Skip to main content

प्रतिभा

सायन्स-सुपरनॅचरल फिक्शन कादंबरी : "जलजीवा"( भाग ९ ते १२)

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 07/03/2011 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
(भाग ९) ......हताश अ‍ॅना पुढे वाचत होती: रात्र शांत होती. जहाजावर काही प्रवासी होते आणि काही भाग माल वाहून नेण्यासाठी राखून ठेवलेला होता. प्रवाश्यांपैकी बहुतकरुन लोक हे श्रीमंत लोक होते. काही हौस म्हणून तर काही संशोधनाचा भाग म्हणून तर काहींना आपल्या काहीजण जलमार्गे काही सोन्याच्या, जुन्या किमती तसेच कर चुकवून आणलेला माल वाहून आणण्यासाठी आणि लपवून ठेवण्यासाठी वापर करत. अनेक अवैध धंदेही चालत जहाजावर. आपण भले आणि आपले काम भले या न्यायाने मी तेथे होतो. पोटापाण्यासाठी या मोठ्या जहाजावर प्रवास करावा लागत असे. मी ही त्यापैकीच एक. पोटापाण्यासाठी जहाजावर काम करणारा एक टेलीकॉम इंजिनियर.

सायन्स-सुपरनॅचरल फिक्शन कादंबरी : "जलजीवा"( भाग १ ते ८)

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 07/03/2011 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
[माझी आतापर्यंत क्रमश: प्रसिद्ध झालेली कादंबरी "जलजीवा" ही आता येथे पुन्हा वाचकांच्या सोयीसाठी सर्व १६ भाग एकत्रीत करून देत आहे] सूचना: ही एक "काल्पनिक सत्यकथा" असून यातील पात्रे, घटना आणि ठिकाणे यांचे जगातल्या इतर काही ठिकाणे, व्यक्ती किंवा घटना यांच्याशी साम्य आढळले तर त्याला योगायोग मानायचा की सत्य मानायचे हे मी वाचकांवर सोपवत आहे. (भाग-1) लंडन शहरातल्या ट्यूब (लोकल ट्रेन्स) मध्ये प्रवास करत असतांनाच त्याला तो कॉल आला.

शब्दांच्या पलिकडले !

लेखक स्पंदना यांनी रविवार, 06/03/2011 20:50 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी नुकत्याच तुम्ही 'शरद्जींच्या' दोन कविता वाचल्या. त्याच दोन पत्रांची उलगड माझ्या शब्दात, 'गुरु आज्ञा शिरसावंद्य मानुन' मी इथे द्यायच धाडस करते आहे. प्रयत्न गोड मानुन घ्यावा! बरचस सांगता येत नाही! बरचस बोलताही येत नाही ! ना डोळ्यातून डोकावण्याची मुभा असते या 'बरचस' ला! पण हे ' बरचस ' तुटत ही नाही, मिटत ही नाही ! मंडळी कल्पना करा, पन्नास वर्षापुर्वी गुंतलेल्या दोन जीवांची! बरचस जीवन उंबर्‍याच्या आत व्यतित करणार्‍या तुमच्या माझ्या आज्जीच्या वेळच्या काळाची! कुठ काहिस वादळ उठल , पण त्या वादळाला बाहेर येण्याची मुभा नसल्यान मनाच्या आतच; त्यान तांडव मांडल्यान व्याकुळ 'ती 'अन व्याकुळ 'तो'!

दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग-३)

लेखक चिंतामणी यांनी बुधवार, 02/03/2011 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग-१) दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग-२) संगीत दिग्दर्शक- एन. दत्ता.
एन. दत्ता उर्फ दत्ता नाईक हेसुध्दा दत्ताराम वाडकरांप्रमाणे मुळचे गोवेंकर. सचीन देव बर्मन यांचे सहाय्यक म्हणून अनेक वर्षे काम केले. त्याच बरोबर स्वतंत्र संगीतकार म्हणून अनेक अवीट गोडीची गाणी दिली. राज खोसलांचा मिलाप (१९५५) या चित्रपटामधून स्वतंत्र संगीतकार म्हणून पदार्पण केले.

दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग-२)

लेखक चिंतामणी यांनी बुधवार, 02/03/2011 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग-१) संगीतकार- दत्ताराम दत्ताराम म्हणजेच दत्ताराम वाडकर. यांनी स्वतंत्रपणे सुमारे १९ चित्रपटांना संगीत दिले. शंकर जयकीशन यांचे सहकारी म्हणून त्यांनी प्रामुख्याने काम केले. श्रीमान सत्यवादी, अब दिल्ली दूर नही, परवरीश इद्यादी प्रमुख चित्रपट त्यांच्या खाती जमा होते. हिंदी सिनेमातील संगीतात त्यांनी ठेक्यात (rhythms) नवनवीन प्रयोग केले.

दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग-१)

लेखक चिंतामणी यांनी बुधवार, 02/03/2011 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
(काही वर्षांपुर्वी एका कम्युनिटीवर हा लेख मी इंग्रजीत लिहीला होता. त्याचेच रुपांतर थोडा संपादित करून येथे ठेवत आहे.) ३-४ वर्षांपुर्वी विविध भारतीला ५० वर्षे पुर्ण झाली. त्यानिमीत्ताने जे विविध कार्यक्रम प्रसारीत व्हायचे त्यात "सुहाना सफर" नावाचा एक कार्यक्रम वर्षभर प्रसारीत व्हायचा. त्यात एकाच संगीतकाराची/संगीतकार जोडीची वाटचाल गाण्यासहीत प्रसारीत व्हायची.

बहर गुलमोहराचा

लेखक जयवी यांनी मंगळवार, 01/03/2011 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
ती उठून बाहेर आली. लख्ख उजेडामुळे तिचे डोळे दिपले…….पण मग त्या प्रकाशाचं महत्व कळलं. कित्येक दिवसांपासून ती अंधाराच्या साम्राज्यात वावरत होती. अंधाराच्या लाटांमधे गुदमरत होती. तिने मनातले सगळे काळेकुट्ट विचार झटकले आणि तिला एकदम मोकळं मोकळं वाटलं. कित्येक दिवसांची मनावर जमलेली कानाकोपर्‍यातली जळमटं निघाल्यामुळे तिचं तिलाच उत्साही वाटायला लागलं. किती दिवस साठवून ठेवलं होतं आपण हे सगळं…..!! कोंदटलेल्या मनाला जरा ऊन दाखवल्याबरोबर पुन्हा एकदा सगळं टवटवीत झालं. आजूबाजूचा कचरा साफ केल्यावर परत तीच झळाळी दिसायला लागली आणि नव्याने सगळं सुंदर दिसायला लागलं. नकोच आता तो कोंडमारा…..

वो सांस हूं जो लबोंपे.....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 28/02/2011 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
रफीसाहेबांची अनेक गैरफिल्मी गाणी आपल्याला माहीत आहेत, असतील. त्याची मजा काही औरच आहे. मुख्य म्हणजे कमीत कमी संगीत व ह्रदयाला भिडणारा त्या गाण्यांचा अर्थ आणि सरळ ह्रदयात एखादी सुरी उतरावी तसा मनाला भिडणारा साहेबांचा आवाज...... त्यातच त्या गाण्यात भावनांची तडफड असेल तर ते गाणे खरच ह्रदय कापत जाते.