Skip to main content

लेख

मिसळपाव, क्लिंटन आणि जागतिक व्यापार. क्लिंटनसाहेबांचे मन:पूर्वक अभिनंदन...!

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 16/05/2009 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
जागतिकिकरण या विषयावर मिपावर क्लिंटनने जी लेखमाला लिहिली आहे त्याची आज सकाळ या वृत्तपत्रातर्फे दखल घेतली गेली याचा अत्यंत आनंद वाटतो. आज सकाळमध्ये मेधा कुळकर्णी या लेखिकेने 'मिसळपाव, क्लिंटन आणि जागतिक व्यापार' या मथळ्याचा लेख लिहून त्यात आपल्या मिपाचे आणि क्लिंटनसाहेबांचे कौतुक केले आहे.. मी व्यक्तिश: मेधा कुळकर्णी यांचा आभारी आहे.. 'मिसळपाव, क्लिंटन आणि जागतिक व्यापार' असा मथळा वाचून क्षणभर मौज वाटली. मथळा निश्चितच गंमतीशीर आहे!

निदान त्याचा तुम्हाला अपाय होणार नाही.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 13/05/2009 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रो.देसाई हंसत हंसत येताना पाहून मला खात्री झाली की काही तरी ते मला आनंदाची बातमी सांगणार आहेत.वाटेत ओळखीचा असो नसो ते सर्वांशी हंसत होते.हे जरा मला निराळंच वाटलं.एका लहान मुलाने त्यांना, "हाय ग्रॅन्डपा!" असं म्हटल्यावर थांबून त्याच्या पाठीवर थोपटून हंसत होते. जवळ आल्यावर मी त्याना विचारलं, "काय भाऊसाहेब,आज बरेच आनंदी दिसता.मघापासून मी बघतोय तुम्हाला तुमचा चेहरा हंसरा दिसतो.म्हणजे तो एरव्ही नसतो अशातला भाग नाही,पण आज जरा विशेष,काय गौडबंगाल आहे.?" "कर्माचं गौडबंगाल,अहो मला तुम्हाला माझी जुनी एक आठवण न विसरता सांगायची होती.म्हणून निघतानाच त्याची पूर्व तयारी करीत आलो आहे." हे त्यांच्याकडून

मातृदिन

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 10/05/2009 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
"अगं, आई! कमलमूखी तू सुंदर असता रूप विधात्याचे कसे वेगळे?" ह्याचं उत्तर जाणण्यासाठी, आईला "आई"च का म्हणतात हे जाणण्यासाठी, ज्यांची आई हयात आहे त्या सौभाग्यांसाठी, ज्यांची आई हयात नाही त्या माझ्यासारख्या अभाग्यांसाठी, "बाळा! तुला लागलं कारे?" हा आईचा प्रश्न जाणण्यासाठी आईची व्यथा जाणण्यासाठी, आईचे डोळे नेहमीच ओले का असतात हे समजण्यासाठी, चिमुकली तनुली आईला काय सांगते हे समजण्यासाठी, प्रत्येक व्यक्तिच्या पोटावरची खूण कां आहे? ते जाणण्यासाठी, "आई..!

अंकिता नव्हे प्रश्नांकिता.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 07/05/2009 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
काल माझी आणि अंकिताची धाकेकॉलनीच्या अपनाबाजारात अचानक गाठ पडली.अंकिताचं लग्न झालं असं मला कुणी तरी सांगितलं होतं.मी तिला म्हणालो, "काय तू मला लग्नाला बोलवायला विसरलीस वाटतं?" "असं काय काका? कुणाचं लग्न म्हणता?माझ्या लग्नाला मी तुम्हाला विसरेन कशी? आणि लग्न झालं तर माझ्या गळ्यात तुम्हाला मंगळसूत्र दिसणार नाही काय?" नेहमी प्रमाणे प्रश्नावर प्रश्न विचारणार्‍या अंकिताला मी गंमतीत "प्रश्नांकिता" असं नाव ठेवलं होतं.

बाळासाहेबांनापण कबूल..!

