Skip to main content

लेख

"इलो रे,इलो! कोकणातला पाऊस.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 30/06/2008 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
"शीरा मारां!ही काय पडण्याची रीत झाली?" कोकणातला पाऊस अनुभवल्या शिवाय कसा असतो तो कळणं कठीण. "नेमिची येई मग पावसाळा" हे कुणीतरी कोकणातल्या पावसालाच उद्देशून म्हटलं असणार. मृग नक्षत्र ७ जूनला लागत.शेतकऱ्या पासून लहान मुला पर्यंत एप्रिल,मेचा उन्हाळा सहन करून झाल्यावर केव्हा एकदा पाऊस येईल असं होतं.मला आठवतं त्यानुसार, मृग नक्षत्र आलं की अगदी नियमीत त्या दिवसात पाऊस यायचाच. "घडाम,घुडूम आकाशात व्हायचं.कडाड,कुडुम" होवून लाखो दिवे पेटवावेत तसं आकाशात क्षणभर सगळं उजाळून जायचं. "इलो रे!

शिपल्यातुन अलग जसा मोती.......

लेखक शितल यांनी सोमवार, 30/06/2008 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
मित्राला माझी बाईक हवी होती, म्हणुन मी त्याला, मला बस स्टॊप वर सोडा्यला सागितले, कॊलेजला बसने जाण्याची ही पहिलीच वेळ होती,आणि बस मधील गर्दी पाहुन परत बाईक कोणालाही द्यायची नाही असे मनात ठरवुन बस मध्ये कसाबसा चढलो, डाव्या साईडच्या बस सीट वर तु बसलेली होतीस, मी तुझ्या शेजारी लटकत होतो, बस चालु झाली, बसच्या प्रवासाची सवय नसल्याने हातातील दोन नोटबुक खाली पडल्या, त्या नेमक्या त्तुझ्या आणि माझ्या पायाच्या मध्येच पडल्या, त्या उचलण्यासाठी वाकण्याचा एक दोन वेळा प्रयत्न केला पण खुप गर्दी असल्याने मला वाकता ही येत नव्हते, हे तुझ्या लक्षात आले आणि तु मला ती उचलुन हातात दिलीस, आणि देताना एक मद स्मित केले

पाऊले चालती पंढरीची वाट

लेखक आनंद घारे यांनी शनिवार, 28/06/2008 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
या वर्षीच्या आषाढीच्या वारीची सुरुवात करण्यासाठी भक्तगण देहू व आळंदीला जमा झाले असल्याची बातमी आली आहे. आता त्यांच्या दिंड्यांच्या मार्गक्रमणाचा वृत्तांत 'आँखो देखा हाल'च्या थाटात पुढील पंधरवडाभर सर्व प्रसिध्दीमाध्यमांत येत राहील. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातूनच नव्हे तर शेजारच्या कर्माटकांतूनसुध्दा लक्षावधी भाविक पायी चालत पंढरपूरपर्यंत जातील. त्यातल्या अनेकांची ही पदयात्रा सुरू झालेलीही असेल. कांही लोक आपापल्या कुवतीनुसार त्यात थोडा काळ सहभाग घेऊन मिळेल तेवढा आनंदानुभव घेतील व पुण्य गांठीला बांधतील. हे सगळे संपूर्णपणे स्वेच्छापूर्वक चालत आले आहे.

ही तुमचीच मुलगी का?

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 28/06/2008 04:36 या दिवशी प्रकाशित केले.
कुणी तरी म्हटलंय. " एखाद्दयाला समजून घेण्यातच वेळ घातला तर त्याच्यावर प्रेम करायची वेळच निघून जाणार.

आतला आवाज

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 26/06/2008 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
"मला वाटतं,आपल्या आतल्या आवाजाची जी शक्ति आहे ती आपल्याला आपल्या कठीण प्रसंगात मदतीला येते.मला वाटतं,लोक सुखासुखी कुठचीच गोष्ट जावू देत नाहीत.काही किंमत पडली तरी ते दुसऱ्याला पण मदत करतात.

प्रेमचि चटणी,प्रेमचि भाकर.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 22/06/2008 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
“प्रेम करण्याच्या क्रियेत बदल घडवून आणण्याची क्षमता असते ह्या क्षमतेवर माझा विश्वास आहे. प्रेमातून जखम सुद्धा भरून आणून बरं करण्याची शक्ति आहे.” बऱ्याच वर्षानी मी गोव्याला माझ्या मोठया वहिनीच्या माहेरी गेलो होतो.लहानपणी नेहमीच उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या वहिनी बरोबर मी गोव्याला जात असे. त्यामुळे त्यांच्या आजूबाजुच्या लोकांशी पुर्वी पासून ओळख होती.वहिनीच्या माहेरच्या बंगल्याच्या सभोवताली मच्छिमार लोकांची वस्ती होती.घर समुद्राच्या जवळ असल्याने ही अशी मिक्स वसाहत तयार झाली होती. आणखी बरेच बंगले आजुबाजुला होते.पण शेजारच्या झोपडी वजा घरात एक ख्रिश्चन कुटुंब राहत असे.

अ॑तर

लेखक शितल यांनी शनिवार, 21/06/2008 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
कविता अणि अमेय चा मुलगा मानस आज उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला रवानगा होणार होता. कविता आणि मानस पुण्याहुन मुबईला कॆब करून एअरपोर्टवर आले, अमेय त्याची वाट पहातच उभा होता. मानसने त्याच्या बाबाना पाहिल्यावर त्याना नमस्कार केला, आज ब-याच वर्षानी कविता आणि अमेय समोरा समोर होते आणि कोणाला काय बोलावे हे समजत नव्हते.

डोळे हे जुलमी गडे...

लेखक प्राजु यांनी शनिवार, 21/06/2008 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, शिर्षकावरून असं वाटेल की, मी डोळे या विषयावर काही लिहिणार आहे. तसं पाहिलं तर ते थोडं फार खरंही आहे. तिच्या / त्याच्या प्रेमळ डोळ्यांवर आजपर्यंत अनेक कवींनी कवनं रचली, गझला लिहिल्या, शेर लिहिले. निसर्गानं प्रत्येक माणसाला डोळे देताना रंगनिर्मिती कोठून केली असेल हा प्रश्न मला नेहमीच पडतो. काळे भोर डोळे, भुरे डोळे, पिंगट डोळे, निळसर डोळे, हिरवट डोळे, राखडी छटा असलेले डोळे.. असे कितीतरी प्रकारचे डोळे आपण पाहतो. डोळ्यावरून मनातील भावना लगेच कळतात असं म्हणतात. काही डोळे शांत वाटतात, काही पाणिदार, काही प्रेमळ , काही उथळ, काही खट्याळ, काही भोचक.. काही गंभिर....

उद्यान नगरी

लेखक आनंद घारे यांनी शुक्रवार, 13/06/2008 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
मी शाळेत असतांना शांतारामबापूंचा 'झनक झनक पायल बाजे' हा आगळा वेगळा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत व नृत्य यांना केंद्रस्थानी ठेऊन निर्माण केलेल्या या सिनेमातील कांही दृष्यांचे चित्रीकरण 'म्हैसूरच्या वृंदावन गार्डन'मध्ये केले होते आणि "ती दृष्ये पाहतांना प्रत्यक्ष स्वर्गलोक पहात असल्यासारखे वाटते." अशी त्याची तारीफ ऐकल्यामुळे "म्हैसूर म्हणजे वृंदावन गार्डन आणि म्हणजेच स्वर्ग " असे एक समीकरण डोक्यात फिट झाले होते.