Skip to main content

-

इतकेच मला जाताना - विडंबन काव्य

लेखक साहना यांनी शुक्रवार, 07/08/2026 04:54 या दिवशी प्रकाशित केले.

इतकेच मला जाताना शाखेवर  कळले होते-
गोबीने  केली सुटका नेहरुने छळले होते !

 

केलेल्या चुकांचा हिशेब गडे विसरूया,
पाऊल कधी गोबीचे चुकीचे पडले  होते?


तू ऐकवली आता मज तुझीच वेगळी कहाणी..
SIR मधून नाव तुझे मीच वगळले होते !


याचेच रडू आले की जमले न जास्त काही-
मी पोस्ट गोबीच्या स्तुतीचे फॉर्वर्डेड ऍज रिसिव्हड केले होते


मते गोबीला मागायला मी वार्‍यावर वणवण केली-
दार माझे  स्वतःचे आधीच निखळले होते !


शत्रूचे लोक आज पार्टीत सहजी मंत्री होत गेले 
कालचेच लोक आजही सतरंजी उचलत होते !

 

धर्म, देश आणि सोयीची व्याख्या!

लेखक अनिशासूत यांनी रविवार, 19/07/2026 09:48 या दिवशी प्रकाशित केले.

​आज सोशल मीडिया स्क्रोल करताना एका व्हिडिओवर काही कमेंट्स वाचल्या आणि डोके भणभणून गेले. देशातल्या विद्यार्थ्यांच्या, तरुणांच्या हक्काच्या आंदोलनाला किंवा त्यांच्या मागण्यांना थेट 'देशविरोधी' किंवा 'धर्मविरोधी' ठरवण्याचा एक नवा ट्रेंड सध्या जोरात सुरू आहे. अशाच एका कमेंटमध्ये कुणीतरी लिहिले होते, "हा आमच्या देश आणि धर्माच्या विरोधात जाणारा आहे, त्यामुळे आमचा अजिबात पाठिंबा नाही." ​हे वाचून मला पडलेला प्रश्न अगदी साधा आहे, भावांनो, तुमचा 'धर्म' आणि 'देश' म्हणजे नेमकं काय रे? ​हा प्रश्न पडण्यामागे माझी एक जुनी आठवण आहे.

एक जीवघेणं लावण्य!

लेखक अनिशासूत यांनी मंगळवार, 07/07/2026 18:10 या दिवशी प्रकाशित केले.

सूर्य उगवला, सकाळ उमलून आली. जाग आली तर माझ्या हातावर डोकं ठेवून निजलेली तू. अस्ताव्यस्त केस, मोठं कपाळ, लांब नाक, गोऱ्यापेक्षा जरा कमी आणि सावळ्यापेक्षा जरा उजळ रंग. तुझे ते गडद गुलाबी ओठ, नाजूक हनुवटी आणि कचकन चावा घ्यावासा वाटणारे तुझे ते गोड कान. आखीव भुवयांच्या खाली बंद पापण्याआडचे तुझे पाणीदार डोळे.

काव्यरस

'पारदर्शक' पावत्या आणि बुडालेला हिशोब!

लेखक अनिशासूत यांनी मंगळवार, 07/07/2026 10:30 या दिवशी प्रकाशित केले.

काही दिवसांपूर्वी 'अशी ही बनवाबनवी' मधल्या त्या ७० रुपयांच्या हिशोबावरून सोशल मीडियावर खूप गप्पा रंगल्या. तेव्हा धनंजय माने अत्यंत गंभीर चेहऱ्याने म्हणाला होता की ७० रुपये वारले! पण आजकालच्या डिजिटल आणि अत्यंत 'संस्कारी' युगात हिशोबाचे आकडे आणि स्वतःच्या फायद्यासाठी बदलली जाणारी श्रद्धेची व्याख्या पाहिली, की जाणवतं की आता फक्त ७० किंवा ३७० रुपये नाही, तर थेट कोट्यवधी जनतेच्या श्रद्धेचा जाहीर लिलाव मांडला गेला आहे. अयोध्या प्रभू रामचंद्रांच्या नावाने जमा झालेल्या दानपेटीतील ज्या चोरीचे प्रकरण समोर आले आहे, ते निव्वळ धक्कादायक नसून डोळ्यात अंजन घालणारे आहे.

मांजरे येती रॉयल घरा.. 😺

लेखक साहित्ययात्री यांनी गुरुवार, 02/07/2026 21:53 या दिवशी प्रकाशित केले.

मांजरे येती रॉयल घरा...🐱

 

असेच एकदा टाईमपास म्हणून ब्रिटिश न्यूज चॅनेल्स पाहत होतो. आपल्या सुनक साहेबांचे भाषण होणार होतं.  10 डाउनिंग दरवाजा उघडला आणि कॅमेराचा एकदम चकचकाट टीव्हीवर पाहायला मिळाला. पण मग नीट बघितलं तर ब्रिटनचे पंतप्रधान नाही,एक गुबगुबीत मांजर बाहेर आले होते. 

