Skip to main content

जीवनमान

पुस्तक संस्कृती/पुस्तक प्रदर्शन

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 12/10/2012 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
वाचन संस्कृती लोपण्याच्या काळात,काहि व्यक्ति यासाठी हिरिरिने काम करतात.ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद असते. शिवाय ज्या भागात पुस्तकांची म्हणुन विशेष दुकाने नाहित तिथे तर अश्या कामांना अतिशय महत्व असते. हेच काम आज राज जैन यांनी सिंहगड रोडवर पुष्पक मंगल कार्यालय येथे १० दिवसांचे पुस्तक प्रदर्शन भरवुन केले आहे. वेगवेगळे बहुविध विषय,आणी दर्जेदार प्रकाशनं या दोहोंचा मिलाफ राज जैन यांनी उत्तम घडवुन आणला आहे.

चावडीवरच्या गप्पा – लग्नाचे वय

लेखक सोत्रि यांनी शुक्रवार, 12/10/2012 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
“कळस आहे हा मूर्खपणाचा! हसावं का रडावं ह्यापुढे आता?”, नारुतात्या कपाळाला हात लावतच चावडीवर आले. “कोणांचा आणि कसलां मूर्खपणां नारुतात्या?”, घारुअण्णा. “अहो, ही खाप पंचायत हो! म्हणे मुला- मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा कमी करा, का? तर त्याने म्हणे बलात्काराचे वाढते प्रमाण कमी होईल, आहे की नाही मूर्खपणा”, नारुतात्या. “ह्या शिंच्या पंचायतीला भारीच ब्वॉ पंचायती?”, घारुअण्णा. “सोळाव्या वर्षीच मुलामुलींचे लग्न झाली तर ती भरकटणार नाहीत आणि त्यातून बलात्काराच्या घटना घटतील असे त्यांचे म्हणणे आहे हो.”, शामराव बारामतीकर. “आयला खरंच आचरटपणा आहे हा.

एकापेक्षा एक.

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 09/10/2012 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ: मुंबै (आणी आश्चर्यकारकरित्या मराठी दुकानदार) "एक ** साइझ ची अंडरवेयर द्या ह"" "कोणाला हवी आहे" - दुकानदार "मलाच" - मी आश्चर्याने (ऐश्वर्या रायला हवी असेल तर मी कशाला येइन मरायला. हे मनात) "** ची घ्या. ** होणार नाही तुम्हाला" - इति दुकानदार (दुकानातल्या इतर ३-४ गिर्‍हाइकांसमोर) " ("भोसडिच्या" हे मनात) अंडरवेयर मी घालतो तर साइझ मला माहिती असणार ना?" " लोक मुद्दाम कमी सांगतात. आणी मग बदलुन मागतात" "तुम्ही वापरलेली अंडरवेयर बदलुन देता?" " आमी नाहिच देत हो. पण कष्टमर येतात त्याला काय करायचे?" "("ढेकण्या" हे परत मनात) मग तुमी द्या ना.

जहालभाषाचिकित्सक

लेखक राजेश घासकडवी यांनी सोमवार, 08/10/2012 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
जहालभाषाचिकित्सकची पार्श्वभूमी सांगाल का? प्रत्येक देशाचे, भागाचे, तिथे राहाणाऱ्या लोकांचे काही विशेष गुणधर्म असतात. तिथल्या जमिनीच्या मातीतून आणि नद्यांच्या पाण्यातून माणसांच्या नसानसांत वहातात. त्यातूनच त्या प्रांताची एक प्रतिमा तयार होते. महाराष्ट्राची तशी प्रतिमा फार मऊ मुलायम नाही असं नक्कीच म्हणता येईल. गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राचं वर्णन करताना मंगल, पवित्र वगैरे नमन करून झाल्यावर पहिली ओळ कुठची वापरली तर 'राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा' आणि 'अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा' असं म्हटलेलं आहे.

