अंजलीची गोष्ट - तिघी (कथा)
"आई, मोहना आणि शालिनी बरेच दिवस म्हणतायत भेटूया म्हणून. या शनिवारी जाऊन येऊ? तू रियाला बघशील?" अंजलीने आईला विचारलं. आई होच म्हणणार आहे हे माहीत असलं तरीही रियाची जबाबदारी आजीवर टाकण्याआधी अंजली नेहेमी आजीची परवानगी घेत असे. आजीची आणि रियाचीसुद्धा!
शनिवारी लंचला त्या तिघींच्या ठरलेल्या सीफेस रेस्टाॅरंटमधे भेटायचा प्लॅन ठरला. हे रेस्टाॅरंट तसं थोडं लांबच पडायचं पण शांत, निवांत माहौल आणि खिडकीतून दिसणारा समुद्र ..... त्यामुळे तिघीनांही तिथे भेटायला आवडायचं. ड्राईव्ह करताना अंजली आठवू लागली. मेडिकल कॉलेज मधे सुरु झालेल्या या मैत्रीला आता तब्बल पंधरा वर्ष झाली होती.
मिसळपाव

रणखांबे मास्तर लईच दार्शनिक.
परीक्षेत दुसऱ्याचं बगून ल्हिवायचो तर म्हनायचा '' तू लेका बांडगूळच रहाणार आयुष्यभर ''
लई राग याचा तवा .
धाव्वी काय लाभली नाय - आलो पुन्यात .
वळखीतनं युवराजदादाला भेटलो , पुढारी माणूस, कामबी मिळालं .
यका खबदाडीत झेरॉक्स मशीन टाकून दिली.
आकडा टाकून कनेक्शनबी दिलं.
फिप्टी - फिप्टीला आपल्या बाचं काय जातंय ?
दिपवाळी झाली.
मावळतीची किरणे चहूकडे सोनं उधळीत होती,
ते सोनेरी लेणं लेऊन लाटाही चमचमत होत्या,
फेसाळत्या लाटांच्या गाजेने आसमंतास एक गूढगंभीर साज चढवला होता.
तिला समुद्र आवडतो, मनापासून..
त्याला माहित होतं, म्हणून तो तिला इथे घेऊन आला होता,
जिथे होते फक्त ते दोघे, समुद्र, आणि साक्षीला सांजवेळ..
तिच्याकडे बघून मंद स्मित करत त्याने तिचा हात हाती घेतला," खुश ना?"
तिचा चेहरा उतरला," किती कमनशिबी आहे मी,
समोर अथांग समुद्र..