Skip to main content

जीवनमान

खादाड कंपू-२०१२

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 10/01/2012 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
या वेळी कट्टा जाहिर धागा काढुन ठरलेला असल्यामुळे,इतर अनेक मि.पा.करांप्रमाणे कट्ट्याविषयीची कल्पनाचित्र(जागा आधीच माहित असल्यमुळे ;-) ) आंम्ही मनात तयार केलेली होती.परंतू प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचल्यावर मात्र,हाटीलच्या भायेर(च)-''बनीयन ट्री''खाली(आमच्या आधी)जमलेली मेंबरं पाहुन आमी जरा शंकाकुल झालो होतो,म्हटलं...आधी आलेल्या बनीयन लेंगा प्रस्तावानुसार शेजारच्या गाडीत ती व्यवस्था केलेली आहे कि काय..?आणी नंतर सगळी मेंबरं.सॉरी सॉरी सभासद(हां आता कंसं सभ्य वाटलं बरं..!)जमल्यावर प्रत्येकाचं माप-काढुन त्या प्रमाणे ड्रेपरी वाटप वगैरे ठरलय की काय..?पण हाटीलच्या दरवाज्याजवळ गाडी(सॉरी टू व्हिलर ;-) )लावल्य

THE FATE !!

लेखक सुहास.. यांनी मंगळवार, 10/01/2012 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्व-प्रकाशित तो दिवस तसा सामान्यच होता, अगदी माझ्या बंगलोर वास्तव्यातल्या रोजच्या दिनक्रमासारखा! जवळ-पास सिंगल बॅचलर्स लाईफ!! रूम वर सकाळी सुमारे ११ च्या सुमारास उठायचे, ११. ४५ पर्यंत फ्रेश व्हायचे, काहीतरी पोटात ढकलायला बनवायचे, खायचे आणि निघायचे. जाताना टपरीवर चहा-सिगरेट मारायचा, चालत-चालत ई-सिटीस्थित प्रशस्त इन्फोसिसच्या गेट न. सहा पर्यंत पोहोचायचे, आपल्या क्यूबिकल ला एकदा पोचलो की काम, सोशल नेटवर्किंग च्या साईट्स आणि ब्रेक घेत आपली ८ वाजेपर्यंतची शिफ्ट संपवायची.

दी क्लिन (बोल्ड) पिक्चर!

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी गुरुवार, 05/01/2012 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
दी क्लिन (बोल्ड) पिक्चर! त्या पिक्चरच्या नावात जरी ‘डर्टी’ शब्द मुद्दाम टाकला असला तरी एका सत्यकथेची ती क्लीन स्टोरी असून ती पाहतांना त्यातील बोल्ड सीन्स ओघानेच अंगावर येत राहतात व नेमकं फिल्म इंडस्ट्रीत असंच घडतं का? या मंथनात रंगलेला प्रेक्षकच अखेरीस क्लीनबोल्ड होऊन थिएटरच्या बाहेर येतो... कथानक सर्वांना परिचित वाटावं असंच असलं तरी यशाच्या शिखरावर असतांना अल्पावधीत प्राप्त केलेलं ते भौतिकसुख कसं बोचू लागतं, कसा पलटवार करू पाहतं आणि एकदा जिंकलेला जुगार कसा लगेच हारावा लागतो याचं मोठं संयमी चित्रण करण्यात फिल्म यशस्वी ठरली आहे. थोडक्यात ‘विषय’ असा फुलत जातो... ती एक अल्लड मुलगी- रेश्मा.

कां वागतो माणूस असा?

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 03/01/2012 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
कां वागतो माणूस असा? कां नाही जगत माणूस म्हणून? . आयुष्यभर सावल्यांशी खेळतो, सावल्यांमध्येच रमतो सगळीच आंधळी कोशिंबीर, सावलीचा संसार सावलीशीच लख्ख सूर्यासारखे सत्य डावलून सावलीचा आभास आपलासा करतो कां? कां वागतो माणूस असा? सत्य तरी किती खरे, कुणास ठाऊक!! कुठेतरी मनात साठवलेले काही क्षण हे कां सत्य? कातड्याच्या डोळ्यांनी पाहिलेले, अन मांसाच्या कानाने ऐकलेले हे जर सत्य तर मग प्रत्येक माणूस "हरिश्चंद्र" कां नाही? उगाचं काही माणसे सत्य शोधण्यात आयुष्य वाया कां घालवतात? त्यांच्या आयुष्याचे हे सत्य त्यांना कळत कां नाही!! कां?
काव्यरस

