Skip to main content

जीवनमान

चावडीवरच्या गप्पा - स्मारक

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 29/11/2012 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
chawadee “काय मंडळी, कशी काय झाली दिवाळी?”, भुजबळकाका, बर्‍याच दिवसांनी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत, चावडीवर प्रवेश करत. “ठीक ठाक! महागाईने त्रस्त असलेल्या लोअर मिडलक्लासला परवडेल अशीच झाली.”, नारुतात्या उसने हसू चेहेर्‍यावर आणत. “हो, पण बाळासाहेबांच्या जाण्याने दिवाळीचा आनंद झाकोळला मात्र गेला.

धागा का गोठविता ... ??? (वि.अ.टु.प्र.)

लेखक मोदक यांनी गुरुवार, 29/11/2012 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
(अवांतराला वैतागून) धागा का गोठविता ...??? प्रेरणा--- गरज हाय का..??? :-D र ला ट जोडले कसेतरी यमक जुळले बसल्या बसल्या कविता पडली हे मलाच कसे नाही कळले??? अर्थहीन शब्दांची तोडफोड, लीलया जमत आहे.. कोणत्याही विषयावर कविता पडते, हीच तर खरी गंम्मत आहे. ताकाला पण उ-कळ्या फुटतील, पूर्वार्धातले प्रतिसाद पाहून, पण उत्तरार्धात बसेल, धागा वाचनमात्र होवून... यदाकदाचित माझ्या काव्यप्रसवक्षमतेला, प्रथम प्रथम तु म्हणशील ईऽऽ ईऽऽ ईऽऽ... पण मी प्रतिसादांचा पा-ऊस बघून, असा हसेन---''ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!'' *(वि.अ.टु.प्र. = विडंबनाचा एक अतिटुकार प्रयत्न!! हलके घ्या आणि जमल्यास भर घाला)

गाडीतल्या गप्पा

लेखक आनंद भातखंडे यांनी मंगळवार, 27/11/2012 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
मी जरा लवकरच म्हणजे २:४५ ला चक्क हाफ डे घेऊन निघालो. विचार केलं ३:३० च्या आसपास कुठली तरी फास्ट लोकल मिळेल. आशेला नेहेमीच अपेक्षांचे पंख असतात नाही का? ऑफिस लोअर परळ येथे असल्याने दादरच्या गर्दीचा ससेमिरा चुकवण्यासाठी भायखळापर्यंत जाणे परवडते. बरं, भायखळ्याला गेलं की गाडीत चढायला मिळणार हे नक्की. ती शाश्वती दादरला उभे असणारे टीसी देखील देऊ शकणार नाहीत. बऱ्यापैकी वेळ असल्या मुळे रमत गमत भायखळा स्टेशन वर पोचलो. नवरात्रीचे दिवस, रिकामा प्लाटफॉर्म, त्यामानाने खुपच कमी गर्दी होती. पुरुषांच्या प्रथम वर्गाच्या डब्याच्या इथे तर आम्ही मोजून २-३ जण पण स्त्रियांच्या डब्याजवळ गर्दी फार होती.

माझी चार अंग वस्रे

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी बुधवार, 21/11/2012 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
जीला माहीत नाही आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती मुर्ख आहे - तीला जवळ येउ द्या त्यातच तुमचा फायदा आहे जीला माहीत नाही आणि जीला माहीत आहे की तीला माहीत नाही ती सरळमार्गी आहे - तीच्याशी लग्न करा आयुष्यभर टेंशन नाही जीला माहीत आहे आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती निद्रीस्त आहे - तीला झोपेतुन जागे करण्याच्या फंदात पडु नका कारण ती उठली तर तुमचा बजार उठेल त्या पेक्षा ती उठायच्या आत तिथुन सटका जीला माहीत आहे आणि जीला माहीत आहे की तीला माहीत आहे ती भयंकर हुशार आहे - तीच्या फारसे जवळ जाउ नका.

जगाच्या पाठीवर आणि आमच्या पोटावर....

लेखक वनक्या यांनी शुक्रवार, 16/11/2012 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली मला वाढत्या पोटाची भयंकर भीती वाटू लागली आहे आणि त्यापेक्षाही त्याच्यावर उगीचच सल्ले देन्यार्यांची तर जरा जास्तच...पोटा वर ( अर्थातच वाढत्या ) फुकट सल्ले देनार्याना सरकारने " पोटा " च्या कायद्या खाली अटक करावी असाच वाटू लागलय आता . " सकाळी उठून सूर्यनमस्कार घाला,पहाटे उठून रोज पलायाला जावा " इति पितामह .." तू .... आसन करायला सुरवात कर आणि मघ बघ सकाळी केलास तर दुपारपर्यंत २ इंच पोट कमी ......८ दिवस कर पोट कुठ आणि पाठ कुठ आहे हे बघनार्याला शोधून ही सपदयाच नाही ....