10 डाउनिंग स्ट्रीट मध्ये मांजर?? ते पण असे भटके दिसणारे??? 
आपल्याकडे दर दाराआड काठी तय्यार ठेवलेली घरे अजूनही पाहायला मिळतात. वाजले म्याव की हाण काठी!

आमी तर ब्वा sin, cos, tan असलं काय वापरत नाय!

लेखक मनस्विता यांनी शुक्रवार, 26/06/2026 21:18 या दिवशी प्रकाशित केले.

आपण शिकत असताना बरीच वर्षं गणित हा विषय शिकतो. शिकत  शिकताना आणि आता शिक्षण पूर्ण झाल्यावरही आपल्याला प्रश्न पडतो की sin, cos, tan तसंच (a + b)^२ हे का शिकायचं? फक्त मार्क मिळवणे किंवा हवं ते शिक्षण घेता येणे एवढाच आहे का? काय उपयोग ह्या सगळ्या गोष्टींचा?

 

खरंच काही नाहीये का?        

 

पाऊस वाजतो दारी.....

लेखक कर्नलतपस्वी यांनी बुधवार, 24/06/2026 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
प

 नेहमीसारखाच साडेपाच वाजता उठलो.  पाऊस पडत होता.काल दुपारी आलेला मेघराज वस्तीलाच राहीला वाटते! कल्पनेनेच शिरशीरी भरली,अंगावर काटा आला. इतक्या दिवसांची प्रतिक्षा संपली. 

"सुमन",सुगंध.....

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 01/06/2026 09:54 या दिवशी प्रकाशित केले.

 

ऐकले किती तरीही, कान माझा अतृप्त आहे,

सुमनांच्या गर्दीतले ते "सुमन", वेगळेच आहे....

 

"निंबोणीच्या झाडा मागे",चंद्र मी ही शोधला होता,

"केतकीच्या बनी मधे" ,नाचरा मोरही ऐकला आहे

 

"उठा उठा चिऊताई ",ऐकून जाग मजला येत होती,

"आली बघ गाई गाई"झोप अंगणात अजुनही येत आहे.

 

सरले लहानपण माझे,"उमलली एक नवी भावना",

"मज नकोत अश्रु घाम हवा",दिला,हाच खरा मंत्र आहे.

 

पिवळी पिवळी हळद लागली","नकळत सारे घडले",

"रे क्षणांच्या संगतीने", किती सांगू,सारे मी ऐकले आहे.

 

काव्यरस

चीन:रेशीमगाठी आणि कषायपेयाचा देश - भाग १

लेखक शेखरमोघे यांनी शनिवार, 30/05/2026 08:15 या दिवशी प्रकाशित केले.
चीन हा देश आपल्या देशासारखाच अनेक हजार वर्षांची परंपरा असलेला देश आहे . एकेकाळी या देशाची ओळख पाश्चिमात्यांना रेशीम आणि कषायपेयाचा (म्हणजेच चहाचा) देश अशी होती. ५०० वर्षांपूर्वीपर्यंत या देशातील रेशीम आणि इतर अनेक पदार्थ वाळवंट, डोंगर, दऱ्या, समुद्र अशा हजारो मैलांचा प्रवास करून युरोप खंडात पोचताना वाटेवरच्या अनेक ठिकाणच्या व्यापाऱ्यांना धनवान करत आणखी  अनेकांनाही  या व्यापारांत हजारभर वर्षे आकर्षित करत होते.

झालमुडी....

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 04/05/2026 19:23 या दिवशी प्रकाशित केले.

लागला निकाल,मान खाली,अन् कपाळावर आठ्या,

शेख चिल्लीच्या बाता आणी खोट्या खोट्या मिठ्या.

 

कोणाला दोष देऊ? कोणाचे नाव घेऊ?

जनतेच्या कौलाचे, रडगाणे कसे गाऊ?

 

तेच ‘हॅकिंग’चे गाणे, EVM,SIR ला दोष देणे,

शिळे झाले बहाणे, तरी का होत नाही शहाणे!

 

"आम्हीच जिंकायला हवे होतो", हाच एक अट्टाहास,

पण जनतेच्या निकालाने दिला, सत्तेचा वनवास.

 

जनतेचा कौल आला, तरी पचत नाही सत्य,

‘लोकांचा रोष’ मानण्यापेक्षा, मोदीमीत दुत्त.

दुत्त,दुत्त,दुत्त......

 

कधी महागाईची लाट, कधी स्वप्नरंजनाची वाट