Skip to main content

लेख

मनाच्या कुपितले-पडदा पडताना

लेखक विनायक पाचलग यांनी बुधवार, 28/01/2009 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या कुपीतले या सदरातला हा पाचवा लेख
पडदा पडताना !
पार्श्वसंगीत चालू ......... "चालत राहील हे युध्द विचारांचे..........." असं म्हणत सर्व कलाकार स्तब्ध. आवाज वाढत जातो आणि पडदा पडतो, एका प्रयोगाचा शेवट होतो. नाटक ............. मानवी मनाला थेट भिडणारे माध्यम ..... जशी मैफलीतील एखादी चीज काळीज चर्र करते. तसेच नाटकातला एखादा संवाद हृदय फाडून टाकतो. म्हणूनच जशी एखादी शास्त्रीय संगीताची मैफल संपताना सर्वांची समाधी लागते. तशीच अगदी तशीच समाधी एखादा अत्युत्तम प्रयोग संपल्यानंतर होते.

एक सकाळ - मुंबईतली आणि अमेरिकेतली

लेखक आनंद घारे यांनी मंगळवार, 27/01/2009 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
गेले सोळा आठवडे अमेरिकेत राहून नुकताच मी मायदेशी परत आलो. साहजीकच मला अमेरिका कशी वाटली असे लोक विचारतात, त्याचे उत्तर काय द्यावे याचा विचार पडतो. तिकडे ज्या गोष्टी चांगल्या वाटल्या त्यांना त्या चांगल्या आहेत असे कोणी म्हंटले की "तंकडचं सगळं लय भारी हाय हे आयकून आमाला आत्ता कंट्टाला आला हाये!" अशी प्रतिक्रिया एकाद्याकडून येते किंवा त्याचा बादरायण संबंध आपली संस्कृती, अस्मिता वगैरेशी जोडून राष्ट्राभिमान, देशभक्ती, धर्मनिष्ठा वगैरेवरले बौध्दिक दुसरा कोणी सुरू करतो.

शून्य प्रहर... भाग १

लेखक रामदास यांनी रविवार, 25/01/2009 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
चार जिने चढून येताना साळवेला दम लागला होता.साळवेच्या सोबत मेल नर्स परमार होता. अडतीस नंबरला ताप असल्याचा मेमो पाठवून दोन तासानी परमार उगवला होता.साळवेला उशीर आवडायचा नाही.परमार बरोबर शिफ्टमध्ये काम करणं साळवेला आवडायचं नाही.

अधिक, अधिक आवडणारं जग.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 23/01/2009 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
" मी मानतो की,दुःख,विफलता आणि निराशा असूनही आणि मानवाला ते सोसावं लागत असतानाही सुख साध्य होण्याजोगं आहे." मी अलीकडे गोव्याला गेलो होतो.विमानात माझ्या बाजूच्या सीटवर बसलेले गृहस्थ गोव्यातले स्थाईक रहिवाशी होते.माझं त्यांच प्रवसात बोलणं झालं त्यावेळी मला हे कळलं. त्यानी माझ्या गोव्यातल्या मुक्कामात दोन दिवस वेळ काढून आपल्या गावात येण्याचा आग्रह केला.मला सुद्धा गोव्यातल्या खेडेगावात जायला आणि जाऊन राहायाला अंमळ बरं वाटतं.

एका ऑफिस सेक्रेटरीची कैफियत

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 18/01/2009 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
"ज्यामुळे जगावंस वाटतं तेच काम करावं." माझ्या मित्राच्या तिनही मुली चांगल्या शिकल्यात.एक डॉक्टर आहे तर एक वकील आहे आणि तिसरी ही इंग्लिश घेऊन एम.ए.आहे.तुला कुठेही कॉलेजात लेक्चरर किंवा प्रोफेसर होता आलं असतं मग तू एका ऑफिसात सेक्रेटरीचा जॉब का पत्करलास? असं मी विचारल्यावर ती म्हणाली, "मी सेक्रेटरी व्हावं असं मला का वाटायचं?कारण जसे हातमोजे हातात फिट्ट बसतात तसंच हे सेक्रेटरी होणं मला फिट्ट बसतं.मी ते काम करायला जाते ज्यावर मी प्रेम करते.ते काम म्हणजे जे सुनियोजित करण्यात जे सुव्यवस्थित करण्यात माझा वेळ जातो.

