गेले व काँग्रेस आणखी प्रबळ झाली. कारण काँग्रेसने जातीय अस्मितेचे राजकारण केले. त्याच बरोबर व्हिपि सिंग आणि इतर समाजवाद्यांनी देखील या सामाजीक दुहीच्या आगीत तेल ओतण्याचे काम केले. एनडीएच्या काळात वाजपेयी ,अडवाणी, प्रमोद महाजन ,मुरली मनोहर जोशी ,यशवंत सिन्हा ,जसवंत सिंग या गैर ओबिसींच्या हातात सुत्रे दिली गेली. एनडीएच्या आधी देखील कल्याणसिंग हे ओबिसी समाजातले मुख्यमंत्री होते. बंगारू लक्ष्मण हे मागासवर्गीय समाजातले नेते आणि मुळचे संघकार्यकर्ते भाजपाचे एनडीएच्या काळातले अध्यक्ष होते. पण तेहलकामुळे त्यांना ते पद सोडायला लागले. बाकी, सध्याच्या काळात निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा काही जागांचा त्या अर्थाने विचार करत असेल तर details माहीत नाहीत, पण आश्चर्य वाटणार नाही. असो.

विकांताला बघावा म्हणतो. माझा फार आवडता व्हिडिओगेम आहे तो. आता त्यावर चित्रपट आला हे उत्तम झाले पण रिव्हू हवा होता. जाण्कारान्नि उजेड टाकावा

पण एज ऑफ एम्पायर पेक्षा त्याचं थोडं फुडलं व्हर्जन एज ऑफ काँकरर्स जास्तं भारी आहे.

त्यात हार्डेस्त लेवल दोन एनिमी घेउनही जिंकतो. आता मोफत ओन्लाइनहि उपलब्ध आहे या एकदा मैदानात आपले सैन्य घेउन हौदे एक मैत्री पूर्ण सामना :) रच्याकने Nfs आजच बघितला पुरता नोस्टेल्जिक झालो. चित्रपट आवडला. फास्ट फ्युरिअस सारखा भपका अथवा तंग कपड्यातिल एकहि ललना चित्रपटात नाही पण गाड्यांचे सिंन्स तूफ़ान आहेत. गेम मधील ट्रेक्स जशे च्या तसे पण खरे शूट केलेत. काही प्रसंगात पडद्या वरील गाडी कंट्रोल करायला प्रत्यक्ष बोटे सुधा शिवशिव्तात... अजुन एकदा नक्कीच बघेन.0

तुझ्याबरोबर खेळायचं म्हणजे हरण्यासाठीच! त्यापेक्षा तो मंद्या पण विचारतो आहे, तू त्याच्याबरोबर खेळ ना! नीड फॉर स्पीड सिनेमा नक्कीच बघितला पाहिजे!

एज ऑफ एम्पायर साठी रात्र रात्र जागवली आहे.. ते शत्रुचे हत्ती मंत्र मारुन आपले करणे सर्वात आवडता भाग. =)) बजरु..