लेखक विकास यांनी बुधवार, 06/05/2009 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
कसाबचे नवीन वकील अब्बास काझमी, यांनी या अतिरेक्याचे वकीलपत्र घेतले म्हणून त्यांना मुंबईच्या प्रतिष्ठीत इस्लाम जिमखान्याच्या विश्वस्तपदावरुन काढून टाकण्यात आले. या संदर्भात आज बाळासाहेबांनी सामनामधे "हा इस्लाम आम्हालाही कबूल आहे" म्हणून अग्रलेख लिहीला आहे. त्यातील मुद्दे:
  1. अंजली वाघमारे वकीलपत्र घेऊन स्वतःच आधी कोर्टात खोटे बोलल्या होत्या.
  2. महेश भट, शबाना आझमी, मेधा पाटकर, टिस्टा सेटलवाड हे नेहमीचे यशस्वी कलाकार चिडीचूप आहे.

सोसायटी आणि बॅचलर

लेखक निखिल देशपांडे यांनी सोमवार, 04/05/2009 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारी सकाळी लवकरच भद्रा मारुती दर्शनाला निघालो. गाडी चालवताना फोन वाजला, बघितल तर घरमालकांचा फोन. घरमालकः- निखिल कुठे आहात??? मुंबई मधे आहात का??? मी:- नाही हो, सध्या मी घरी आलेलो आहे. घरमालकः- तुमच्याशी थोडे बोलायचे होते. मी:- सध्या गाडी चालवत आहे, तुम्हाला साधारण तासभरात फोन करतो. घरमालकः- ठीक आहे पण आठवणीने फोन करा माझ्या डोक्यात पहिला विचार आला आज तर दोन तारीख आहे ह्यांना लवकर घरभाडे पाहिजे असणार ह्या वेळेस. तसेच सगळे काम आटपुन एक तासाच्या आत घरी पोहचतच होतो तेव्हा परत त्यांचा फोने आला.

माझी गादी

लेखक निखिल देशपांडे यांनी रविवार, 03/05/2009 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
(हा एक अतिशय फालतु लेख आहे त्या मुळे वाचणार्‍यांनी स्वः जवाबदारीवर वाचावा.) मित्रांनो ही कथा आहे एका गादीची. मला वारसाहक्काने मिळालेल्या गादिची. गेल्या काही वर्षापासुन ह्या गादिवर हक्क सांगणार्‍या लोंकामधुन आता फक्त माझा ह्या गादीवर हक्क आहे ह्याचा आनंद काहीतरी वेगळा आहे. ह्याच गादीसाठी आमच्या घराण्यात अनेक वेळा भांडण तंटे झाले. तर अशीही आमची गादी. काय रे कोण म्हणतोय पानाची गादी म्हणुन.

रिक्षावाले, संप आणि आम्ही ...

लेखक छोटा डॉन यांनी शनिवार, 02/05/2009 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी (जरासे अंमळ उशीरानेच) उठलो, नेहमीच्या सवयीनुसार आधी लॅपटॉप चालु करुन नेट चालु केले व काय चालु आहे ह्याची चाचपणी केली. सकाळ-सकाळ एका महत्वाच्या बातमीने आमचे लक्ष वेधुन घेतले ( काळजी नको, अजुन कोण नवा चप्पल्/बुट फेकीचा नवा बकरा झाले नाही. त्याबद्दल सविस्तर नंतर कधीतरी.) ते म्हणजे "दरकपातीच्या निषेधार्थ पुण्यातले २५००० रिक्षावाले संपावर ....". हीच बातमी जवळपास सगळ्या पेपरमध्ये आणि सोशल वेबसाईटवर दिमाखात झळकत आहे. बरोबर आहे ना, अहो हा प्रश्न "पुण्याशी" निगडीत आहे ना, मग त्याला "वैश्विक प्रश्नाचा" दर्जा नको द्यायला ?

मला काय वाटतं आणि मला काय ज्ञात आहे .

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 02/05/2009 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
काल मी तळ्यावर प्रो.देसायांची वाट बघून बघून थकलो.आता घरी जावं म्हणून उठून चालायला लागलो.वाटेत एका बाकावर एक गृहस्थ पुस्तक वाचताना मी पाहिलं.वाचनात ते अगदी गर्क झाले होते.