Welcome to misalpav.com
लेखक: शशिकांत ओक | प्रसिद्ध:
कावळा बायकांनाच का शिवतो?
पूर्वी कित्येकदा घरोघरी वडील स्वयंपाकी बनून कामाला लागलेले दिसत. 'आमच्या आईला कावळा शिवलाय' अशी ओळ कानावर येणे अंगवळणी पडलेले असे. कावळे बायकांनाच कसे काय शिवतात बुवा? असे मनोमन वाटून बालपणात ही विचारणा तशीच राहून गेली. मोठे झाल्यावर ते आपोआप समजून आले! मात्र ते कळायला मला माझा मठ्ठपणा कारणीभूत झाला. त्याचे झाले असे की सैन्य दलातील कँन्टीन स्टोअर्स मधे टूथपेस्ट पासून फ्रिज, टीव्ही, कार पर्यंत सर्व वस्तू विकत घ्यायला झुंबड असते. नोकरीला लागल्या नंतर सुरुवातीच्या काळात मी कधीतरी शेव्हींग किट, तेल, साबण आणायला जात असे.एकदा गेलो असता एका सुंदर पॅकेट वर नजर पडली. 'ये क्या है? 'नैपकिन सरजी' काऊंटरवरील एयरमनने माहिती पुरवली. 'जरा एक निकालना' माझी फ़रमाईश. 'सिंगल पीस नही पूरा पैकेट लेना पडेगा ' चेहऱ्यावर वैताग दाखवत तो म्हणाला. अशा काउंटर ड्यूटीमुळे परेशान एयरमन मनात म्हणत असावा की माझे काम विमान दुरूस्त करायचे सोडून मी इथे कँटीनमधे आलेल्यांच्या फालतू विचारणात का वेळ घालवतोय?' 'ठीक एक पॅक देना 'मी ऑर्डर दिली. त्याच्या शेजारच्या काउंटरवरील एक सीनियर सरदारजी 'चीफी उर्फ फ्लाइट सार्जेंट' म्हणाला,' सर, मॅडम नहीं आई? 'मॅडम क्या खाक आएगी! अभीतक मेरे घर बारात नही आयी है' मी सरदारजीला दमात घेत म्हटले. "सर, ये लेडीज़ नैपकिन है। आपके-हमारे काम नहीं आयेंगे। दबक्या आवाजात सरदारजींनी पुरूषी सीनियारटी दाखवत दटावले. कधी कधी पँटचे झीप नीट बंद नाही असे दाखवून दिल्याबद्दल ओशाळलेला चेहरा होतो तसा करत मी परतलो. कावळा शिवल्यावर पुढे पुढे या पैकेट्सचे ढीग घरी येऊ लागले तशी हळू हळू उत्सुकता मावळली.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

साती, मला एक सांगा, मी कुठेहे तुमचे नाव घेता जनरल बर्‍याच आयड्यांबाबत ते लिहिले होते, तर तुम्ही ते स्वतःच्या अंगावर का ओढवून घेतले, मला काही समजले नाही खरेच. तुमचा कोणताही प्रतिसाद आजवर मी उडवला नसताना, माझा प्रतिसाद उडवालच वगैरे कशाला बोललात? मूळात गरज नसताना ओककाकांच्या मागच्या लेखाचे संदर्भ का? >> स्त्री पुरुष समानतेचा संबध नसताना जर तो मुद्दा होऊ शकतो, तर ज्या लेखकाच्या धाग्याचा विषय आहे, त्याच लेखकाच्या मागच्या धाग्यांचा उल्लेख झालेला का खटकावा? आमचा तोच फक्त मुद्दा.. असं काही आहे का? >>माझ्या बर्याचश्या प्रतिसादांच्या मागेमागे इकडचं तिकडचं उकरून >>आँ? बर्‍याचश्या प्रतिसादांवर काय उकरलं आहे ते सिद्ध करा. नाहीतर विधान मागे घेऊन माफी मागा.

