इक बंगला मेरा न्यारा.
तसे आम्ही या बंगल्यात अनेक वर्षं राहिलो आहोत. माझ्या वडिलांनी हौसेने चांगला प्रशस्त बंगला बांधला. तेंव्हापासून इथे रहाण्याची इतकी संवय लागली होती की चार दिवस कुठे गांवाला गेलो तरी आईला मी, परत कधी जायचं, असं सारखं विचारुन भंडावून सोडत असे. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर, बाहेरगांवच्या कित्येक चांगल्या ऑफर्स मी नाकारल्या आणि आमच्या गांवातच नोकरी पत्करली. पगार थोडा कमी मिळायचा, पण मला ही जागा सोडायची नव्हती. आयुष्य तसं संथगतीने पण खाऊन्-पिऊन सुखी गेले. मुलं मोठी झाली, थोरला अमेरिकेला गेला आणि धाकटा मुंबईला गेला. थोड्याच दिवसांत त्याने मुंबईतल्या धंद्यात जम बसवला. मोठा फ्लॅट घेतला.
मिसळपाव

आये , सरकारनी हजार पाचशेच्या नोटा बंद केल्यात.नाय बदलल्यातं त्याला किंमत ऱ्हाणार नाय", किसना म्हातारीला म्हणाला.
"माह्याकं काह्याचा पैका." म्हातारी फणकारली.
"हां ! माजघरात ठिवलेत गठुड्यात. पण अडनडीला म्हून रुपया द्याची वासना झाली नाही" सून आतून कडाडली.
"तू माह्या पैशावंच टपून बस. औशादपाण्याला कवा धीला मोकळ्या मनानी पैका?