सत्यम-शिवम-सुंदरम

लेखक नरेंद्र गोळे यांनी मंगळवार, 03/01/2012 07:55 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव डॉट कॉम ह्या संकेतस्थळावरील व्यक्तीरेखा “स्पा”, यांनी माझे गाव हा लेख लिहीला आणि तो माझ्या वाचनात आला. खरे तर असे गाव कित्येकांचे असू शकेल. मात्र ज्या ज्या गोष्टी वास्तव (सत्यं), पवित्र (शिवं), सुंदर (सुंदरम्‌) वाटाव्यात, त्या त्या सर्व गोष्टींचा आलेख तपशीलवार काढावा तसा तो लेख, मला वाटला. त्या लेखातील उदात्त स्मृतींच्या सान्निध्यात सतत राहावे असे मला वाटू लागले. असेही वाटले की असे सुंदर घर, गाव सोडून लोकं डोंबिवलीत येऊन राहूच कशी शकतात? असो.

पदमविभूषण ई.श्रीधरन यांस मानाचा मुजरा!

लेखक नरेंद्र गोळे यांनी रविवार, 01/01/2012 20:28 या दिवशी प्रकाशित केले.


पदमविभूषण डॉ. ईलत्तुवलपीळ श्रीधरन व्यवस्थापकीय संचालक, दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन.

१ जानेवारी... चलो पेरणेफाटा...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शनिवार, 31/12/2011 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
ऐतिहासिक पेरणेफाटा... पेरणे गावापासून दोन किमीदूरवर नव्याने हायवेला झालेली नागरवस्ती म्हणजे पेरणेफाटा होय. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याची हद्द इथे समाप्त होते. भीमा नदीवरील पूल ओलांडला की शिरूर तालुका लागतो. नव्याने वसलेल्या गावास इतिहास असू शकतो का? पण होय. पेरणेफाट्याला ऐतिहासिक महत्त्व आहे.

सोनेरी (पिकली) पाने २०११

लेखक आनंद घारे यांनी शुक्रवार, 30/12/2011 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
पिकल्या पानांनी गळून पडणे हा निसर्गाचा नियम आहे. यातली काही पाने सोनेरीच नव्हे तर ती बावनकशी सोन्याचीच असतात असे म्हणता येईल. अशा अनमोल पानांचा २०११ मध्ये नुसता खच पडला. निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये ज्यांनी सर्वोच्च स्थान संपादन केले किंवा सर्वोच्च पातळी गाठली अशा इतक्या व्यक्ती एका वर्षात जगाला सोडून गेल्याचे यापूर्वी कधी झाले नसेल. पूर्वी पंचावन्न वर्षे पूर्ण होताच सरकारी नोकरीमधून सेवानिवृत्त केले जात असे. त्याची मुदत आता वाढवून ५८ ते ६० वर्षांपर्यंत झाली आहे. पूर्वी सत्तरीला पोचेपर्यंत बहुतेक लोकांची क्रियाशक्ती क्षीण झालेली असे.

ब्रेक अप...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी मंगळवार, 27/12/2011 01:19 या दिवशी प्रकाशित केले.
माझी अपेक्षापूर्ती न करणाऱ्या या अनामिक नात्याचा मला भयंकर कंटाळा आलाय बघ. तू म्हणशील पुरुष इथून तिथून सारखेच असतात, मलाही तसंच समज हवं तर. तुझे सारे आरोप अन् आक्षेप मला मान्य आहेत. हो, मीही पुरुष आहे. मीही तुझ्यावर प्रेम करतांना एकच अपेक्षा ठेवली होती. ती सुरुवातीला तू समरसून पूर्ण करीत गेलीस. परंतु आता काळ बदलला, आपण जरा समंजस झालो आहोत. तुला तुझे करियर घडवायचे आहे. तू आता मध्यावर आली आहेस. अजून खूप पल्ला गाठायचा आहे. तू जीव तोडून काम करतेस, प्रसंगी ओव्हर टाईमलाही थांबतेस.