Skip to main content

प्रकटन

ब्राऊ ..८

लेखक गवि यांनी सोमवार, 05/09/2011 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
3

गडद

लेखक समीरसूर यांनी सोमवार, 05/09/2011 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
काचेच्या तावदानातून बाहेर खिन्नपणे बघत सायली एका खुर्चीत विसावली होती. चेहरा घामाने डबडबलेला होता. नाकपुड्या किंचित फुगलेल्या होत्या. दोन्ही ओठ मुडपत सायली मोठे श्वास घेत बसली होती. बाहेर पाऊस वेड्यासारखा कोसळत होता. डोळ्यातून पाणी बाहेर येऊ नये म्हणून सायलीची केविलवाणी धडपड सुरु होती. समोर पडलेले एखादे मासिक उघड, मोबाईलमधला एखादा गेम खेळ असे काहीतरी करून सायली आपले चित्त थार्‍यावर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. हॉस्पिटलच्या त्या भल्यामोठ्या पॅसेजमध्ये कित्येक लोकांची धावपळ सुरु होती. बाहेरचा पाऊस हॉस्पिटलमधल्या त्या भयाण शांततेला अधिकच गडद करत होता... पाऊस!

चष्मावाला, गायवाला

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 02/09/2011 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
काय म्हणताहात मंडळी कसा काय चाल्ल्लाय तुमचा गणेशोत्सव? हो. हो. हो. नियम माहीत आहे मला. आधी आपले सांगा मग विचारा. ........................................................................................................................................................... आदला दिवस "जरा शेजार्‍यांना चपलांचा त्रास होणार नाही हे बघा हो. कळ सोसा म्हणावे पाच दिवस." मोदकाच्या दिवशी जेवायला बोलव. "ते तर बोलवणारच आहे. पण तु आधीच सांगुन ठेव. आणि जरा नम्र पणे. आपली गरज आहे" चालेल. "आणि तु सुट्टी घे. आणि हो. तो मिक्सर बिघडलाय. ओवर लोड झाला असेल. लगेच पाहीजे. उद्या देतो म्हटले तर चालणार नाही.

अप्रतिम हैद्राबाद !

लेखक नीलकांत यांनी बुधवार, 31/08/2011 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात हैदराबाद ( आंध्रपद्रेश) येथे जाण्याचा योग शेवटी जुळून आलाच. :) गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून जाण्याचा बेत होता. आता रमजानचा मुहूर्त पाहून ही भेट शक्य झाली. या धावत्या भेटीचा हा धावता वृत्तांत. हैदराबाद ! - हैदराबाद असं केवळ ऐकून होतो. वाचून होतो. बहामनी साम्राज्याचे पाच तुकडे होऊन पाच नवीन शाह्या (शाही चे अनेकवचन) तयार झाल्या होत्या त्यात आपल्या जास्त ओळखीचे म्हणजे विजापूर, अहमदनगर (निजाम), बिदर, बेरार (वर्‍हाड) आणि गोवळकोंडा (कुतुबशहा) असे होते. यातील गोळवकोंडा म्हणजे आताचे हैदराबाद. अर्थात गोवळकोंड्याचा किल्ला आजही आहे आणि तो शहराच्या पश्चिमेस आहे.

मोक्ष

लेखक विनीत संखे यांनी बुधवार, 31/08/2011 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
आज मोक्ष मिळायला हवाच... उगीच ह्या मृगजळात अडकलोय... दरदिवशीची कटकट, साडेसातची लोकल, ऒफिसचा ऊशीर, मोठ्या साहेबांचं तणतणणं. घरी गेल्यावर मुलांच्या मागण्या, सौ ची कैफियत. आज हे महाग तर उद्या ते. छ्या किती सहन करायचं? किडामुंगीशी जवळीक साधायची ती अशी? एवढं राब राब राबून विरंगुळ्याचे क्षणच दुर्मिळ झालेत ... मोबाईलच्या रेडियोवर एकशेसातवर जाऊन जुनं मदन मोहन ऎकावं... आयुष्य सार्थकी लागावं असं काहीतरी... तो तर गेला त्याच्या स्वरलता सोडून... पण आम्ही काय सोडलं? आमचं नाव? की आडनाव? आमची सौ की ती पिल्लावळ? ...