Skip to main content

विचार

खरेदी एक भोग!

लेखक sudhirvdeshmukh यांनी सोमवार, 14/08/2017 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
खरेदी एक भोग ! जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्य प्राण्याला खरेदी करावी लागते. ज्याने आयुष्यात कधीच खरेदी केली नाही असा व्यक्ती कदाचितच असेल. अन्न, वस्त्र, निवारा ह्या जश्या मुलभूत गरजा होत तशीच खरेदी सुद्धा मुलभूत गरज आहे. किंबहुना खरेदी मुळेच ह्या गरजा भागू शकतात. मानवी उत्कांतीचा इतिहास हा खरेदीचाच इतिहास आहेे. खरेदी प्रकियेत ग्राहक व विक्रेता हे दोन मुलभूत घटक जसे अंतर्भूत असतात तसेच ईतर अनेक घटक देखील यामधे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या अंतर्भूत होत असतात. आजच्या काळात माणूस हा माणूस आहे का नाही हे खात्रीलायक रीत्या सांगणे धाडसाचेच होईल. पण माणूस हा ग्राहक मात्र आहे.

ऐसी भी क्या जल्दी है !

लेखक sudhirvdeshmukh यांनी बुधवार, 09/08/2017 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या सर्वाना पुढे जायची घाई आहे. परंतु काहि महाभागांना मात्र जरा जास्तच घाई दिसते. ही सतत व्यस्त, त्रस्त आणि काहिशी अत्यव्यस्त असणारी मंडळी भेटणार्यांची अनेक ठिकाणे आहेत. प्रामुख्याने ATM, पेट्रोल पंप, ट्राफिक सिग्नल्स, टिकिट खिडकी इत्यादी ठिकाणी ही मंडळी हटकुन भेटतात. गर्दीच्या रस्त्यांवरून सुसाट वेगाने वाहने पळवनारे कुशल वाहन चालक याच जात कुळीतले. बहुतेक सर्वाना रेल्वे स्टेशन वर जायचे आहे व पोहचले नाहीतर यांची गाड़ी सुटनार, अर्थातच गाडी सुटली तर यांचे आयुष्यभराचे नुकसान होणार, असेच आपल्याला वाटावे एवढ्या सुसाट वेगात ही मंडळी जात असतात.

मेनोपॉज एक संक्रमण!

लेखक ज्योति अळवणी यांनी मंगळवार, 08/08/2017 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
मेनोपॉज.... एक संक्रमण! स्त्री साधारण चाळीशीच्या पुढे सरकली की तिच्यात अनेक बदल व्हायला लागतात. मुलं स्वतःच शाळा/कॉलेज स्वतःच सांभाळायला लागलेली असतात. नवरा नोकरी/धंद्यात सेट झालेला असतो. ती स्वतः नोकरी करत असली तर ती देखील काम, पगार आणि होणारी धावपळ यात adjust झालेली असते. नोकरी नसली तर घर सांभाळत तिने स्वतःला थोडं बिझी केलेलं असतं. सासू-सासरे असले तरी आता एकमेकांचं काय पटत आणि काय नाही ते एकमेकांना बरोबर माहीत असतं. त्यामुळे एक सुखी-संसारी स्त्री तिच्या अंगा-प्रत्यांगातून आणि वागण्या-बोलण्यातून दिसायला लागलेली असते. पण मग या सुखात देखील तिला काहीतरी खुपायला लागतं.

पैठणी दिवस भाग-१

लेखक गुल्लू दादा यांनी गुरुवार, 03/08/2017 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
झाली! सगळी तयारी झाली. दंतमंजन, पांघरूण, कपडे, साबण, इ. बारीकसारीक सामान भरून झाले. " प्रवासाला जाताना जितके कमी सामान न्याल तेवढे हाल कमी होतात." या जगमान्य सल्ल्याला अनुसरूनच बॅग भरणे सुरू होते. पण एक महिन्याच्या थांबा असल्यामुळे नाही म्हणता म्हणता 2 बॅग्स गच्च भरल्या होत्या. अरे हो! पण तुम्हाला सांगायचेच राहिले आम्ही कुठे निघालो ते. त्याच अस आहे की , माझे शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद येथे सुरू होते. त्या वेळी मी आंतरवासिता (इंटर्नशिप) करत होतो. एका वर्षांच्या प्रशिक्षणात एका महिन्यासाठी ग्रामीण रुग्णालयात सेवा देणे अनिवार्य असते.

श्री महेश गिरी आणि श्री विनय सहस्त्रबुद्धे ह्यांचे अभिनंदन.

लेखक साहना यांनी मंगळवार, 01/08/2017 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
वर्षां पासून "शिक्षणाचा अधिकार कायदा" रद्दबातल करावा आणि ९३वी घटनादुरस्ती रद्दबातल करावी ह्यावर आमचे बरेच काम चालू आहे. ह्या संसदीय सत्रांत ह्या दृष्टीने बरीच प्रगती झाली (थोडी का असेना पण प्रगती आहे). भाजपचे श्री महेश गिरी ह्यांनी खाजगी बिल आणून ९३वी घटनादुरुस्ती रद्दबातल करण्याची मागणी केली.

