मानसिक त्रास
काल ७ एप्रिल रोजी माझ्या आईची पुणे येथील पासपोर्ट ऑफिसची ३:४५ ची अपाँटमेंट होती.
१.व्यवस्थित भरलेला फॉर्म
२.रीसीट
३.आधार कार्ड
४ पॅन कार्ड
५. शाळा सोडल्याचा दाखला
६.दहावीचे बोर्ड सर्टीफिकेट
७. अॅनेक्चर डी ( लग्नानंतरचे नाव बदलल्यासाठी)
८.अॅनेक्चर ए ( जन्मगाव )
९. लाइट बिल
१०. राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक (१ वर्षा हूनही जुने)
वरील सर्व मूळ कागदपत्रे आणि त्याम्च्या सेल्फ अॅटेस्टेड झेरॉक्सचे २ सेट असे नेले होते.
प्रचंड गर्दी आणि २.५ तास वाट पाहिल्यानंतर नंबर आला . पहिल्या ठिकाणी सर्व कागदपत्रे तपासून "ओके" चा शेरा मिळाला पुढे दुसर्या काउंटरवर फोटो हाताचे ठसे घेतले . एवढे होईतो ७ वाजत आले होते. पुढील माणसाने कोणतीही माहिती न देता "insuffiecient documents" असा शेरा मारला . त्याला कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करायची आहे हे विचारले असता. त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली आणि दुसर्या काउंटरवर पाठवले ( त्याला मराठी येत नव्हते आणि आइचे हिंदी- इंग्लिश कच्चे आहे). आणि त्याने पुढची तारीख २१ मे टाकली आणि निघून गेला. दुसर्या काउंटरवर तिथल्या महिलेने कागदपत्रे तपासली आणि योग्य असल्याचा निर्वाळा दिला. पण तोवर हा मनुष्य सीस्टम बंद करून निघुन गेला होता.
त्या महिलेने सांगितले एकदा तुमचा अॅप्लीकेशन ऑन होल्ड स्टेटस वर गेले तर पुन्हा त्या तारखे शिवाय काहीच करू शकत नाही. या प्रकारात ८ वाजून गेले होते. प्रंचंड मनस्ताप झाला होता आणि पासपोर्ट ची पुढची तारीख २१ मे ( ४५ दिवसानंतरची) मिळाल्यामुळे बर्याच प्लॅनवर पाणी फिरले आणि यात कोणतीही चूक नसताना !
दुर्दैवाने या विरूद्ध कुठेही तक्रार करायची सोय नाही . फीडबॅक मधे लिहा किंवा कॉल सेंटरला कॉल करा ठराविक साच्याची उत्तरे मिळतात पण बेजबाबदार कर्मचार्यांची तक्रार करण्याची आणि कारवाईची सोय कुठेही नाही.
अशा गोष्टी टाळण्यासाठी
१. महाराष्ट्रात मराठी भाषिक कर्मचारी / अनुवादक असावेत.
२. प्रत्येक कर्मचार्याने काम न होण्याचे कारण लिखित स्वरूपात द्यावे.
३. तक्रार नोंदणी आणि कारवाइ विभाग असावा
(अशी दिवास्वप्ने आहेत).
प्रत्येक सरकारी विभागात अशीच रड असते.
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
हरामखोरानी मला ४ वेळा बोलावले होते.
...