मूळात इथे कोण कुणावर कुरघोडी करायचा प्रयत्न करत नसताना तुम्ही हा पॉईंट स्कोअर केलात वैगेरे भाषा काय संयत मानसिकतेचे ध्योतक आहे का?
हे अगदीच अरेरे आणि दुर्दैवी. तुअम्च्या पहिल्या संयत भाषेतल्या प्रतिसादाबद्दल ते होते. ब्राऊनी पॉईट्स. कौतुक होतं ते , प्रतिसाद विषयाला टेंजंट होता (कारण पाळीबद्दलचं लिखाण हा मूळ मुद्दाच नव्हता - पाळी वा त्याबद्दलचा किस्सा कसा संयत भाषेत सांगता येतो आणि मुद्दा पोहोचवता येतो ह्यासाठी सूड्चा धागा पहावा) तरी उत्तम भाषेसाठी ते पाँईट्स होते, पण एकाच दिशेन विचार करुन अर्थाचा अनर्थ करुन एखाद्याचे नाव कारण नसताना कसे खराब होऊ शकते ह्याचा हा एक चपखल नमुना. असो. :) चालूदेत.

व्यक्तीच्या मनाला दुखवणारे काही झाले असल्यास त्या हरकतीचा योग्य मान किंवा मौन यापैकी एक व्हावे.
मौन एकवेळ मान्य .. की हरकतीच्या प्रतिसादावर काहीच प्रतिक्रीया न देणे.. योग्य मान म्हणजे नक्की काय करावे?? खास करुन आपल्याला त्यात काही आक्षेपार्ह वाटत नसताना.. परत त्या प्रतिसादावर प्रतिसाद नाही दिला तरी धाग्यावरी इतर सर्व प्रतिसाद वाचून एखाद्याचे मन परत परत दुखावले जाउ शकतेच ना.. त्याला काय करणार?? आणि हजारो आयडी आणि शेकडो वेगळेवेगळे विषय असताना कुणाचे मन कुठे दुखावेल सांगता येत नाही...

..पण कोणाचे मन दुखावल्यास त्यावर तार्किक प्रतिवाद करु नये असं मत आहे.
ह्याला समंजसपणा असे म्हणतात. प्रचंड सुंदर प्रतिसाद.

याला समंजसपणा नव्हे, सारवासारव म्हणतात. मुळात काही लोकांनी अकारण भावनांची गळवे दुखवून घ्यायची आणि वाट्टेल ते ताशेरे ओढायचे (कुणालाही वैयक्तिक रीत्या उद्देशून लिहित नाही, पण काही मासलेवाईक प्रतिक्रिया पाहू - ) - मुक्तपीठीय पोस्ट ! - खूपच मजा येत असेल ना चित्रगुप्तकाका, ह्या विषयावर चवितचर्वण करुन? चालूदेत. जिलबी आहे ही. ती ही बेचव. ओकावंसं वाटणारा धागा टाकला काकांनी मग इतरांनी सभ्य शब्दात पण कणखर आणि मुद्देसूद प्रतिवाद केला की त्यांच्यावर अतार्किक, असंबद्ध आरोप (त्या अमक्या धाग्यावर लेखकाची टिंगल ना हो केली होतीत? मग आता बाजू का घेताय?...मला तरी यातलं अगम्य लॉजिक समजलेलं नाही) व्यक्तिगत टोमण्यांची राळ उडवून देणे, आणि केवळ वादासाठी वाद... आणि हे डावपेच व्यर्थ जाताहेत म्हटल्यावर गविंसारखा कोणीतरी येऊन रुद्ध कंठाने भावनात्मक आवाहन करणार - मग आपण कसे एक्स्टेंडेड कुटुम्ब आहोत की नाई, ताईसाहेबांचा, मामासाहेबांचा मान राखला पाहिजे की नाही, मग माफी मागा पाहू, वगैरे टिपिकल एमोशनल ब्लॅकमेल. मुळात फालतू नॉन-इश्युवरून कोणी मन दुखावून घेत असेल तर त्यानेच ते मनात ठेवावं, किंवा मग उघडपणे मत मांडायचं झाल्यास प्रतिवाद ऐकण्याची तयारी ठेवावी. सोयीस्कर असेल तेव्हा मिसळपाव हे एक ऑनलाईन फोरम आहे आणि नसेल तेव्हा एक्स्टेंडेड कुटुम्ब अशी मखलाशी करू नये.