भेट हवी की भेटवस्तू ?

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 01/08/2017 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
सुमारे ४० वर्षांपूर्वीचे लग्नसमारंभ आठवतात का पाहा. लग्न लागल्यानंतर वधूवर मंचावर बसत आणि मग लोक त्याना भेटायला येत. तेव्हा लग्नाला आलेला प्रत्येक पाहुणा हा त्यांच्यासाठी काहीतरी भेटवस्तू घेऊनच येई. वधू आणि वराच्या बाजूस प्रत्येकी एक जवळचा माणूस वही घेऊन बसलेला असे. पाहुण्याने वर किंवा वधूच्या हातात ती वस्तू दिल्यावर ते ती बाजूस बसलेल्या माणसाकडे देत. मग तो त्या वस्तूची व्यवस्थित नोंद (कुणी दिली यासह) त्याच्या वहीत करत असे. एक प्रकारे हा माणूस वधू अथवा वरपक्षाचा ‘ रोखापाल’ च असे ! कार्यक्रम संपेपर्यंत तो हे काम चोख बजावी आणि अखेरीस तो सर्व ‘हिशेब’ ज्या त्या यजमानाच्या स्वाधीन करे.

चॅलेंज भाग 1

लेखक aanandinee यांनी मंगळवार, 01/08/2017 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
तिघंही ठरल्याप्रमाणे संध्याकाळी सहाला कॅफेत पोहोचले. “ही अवनी तर कधीच वेळेवर येणार नाही. मीरा फोन कर तिला, बघ किती वेळ आहे” शौनकने वैतागून म्हटलं. हात खांद्यान्मागे ताणून आळस देत तो पुढे म्हणाला, “I am knackered. घरी जाऊन झोपायचंय मला.” “कोणाला कापत होतास?” दिगंतने हसून विचारलं. “कापायला वेळ लागत नाही रे, जोडायला वेळ लागतो” शौनकने उत्तर दिलं. “अवनी अर्ध्या तासात पोहोचतेय. ट्रॅफिकमधे अडकलीये म्हणाली.” मीराने मोबाईल खाली ठेवत या दोघांना सांगितलं. “हो ट्रॅफिक, आम्ही हेलिकॉप्टरने आलोय ना, ट्रॅफिक काय आजच आहे का, ते असेल असं धरूनच तेवढा वेळ आधी निघायला पाहिजे ना!

मादाम तुसॉ ह्यांना पत्र

लेखक सरनौबत यांनी रविवार, 30/07/2017 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
माननीय व्यवस्थापक, मादाम तुसॉ वॅक्स म्यूझियम, मुक्काम पोस्ट लंडन पत्र लिहिणेस कारण कि परवाची बातमी. तुम्ही आमच्या अतिशय लाडक्या मधुबाला चा मेणाचा पुतळा बनवणार आहात म्हणे! साक्षात विधात्याला पुन्हा इतकी सुंदर स्त्री घडवणे जमले नाही. त्याने माधुरी बनवून पाहिली, गेला बाजार कतरीना देखील केली. पण मधुबाला ची सर काही त्यांना आली नाही. तुम्ही देखील आत्तापर्यंत अतीव सुंदर पुतळे घडवले. इतके हुबेहूब कि बघणाऱ्यांचा 'पुतळा' झाला. मात्र भारतीयांचे पुतळे तुम्हांला म्हणावे तसे जमले नाहीत बुवा. बच्चन कुटुंबियांवर तुमचा इतका राग का? अमिताभचा पुतळा एखाद्या उर्दू शायर / गज़ल गायकासारखा दिसतो.

हिंदी चित्रपट गीतांमध्ये दडलेला असाही अर्थ

लेखक मार्गी यांनी शनिवार, 29/07/2017 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदी चित्रपट गीतांमध्ये दडलेला असाही अर्थ हिंदी चित्रपटगीतांमधल्या काही गाण्यांमध्ये सापडलेला हा अर्थ आहे. हा अर्थ काहीसा व्यक्तिसापेक्ष आहे. एकाला जो अर्थ दिसेल, तो दुस-याला दिसेलच असं नाही. पण त्या गाण्याची पार्श्वभूमी, त्याचे चित्रण, त्याचे चित्रपटातील संदर्भ व आपण कोणत्या काळात ते गाणं ऐकलं, हे थोडं बाजूला ठेवलं तर खूप वेगळा अर्थ सापडतो. काही गाण्यांमध्ये तर पूर्ण धर्माचं सार आहे; काही गाण्यांमध्ये आध्यात्मिक जीवनदृष्टी आहे तर काही गाणी ही जणू गुरू- शिष्य नात्याच्या विविध छटा दाखवतात तर काही अध्यात्मिक दृष्टीची प्रचिती देतात.