प्रत्येक सरकारी विभागात अशीच रड असते.असली बेजबाबदार विधाने करायची असतील तर कृपया अधिक चांगला देश पहा आणि सुखाने रहा. सरकारी कर्मचारी काही दुसर्या देशातून येतात का ? तुमच्यासारख्या जनतेमधूनच येतात ना हा लेख अतिशय ढोंगी वाटतो आणि आपल्याला फटका बसला की इतरांना जबाबदार धरणार्या प्रवृत्तीचा वाटतो. या ऑफीसमधे अनेकांना आजवर उत्तमच अनुभव आलेला आहे. काही भाग टी सी एस आणि काही परराष्ट्र मंत्रालयाकडे आहे. सर्वजण अत्यंत सौजन्याने वागतात. रोज एवढ्या मोठ्या संख्येत येणार्या लोकांचे काम हाताळायचे आणि तरी चेहेरा हसतमुख ठेवायचा हे कौतुकास्पद आहे. यात काडीचीही अतिशयोक्ती नाही. अगदी बाहेर केवळ शंका विचारण्यासाठी एक माणूस बसलेला आहे. रोज लोक येऊन त्याला पिडतात तेच तेच प्रश्न विचारतात पण तो तितक्याच उत्साहाने उत्तरे देतो. दिलेल्या वेळेच्या स्लॉटमधे गेल्यास कामे व्यवस्थित होतात. अलिकडे तर पैसे भरणे आणि नंबर लावणे हे दोन्ही ऑनलाइन झाले आहे. त्यामुळे सुटसुटीतपणा आलेला आहे. कंप्युऊटर नव्हता तेव्हाही गडबड गोंधळ अजिबात नव्हता. कारण माणसे शिस्तीची आहेत. आता यातूनही कुणाला काही त्रास झाला असेल तर त्यांनी आपले काय चुकले हे आधी सांगावे मिसळीकडे दाद मागायला येऊ नये.वा वा ! (अगदी हितसंबंधांचा
कंप्युऊटर नव्हता तेव्हाही गडबड गोंधळ अजिबात नव्हता. कारण माणसे शिस्तीची आहेत.कुठल्या ग्रहावर ही स्थिती होती हे सांगितले असते तर बरे झाले असते !? :) फार पूर्वीही अर्ज दाखल केला की ६ ते ८ आठवड्यात पासपोर्ट मिळायचा. आता पोर्टलवरून साधारण (ऑर्डिनरी) अपॉईंटमेंट सहा आठवड्यांच्या नंतरची मिळते आणि पासपोर्ट त्यांनतर सहा आठवड्यांनी... म्हणजे एकूण बारा आठवड्यांनी पासपोर्ट मिळतो ! काही कारण नसताना पासपोर्ट अर्ज केल्यानंतरही ३ महिने नविनिकरण करून दिला नाही तेव्हा पासपोर्ट अधिकार्याला भेटून जरा जोरात नक्की कारण विचारले तरी ते सांगता आले नाही. मात्र याचा फायदा नविन पासपोर्ट आठवड्यात मिळण्यात झाला ! का बरे ? आजही पोर्टलवर ज्या प्रती जोडव्या त्यांची यादी आहे ती खूप जुनी आहे. तिच्या योग्य ते बदल केले जात नाहीत. तरीही लोकांनी अंतर्ज्ञानाने ते ओळखावे नाहीतर कोणतीही तक्रार न करता पुढच्या (४-६ आठवड्यांनतरच्या) तारखेला परत यावे, यात काही गैर आहे असे तेथल्या शासनाला वाटत नाही. अर्थात, लोक कंटाळून अथवा वेळेच्या कमीमुळे एजंटतर्फे जादा फी भरून आले तर आनंदाचीच गोष्ट आहे, नाही का ? आजही तत्काळ पासपोर्टची अपॉईंटमेंट पोर्टलवर ऑनलाईन मिळत नाही, पण एजंटला हवी तेवढी फी दिली की दोन दिवसानंतरची मिळते ! भारतिय पासपोर्ट ऑफिस भारतातले असो परदेशातले, त्यांच्या कारवाईमध्ये खूप सुधारणा व्हायला हवी आहे हे नक्की.एकंदरीत सहमत आहे
पासपोर्ट ऑफिसचा अनुभव चांगलाच
माझा अनुभव चिखलीचा आहे
कागदपत्रांची पूर्तता करणे
या ऑफीसमधे अनेकांना आजवर
बारा वर्षापूर्वी
ठान्यातल्या ओफिसात एकदम पटकन
गरज पडली तर म्हणून..
कुठल्या परिसरातील हवा आहे?