ट्रेन आणि थुंकी

लेखक वडापाव यांनी रविवार, 07/10/2012 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
शाळा संपली; दहावी पास झालो. चांगल्या कॉलेजात प्रवेशही मिळाला. आणि ओघानेच ट्रेनने नियमितपणे प्रवास करण्याचे दिवस सुरु झाले. ट्रेनमध्ये गर्दी असते, त्यापेक्षा बस बरी - अशा मताचा मी होतो. पण माझं हे मत, मला लहान असताना आईबरोबर लेडिज कंपार्टमेंटात दरवेळी चढावं लागल्याने तयार झालं होतं, तेव्हा आता ते मत बदलून, जनरल डब्यातला माझा रोजचा प्रवास माझ्या अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक सुखमय होऊ लागला. कधी जास्त गर्दीतून जावं लागलं, तरी मजा यायची. आणि मग ट्रेनपेक्षा बसचा प्रवासच कितीतरी जास्त क्लेशकारक आहे, अशा मताचा मी झालो. पहिला महिनाभर सेकंडक्लासात घालवला.

चावडीवरच्या गप्पा – मंत्रालयातील आग आणि पाणी सिंचन

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 04/10/2012 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
“अहो बारामतीकर, पाण्यामुळे तर आग विझते ना! पण इथे तर उलटच होतंय, मज्जाच आहे ब्वॉ!”, घारुअण्णा एकदम खुशीत कट्ट्यावर हजेरी लावत. “काय झाले आता?”, कोणीतरी. “अहो, मंत्रालयाला लागलेल्या आगीमुळे पाणी सिंचन घोटाळा करणार्‍यांचे फावले आहे.”, घारुअण्णा. “काय हो घारुअण्णा, कोणाचा जावईशोध म्हणायचा हा?”, इति शामराव बारामतीकर. “बोलून बोलून बोलणार कोण, उद्धव शिवाय आहेच कोण? असे जाहीर बोलण्याची छाती एका शिवसैनिकाशिवाय कोणाची असू शकते?”, इति बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका. “आयला, यू टू भुजबळकाका? ”, शामराव बारामतीकर. “मग काय!

गणपतीबाप्पा येता आमच्या घरी

लेखक हरिप्रिया_ यांनी सोमवार, 01/10/2012 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
. माझ लग्न झाल आणि मी दुबईला येऊन राहिले. पावसाळा तर अनुभवता आलाच नाही आणि त्यामुळे श्रावण ही नाही अन श्रावणातले सण ही नाही. मला वाटू लागलेलं गणपती पण असेच जाणार. काहिही न कळता. कोरडे. माझ मन खट्टू होऊन बसलं होत. तसा तर इथे आमचा एक मस्त मराठी ग्रुप आहे आणि एका घरी आमचे गणपतीबाप्पा पण विराजमान होतात. पण ह्या वेगळ्याच देशात आपले गणपती कितपत उत्साहात साजरे होतील याबद्दल मनात शंकाच होती.

राम .. राम .. राम ..

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 28/09/2012 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
राम... राम... राम... राम ... माळ घेऊन माझा जप चालू आहे कानावर बातमी पेट्रोल डिझेल महागले राम .. राम .. राम .. माळ घेऊन जप चालू कानावर बातमी कोळसा घोटाळा जलसिंचन घोटाळा राम . राम. जप चालू राम . सिलेंडरची टंचाई मरा.. मरा.. मरा... आजकाल माझा जप नीट का होत नाही, माझ्या रामालाच ठाऊक ! .

फेसाळबुक

लेखक समीरसूर यांनी गुरुवार, 27/09/2012 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या बायकोचं फेसबुक खातं नाहीये. मी तिला एक-दोनवेळा म्हटलं की फेसबुकावर खातं उघड पण तिला अजिबात रस नाही. तिचा प्रश्नः "काय करू मी फेसबुकावर येऊन?" "आपल्या शाळा-कॉलेजमधल्या मैत्रीणींशी आणि मित्रांशी कनेक्ट हो; फोटो शेअर कर...अजून काय? सगळेच करतात. आपण सगळ्यांच्या संपर्कात राहतो." "तुझे २०० मित्र आहेत फेसबुकावर, कुणा-कुणाशी तू वरचेवर संपर्कात असतोस? नुसतीच यादी मोठी असते, असा यादी करून ठेवलेला संपर्क खरे म्हणजे हृद्य नसतोच; तो नुसताच आभास असतो. तुमचा कॉलेजचा गृप पुण्यातच आहे. तुम्ही महिन्याला एकदा तरी भेटता, सहलीला जाता.