हल्ली तुम्ही भलतंच काही करत आहात का ?

लेखक चित्रगुप्त यांनी मंगळवार, 13/11/2012 01:56 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही हल्ली भलतंच काही करत आहात ? असाल, तर हा धागा खास तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, आपण मिपाकर म्हणजे छांदिष्टांची मांदियाळी - आपण काय काय करत नाही? कशानंतरी भारून जाऊन, रोजच्या रुटीनपेक्षा काहीतरी नवीन, वेगळंच, भलतंच - असं काहीतरी करण्याचा आपल्यापैकी प्रत्येकालाच नाद असावा. खाजच म्हणा हवंतर. तर सध्या तुम्ही असं भलतंच काय करत आहात ? ते लिहिण्यासाठी हा धागा. सुरुवात स्वत:पासून करतो: --------------------------------------------------------------------------------------------------------------- सध्या मी 'उदरनृत्य' अर्थात 'बेलीडान्स' शिकण्याच्या खटाटोपात आहे.

तुम्ही किती व्यवस्थित आहात?

लेखक फारएन्ड यांनी शनिवार, 10/11/2012 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल व्यवस्थितपणाचा रोग खूप पसरू लागला आहे. एका सर्वेक्षणानुसार जगातील बरेच (***) टक्के लोक आजकाल व्यवस्थित होऊ लागले आहेत. कित्येक लोकांना तर कळतही नाही कधी आपण व्यवस्थित झालो आणि कळेपर्यंत बराच उशीर झालेला असतो व पुन्हा अव्यवस्थित होणे फार अवघड होऊन बसते. ही खालची प्रश्नावली तुमची आत्ताची लेव्हल कळण्यासाठी उपयोगी पडेल. खालील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरांमधे तुमचे उत्तर "अ" असेल तर प्रत्येकी १००० गुण, "ब" असेल तर प्रत्येकी १०० गुण व "क" असेल तर प्रत्येकी १ गुण धरा व शेवटी बेरीज करा. प्रश्नावली सोडवण्याआधी: हे पान प्रिंट करा व नीट ठेवून द्या.

दारुबंदी झालीच पाहिजे!

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 09/11/2012 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
मद्यप्रेमी आणि मद्यपरिणामभयग्रस्त यांच्यात नेहेमीच चकमकी झडत असतात. दोन्ही पक्ष आपापल्या परीने योग्यच बोलत असतात. दोन घटका विरंगुळा म्हणुन वा मजा म्हणुन कधी चार दोस्तांबरोबर निवांत बसुन मैत्रीबरोबर मद्याचा आस्वाद घेणे काही गैर नाही - हे ही योग्य. एकदा पीण्याची चटक लागली तर बरबादी होण्याची खात्री हेही बरोबर. कोण आस्वाद घेईल आणि कोण व्यसनी होईल हे सांगणे अशक्य आहे. असो. सध्या सोत्रिंच्या चावडीवरून सुरू झालेल्या चर्चासत्रावरुन मला माझा एक जुना किस्सा आठवला.

चावडीवरच्या गप्पा – महाराष्ट्र की मद्यराष्ट्र

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 07/11/2012 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
“ते घोर कलियुग का काय म्हणतात ना, त्याची प्रचीती दिली हो तुमच्या साहेबांनी, बारामतीकर!”, घारुअण्णा तिरमिरीत चावडीवर प्रवेश करत. “ काय? आज कसला बार उडवताय घारुअण्णा?”, नारुतात्या. “अहो, ह्या बारामतीकरांच्या साहेबांनी महाराष्ट्रात दारूचा महापूर आणून महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ बनविण्याचा घाट घातला आहे, म्हणून म्हणालो घोर कलियुग”, घारुअण्णा भयंकर उद्विग्न होत. “कोण म्हणतंय असं ?”, इति नारुतात्या. “मटातली बातमी वाचली नाही का? ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी हे म्हटले आहे आणि ह्याचे सत्तापीठ बारामतीत आहे ह्याची चिंता व्यक्त केलीय.”, घारुअण्णा त्याच उद्विग्नतेत . “काय?