घरटे ३!!! सत्यकथेवर आधारित

लेखक चेतन१२३प यांनी शनिवार, 17/01/2009 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
...... श्रावण महिन्यातली ती एक साधारण सायंकाळ होती. सूर्य अस्ताला जाण्यास अवकाश होता. कदाचित काही कारणास्तव तो थांबला होता. एक्सप्रेस वे वरून गाडी एकशे साठ ते एकशे एंशीच्या वायुवेगाने समोर जात होती. सहालेनच्या त्या चिकण्या रस्त्यावर मावळत्या सूर्याचे लालसर प्रतिबिंब काळ्या शस्त्राने चिरत गाड्या चिं.... चिं... आवाज करत पुढे सरकत होत्या. डिव्हायडरच्या अगदी जवळच्या लेनला नचिकेतची गाडी वाऱ्याशी स्पर्धा करत पुढे जात होती. टोल नाक्यावर गाडी थांबली. ड्रायविंग सीटच्या बाजूला नचिकेतची आयुष्याची सोबतीनं आपल्या इवल्याश्या नेत्रांनी, अनभिज्ञ मनाने सभोवार बघणाऱ्या पाच महिन्याच्या मुलाला घेऊन बसली होती.

पायी प्रवासातली मजा.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 14/01/2009 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
"मला हळू हळू लक्षात आलं,की जे दुसर्‍याला देतात तेच लोक दुसर्‍याकडून घेतानाही त्यांचा सन्मान ठेऊन घ्यायला शिकतात.त्यांच्या चेहर्‍यावरून ते त्याबद्दल ऋणी आहेत आणि आभारी आहेत हे प्रदर्शीत होत असतं " श्रीधर केळकर बरीच वर्ष इंग्लंडमधे राहत होते.आता निवृत्त झाल्यावर परत ते भारतात कायमचे राहायला आले.इंग्लंडमधे असताना त्यांना मैलो- मैल पायी प्रवास करायची संवय होती.इथे आल्यावर त्यानी तेच करायचं ठरवलं.प्रथम प्रवासाचा मोठा पल्ला घेण्याऐवजी त्यानी मुंबईहून कोकणात आणि पुढे गोव्यात पायी प्रवास करायचं ठरवलं. केळकर म्हणाले, "इंग्लंडमधे राहात असताना कामावर जायच्यावेळी कुणाची ना कुणाची लिफ्ट मिळायची.त्यामुळे

इच्छेच्या पाऊलवाटा

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 10/01/2009 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
माझी मामेबहिण सुमती कोकणातल्या एका खेड्यात रहाते.ती, तिचा नवरा आणि मुलं घराच्या मागे शेती करतात.घर मोठं आहे आणि मागे मांगर,विहीर आणि गाईबैलांचा गोठापण आहे.एक दिवस मी तिच्या घरी गेलो असताना मला ती तिच्या घराच्या मागच्या परड्यातून गाईगुरं दाखवीत खोल विहिरीची आणि आजूबाजूच्या शेतीची माहिती देत देत आपला अनुभव सांगत होती.एका जागेतून दुसर्‍या जागेत जाताना लहान लहान पाऊलवाटा झाल्या होत्या.ह्या पाऊलवाटावरून विषय निघाला. मी तिला विचारलं, "सुमती प्रत्येक पाऊलवाटांच्या टोकाला तू आखांडे घातले आहेस.हे अटकाव कशासाठी ?" सुमती खेड्यात रहात असली तरी तिने कॉलेजचं शिक्षण पूरं केलं होतं.काही दिवस ती त्याच कॉलेजात

गाभ्रीचा पाऊस हा मराठी चित्रपट साता समुद्रा पलीकडे चालला

लेखक शनआत्तार यांनी मंगळवार, 06/01/2009 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक ४ जानेवारी २००९ च्या टाईम्स ऒफ इंडीया या पेपर च्या पुणे पेपर मध्ये प्रकाशित झालेली बातमी आपणा सर्वांच्या महीती साठी देत आहे. हा मराठी चा अभिमान आहे Marathi film makes it to Rotterdam fest 5 Jan 2009, 0621 hrs IST, Rahul Chandawarkar, TNN PUNE: Satish Manwar is smiling from ear to ear. And with good reason. The young writer-director's very first Marathi feature film Gabhricha Paus (The damned rain) has been selected for the prestigious Rotterdam Film Festival and also the Pune International Film Festival (Piff).