गिरिराज ट्रॅवल्स
व्हिश्याबाबत कल्पना नाही
अधिक माहिती
ओके
एजंटची गरजच नाही तुम्ही
मला निराळाच अनुभव आलाय,गर्दी
@ आशु जोग दादा..
दुर्दैवी
मी मान्य करते की चुक
हा नवीन नियम कधीचा आहे?
नेमकी चुक कोणती?
...
जन्मदाखला - आईचे सासरचे नाव
...
जन्मदाखला पि.चि.मनपा कडुन मिळालेला आहे. तो बदलता येत नाही असा रुल आहे.पि.चि.मनपा भारतातच येते म्हणावं... सगळ्या भारतात नियम सारखेच आहेत. अर्थात तुमच्यासारखा प्रॉब्लेम तिथेही अनेकांना आला असेल त्यामुळे दाखल्यात बदल विषयीची माहिती देणारी पाटी बाहेरच लावलेली असायला हवी. नाही म्हणायचे कारणच नाही. आणखी एक- येवढ्यासाठी स्वतःचे नाव बदलून घेण्याच्या फंदात पडू नका आणि ते पॅन पासपोर्ट बॅक अकाऊंट सगळीकडे करणेही शक्यही नसते त्यामुळे गोंधळ वाढेल ... आपल्या देशात सरकारी नियम हे फारच काटेकोर आणि लाखो केसेसचा विचार करुन केलेले असतात हा विश्वास बाळगाकृपया हा लेख वाचावा
...
:-)
...
सरकारी काम चार महिने थांबमी स्वतः या सगळ्याचा अनुभव घेतला आहे अगदी मोठ्या शहरापासून तालुक्यापर्यंत आणि भारतात काही प्रांतात. पण बहुतेक ठिकाणी जिथे वेळ लागतो तिथे सरकारी कार्यालयाला कामही प्रचंड असते. ऑफिसच्या वेळेनंतर आणि सुटीच्या दिवशीही येऊन कित्येक ऑफिसात काम चालते. आणि प्रायवेटमधे फार उत्तम काम चालते असे वाटत असेल तर त्यांनी एयरटेल, आयडीया, रिलायन्स कम्युनिकेशनचा गोड अनुभव घ्यावा. जाता जाता तुम्ही एकटे प्रामाणिक असलात तरी बाकी सगळी जनता प्रामाणिक आहे अशी खात्री देता येइल का भारतात आणि अमेरिकेतहीhttps://arogya.maharashtra
...
ह्या दोन्ही ठिकाणी मला असे करेक्शन होणार नाही हेच सांगण्यात आलेम्हणून तुम्ही स्वतःचे नाव बदलायच्या फंदात पडू नका. पुढचे गोंधळ निस्तरता येणार नाहीत. करेक्शन करता येत नाही असे तोंडाने सांगत असतील तर त्यांना अर्ज द्या. त्यांचे लेखी उत्तर घ्या आणि मग त्यांच्या बापाकडे जा. आणि हेच बेसिक आधारभूत डॉक्यूमेंट असल्याने ते करेक्ट मिळाल्याशिवाय त्यावर आधारीत दुसर्या कामाला हात घालू नका. बर्थ सर्टिफिकेट बदलून मिळते बर्थ सर्टिफिकेट बदलून मिळते बर्थ सर्टिफिकेट बदलून मिळते भारतात सर्वत्र नियम सारखेच आहेत. हे मी अनुभवाने सांगत आहे.थांबाच आता..
एक केस
निर्णय पटला नाही
कोर्टाचा निर्णय
पटतो
खरंय
एक नुकतेच कळलेले उदाहरण
नॉट वर्थ इट
मान्य आहे
@ श्रीरंग जोशी आणि आजानुकर्ण
सरकार ठरवून त्रास देत नसेल
पिरा अॅफिडेविट करणे आणि
विचार तोच आहे.. करुन तर पाहु.
दुवा
पासपोर्ट वर नाव बदलता येतेच..
सरकारी रुग्णालय
धन्य
मुलाचच नाव गॅझेट मध्ये बदलुन
Pagination