विरंगुळा
तोंड लोकांचे
प्रसाद यांच्या गुंड लोकांचे या सुंदर कवितेपासून स्फुर्ती घेऊन हा प्रयत्न.
तहानेने सुकत गेले तोंड लोकांचे
भाषणाने फक्त चाले तोंड लोकांचे
चतकोर भाकरी हि गुंतवी आशा
आश्वासने केवळ पुसती तोंड लोकांचे!
दुथडी भरून वाहे येथली कृष्णा
कोरडेच उरले मराठी तोंड लोकांचे...
दंगल बाहेर नि असती घरात हत्यारे
दत्त आडनावच उजळी तोंड लोकांचे
जरी मंचावर घालती गळ्यात हे गळे
मुखवट्या आड दडले तोंड लोकांचे
दोस्तहो तलवार नाही, लेखण्या परजा
लेखणी नक्कीच फोडे तोंड लोकांचे...
-ऋषिकेश
Taxonomy upgrade extras
जुनी व दुर्मिळ हिंदी चित्रपट गीते (दुवा)
मित्रहो,
जुन्या व दुर्मिळ गाण्यांसाठी सापडलेला एक दुवा
http://www.indianscreen.com/songs.htm
संजय अभ्यंकर
"आय टी " कंपन्या व "प्रोजेक्ट डिलीव्हरी अर्थातच मुल जन्माला घालणे ...... "
च्यायला ह्या "प्रोजेक्ट डिलीव्हरीच्या डेडलाईन " मुळे पार डोक्याची मंडई झाली पण काम काही संपतच नाही . त्या पच्छिम बंगालमध्ये चहाच्या मळ्यात राबणाऱ्या 'वेठबीगार' मजुरांच्या पेक्षा आमची अवस्था बेकार झाली आहे. ३२ तास झाले अजून घरी गेलो नाही. आमचा मॅनेजर , ती टेस्टींग टीम, तो ऑनसाईट को-ऑर्डीनेटर पार 'रक्ताची चटक लागलेल्या खविसासारखे' मागे लागले आहेत.
उद्घाटन, नको रे बाबा!
बाबूराव पाटील म्हणजे अवली माणूस. गोंधळे बुद्रुक गावाचे सरपंच; पण रुबाब पंतप्रधान असल्याचा. अडल्यानडल्याची कामं करतील, पण प्रत्येक ठिकाणी मिरवायला मिळालं तर! लग्न असो, मुंज असो, साठी-पंच्याहत्तरी असो की श्राद्ध; बाबूरावांना काही वर्ज्य नाही. श्रद्धांजली सभेतही असं भाषण ठोकणार, की निवडणुकीच्या प्रचाराची सभा आहे की काय, असंच वाटावं.
या अतिउत्साहापायी स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेण्यातही बाबूराव पटाईत. कधी तोंडघशी पडतील, याचा नेम नाही. बरं त्याचं यांना सोयर ना सुतक. आजूबाजूची मंडळीच खजील व्हायची. बाबूराव मात्र जय की थय!
एकदा काय झालं, गावातल्या कुणातरी मान्यवराचं दुःखद निधन झालं होतं.
राम राम !
नमस्कार मंडळी !
आज दोन महिन्यांनंतर पुन्हा रुजू होत आहे.
तसे ही आम्ही प्रतिसादापुरतेच जास्त असल्याने आपण अभिजात साहित्याला मुकला आहात असे मुळीच नाही. ( स्वतःला, आम्ही असे म्हणवून घ्यायची संधी आम्हाला इतरत्र कुठे मिळत नसल्याने संधीचा भरपूर उपयोग आम्ही इथे करत असतो. हे सांगणे न लगे :)
तर काय ! आज इथे येवून पुन्हा लिहायला सुरुवात केल्यावर आनंद झाला आहे. पुन्हा सर्वांच्या गाठी-भेटी होतील. खरडवह्यांतून महत्वाच्या माहितीची आदानप्रदान होईल असा विचार करता मन कसे प्रफुल्लीत झाले आहे.
मिसळपाव