आठवणी
(हे पद्य नाही... तरीही मी ते असे लिहिले आहे कारण , ते असे वाचले असता जास्तं परिणामकारक वाटेल असे मला वाटते )
ओथंबलेलं आकाश
बरसतच नाही कधीचं
मनात दाटलेलं मळभ
पसरत राहतं आभाळावर
संध्याकाळच्या कृष्णछाया
पसरतात घरावर
घराच्या या भिंती
माझ्या एकांताच्या साक्षी
सारे भोग ..... सा-या वेदना
जपल्या आहेत त्यांनीच
हळुवार होणारं मन
सावरलं आहे त्यांनीच
कसं सांगु?
मिसळपाव
उद्घाटन होणार होते मलेशियाचे पंतप्रधान दातो(माननीय)स्री अब्दुल हजी अहमद बडावी यांच्या शुभहस्ते! आम्हाला सकाळी साडेनऊलाच ग्रेट हॉलमध्ये बोलाविले होते.